पोस्ट्स

भर पावसात छावा क्रांतीवीर सेनेचा बदनापुरांत पायताण मोर्चा ! दोन महीन्यात रस्ते दुरूस्त न झाल्यास आमदार खासदार यांना तालुका बंदी - करन गायकर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
         बदनापूर( दि.१६)::- तालुक्यातील गावा-गावांना जोडणारे रस्ते अतिशय खराब झालेले असून या रस्त्यावरून साधे चालणेही दुरापास्त झालेले असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड हाल होत असल्याने बदनापूर येथे भर पावसात छावा क्रांतीवीर सेनेकडून मोर्चा काढण्यात आला.           दोन महिन्यात रस्ते दुरुस्त झाले नाही तर आमदार व खासदारांना तालुक्यात फिरकू देणार नसल्याचा इशारा छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे.          बदनापुर ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिशय दूरवस्था झालेली असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला अतिशय त्रास सहन करावा लागत असल्यामुळे हे रस्ते लवकरात लवकर तयार करावेत तसेच  रोषनगाव येथील काही शेतकऱ्यांना महापारेषणकडून तयार होत असलेल्या विद्युत टॉवरचा मोबदला मिळालेला नसताना शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे या  शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत हे  गुन्हे मागे घ्यावे या प्रमुख मागणीसाठी बदनापूर ते तहसिल कार्यालयापर्यंत  जवळपास ३ किलोमीटर  मोर्चा निघाला, बदनापूर परिसरात आज सकाळपासून पाऊस सुरू होता या पावसातही मोठया संख्येने ठिकठिकाणच्या गावाच्या तरुणांनी सहभाग नो

राहुडे अतिसाराचे बळींची संख्या चारवर !! नागरिकांनी पाणी शुद्ध करून पिणे व प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी-शितल सांगळे, खासदार चव्हाण यांनीही केली पाहणी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
              नाशिक(१३)::– दुषित पाण्यामुळे  अतिसाराचा उद्रेक होवून ४ जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविली गेलेल्या सुरगाणा तालुक्यातील राहुडे ग्रामपंचायतीस आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी भेट देवून याबाबत माहिती घेतली.  दरम्यान, खासदार हरीश्चंद्र चव्हाण यांनीदेखील राहुडे गावास भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा केली. ८ जुलै रोजी सुरगाणा तालुक्यातील राहूडे येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत अति पावसामुळे विहिरी शेजारील नाल्यातील पाणी गेल्यामुळे पाणी दुषित होवून अतिरासाराची लागण झाली असे प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते, त्यापाठोपाठ कळवण तालुक्यातील वीरशेत येथे पाणी पिण्यास अयोग्य असलेल्या हातपंपाचे पाणी पिल्यामुळे साथीचा उद्रेक झाला होता. याबाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत, जलव्यवस्थापन सभेत तसेच स्थायी सभेत याविषयी चर्चा झाली होती. घटनेची सर्व चौकशी करून संबधितांवर कार्यवाही करण्याचे आदेश शितल सांगळे यांनी दिले होते. जिल्ह

"परी हूँ मैं" ७ सपप्टेंबर ला सुरू होतेय ग्लँमरस दुनियेची सफर ! सविस्तर माहीतीसाठी दीनानाथ यांजकडून न्यूज मसालाच्या रसिकांसाठी, लिंक क्लिक करा !!!

इमेज
दीनानाथ यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ]       ग्लॅमरस दुनियेची सफर  ‘ परी हुँ  मैं ’  या मराठी चित्रपटातून घडणार        ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महराष्ट्रात होणार प्रदर्शित             गाजलेल्या   ‘ वेगे वेगे धावू ’  एकांकिकेवर आधारित               टीव्हीच्या स्मॉल स्क्रीनमध्ये मोठी ताकद आहे, या छोट्या पडद्याने आपल्या घराचा ताबा कधी मिळविला हे आपल्या ध्यानातही आले नाही. मोठ्या कलाकारांसह लहान मुलांना नवी ओळख देणाऱ्या या छोट्या पडद्याचं विश्वच निराळं आहे. टिव्ही जगताच्या ग्लॅमरस आणि टीआरपीच्या विश्वाची सफर घडवणारा ‘‘परी हुँ मैं’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि योगायतन फिल्मस निर्मित ‘परी हुँ मैं’ या चित्रपटाची निर्मिती डॉ. राजेंद्र प्रताप सिंग आणि शिला सिंग यांनी केली असून संजय गुजर हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत तर रोहित दास शिलवंत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. लहान मुले टार्गेट ठेउन टीव्हीवर अनेक कार्यक्रम होतात, चंदेरी दुनियेचा हाच विषय लेखिका इरावती कर्णिक यांनी ‘वेगे वेगे धावू’ या एकांकिकेमधून मा

थर्माकोल विक्रेत्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा नाही, ! समाजहितासाठी बंदी आवश्यकच !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
इको फ्रेंडली ‘उत्सवी’नानासाहेब शेंडकरांच्या लढ्याला यश! थर्माकोल विक्रेत्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही , समाज हितासाठी बंदी आवश्यक –   मुंबईतील थर्माकोल फॅब्रिकेटर अॅन्ड डेकोरेटर्स असोसिएशनची विनंती फेटाळून लावत उच्च न्यायालयाने थर्माकोल बंदी कायम केली आहे. त्यामुळे थर्माकोल विक्रेत्यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. ‘पर्यावरणाला हानिकारक अशा वस्तूंना परवानगी देणे शक्य नाही’, असे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने याविषयी दिले आहे. तर बंदी संदर्भातील सविस्तर आदेश याआधीच दिलेले असून, विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला आहे असेही उच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. पर्यावरणाला हानी पोहचविणाऱ्या वस्तूंचा विरोध गेली ३२ वर्षे सातत्याने नानासाहेब शेंडकर करीत आहेत. अत्यंत कष्टातून जेजे महाविद्यालयात कलेचे शिक्षण घेऊन नानासाहेब शेंड्कारांनी कलासाधना जोपासली आहे. गेली पन्नास वर्षे ते कलाक्षेत्रात भरीव योगदान देत आहेत. त्यांच्या  'aaartist'  या संस्थेद्वारे कलेचे विविध पैलू ते घडवीत आहेतच पण त्यासोबतच ‘उत्सवी’ संस्थेच्या वतीने समाजासाठी अत्यंत महत्वाचे कार्य त्यां

वाँक विथ कमीशनर कार्यक्रम सप्टेंबर नंतर पुन्हा सुरू होणार - आयुक्त ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
            नासिक (१२)::-महानगरपालीकेचे आयुक्त तुकाराम मुंढे नासिकला आल्यापासुन विविध उपक्रम राबवित आहेत त्यातीलच एक नावाजलेला उपक्रम "वाँक विथ कमीशनर". दर शनिवारी सकाळी शहरांतील वेगवेगळ्या ठिकाणी नाशिक शहरांतील नागरिकांना भेटून त्यांना व शहरांतील जनतेस येणाऱ्या अडचणी समजून घेत त्या कमीतकमी कालावधीत सोडविण्यास प्राधान्य देत आहेत, या प्रशासनासाठी पथदर्शी ठरलेल्या उपक्रमाला पावसामुळे ब्रेक लागला असुन हा उपक्रम सप्टेंबर नंतर पुन्हा त्याच उत्साहाने सुरू होणार आहे. त्यासंबंधीच्या सूचना आज अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.नाशिक महानगरपालिकेच्या वतीने "वॉकविथ कमिशनर" "walk with commissioner" हा उपक्रम सप्टेंबर २०१८ पासुन पुनश्च: सुरू होऊन या कार्यक्रमाच्या माध्यमातून महानगरपालिका आयुक्त श्री तुकाराम मुंढे अधिका-यांसह उपस्थित राहुन नागरिकांशी थेट सुसंवाद साधुन नागरिकांच्या तक्रारी/सुचना जाणुन घेणार आहेत.

भूकंपप्रवण क्षेत्रास भेट देण्यात प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता ! खासदारांनी केली नाराजी व्यक्त !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
पेठ तालुक्यातील गोंदे, निरगुडे, भायगाव, आड, उस्तळे, या परिसरात दहा जुलै रोजी २.७ रिष्टर स्केलचा भुकंप झाला १९९५ पासून  ८२ वेळा भुकंपाचे धक्के बसले परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही तेथे आज खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी भेट दिली व या धक्का दायक बाबीकडे दुरदर्शन, वर्तमानपत्रात बातमी आली,तरी साधा प्रशासनांतील तलाठी सुध्दा तेथे जाऊन चौकशी करण्याची तसदी घेतली नाही, बाकी मोठे आधिकारी तर लांबची बाब अशा शब्दात तीव्र नापसंती व्यक्त केली. याबाबत तहसीलदार, पोलीस यंत्रणेने तेथील पोलीस पाटील सरपंच यांनी लेखी कळवल्या नंतर जाणे क्रमप्राप्त असतांनाही या ठिकाणास भेट देण्याचे औदार्य दाखविले जाऊ नये हि प्रशासनाची उदासीनतेला उत्तर म्हणून खासदारानी भेट दिली, सोबत प्रशांत भदाणे, रघुनाथ चौधरी,  बापु पाटील.भाऊ माळगावे, गणपत चौधरी,  कांतीलाल राऊत, यशवंत खंबाईत, संपत भोंडवे, तसेच गोंदे.निरगुडे .भायगाव येथील सरपंच व पोलीस पाटील हजर होते....

देशसेवेचा वसा जपत देशाची मान उंचावणे आजच्या विद्यार्थ्यांच्या हाती आहे-डाँ.रविंद्रकुमार सिंघल, (नासिक पोलीस आयुक्त), पश्चिम विधानसभा मतदार संघातील १५०० विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा , आयोजक आमदार सीमा हिरे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
         नाशिक(८)::-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा आज संपन्न झाला कार्यक्रमाला नाशिकचे पोलिस आयुक्त डाँ.रविंद्रकुमार सिंघल  प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते. त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषणाप्रसंगी जीवनांत यशस्वी होत असतांनाच सामाजिक समरसता अंगी बानगावी, आत्मसात करावी व देशसेवेचा वसा जपत देशाची मान जगात उंचावणे हे सर्वस्वी आपल्यासारख्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या हाती अाहे असे मनोगतातून व्यक्त केले, या प्रसंगी आमदार सीमा महेश हिरे , जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी नितिन बच्छाव, सुनील बागुल, भाजपा नेते महेश हिरे, मनपा स्थायी समिती अध्यक्ष हिमगौरी आडके, सभागृह नेता दिनकर पाटिल, भाजपा नवीन नाशिक अध्यक्ष बाळासाहेब पाटिल सातपुर मंडळ चे अध्यक्ष शशिकांत जाधव, रश्मि हिरे नाशिक पश्चिम मतदारसंघाचे सर्व नगरसेवक नगरसेविका भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा,कार्यकर्ते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील खुप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पालक वर्ग नागरिक उपस्थित होते कार्यक्रमात १५०० गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे

राष्ट्रसंत भैय्युजी महाराज अस्थिकलश दर्शन व विसर्जन आज गोदातीरी झाले, यानिमित्त रामक्रुष्ण लहवितकर महाराजांचे प्रवचनातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली !!!!

इमेज
नासिक(८ जुलै १८)::-आज प.पु.भैय्युजी महाराज यांच्या अस्थिविसर्जन व कलश दर्शन गोदावरीती करण्यात आले.        राष्ट्रसंत, सद्गुरू, प.पु.डाँ.भैय्युजी महाराज यांच्या आकस्मित निधनाने समाजमन हळहळले, धर्मक्षेत्र, सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र असेल त्या सर्वांची मोठी हानी झाली असे हभप रामक्रुष्ण महाराज लहवितकर यांनी  उपस्थितांना आपल्या किर्तनाच्या माध्यमांतून समजावून दिले, आज अस्थिकलश दर्शन व विसर्जन निमित्त किर्तन प्रवचन आयोजित केले होते, नासिक शहर व जिल्हा सर्वोदय परिवार , छावा क्रांतीवीर सेना यांनी या प्रवचनाचे आयोजन करून प्रवचनातून अध्यात्म, जीव व परमात्मा, म्रुत्यु व म्रुत्यु पश्चातील जीवन याचबरोबर भैय्युजी महाराजांचाही परिचय करून दिला.          महाराजांचा मानवता धर्म हा आजही त्यांच्या आत्मारूपी वावराने आपल्या पाठीशी सदैव राहील कारण ते समाजासाठी झटलेत, समाजाला दिशा देणारे राष्ट्रसंत होते, संतांचे निर्माण व त्यांचे जीवन मानवी जीवनातील वास्तव्य हे आत्मारूपाने कायम असते.      यानंतर नासिक तसेच इतर ठिकाणांहून अस्थिकलश दर्शनाला आलेले धार्मिक, राजकीय , सामाजिक, क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्ध

पंढरपुरच्या विठ्ठल दर्शनाला नासिकहून सायकल वारी चे सालाबादाप्रमाणे आयोजन,! सायकल प्रेमींना सोमवारपर्यंत (दि. ९ ) सहभागी होण्याचे आवाहन-प्रविणकुमार खाबिया, सायकलिस्ट वारकरी व यावर्षीचा संदेश सविस्तरतेसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नासिक:(7)::-नासिक सायकलिस्ट व दातार कँन्सर जेनेटिक्स लिमिटेड यांच्यातर्फे संयुक्त विद्यमाने आषाडी एकादशी निमित्त नासिक ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले असुन सायकल प्रेमींनी सोमवार पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले असुन आतापर्यंत नासिक जिल्ह्यासह मुंबई, पुणे, ठाणे, सिन्नर, सायखेडा, निफाड, पिंपळगांव, संगमनेर, अहमदनगर, व जिल्हाभरांतून ४०० सायकल प्रेमींनी नोंदणी केली आहे.           आयपीएस हरिष बैजल यांच्या संकल्पनेतून गेली सात वर्ष हा उपक्रम दरवर्षी नवीन संदेश घेऊन पार पडत आहे, यावर्षी झाडे लावणे (जगविण्याच्या उद्देशाने योग्य त्या ठिकाणी व जबाबदारी वितरीत करून)  तसेच शुन्य प्लास्टिक हा संदेश घेऊन सायकल वारी १३ जुलै रोजी सकाळी ६:०० वा. नासिक येथील गोल्फ क्लब मैदानावरून निघणार आहे.         नासिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत माहीती दिली, यांवेळी दातार कँन्सर जेनेटीक्सचे मिलींद अग्निहोत्री, तसेच सकलिस्टचे सचिव नितीन भोसले, राजेंद्र वानखेडे, योगेश शिंदे, राजहंस, रत्नाकर आहेर उपस्थित होते.        दरवर्षी सुधारीत स्वरूपात

ग्रामपंचायतींमधील माहीती संकलनासाठी जिल्हा परिषदेकडून गुगल एक्सलशीटच्या वापरास सुरूवात-राजेंद्र पाटील ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
         नाशिक(७)::-जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील विविध विषयांची माहिती संकलित करण्यासाठी गुगल एक्सलशीटचा वापर करण्यास सुरवात केली आहे. यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांबाबत प्रपत्र तयार करण्यात आले असून प्रत्येक ग्रामपंचायतीमधून सदरची प्रपत्र भरण्यात येणार आहेत. याबाबत आज ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आज आढावा बैठक घेऊन याबाबत माहिती देण्यात आली. तसेच ग्रामपंचायत विभागाच्या विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.        ग्रामपंचायत विभाग हा जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक महत्वाचा विभाग आहे. सर्व प्रकारच्या योजनाची अंमलबजावणी ग्राम स्तरावर ग्रामसेवकाकडून करण्यात येते. तसेच विविध प्रकारचे अहवाल व माहितीदेखील ग्रामसेवकाकडूनच घेण्यात येते. जिल्हा व तालुकास्तरावर विविध आढावा बैठकींसाठी सदरची माहिती आवश्यक असते. यासाठी ग्रामपंचायत विभागाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती संकलनासाठी विविध विषयांचे प्र