निसर्गपुत्रांचा सुगम कलाविष्कार ! वारली चित्रशैलीतील रामकथा !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
निसर्गपुत्रांचा सुगम कलाविष्कार ! चित्र, संगीत आणि नृत्य या कला आदिवासी लोकजीवनाचे अविभाज्य अंग आहेत. त्यांच्या दैनंदिन वापराच्या साध्या साध्या वस्तूंनाही कलेचा परिसस्पर्श झालेला दिसतो. आवश्यक तितकंच तांत्रिक कौशल्य वापरून निसर्गपुत्रांनी केलेला सुगम कलाविष्कार हा आदिवासी कलेचा प्राण आहे. वारली चित्रे सहजपणे संवाद साधतात म्हणून ती सुगम आहेत. वारल्यांना त्यांच्या कलानिर्मितीची प्रेरणा निसर्गाकडून मिळते. त्यांचे माध्यम निसर्ग व आविष्कारही निसर्गच आहे. निसर्गाकडून घेऊन निसर्गालाच अर्पण करणे हे वारली जमातीचे जीवनसूत्र आहे. परिसराशी सुसंवाद साधणारी निर्मिती हे वैशिष्ट्य त्यांच्या कलेत ठळकपणे जाणवते. वारली ही ठाणे, पालघर जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमात आहे. त्यांची एक वेगळी संस्कृती असून तिच्या परिघातच ते आनंदाने जगतात. त्यांचे जीवन खडतर, कष्टमय असले तरीही निसर्गाच्या सान्निध्यात त्यांची कला फुलते. भारतीय नागरी सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीला आदिवासी कलांचं अधिष्ठान आहे. वारली जमात दुर्गम पाड्यांवर राहून सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यातून उत्स्फूर्तपणे कलानिर्मिती करते. ११०० वर्ष