पोस्ट्स

निसर्गाचं गाणं, लोकसंस्कृतीचं लेणं ! निसर्ग व लोकसंस्कृतीप्रेमींसाठी खास लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
निसर्गाचं गाणं ; लोकसंस्कृतीचं लेणं !    दुर्गम भागात वस्ती करून उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक जमाती भारतात आहेत. त्यांना मूलवासी किंवा आदिवासी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात ठाणे, नाशिक, नंदुरबार, तसेच विदर्भातील काही भाग आदिवासी बहुल आहे. शेजारच्या डांग भागातही आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. त्यात प्रामुख्याने वारली, कोकणा, कातकरी, गोंड, कोरकू, भिल्ल या जमातींचा समावेश होतो. त्यांच्या जीवनशैलीवर जसा निसर्गाचा प्रभाव आहे, तसाच तो त्यांची लोकगीते, लोककथांवरही आहे. सूर्यचंद्र, डोंगरदऱ्या, पशुपक्षी, झाडंझुडपं, सभोवतालचा परिसर यांचं वर्णन आणि गुणगान त्यात आढळतं. ते त्यांच्या लोकसंस्कृतीचंच कलारूप आविष्करण आहे. वारली चित्रशैलीत तर ते अधिक नितळपणे प्रतिबिंबित होतं. सध्या वसंत ऋतूत जणू सारी सृष्टीचं गाणं गात असते.     ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणाऱ्या वारली चित्रशैलीला बऱ्याचदा लोककथांंचा  आधार असतो. लोकगीतांमधील लय, ताल व विचार चित्रांमध्ये प्रकट होतो. लोकसंस्कृतीची रसरशीत भावानुभूती त्यातून मिळते.आदिवासी वारली जमातीतील कलाकार, विशेषतः स्त्रिया आपल्या झोपडीच्या भिंती चित्रांनी सजवतात.

एक मार्च रोजी राबविली जाणार जंत विरोधी मोहीम ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
जंता पासून मुक्त , होतील मुले सशक्त ! एक मार्च रोजी नाशिक जिल्ह्यात राबविली जाणार जंत विरोधी मोहीम ! नाशिक::- जिल्ह्यामध्ये येत्या १ ते ८ मार्च सप्ताहात १ ते १९ वर्षे वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना जंतविरोधी गोळी दिली जाणार आहे, भारतात ५ वर्षाखालील मुला-मुलींमध्ये ७० टक्के रक्तक्षयाचे प्रमाण आढळते, महाराष्ट्रात पाच वर्षाखालील कुपोषणा  मुळे वाढ खुंटलेल्या  बालकांची टक्केवारी एन एफ एच एस ३ सर्वेनुसार १५ ते १९ वर्षे वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलीं मध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो तसेच  महाराष्ट्रात मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमीचे प्रमाण २९ टक्के आढळलेले आहे त्यामुळे राष्ट्रीय जंतनाशक दिन ही आरोग्य विभागामार्फत दरवर्षी दोनदा वर्षातून राबविण्यात येते, यामध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांचे आरोग्य चांगले ठेवणे पोषण स्थिती शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या मोहिमेची आखणी केलेली आहे दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सम

सावरकरांची अनेक वैशिष्ट्ये अपरिचित  - प्रा. डॉ. गिरीश पिंपळे . सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
सावरकरांची अनेक वैशिष्ट्ये अपरिचित  - प्रा. डॉ. गिरीश पिंपळे   नाशिक ( प्रतिनिधी )- सावरकरांचे नाव उच्चारले की आपल्याला अंदमानमध्ये त्यांनी सहन केलेल्या छळाची, त्यांच्या कवितांची , त्यांनी समुद्रात मारलेल्या उडीची किंवा माझी जन्मठेप या ग्रंथाची आठवण होते. पण त्यांचे व्यक्तिमत्व इतके मर्यादित नाही. त्यांची अनेक वैशिष्ट्ये समाजापुढे ठळकपणे आलेली नाहीत , ती अपरिचित राहिली आहेत असे प्रतिपादन नाशिक येथील सावरकर अभ्यासक डॉ. गिरीश पिंपळे यांनी नुकतेच केले.      सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त समर्थ भारत मंचाने आयोजित केलेल्या आभासी कार्यक्रमात प्रा. डॉ. गिरीश पिंपळे ‘अपरिचित सावरकर’ या विषयावर  बोलत होते. विशेष म्हणजे समर्थ भारत मंच ही दृष्टीबाधित बांधवांनी स्थापन केलेली राष्ट्रीय पातळीवरची संस्था आहे. आपण राष्ट्राचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ही संस्था काम करीत आहे. सुरवातीला मंचाचे प्रमुख कार्यकर्ते  संदेश नारायणे यांनी सर्वांचे स्वागत केले.  पिंपळे यांनी सावरकरांच्या एकूण पाच अपरिचित पैलूंचा आपल्या भाषणात अतिशय प्रभावीपणे वेध घेतला. सावरकर हे द्रष्टे, भाषाशुद्धीचे पुरस्कर्ते, विज्ञ

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर नियोजित साहित्य संमेलन पुढे ढकलले ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर इगतपुरी तील २२ वे ग्रामीण साहित्य संमेलन पुढे ढकलले ! नासिक, वाडीवऱ्हे::- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २२ वे ग्रामीण साहित्य संमेलन काही काळासाठी पुढे ढकलले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा जेष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली आहे.         कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात हे २२वे ग्रामीण साहित्य संमेलन दि.२६ आणि २७ फेब्रु.रोजी होणार होते,साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी जेष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांची निवड करण्यात आली होती.आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर साहित्य संमेलनाचे आयोजन याच प्रमुख पाहुन्यांच्या उपस्थितीत पार पडेल अशी माहिती त्यांनी दिली.        राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विविध सामाजिक,राजकीय,धार्मिक कार्यक्रमावर बंधने घालून नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते,या अवाहनास प्रतिसाद देत संयोजकांनी हा साहित्य संमेलन पुढे ढकलन्याचा निर्णय बैठकी

रेषांमधला आनंददायी 'मुक्तछंद' ! मार्केट विस्तारले ! सौन्दर्य हरवू नये ! संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
रेषांमधला आनंददायी 'मुक्तछंद'    आदिवासी वारली जमात दुर्गम पाड्यांवर पूर्वापार राहते. निसर्गाशी एकरूप होऊन पर्यावरण रक्षण करणारे स्त्रीपुरुष मुक्तपणे जगतात. स्वच्छंदी, स्वतंत्र जीवनाची त्यांना उपजतच आवड आहे. पोटापाण्यासाठी शेती करणे, दिवसभर रानावनात मनसोक्तपणे भटकंती करणे, मासे पकडणे असे मनमोकळे जगायला त्यांना आवडते.सण- उत्सव, विविध देवदेवतांचे पूजाविधी, लग्नसोहळे,सामूहिक नृत्य यात ते मनापासून रममाण होतात. याच स्वच्छंदी जीवनाचे प्रसन्न, आनंदी प्रतिबिंब त्यांच्या वारली चित्रशैलीत स्पष्टपणे उमटलेले दिसते.रेषांमधला हा आनंददायी ' मुक्तछंद ' वारली चित्रांमध्ये सहजपणे अनुभवता येतो.     आदिवासी वारली जमात ठाणे जिल्ह्यातील पाड्यांपासून गुजरातच्या सीमारेषेपर्यन्त पसरलेली आहे. ठाणे जिल्ह्यात १० वन्य जमाती असून त्यात वारली बहुसंख्येने राहतात. डहाणू, पालघर, जव्हार, मोखाडा, तलासरी, सिल्वासा, दीव - दमण, दादरा - नगरहवेली या भागात तसेच नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, नंदुरबार जिल्ह्यात व डांग परिसरात वारल्यांची वस्ती आहे. वारली चित्रशैलीला तब्बल ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा अस

बी. आर. फ्रेंड सर्कल तर्फे शिवजन्मोत्सव २०२१ उत्साहात साजरा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
बी. आर. फ्रेंड सर्कल तर्फे शिवजन्मोत्सव २०२१ म्हसरुळ येथे उत्साहात साजरा       नासिक::- म्हसरूळ येथील बी. आर. फ्रेंड सर्कल च्या वतीने शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, मंडळाच्या वतीने शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला संगीत लाईट शो आयोजीत करण्यात आला होता. शिवजयंती व लाईट शो पाहण्यासाठी परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे आयोजन भावनेश राऊत , अध्यक्ष राकेश पाटील , अजय मोरे , अजय पाटील , तन्मय नेरकर , राजेश जाधव , ऋषी ढवळे , मयूर पाटील , तन्मय कड, प्रितेश आहेर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.

नाशिककरांचे घर घेण्याचे स्वप्न होणार साकार !  गृह कर्जावरील व्याज दरात घट ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिककरांचे घर घेण्याचे स्वप्न होणार साकार !  गृह कर्जावरील व्याज दरात घट !      नाशिक (प्रतिनिधी) : कोव्हीड-१९  महासाथीने मोठ्या आणि आरामशीर  घराची गरज असल्याची जाणीव लोकांच्या मनात निर्माण करून दिली आहे.  सर्वसाधारणपणे, सर्वच जण घरातच असल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्यांची स्वत:चे घर असावे असे वाटत आहे.  यंदा प्रथमच  गृह कर्जावरील वार्षिक व्याज दर कमी झाल्याने नाशिक करांना स्वत:च्या घराचे स्वप्न  साकार करण्याची संधी मिळत आहे. अनेक बँका गृह कर्ज देत असताना कोटक बँकेने कमी म्हणजेच ६.७५ इतका व्याजदर आकारणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे घर घेऊ इच्छिणाऱ्या अनेक कुटुंबातील आर्थिक भार कमी होण्याची शक्यता आहे.           याबाबत कोटक महिंद्र बँकेच्या ग्राहक, व्यावसायिक आणि संपत्ती विपणन सह-अध्यक्षा एलिझाबेथ वेंकटरामन यांनी सांगितले की,  “स्वप्नातले घर स्वत:च्या मालकीचे असण्यातला अभिमान आणि आनंद हा प्रत्येकासाठी सारखाच असतो. अर्थातच, काही जणांसाठी हे स्वप्न अखेरपर्यंत स्वप्नच राहते.  मात्र, कोटक गृह कर्ज हे ६.७५ टक्के प्रती वर्ष इतक्या कमी व्याज दराने उपलब्ध असल्याने हे स्व

संभाजी ब्रिगेड तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
     नासिक::- म्हसरूळ येथील संभाजी ब्रिगेड प्रणीत प्रसादनगर मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी छत्रपती शिवरायांच्या मुर्तीस पुष्पहार घालुन आभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे हार्दिक निगळ, हर्षल पवार, बापु शिरसाठ, पप्पू गोसावी, शुभम पाटिल, आभिषेक घोडेकर, ओंकार इचाळे, प्रसाद गोसावी, साहील गांगुर्डे, रुपेश मोरे, शिवम पगार, कार्तीक निकम व प्रसादनगर, कलानगर, निसर्गनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

पोलिस आयुक्तांची सल्लागार समिती ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
अ.भा.मराठी साहित्य संमेलन- पोलिस आयुक्तांची सल्लागार समिती       नाशिक::- येथे होणारे ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निर्विघ्नपणे व शांततेत पार पडावे यासाठी नाशिक पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सल्लागार समिती गठित केली आहे. संमेलनात होणारे विविध कार्यक्रम, मिरवणुक आदिस परवानगी देणे, संमेलन सुरळीत पार पडावे यासाठी उपाय योजना करणे, वाहतूक व पार्किंग व्यवस्था इ. विषयांवर ही समिती विचार करणार आहे. या समितीवर महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय,  कामगार, सार्वजनिक बांधकाम, विद्युतपुरवठा, प्रादेशिक परिवहन, अन्न व औषधे प्रशासन यांचे प्रतिनिधी आहेत. लोकहितवादी मंडळाचे प्रतिनिधी म्हणून विश्वास ठाकूर  आणि डाॅ. वैशाली बालाजीवाले हे या समितीवर सदस्य म्हणून काम करणार आहेत.

साहित्य संमेलनाला मुक्त विद्यापीठाचे सर्वतोपरी सहकार्य : कुलगुरू ई वायूनंदन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
साहित्य संमेलनाला मुक्त विद्यापीठाचे सर्वतोपरी सहकार्य : कुलगुरू ई वायूनंदन,  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ           नाशिक : नाशिकमध्ये २६ मार्चपासून होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायूनंदन यांनी साहित्य संमेलन आयोजन समितीच्या शिष्टमंडळाला दिली. याबाबत माहिती देताना जातेगावकर म्हणाले, की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे भूषण आहे. सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेले आणि ज्ञानाची गंगा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत घेऊन शिक्षणापासून वंचित असलेल्या लाखो लोकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येणारे  ज्ञानशिक्षणाचे महाद्वार आहे. येत्या साहित्य संमेलनासाठी मुक्त विद्यापीठासारखी सशक्त आणि लोकाभिमुख संस्था आयोजकांना सहकार्य करण्यासाठी भक्कमपणे पाठीशी उभी रहावी, याकरिता संमेलन आयोजकांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू वायूनंदन यांची भेट घेऊन संमेलनाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी नाशिकमध्ये होणार