दुष्काळी परिस्थितीत थकीत वीज बीलामुळे बंद पडलेली ४२ गांव पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ नरेश गितेंनी बोलविलेल्या बैठकीतील चर्चेनंतर यशस्वीपणे सुरू !
नाशिक - गेल्या दोन महिन्यापासून थकीत वीज बिल व नादुरुस्त केबलमुळे बंद असलेली ४२ खेडी पाणी पुरवठा योजना अखेर शुक्रवारपासून (दि. ९) सुरु करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेने जिल्हा पाणी पुरवठा देखभाल दुरुस्तीमधून १३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे तसेच वीज वितरण विभागाने पिण्याच्या पाणी प्रश्नी संवेदनशीलता दाखविल्यामुळे योजना कार्यान्वित करण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. ४२ खेडी पाणी पुरवठा योजनेंतर्गत नांदगाव व चांदवड तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र वीज बिलाची रक्कम वारंवार थकीत राहत असल्याने ही योजना बंद पडत आहे. गेल्या दोन महिन्यापासून थकीत बिलामुळे या योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. ऐन दुष्काळी परिस्थितीत पाणी पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे ४० गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक गावांमध्ये टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. ही योजना तत्काळ सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीतही याबाबत चर्चा झाली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनीदेखील ग्रामीण पाणी पुरवठा