तीनशे स्वयंसेवकांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत श्रमदानातून राबविली स्वच्छता मोहीम ! मोहीमेत मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारींसह अनेकांचा सहभाग !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
नाशिक- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आज किल्ले रामशेज (ता. दिंडोरी) येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस.यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या श्रमदानातुन रामशेज गावात तसेच किल्याच्या माथ्यावरील विविध प्रकारचे प्लास्टिक जमा करण्यात आले. या मोहिमेत तीनशेहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. जिल्हा परिषदेच्या वतीने ग्राम दत्तक योजना राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत दिंडोरी तालुक्यातील गावांमध्ये श्रमदान मोहीम सुरू करण्यात आली आहे. आज सकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, दिंडोरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी चंद्रकांत भावसार, सरपंच जिजाबाई कांजळे, उपसरपंच संजय बोडके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभिनयाचा शुभारंभ करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी किल्याच्या पायथ्यापर्यंत स्वतः श्रमदान करून प्लास्टिक संकलित केले. किल्यावरील मंदिर तसेच परिसराचीही यावेळी स्वच्छता करण्यात आ