पोस्ट्स

जून, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांचा आज सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. शितल सांगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक – जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांचा आज सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. शितल सांगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा परिषदेच्या विविध संघटनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी  बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी अनिल लांडगे यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या अभ्यासू व्यक्यिमत्वा मुळे जिल्हयासाठी त्यांनी महत्वाचे योगदान दिले असून पदाधिकारी व प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना अनिल लांडगे यांनी आजपर्यंतच्या प्रवासाबाबत माहिती दिली तसेच जिल्हा परिषदेत काम करताना अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय असणे आवश्यक असून अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना विविध नियम तसेच त्यांच्या हक्कांबाबत माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना शिक्षण सभापती यतीन पगार यांनी लांडगे हे अभ्यासू अधिकारी असल्याचे सांगत यापुढेही त्यांनी विकासासाठी मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. उप मुख्य

दिंडोरी लोकसभा मतदार संघासह नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ जन्य परिस्थिती बाबत संसदेत मांडण्यात आला शून्य प्रहरात प्रश्न  !!! थोडक्यात बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
दिंडोरी लोकसभा मतदार संघासह नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ जन्य परिस्थिती बाबत संसदेत मांडण्यात आला शून्य प्रहरात प्रश्न  !!!              दिंडोरी लोकसभा मतदार संघासह नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ जन्य परिस्थिती बाबत केंद्र शासनामार्फत सदर विषय मार्गी लावणेकामी शून्यकाळात विनंतीपूर्वक प्रश्न सादरीकरण करताना डॉ.भारती ताई प्रवीण पवार हीच परिस्थिती कायम राहिली आणि शासनामार्फत जर यावर काही तोडगा काढला गेला नाही तर डिसेंबर अखेर पर्यंत जवळपास 3000 गावांच्या वर दुष्काळाचे भयंकर सावट तयार होईल. करिता केंद्र सरकार द्वारा जलयुक्त शिवार अभियान व इतर योजनांच्या अंतर्गत सदर प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यात यावी.

आयपीएस अधिकारी बनण्या चे स्वप्न उरी बाळगत कर्करोगाशी झुंग देणाऱ्या सागरला त्याच्या आवडत्या महानायक कडून भेट, दिला आयपीएस अधिकारी दर्जा ! पोलिस आयुक्त व डॉक्टर यांचे सर्व स्तरांतून स्वागत !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली मानवता क्युरी हास्पीटल येथे  सागर बोरसे याची भेट IPS अधिकारी बनण्या चे स्वप्न उरी बाळगत कर्करोगाशी झुंग देणाऱ्या सागरला त्याच्या आवडत्या महानायक कडून भेट, दिला IPS  अधिकारी दर्जा !         आज दिनांक २७ जून रोजी आपले नाशिक शहराचे आवडते पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील यांनी पुन्हा एकदा शहराला नव्हे तर माणुसकीला शोभेल असे एक उदाहरण समोर केले निमित्त होते ते एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर मधील एक पेशंट चि. सागर बोरसे याच्या इच्छेचे आणि ऑपरेशन पूर्वी व्यक्त केलेली इच्छा. सागरच्या पायाला झालेल्या कॅन्सरमुळे आज त्याचा पाय गुडघ्यापासून काढण्याची शस्त्रक्रिया होती. सागरला आयुष्यात आयपीएस ऑफिसर बनायचे आहे. पण काळाने घातलेला घाला आणि त्यावर कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने थोड्या वेळासाठी का होईना पण मिळवलेला विजय यावर मात म्हणून सागरची असलेली प्रबळ इच्छाशक्ती हेच एक जिवंत उदाहरण. सागर ने डॉक्टर राज नगरकर यांच्याकडे एक इच्छा व्यक्त केली ती होती आपले नायक पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांना  भेटण्याची. डॉ. राज नगरकर यांनी क्षणाचाही वि

भारतात होणार रेनो ट्रायबरचे ग्लोबल प्रीमियर !! ग्रुप रेनोची नवीकोरी कार, सर्वात प्रशस्त आणि अत्याधुनिक गेम चेंजर ! भारतीय वाहनबाजारात लवकरच दाखल होत आहे रेनो ट्रायबर !!! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
## भारतात होणार रेनो ट्रायबरचे ग्लोबल प्रीमियर   ग्रुप रेनोची नवीकोरी, सर्वात प्रशस्त आणि अत्याधुनिक गेम चेंजर !  ## ## रेनो ट्रायबर ## नवी दिल्ली::- रेनो हा भारतातील पहिल्या क्रमांकाचा युरोपियन ब्रँड असून त्यांनी नवीन ग्लोबल प्रॉडक्ट, रेनो ट्रायबर ची आज भारतात घोषणा केली आहे. रेनो ट्रायबर हा भारत आणि फ्रान्समधील रेनो टीमचा संयुक्त प्रकल्प आहे. तसेच हे जगातील पहिले असे वाहन जे भारतीय बाजारपेठांसाठी डिझाईन केले आहे.          “ग्रुप रेनोकरिता भारत ही प्रमुख बाजारपेठ समजून भारतात रेनो उचलली आहे,  कंपनीची महत्त्वाकांक्षा ही धोरणात्मक योजना "ड्राईव्ह द फ्युचर" प्रमाणे मोठी आहे. 2022 पर्यंत रेनोची विक्री दुप्पट करायची आहे. रेनो ट्रायबर ही एक अद्वितीय संकल्पना जी प्रमुख भारतीय बाजारपेठ लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. रेनो ट्रायबरचा जन्म, विकास आणि निर्मिती भारतातील आहे, भारतीय ग्राहकांचा प्राधान्याने विचार करून ती बनविण्यात आली आहे. इतर देशांमध्ये उपलब्ध होण्याआधी ती भारतात उपलब्ध होईल. हे वाहन खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार आहे," असे ग्रुप रेनोचे सीईओ थिएरी बोल्लो

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तलाठ्याला न्यायालयाने ठोठावली शिक्षा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा!!!

इमेज
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तलाठ्याला न्यायालयाने ठोठावली शिक्षा !! नासिक::- वाडीवऱ्हे येथील वडीलोपार्जित शेतगट ५३ चे फेरफार रजिस्टर चर्या ६(ड) नोंदीच्या नकला देणेकरीता तत्कालीन तलाठी सुनतीलाल शिवाजी गावीत याने ४००/- रुपये लाचेची मागणी केली होती. सदर रक्कम १३ आॅगस्ट २०१४ ला वाडीवऱ्हे बाजार पटांगणात स्विकारण्यात आली होती, त्यांचा गुन्हा वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता, गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते त्याचा निकाल काल मा. जे. पी. झपाटे , जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ४ नासिक यांनी निकाल दिला असून कलम ७ प्रमाणे तीन वर्षे कैद व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी ची कैद, तसेच कलम १३(२) प्रमाणे चार वर्षे कैद व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी ची कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे गुन्ह्याचे कामकाज श्रीमती विद्या जाधव यांनी पाहीले.

पोलिस अधिकारी, कर्मचारी यानी सहकुटुंब लुटला नाटकाचा आनंद !! भरत जाधव चा पोलिस आयुक्तांनी केला सत्कार !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
                 नासिक::-पोलीस आयुक्तालय नाशिक शहर व एकदंत फिल्मस यांच्या संयुक्त विद्यमाने काल कालिदास कलामंदिर येथे भरत जाधव निर्मित "मोरूची मावशी"  या मनोरंजनपर नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस आयुक्तालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकुटुंब नाटकाचा आस्वाद घेतला. नासिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालय नाशिक शहर यांचे वतीने सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव व एकदंत फिल्मसचे प्रोड्युसर अमित कुलकर्णी यांचे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त अमोल तांबे, पोलीस उपायुक्त श्रीमती माधुरी कांगणे,पोलीस उपायुक्त श्रीमती पौर्णिमा चौगुले व सर्व सहा.पोलीस आयुक्त उपस्थित होते .

सर्वच जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना पदवी पर्यंत मोफत शिक्षण द्यावे- छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेची मागणी ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सर्वच जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना पदवी पर्यंत मोफत शिक्षण द्यावे- छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेची मागणी !!              नासिक::- आपल्या 'व्यवस्थेतच ' भयानक दोष आहे. मराठा समाजासह धनगर ,आणि मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न मार्गी का लागत नाहीत ? शेतकऱ्याच्या बांधावर स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे पाणी का गेलं नाही ? त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव का मिळत नाही ? असे अनेक प्रश्न राज्या समोर आ वासून उभे आहेत.आणि दुसऱ्या बाजूला या समस्यांना सामोरे जात असताना पर्याय मिळत नसल्याने या प्रत्येक समाजातील घटक जीवन संपविण्याचा निर्णय घेत गळ्याला फास लावून घेत आहे.एकामागून एक माणूस अशा पध्दतीने स्वतःला संपवू लागला तर शासन नावाची व्यवस्था प्रेतांवर राज्य करणार आहे का? अशा ओसाड मनोवृत्तीचा कारभार सुरू असेल तर आपल्या सर्वांना आपल्या राजकारणाचा, समाजकारणाचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे,आपण हा सारा उपद्व्याप का आणि कुणासाठी करतो आहोत? म्हणूनच समाजाच्या पदरात त्याच्या हक्काचे योग्य दान टाकण्याचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे.पहिली पायरी म्हणून सध्या ऐरणीवर असलेला मराठा, धनगर,  मुस्लिम आर

डॉ. भारती पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
दिंडोरी लोकसभा मतदार संघातील प्रथम महिला खासदार म्हणून चांगल्या मताधिक्याने विजय मिळवणाऱ्या डॉ.भारती पवार यांचा दि.22 जून रोजी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय येथे सत्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .        सध्या दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन सुरू असताना मु ख्य मंत्र्यांनी अधिवे शन सं पल्यानंतर डॉ. भारती पवार यांना मुंबईत सत्कारासाठी निमंत्रित केले होते, दिं डो री लोकसभा मतदारसंघा तून डॉ. पवार या पही ल्या महिला खासदा र व मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने त्यांचा सन्मानाने सत्कार सोहळा भाजपा महाराष्ट्र प्र देश कार्याल यात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

योग विद्याधाम यांच्यावतीनेयोग दिनानिमित्त (२१ जून) मोफत सामुहिक योग साधना व रक्तदान शिबीर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
योग विद्याधाम ओंकार नगर नाशिक यांच्यावतीने योग दिनानिमित्त मोफत ‘ सामुहिक योग साधना’ व ‘रक्तदान शिबीर’ नाशिक,दि.२० जून :- योगविद्याधाम ओंकार नगर तसेच अत्रेयनंदन सामाजिक संस्था नाशिक यांच्यावतीने (२१ जून) जागतिक योगदिनाचे औचित्य साधून माऊली लॉन्स, कामटवाडे सिडको नाशिक येथे ‘सामुहिक योग साधना’ व ‘रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कुलगुरू डॉ.विश्वासराव मंडलिक, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे उपस्थित राहणार आहे. या सामुहिक योग साधना व रक्तदान शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन योग विद्याधामचे नाशिकचे अध्यक्ष मनोहर कानडे, उपाध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम पुरी, कार्यवाहक अॅड. अमरजितसिंग गरेवाल, सिडको विभाग अध्यक्ष राजेंद्र फड, कार्याध्यक्ष संजय जाधव, कार्यवाहक शंकरराव बोराटे, योगशिक्षिका कांचन खाडे यांनी केले आहे. योग विद्याधाम यांच्यावतीने निरोगी आयुष्यासाठी योगाचा प्रचार आणि प्रसार केला जात असून त्यांच्याकडून वर्षभर विविध योग वर्गाचे आयोजन केले जाते. नाशिक शहरात प्रकल्प प्रमुख व सहप्रकल्प प्र

पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या  संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांच्या सेवेत छावा क्रांतीवीर सेनेकडून पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, रूग्णवाहिका यांचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या शुभहस्ते उद्घाटन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
छावा क्रांती वीर सेनेकडून पिण्याच्या पाण्याची व वैद्यकीय सेवा वारकऱ्यांच्या चरणी रूजू नाशिक::-छावा क्रांतीविर सेनेच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या  संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांच्या सेवेत पिण्याच्या पाण्याचे टँकर्स , रूग्णवाहीका , औषधं आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा  आज बुधवार दि.१९ जून रोजी रूजू केली. या सेवेला युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले (खासदार)  यांच्या विशेष प्रेरणेने ही सेवा रूजू केल्याचे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर व प्रदेश संघटक नितीन सातपुते यांनी सांगीतले.             छत्रपतींनी वारकऱ्यांच्या पायी दिंडी सोहळ्याला अभय दिले, वारकऱ्यांची सेवा केली त्या अनुषंगाने छत्रपती शिवरायांचे पाईक म्हणून छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने ही सेवा पुरवली जाते. आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका, डॉक्टर व सहकाऱ्यांचे पथक व सोबत विविध आजारांवरील गोळ्या औषधे आदींचा पुरवठा करून आज नाशिकमध्ये दिंडी सोहळ्याचे स्वागत करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॕ.न

२१ जून-जागतिक योगदिन, योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे. हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे--अमृता वसंत बोरसे  (योगशिक्षिका)!! सर्वांनी खालील लिंकवर क्लिक करून जरूर वाचा व आपल्या स्नेहीजनांच्या माहीतीसाठी लिंक शेअर करा !!!

इमेज
योग हा शब्द 'युज' या संस्कृत धातू पासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. योग ही भारतातील पांच हजार वर्ष प्राचीन ज्ञानशैली आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे, ज्यात शरीर ताणले, वाकवले, पिळले जाते आणि अवघड श्वसन प्रक्रियांचा अवलंब केला जातो. खरेतर मानवी मन आणि आत्मा यांची अनंत क्षमता जाणून घेणाऱ्या या विज्ञानाची ही म्हणजे योगाभ्यासाची केवळ वरवरची ओळख झाली. योगाभ्यासामध्ये जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो.          योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे. हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे.”         महाभारत आणि भगवत गीतेच्या फार पूर्वी वीस पेक्षा ज्यादा उपनिषदामध्ये सर्वोच्च चेतनेसोबत मनाचे मिलन होणे म्हणजे ‘योग’ असे सांगितले गेले आहे. हिंदू दर्शनातील प्राचीन मुलभूत सूत्रांच्या रुपामध्ये योगाची चर्चा आहे, ज्यांचा अलंकृत उल्लेख पतंजली योग सूत्रमध्ये आहे. महर्षी पतंजली आपल्या दुसऱ्याच योग सूत्र मध्ये योगाची व्य

महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेचा उपक्रम कौतुकास्पद - नामदार सांगळे ! पहिली ते दहावी इयत्तेच्या ६५० मुलींसाठी ९५०० वह्यांचे मोफत वाटप !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेचा उपक्रम कौतुकास्पद - नामदार सांगळे महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटना, जिल्हा शाखा नाशिक व स्वयंसेवी संस्था यांचे वतीने इयत्ता पहिली ते दहावी इयत्तेच्या ६५० मुलींसाठी सर्व अभ्यासक्रमाच्या एकूण ९५०० वह्यांचे मोफत वाटपाचा कार्यक्रम शासकीय कन्या शाळा नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला होता. एक वही मोलाची, सावित्रीच्या लेकीची हे ब्रीद वाक्य घेऊन औषध निर्माण अधिकारी संघटना गत पाच वर्षापासून अखंडपणे या कार्यक्रमाचे नियमित प्रमाणे आयोजन करत आहे. मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार शीतल उदय सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली  तसेच अर्थ व बांधकाम समिती सभापती मनिषा रत्नाकर पवार, उपशिक्षण अधिकारी अनिल शहारे यांचे हस्ते पार पडला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत शेवग्याच्या झाडाचे रोपटे देऊन करण्यात आले.                                        शीतल सांगळे यांनी आपल्या मनोगतात नमुद केले की, नाशिक जिल्हा परिषदेची पुरातन काळातील नाशिक शहरातील शासकिय कन्या विद्यालय ही मुलींची एकमेव शाळा असून या शाळेत गोरगरिब कुटूंबातील नाशिक शहरातील मुल

शाळा व अंगणवाडी प्रवेशोत्वसानिमित्त विविध वेशभूषा केलेली मुल, लेझीम पथक, बैलगाडीसारख्या वाहनातून मिरवणूक यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक :  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये  आज शाळा प्रवेशोत्सव सोहळा अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. अंगणवाडींमध्येदेखील नव्यानेच दाखल झालेल्या मुलांच्या पायाचे ठसे घेण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सलग दुस-या वर्षी नाशिक जिल्ह्यात अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात शाळा व अंगणवाडी प्रवेशोस्तव साजरा करण्यात आला असून ग्रामीण भागातील शाळांकडे पालकांचा कल वाढावा व शिक्षणाचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी व्यापक प्रमाणात हा सोहळा साजरा करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी दिली. शाळा व अंगणवाडी प्रवेशोत्वसानिमित्त विविध वेशभूषा केलेली मुल, लेझीम पथक, बैलगाडीसारख्या वाहनातून मिरवणूक यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण होते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकल्याण समितीच्या सभापती अपर्णा खोसकर यांनी नाशिक तालुकयातील सावरगाव, गंगावरे, मुंगसरे येथील शाळा व अंगणवाडींना भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. जिल्हा परिषदेच्या वतीने शाळा प्रवेशोत्सव सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात ११

नाशिक जिल्हयाने राबविलेल्या उपक्रमांची राज्यभरात अंमलबाजावणी करण्यासाठी शासनाकडे शिफारस करणार- आ. विवेक पंडित !!! आदिवासी क्षेत्रातील शंभर टक्के जागा भरण्याची डॉ.नरेश गिते यांनी मांडली सूचना !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक –  नाशिक जिल्हयाच्या दौ-यावर आलेल्या राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीने आज गोल्फ क्लब येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत विविध विभागांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा आढावा घेवून जिल्हा परिषदेच्या कामाचे कौतूक करतानाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केलेल्या विविध सुचनांबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. आदिवासी क्षेत्रातील राबविण्यात येणा-या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी शासनाने राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती गठीत केली आहे. आमदार विवेक पंडीत यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने आज नाशिक जिल्हयास भेट दिली. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध विभागांमार्फत आदिवासी भागात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. आढावा घेतानाच आदिवासी क्षेत्रासाठी योजना राबविताना काही शिफारशी असल्यास याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी आदिवासी क्षेत्रातील १०० टक्के जागा भरण्याची सुचना केली. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हयात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने

साथीचे आजारांवर नियंत्रणासाठी ग्रामपंचायतीमध्ये एक कोरडा दिवस पाळण्यात यावा-इशादिन शेळकंदे ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक – पाणी गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सलग दुस-या वर्षी सर्व तालुक्यांमध्ये जलकुंभांची स्वच्छता व शुद्धीकरण तसेच हातपंपांचे शुद्धीकरण करण्यात येत असून १६ ते ३० जुन पर्यत चालणा-या या अभियानात आतापर्यत जिल्हयातील पेठ, निफाड, बागलाण व सिन्नर येथे मोठया प्रमाणात जलकुंभांची स्वच्छता करण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा येथे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या स्वच्छता व हातपंप शुद्धीकरण अभियान प्रभावीपणे राबविणेबाबतचे दिले असून याचा दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे.       ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश  आहे.  गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे मुलभूत कर्तव्य आहे. यासाठी पाणी व स्वच्छता विभागातील पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या, हातपंप शुद्धीकरण, टी.सी.एल. साठवणूक व टी.सी.ए

दिंडोरी लोकसभा मतदार संघात विविध विकास कामांसाठी 22 कोटींच्या रस्ते कामांना तत्वतः मंजुरी---खा.डॉ.भारतीताई पवार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
दिंडोरी लोकसभा मतदार संघात विविध विकास कामांसाठी 22 कोटींच्या रस्ते कामांना तत्वतः मंजुरी---खा.डॉ.भारतीताई पवार   नाशिक:  दिंडोरी लोकसभा मतदार संघातील प्रथम महिला खासदार म्हणून चांगल्या मताधिक्याने विजय मिळवणाऱ्या डॉ.भारतीताई पवार यांनी मतदार संघाचा विकासासाठी  संपूर्ण मतदार संघातील रस्त्यांची सद्यस्थितीची निवडून आल्यानंतर त्वरित  पाहणी करून तसा अहवाल संबधित विभागाकडून मागवून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची मुंबईत भेट घेऊन  मतदार संघातील रस्त्याच्या कामांसाठी निधी मिळावा अशी मागणी नवनिर्वाचित खासदार डॉ. भारती पवार यांनी केली.तर सदर मागणीची त्वरित दखल घेत नामदार पाटिल यांनी ५०५४(३) व ५०५४(४) अंतर्गत सदरच्या कामांना निधी देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.  खासदार पदावर विराजमान होताच सत्कार समारंभांना फाटा देत दुष्काळजन्य परिस्थिती असलेल्या गावांना अधिका-यांना सोबत घेऊन दुष्काळी भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन दुष्काळावर कशी मात करता येईल यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना संबधीताना केल्या एवढेच नव्हे तर गेली अनेक दिवसांपासून दिडोंरी मतदार संघातील रस्

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांना आवाहन पत्र !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक- पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये २० ते ३० जुन या कालावधीत पावसाच्या पाण्याची साठवणुक करण्यासाठी अभियान राबविण्याचे निर्देश केंद्र  शासनाने दिले असून याविषयी आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींना शासनाकडून प्राप्त झाले आहे. सदर अभियान राबविण्याबाबत तालुकास्तरीय यंत्रणेला निर्देश देण्यात आले असल्याची माहिती माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली. केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार देशातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पावसाचे पाणी साठवणुकीसाठी अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये श्रमदानातून बांध-बंदिस्ती, नदी व ओढयात चेक डॅक तयार करणे, गाळाचा उपसा करणे, तलावांचे खोलीकरण व सफाई, वृक्षारोपन आदि विविध प्रकारची काम करावयाची आहेत. यासाठी २२ जुन रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घ्यावयाची असून त्यामध्ये पंतप्रधान महोदयांचे पत्र सर्वांना वाचून दाखवायचे आहे. यासाठी केंद्र शासनाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे मराठी भाषेतील आवाहन पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे. प्रत्येक

छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेच्या वतीने निवासी जिल्हाअधिकारी यांना SEBC जात प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदत वाढ मिळावी अन्यथा जनआंदोलन इशाऱ्याचे निवेदन देण्यात आले. !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेच्या वतीने निवासी जिल्हाअधिकारी रामदास खेडकर यांना १६ % मराठा आरक्षणाचा लाभ होण्यासाठी SEBC जात प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदत वाढ मिळावी  व ५०% शिक्षण शुल्क  मिळणेबाबत ... निवेदन देण्यात आले.        नाशिक::-छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेच्या वतीने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या १६ % आरक्षणाचा लाभ होण्यासाठी SEBC जात प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदत वाढ  मिळावी. शैक्षणिक वर्ष २०१९ विद्यालय ,महाविद्यालयात  प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थी व पालकांना याबाबत संभ्रम आहे. मागील शैक्षणिक वर्षी ५०%  शिक्षण शुल्क  बाबत असलेला निर्णय काही महाविद्यालयांनी पाळला नव्हता,  त्या सदर निर्णयाची अंमलबजावणी व्हावी व महाविद्यालयांनाही निर्णयाचा लाभ द्यावा जेणेकरून महाविद्यालय विद्यार्थ्याना तो लाभ ,सूट देतील .              मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातील शिफारसीनुसार मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास घोषित करून मराठा समाजाला (SEBC) प्रवर्गातून १६% आरक्षण लागू करण्यात आले आहे.  प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना मिळालेल्या आरक्षण कोट्यातील १६

१) बांधकामांसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम एस.) प्रणाली राबविण्यात येणार ! २) शाळा प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन !! ३) जिल्हयात ग्राम बाल विकास केंद्रे स्थापन करणार !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
बांधकामांसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम एस.) प्रणाली राबविण्यात येणार नाशिक – जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागातील बांधकामांसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम एस.) प्रणाली राबविण्यात येणार असुन १ एप्रिल २०१९ पासून नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत मंजूर असलेल्या सर्व विभांगांच्या सर्व योजनांची व कामांची देयके प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम मधून अदा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व संबधित विभागांना सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सर्व दिली. नाशिक जिल्ह्यात बांधकाम विभाग, लघु पाटबंधरे विभाग तसेच पाणीपुरवठा विभाग येथे प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम एस.) प्रणालीमध्ये तांत्रिक दुरुस्ती करुन यापुढे मोजमाप पुस्तिकाही संगणकीकृत पध्दतीनेच करणेबाबत शासनाने मान्यता दिली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे व बांधकाम सभापती मनीषा पवार यांच्या हस्ते मागील वर्षी जिल्ह्यात या उपक्रमास सुरवात झाली होती. राज्याने या प्रकल्पासाठी प्रायोगिक तत्वावर नाशिक जिल्ह्याची निवड केली होती त्यान

खोटी माहिती सादर केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार ! उप अभियंत्यांनी दिलेला अंतराचा दाखला ग्राह्य धरला जाईल !! शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांबाबत डॉ. गितेंचा इशारा !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक - शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीही शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्यात येणार असून रिक्त पद आणि सामानिकरणानुसार रिक्त पद च्या आधारे ही प्रक्रिया करण्यात येणार आहे. याबाबत आज जिल्हा परिषदेत गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संकेतस्थळावर माहिती भरण्यात आली. गट शिक्षण अधिकारी यांनी सादर केलेली माहिती खोटी असल्यास व त्यामुळे बदल्यांमध्ये प्रश्न निर्माण झाल्यास संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिला आहे. शासनाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची बदली प्रक्रिया संदर्भात शाळानिहाय रिक्त जागा आणि समानीकरणानुसार रिक्त ठेवायची पदे निश्चित करून घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेमार्फत अंतरजिल्हा बदलीने आलेले, सेवानिवृत्त झालेले, मयत झालेले, तसेच मनपा मालेगात हद्दवाढ झाल्याने रिक्त जागांमध्ये सुधारणा झालेने यानुसार समानीकरणानुसार रिक्त ठेवायची पदे निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच शासन निर्णयानुसार आदिवासी क्षेत्रातील सर्व जागा भरण्याची कार्यवाही करणे आव

अलकाताई आपलं चुकलंच, माफी मागितली तरीही, माफ करतील हा त्यांचा मोठेपणा समजावा लागेल !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
अलकाताई आपलं चुकलंच, माफी मागितली तरीही नासिककर माफ करतील हा त्यांचा मोठेपणा समजावा लागेल ! काल नासिकच्या कालीदास कलामंदिर येथे चित्रपटाच्या पोस्टर व ट्रेलर च्या अनावरणासाठी अलका कुबल, शंतनु मोघे यांना आयोजकांनी निमंत्रित केले होते, या प्रसंगी नासिक शहरातील ख्यातनाम संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे, बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष, नगरसेवक, चित्रपट दिग्दर्शक, कलाकार, चित्रपट रसिक, पत्रकार असे मान्यवर उपस्थित होते,        "आयोजकांनी कार्यक्रमाबाबत दिनांक, वेळ, ठिकाण ठरवल्यानंतर साधा फोन केला नाही" असा जाहीर आरोप अलका कुबल यांनी रसिकांसमोर केला व तीव्र नाराजी व्यक्त करत दिड-दोन मिनिटांत तीन तास ताटकळत असलेल्या रसिकांसाठी आपला "अमुल्य" वेळ दिला.         परिचय कर्त्याने तर चक्क पाच मिनिटे यथासांग परिचय करून दिला, नासिक करांनी रसिकव्रुत्तीने टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली अन्  त्याबदल्यात कुबल यांनी रसिकांसमोर आयोजकांचे "साध्या फोनवरून" जाहीर वाच्यता करुन वाभाडे काढले याबाबत रसिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. नासिक च्या रसिकांची आवडती "माहेरची साडी फेम&

शिवराज्यभिषेक सोहळ्यात चीन,पोलंड,ट्युनिशिया,बल्गेरिया,ग्रीसचे राजदूत राहणार उपस्थित ! शिवराज्याभिषेक सोहळा ०६ जूनला लोकोत्सव म्हणून साजरा होत असून मोठ्या संख्येने नाशिककर होणार साक्षीदार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
शिवराज्याभिषेक सोहळा ०६ जून लोकोत्सव म्हणून साजरा करणार, मोठ्या संख्येने नाशिककर होणार साक्षीदार ! चीन,पोलंड,ट्युनिशिया,बल्गेरिया,ग्रीसचे राजदूत राहणार उपस्थित नाशिक(१)::-अखिल भारतीय शिवराज्यभिषेक  महोत्सव समितीचे वतीने दुर्गराज किल्ले रायगडावर ०५ व ०६ जून २०१९ रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजीराजे व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे, यंदा प्रथमच जागर शिवकालीन युद्धकलेचा व सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा कार्यक्रम यावर्षी आकर्षण बिंदू असणार आहे,  विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी    चीन,पोलंड,ट्युनिशिया,बल्गेरिया,ग्रीस  या पाच राष्ट्रांचे राजदूत राहणार उपस्थित राहणार आहेत. अशा या ऐतिहासिक लोकोत्सवासाठी   शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समितीच्या वतीने सदस्य गणेश कदम, करण गायकर यांनी केले आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी लोकशाहीच्या तत्त्वावर स्वराज्याची उभारणी केली. अठरा पगड जाती, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन शिवरायांनी आदर्श राज्याची घडी बसविली.