पोस्ट्स

जिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नासिक ::-  जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी वर्ग-२ भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांस काल लाचलुचपत विभागाच्या वतीने ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. तक्रारदार यांची पत्नी जिल्हा.प. उर्दू प्राथमिक शाळा चांदवड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून नेमणुकीस असतानाचे तत्कालीन कालावधीत भाऊसाहेब चव्हाण गटशिक्षण पदावर कार्यरत होता. त्यावेळी तक्रारदार यांच्या पत्नीची वेतन निश्चिती होवून ही डिसेंबर १९ पासून वेतन मिळाले नव्हते त्याबाबत तक्रारदाराने खात्री केली असता त्याच्या पत्नीचे सेवापुस्तकामध्ये तत्कालीन गट शिक्षणाधिकारी याची स्वाक्षरी नसल्याने वेतन काढून अदा करण्यात आले नव्हते. म्हणून माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांने सेवापुस्तिकेत सही करण्यासाठी १५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली व तडजोडी अंती ६०००/- रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत विभाग नासिक कडून पंच साक्षीदारांसमक्ष पकडण्यात आले. सदर कारवाई जिल्हा परिषद नासिक येथील माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली.

कोरोनाला रोखण्यासाठी आमदार निधीतून १८ लाख ६० हजाराचा निधी ! तालुक्यातील सर्व शासकीय विभागांना पल्स अँक्सोमीटर व थर्मामीटरचे वाटप !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस, कोरोनाला रोखण्यासाठी आमदार दिलीप बनकर यांच्या निधीतून १८ लाख ६० हजाराचा निधी... निफाड  तालुक्यातील सर्व शासकीय विभागांना पल्स अँक्सोमीटर व थर्मामीटरचे वाटप. नासिक ::- निफाड तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वत्र भीती पसरली असून कोरोना आजाराचे रुग्ण आढळल्या पासून या महामारीतून बाहेर पडण्यासाठी आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहे.  तालुक्यातील सर्व शासकीय विभागातील कर्मचारी सर्वसामान्य नागरिक यांच्या आरोग्य अबाधित राखण्यासाठी आमदार दिलीप बनकर यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत निफाड विधानसभा मतदार संघामध्ये कोविड - १९ चां मुकाबला करण्यासाठी १८ लाख ६० हजार रुपयांच्या निधीची तरतूद आमदार दिलीप बनकर यांनी करून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीना २०० नग, प्राथमिक आरोग्य केंद्र ३५ नग, ग्रामीण रुग्णालय  १० नग, पंचायत समिती १० नग, पोलीस स्टेशन १० नग, नगरपंचायत कार्यालय सर्व विभाग १५ नग व इतर शासकीय कार्यालय २० नग असे एकूण ३०० नग पल्स अँक्सोमीटर व ३०० नग थर्मामीटर साहित्याचे आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.   कोरो

कर्तव्यावर असताना दावचवाडीचा भूमिपुत्र शहीद ! उद्या होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! न्यूज मसाला परीवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली, जयहिंद, जयहिंद !!!!

इमेज
संतोष गिरी यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस, कर्तव्यावर असताना दावचवाडीचा भूमिपुत्र शहीद ! उद्या होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नासिक::- छत्तीसगड येथे १११ बटालियनमध्ये सेवेत असलेल्या आणि निफाड तालुक्यातील दावचवाडी येथील भूमिपुत्र राजाराम चिंधूबाबा कुयटे शहीद झाले आहेत.  कर्तव्यावर असताना गुरुवारी रात्री त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते.            याबाबत माहिती अशी की, छत्तीसगड येथे १११ बटालियनमध्ये सेवेत असलेल्या राजाराम चिंधूबाबा कुयटे कर्तव्यावर असताना गुरुवारी (दि. ९)  रात्री साडेअकराच्या सुमारास ह्रदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ४९ होते. उद्या शनिवार दि.११, सकाळी दावचवाडी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. राजाराम कुयटे यांना बालपणापासूनच देशसेवा करण्याची आवड होती. रानवड येथे त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. तर बारावीपर्यंतचे शिक्षण पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयात झाले. त्यानंतर लगेचच ते देशसेवेत रूजू झाले. राजाराम कुयटे यांनी गावातील मुलांना देखील देशसेवेचे धडे दिले होत

@ वर्तमानपत्रांचे भवितव्य याविषयी सतिष जोशी यांचा लेख ! @ आश्र्वासित प्रगती योजनेचा कर्मचाऱ्यांना लाभ ! @ राजगृहावरील तोडफोडीचा निषेध ! @ राष्ट्रीय वेबिनार-कोविड १९ सकारात्मक मिडीया आणि समाज ! @ रासाकासाठी ठिय्या आंदोलन ! @ निसाकासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून पाठींबा ! @यासह इतर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
@ वर्तमानपत्रांचे भवितव्य याविषयी सतिष जोशी यांचा लेख ! @ आश्र्वासित प्रगती योजनेचा कर्मचाऱ्यांना लाभ ! @ राजगृहावरील तोडफोडीचा निषेध ! @ राष्ट्रीय वेबिनार-कोविड १९ सकारात्मक मिडीया आणि समाज ! @ रासाकासाठी ठिय्या आंदोलन ! @ निसाकासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून पाठींबा ! यासह इतर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !

शिवव्याख्याते सुनिल भोर यांच्या मातोश्रींचे दु:खद निधन... ९ जुलै रोजी दारणातीरी दशक्रिया विधी !!

इमेज
शिवव्याख्याते सुनिल भोर यांच्या मातोश्रींचे दु:खद निधन... मंगळवार दि. ३० जुन रोजी शिवव्याख्याते सुनिल भोर यांच्या मातोश्री कै. तुळसाबाई दशरथ भोर (वय ५०)  आजारी असल्याकारणाने घोटी येथील रूग्णालयात त्यांचे उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले. त्या वाघेरे येथील राहणार असून त्यांच्या पश्चात पती, दोन मुले व एक मुलगी असून ईगतपुरी तालुक्यात तसेच सुनील भोर यांच्या शिवप्रेमी चाहत्यांमध्ये  कै. तुळसाबाईंच्या जाण्याने शोककळा पसरली आहे. दशक्रिया विधी ९ जुलै रोजी वाघेरे येथे दारणातिरी करण्यात येणार आहे.       न्यूज मसाला परीवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ! शिवव्याख्याते सुनील भोर-7743888608

निवृत्त वायुसेना अधिकाऱ्याचा विश्वनाथ सेवा समुहाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
विश्वनाथ सेवा समूहाचा, समाजोपयोगी उपक्रम              नाशिक ( प्रतिनिधी)- आपल्या मुलामुलींचे विवाह योग्य वयात व्हावे ही सर्व पालकांची इच्छा असते. आपल्याला सुयोग्य जोडीदार मिळावा ही  युवक- युवतींची अपेक्षा असते. मात्र सध्याच्या काळात सर्व समाजात विवाह ठरविणे अतिशय जिकिरीचे झाले आहे. एकीकडे वय वाढत जाते व समस्या उग्ररुप धारण करते. यावर उपाय म्हणून सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी सतीश पेठकर यांनी विश्वनाथ सेवा समूहाची स्थापना केली आहे. त्याद्वारे ब्राह्मण समाजातील उपवर वधू - वरांसाठी विनामूल्य स्थळे सुचविण्यात येत आहेत.            पालकांनी विहित नमुन्यात आपल्या विवाहयोग्य मुला - मुलींची माहिती भरून फोटोसह पाठवावी. प्राप्त स्थळांच्या माहितीनुसार योग्य स्थळ सुचविले जाते. कुंडली पडताळणी करुन अठरा किंवा त्याहून जास्त गुण असलेली निवडक स्थळे पाठविण्यात येतात. त्यामुळे निवड करणे सोपे होते.याशिवाय आवश्यकतेनुसार विवाह जुळण्यासाठी मध्यस्थी व मार्गदर्शनही करण्यात येते. ज्यांचे वय वाढले आहे अशी विवाहेच्छू मुलेमुली तसेच विधुर, विधवा,घटस्फोटीत, दिव्यांग या वर्गवारीतील सर्वांना माहिती पाठवता येईल.

सामाजिक कोरोना संपला काय ! कुठे गायब झालेत मदत करणारे राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते ? उत्तर हवंय, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सामाजिक कोरोना संपला काय ! कुठे गायब झालेत मदत करणारे राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते ? जागतिक महामारी कोरोना उर्फ कोविड-१९ ने जगात डिसेंबर १९ पासून धुमाकूळ माजवायला सुरूवात केली, अनेकांचा जीव घेतला, अनेक कुटुंबे देशोधडीला लागण्याची चिन्हे असताना त्यांना आधार द्यायला सामाजिक, राजकीय हात सरसावले होते. कुठे गेलेत सारे आता ? हा प्रश्न कुणाला पडला असेल तर त्याचे उत्तर आपणच शोधायला हवे, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी कुठे लपले नाहीत, त्यांची वृत्तीही बदलली असावी असे नाही, त्यांच्याकडील पैसा संपत्ती संपली असे ही नाही, मग मार्च- एप्रिल मधील त्यांची सामाजिक दानशूरता आज का दिसत नाही ? आणि का दिसावी ?             जनहो, राजकारणी किंवा सामाजिक संस्था, व्यक्ती त्यांच्यापरीने जी मदत सर्वसामान्यांपर्यंत पोहचवत होते तीचा विपर्यास केला गेला. तो कुणी केला ? आपणच ना ? कोरोना संपला नाही, लस आजही उपलब्ध झालेली नाही, कधी येईल याची शाश्वती नाही (मात्र येणार हे निश्चित), अशी परिस्थिती असताना आपण स्वत:वर जी बंधने घालायला हवी होती ती स्विकारली नाहीत याचाच परिणाम राजकारणी, सामाजिक संस्था,व्यक्ती बाजारातून अचा

केशरी शिधापत्रिका धारकांना देखील सवलतीच्या दरात जुलै व ऑगस्टमध्ये धान्यवाटप करण्यात येणार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
आणखी दोन महिने केशरी शिधापत्रिका धारकांना देखील सवलतीच्या दरात धान्य मे आणि जून महिन्यामध्ये एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतलेला होता. सदर योजना  आणखी दोन महिने चालू ठेवली जाणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री ना.छगन भुजबळ यांनी दिली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या 3 कोटी 8 लाख नागरिकांना  या योजनेचा फायदा होत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना राज्यात १ फेब्रुवारी २०१४  पासून अंमलात आली त्यामध्ये महाराष्ट्राला ७ कोटी इतका इष्टांक होता. म्हणजेच त्यावेळेचे एकूण ८ कोटी ७७ लाख लाभार्थीपैकी १.७७ कोटी लाभार्थी अपात्र ठरले.शहरी भागात एकूण ५९ हजार ते १ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना तर  ग्रामीण भागात ४४ हजार ते १ लाख पर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले  ए.पी.एल केशरी कार्डधारक लाभार्थी वंचित राहिले.त्यामुळे तत्कालीन आघाडी शासनाने मे,२०१४ ते ऑक्टोबर,२०१४ पर्यंत स्वखर्चाने त्या केशरी कार्डधारकांना जवळ जवळ १८० कोटी दर म

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने आंदोलन करण्यात आले ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने आंदोलन करण्यात आले !             नाशिक - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय राज्य सरकारी / निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर व कंत्राटी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा परिषद आवारात निदर्शने आंदोलन करुन जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. जिल्हा परिषद मुख्यालय व सर्व पंचायत समित्यां समोरही फिजिकल डिस्टन्स पाळत निदर्शने करुन तालुका प्रशासनामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी बोलतांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण आहेर म्हणाले की, शासनाच्या धोरणाविरोधात  २२ मे आणि ४ जून २०२० रोजी राष्ट्रीय, राज्य व जिल्हा स्तरावर तीव्र निदर्शने पाळून निदर्शने आंदोलनातून कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांनी असंतोषात्मक आक्रोश व्यक्त करून निषेध दिन पाळला होता. मात्र शासनाने याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करून कोवीडच्या नावाखाली कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, कामगारांचे आर्

संपादकीय- काॅग्रेस संपवायला कोण निघाले आहे ? ** सावरगाव खुर्द ते देवरगाव रस्त्याचे वाजले बारा ! ** महावितरणच्या गलथान कारभारामुळे व्यावसायिक अंधारात ! ** इतर बातम्यासह सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
काॅग्रेस संपवायला कोण निघाले आहे ! काॅंग्रेसमुक्त भारत करण्याची भाषा भाजपकडून २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केली गेली, १२५ वर्षांपेक्षा अधिक परंपरा असलेल्या काॅंग्रेसला संपविणे भाजपाला ही अवघड वाटत असेल म्हणून दुधाची तहान ताकावर भागवावी या उक्तीप्रमाणे भाजपाने प्रचार केला, भारताला काॅंग्रेसमुक्त करण्याची जबाबदारी मतदारांवर सोपविण्यात आली पण संपविण्याची भाषा ना मतदारांना करू दिली ना स्वत: भाजपाने उचलली, यांतच खरी गोम आहे ती समजणाऱ्यांनी समजून घ्यावी व समजू न शकणाऱ्यांनी "डोक्याची दही" करू नये हा मानसिकतेच्या खेळाचे फासे फेकून भाजपा नामानिराळा झाला, याचा भाजपाला अपेक्षित असलेला फायदा तर झाला, मग संपविण्याची भाषा कोणी करावी ?            राष्ट्रीय काँग्रेस संपत चालली असून पूर्णपणे संपलेली नाही, केंद्रात विरोधी पक्ष नेतेपदी बसण्याइतके संख्याबळ मिळवू न शकणे हा "संपली" असा गृहीत धरणे चुकीचे वाटते. सक्षम नेतृत्व मिळाले तर पुन्हा उभारी घेणे काॅग्रेसला शक्य आहे पण गांधी घराणे एकाधिकारशाही व रिमोट कंट्रोल ठेवण्याचे काम जोपर्यंत थांबवत नाही तोपर्यंत काठावर पास नव्हे त