पोस्ट्स

राष्ट्रपती भवनात झळकले वारली चित्रशैलीतील रामायण ! हरेश्वर वनगा : पुरोगामी वारली चित्रकार !!

इमेज
हरेश्वर वनगा : पुरोगामी वारली चित्रकार   आई मथीबाई यांच्याकडून हरेश्वर वनगा यांना वारली चित्रकलेचा वारसा मिळाला. उद्धवराव पंडित यांच्या घरी ती मोलकरणीचे काम करायची. तेथे हरेश्वर व त्यांच्या भावंडांवर  नागरी संस्कार झाले. तलासरीच्या जनजाती आश्रमशाळेतील विकास प्रकल्पात त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रप्रेमी विचारांनी ते प्रेरित झाले व स्वयंसेवक बनले. पुरोगामी विचारसरणीच्या हरेश्वर यांनी नातेवाईकांच्या व समाजाच्या दबावाला न जुमानता, आपल्या दोन मुलींना 'वंशाची पणती' मानून उत्तम शिकवले. त्यांना उच्चशिक्षित केले. राज्य सरकारने आदिवासी सेवक पुरस्काराने त्यांना गौरविले आहे. त्यांनी वारली कलेत स्वतःचे वेगळेपण सिध्द केले आहे. त्यांचे रामायणावर आधारित असलेले वारली चित्र थेट राष्ट्रपती भवनात विराजमान झाले आहे.    डहाणू आगर येथे १९६५ साली जन्मलेल्या हरेश्वर नथू वनगा यांची आई मथीबाई झोपडीच्या भिंतीवर चित्रे रंगवायची. छोट्या हरेश्वरला ते बघून खूप उत्सुकता वाटायची. आईकडून ही कला त्यांनी आत्मसात केली. ५ बहिणी व १ भाऊ अशा मोठ्या कुटुंबात हरेश्व

जिल्हा परिषदेत ५८ कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदोन्नत्या ! कुटुंबप्रमुखच्या भूमिकेत मुख्य कार्यकारी अधिकारी !!

इमेज
जिल्हा परिषदेत ५८ कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदोन्नत्या ! सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, ग्रामविकास अधिकारी पदी बढती नाशिक : मागीलआठवड्यात अनुकंपा व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेत समावेश केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्हा परिषद सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी आनंदराव पिंगळे व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांना कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या होत्या, त्यानुषंगाने जिल्हा परिषदेत सेवेतील वरिष्ठ सहायक पदावरील कर्मचाऱ्यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर १६ तर कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावरून सहायक प्रशासन अधिकारी ०६ तर ग्रामसेवक पदावरून ग्रामविकास अधिकारी या पदावर ३६ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली, यावेळी महिला, वयोवृद्ध, दिव्यांग, दुर्धर आजाराने त्रस्त, पती पत्नी एकत्रीकरण यांच्याबाबत पदोन्नती देताना सहानुभतीपूर्वक विचार करण्यात आला. असे आहेत पदोन्नती झालेले कर्मचारी - सहायक प्रशासन अधिकारी पाठक वृषाली दिलीप जाधव ललिता ज्ञानेश्वर भुजबळ राजे

भास्कर यांच्यामुळेच  आमचा, कलेचा भाग्योदय - सदाशिव. सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
भास्कर यांच्यामुळेच  आमचा, कलेचा भाग्योदय !    "१९७३ साली भास्कर कुलकर्णी गंजाडला आमच्याकडे प्रथम आले आणि त्यांच्या येण्याने माझे वडील जिव्या सोमा मशे लोकांसमोर आले ! आमची वारली कला उजेडात आली. वारल्यांचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचले. त्यांच्या येण्याने आमच्या वारली जमातीचा व पारंपरिक कलेचा भाग्योदय झाला. ते वारली आणि मधुबनी या लोककलांचे तारणहार ठरले. त्यांच्या रुपात देवच भेटला. नाहीतर वारली जमात आयुष्यभर वेठबिगारी करीत राहिली असती. वारली कला जनमानसात पोहोचली त्याला लवकरच ५० वर्षे होतील."  -हे उदगार आहेत पद्मश्री जिव्या सोमा मशे यांचे ज्येष्ठ चिरंजीव सदाशिव यांचे...    वारली चित्रशैलीवरील लेखमालेतील ५० लेखांचा माझा संकल्प गेल्या आठवड्यात पूर्ण झाला. त्यानंतर प्रतिभावान वारली कलाकारांवर नवी लेखमाला लिहिण्याचे ठरवले. अर्थातच पहिले नाव समोर आले ते वारली कलेचे पितामह पद्मश्री मशे यांचे चिरंजीव सदाशिव यांचे. त्यांचा जन्म डहाणू तालुक्यातील गंजाड या गावात १ जून १९५८ रोजी झाला. वाडा येथील आश्रमशाळेत नववीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वारली चित्रे रे

अभिनंदनीय !! अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाच्या एंजल मोरे या युवतीस मॅरेथॉन जलतरणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'वर्ल्ड ट्रिपल क्राऊन' हा बहुमान प्राप्त !

इमेज
  'वर्ल्ड ट्रिपल क्राऊन ' विजेती एंजल मोरे !   अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाच्या एंजल मोरे या युवतीने, मॅरेथॉन जलतरणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'वर्ल्ड ट्रिपल क्राऊन' हा बहुमान प्राप्त केला आहे. तब्बल १४ तास २३ मिनिटे महाकाय सागरी लाटांशी दोन हात केल्यानंतर, दि.१५ सप्टेंबरला  संध्याकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी इंग्लिश खाडी पार करून तिने हे असामान्य यश मिळवले.एंजल मूळची नाशिक येथील मोरे परिवारातील आहे. ज्येष्ठ संगणक अभियंता तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रातील प्रख्यात उद्योजक श्री. हेमंत आणि अर्चना मोरे यांची ती कन्या असून, व्यवसायानिमित्त हे दाम्पत्य अमेरिकेत स्थायिक झाले आहे.       एंजलचा या मोहिमेतील अत्यंत खडतर जलप्रवास इंग्लंड ते फ्रान्स असा होता. खाडी ओलांडण्याचे हे अंतर, म्हणजेच चॅनल क्रॉसिंग २८.१ मैल (४५.१ कि.मी.) इतके प्रदीर्घ  होते. एंजलसह अन्य आठ स्वतंत्र एकल जलतरणपटू आणि दोन रिले संघ ग्रीनीच मध्यवर्ती वेळेनुसार पहाटे ४.३० वाजता मोहिमेवर निघाले. सोसाट्याचा वारा आणि  पाण्याच्या प्रचंड वेगाने त्यांच्या पुढे आव्हान उभे केले. परिणामी यापैकी पाच माघारी

ब्रह्माकुमारी संस्थेच्या कार्याची समाजाला गरज आहे -पोलीस निरिक्षक सीताराम कोल्हे. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
ब्रह्माकुमारी संस्थेच्या कार्याची समाजाला गरज आहे -पोलीस निरिक्षक सीताराम कोल्हे पंचवटी (दि.२० सप्टेंबर) - या आध्यात्मिक वातावरणात येऊन मला खूप छान वाटले.  बाहेर समाजात फिरताना ताण-तणावाला सामोरे जावे लागते. मात्र येथे दहा मिनिटातच मला सुख शांतीची अनुभूती झाली. ब्रह्माकुमारी संस्थेचे कार्य महान आहे.   या कार्याची समाजाला गरज आहे. समाजात फोफावत चाललेली गुंड प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी अध्यात्मिक ज्ञान गरजेचे आहे, हे ब्रह्मकुमारी संस्थेने अधोरेखित केले आहे.  समाजसुधारणेचे हे महान कार्य ब्रह्माकुमारी संस्था करीत आहे असे प्रतिपादन पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी केले.  दिनांक १९ सप्टेंबर रोजी  ब्रह्माकुमारी संस्थेच्या पंचवटी सेवाकेंद्रात  राजयोग शिबीराच्या समापन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली याप्रसंगी व्यासपीठावर नाशिक रोड सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी प्रा. सुरेश साळुंखे, ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी, सप्तशृंगी मित्रमंडळाचे सतनाम राज

आरोग्य कर्मचारी यांच्यावरील मारहाणीच्या निषेधार्थ सर्व संघटना एकवटल्या, दोषी व्यक्तींवर ३५३ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन दिले ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
सिन्नर तालुक्यातील पास्ते येथील आरोग्य कर्मचारी यांच्यावरील मारहाणीच्या निषेधार्थ सर्व संघटना एकवटल्या .दोषी व्यक्तींवर 353 कलमान्वये गुन्हा दाखल  !          सिन्नर::-तालुक्यातील पास्ते येथे कोविड लसीकरण सत्राच्या कामकाजात हस्तक्षेप करुन महिला व पुरुष आरोग्य कर्मचारी यांच्यावर जीवघेणा हल्ला करुन मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर कलम ३५३  लावावा व दोषी व्यक्तींना कठोर शासन व्हावे या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व संवर्ग संघटना एकत्र झाल्या व त्यांनी जिल्हा परिषद आवारात सदर घटनेचा निषेध करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.       संबंधित दोषी व्यक्तींवर ३५३ कलम लावण्यासंदर्भात तसेच लसीकरण केंद्राच्या ठिकाणी पोलीस संरक्षण मिळावे, सर्व कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन संघटनांची बोलणीसाठी सर्व खाते प्रमुख यांनी वेळ द्यावा अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले, याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर दोषी व्यक्तींवर ३५३ कलम लावण्यासंदर्भात सिन्नर पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा व तेथे सदर केस दाखल करणे संदर्भात दुजोरा दिल

अनंतरूपी वारली चित्रकला ! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
अनंतरूपी वारली चित्रकला !     आदिवासी वारली चित्रकला अनंत रूपांतून बघायला मिळते. काही ठिपके, सरळ, आडव्या, तिरप्या व लयदार रेषा आणि त्रिकोण, वर्तुळ, चौकोन या मूलभूत आकारांचा वारली चित्रे रेखाटण्यासाठी वापर केला जातो. तांदळाच्या पिठाचा पांढराशुभ्र रंग गडद पार्श्वभूमीवर उठून दिसतो. अतिशय अल्प सामग्री वापरूनही सुंदर दिसणारी वारली चित्रांमधली आशय-विषयांची विविधता थक्क करते.अनंत अज्ञात वारली कलाकारांनी ११ शतके योगदान देऊन हे आदिम कलेचे दालन समृद्ध केले आहे. आज अनंत चतुर्दशी आहे, त्या निमित्त हा धांडोळा...    डोंगरदऱ्यांमध्ये, रानावनात दुर्गम पाड्यांवर निसर्गाच्या सान्निध्यात आदिवासी वारली जमात राहाते. निसर्गाच्या बरोबरीने आपल्या परंपरा जोपासणारे निरागस वारली स्त्रीपुरुष झोपडीची भिंत चित्रांनी सजवून आनंद व्यक्त करतात. एका प्रकारे ते आदर्श डिझाइनर आहेत! अबोल आदिवासी वारली कलावंत आपल्या अनोख्या व साध्यासोप्या चित्रशैलीद्वारे आकारांमधून बोलतात, मनापासून व्यक्त होतात. त्यांच्या डोळ्यांना जसं दिसतं, जाणवतं तसं ते रेखाटतात. आकाशात विहार करताना पक्ष्यांना जशी सृष्टी दिसते तशाच प्रकारचे हे वै

सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेतील ‘नो हायपर टेन्शन’ पुस्तक ठरणार उपयुक्त मार्गदर्शक सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
‘नो हायपर टेन्शन’ पुस्तक ठरणार उपयुक्त मार्गदर्शक नाशिक । प्रतिनिधी आज ३० ते ५० उमेदीच्या वयोगटातील युवापिढी हृदयरोगाचा विळखा पडत आहे. या आजाराची भीषणता लक्षात घेता हृदयरोगासबंधी प्रबोधन व्हावे, याची लक्षणे, कारणे समजावित आणि तो होऊ नये याकरिता आहार, व्यायाम, जीवनशैली यासह याविषयीचे गैरसमज दूर व्हावे या उद्देशाने  सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करण्यासाठी ‘नो हायपर टेन्शन’ पुस्तक लिहले आहे, अशी माहिती प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अतुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. अतुल पाटील यांनी बंंगळुरू येथून कार्डिऑलॉजीचे शिक्षण घेतले आहे. नाशिकमध्ये ते सध्या आशा हार्ट केअर क्लिनिकच्या माध्यमातून रूग्णसेवा देत आहेत. या दरम्यान त्यांनी अनुभवले की कमी वयात कारकीर्द घडवण्याच्या काळात यूवापिढी हृदयरोगाने ग्रासते आहे, हे वास्तव त्यांना अस्वस्थ करत होते आणि हे कुठेतरी थांबायला हवे या उद्देशाने ‘नो हायपर टेन्शन पुस्तक लिहण्याचे त्यांनी ठरवले.   उच्च रक्तदाब असणार्‍या रुग्णांचे प्रमाण देशात २५ ते ३० टक्के आहे अशी माहिती नुकत्याच प्रसिद्ध झालेल्यां लॅनसेट या वैद्यकीय पत्रिकेत प्रसिद्ध

खामखेडा येथील अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात सुरुवात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
खामखेडा येथील अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात सुरुवात महेश शिरोरे यांजकडून-       देवळा::- तालुक्यातील खामखेडा येथील अखंड हरिनाम सप्ताह व ग्रँथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच किर्तन महोत्सव सोहळ्यास सुरुवात करण्यात आली असून आठ दिवस हा सोहळा असून  या अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे खामखेडा गावातील एक विस्मरणीय असा एक नावीन्यमय सप्ताह म्हणून कसमादे परिसरात नावारूपास आला असून तरुण मंडळाच्या या कार्याला यश आले असून कसमादे परिसरातील आलेल्या श्रोत्यांनी तर मंडळाचे गोड कौतुक ही केले. या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये दैनंदिनी कार्यक्रम पहाटे ५ वाजता  काकडा आरती , सकाळी ८ ते १० व दुपारी ३ ते ५ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण , सायंकाळी ६ ते  ७ हरिपाठ ,व रात्री ९ ते ११ या वेळेत हरिकीर्तन  अशी कार्यक्रमाची रुपरेषा आहे.ह भ प समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरिकर, ह भ प . प्रेममुर्ती अनिल महाराज वाळके, , ह भ प ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर , ह भ प वेंदांतचार्य रामेश्वर महाराज भोजने,  ह भ प भागवताचार्य समाधान महाराज भोजेकर,  ह भ प धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते, ह भ प रामकृष्ण महार

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वातंत्र्य दिनाचेअमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वातंत्र्य दिनाचेअमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन नाशिक - भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शाश्वत स्वच्छतेसाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन शाश्वत स्वच्छतेसाठी काम करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले आहे.          नाशिक जिल्हा मार्च २०१८ मध्ये हागणदारी मुक्त घोषित झाला असून पायाभूत सर्वेक्षणानुसा कुटुंबांकडे शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत शौचालयांचा नियमित वापर व्हावा, नादुरुस्त शौचालय दुरुस्त व्हावीत, गावातील व परिसराची स्वच्छता राहावी यासाठी सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनासह शाश्वत स्वच्छतेवर काम करण्यात येत आहे. याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात १ सप्टेंबर २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ यादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.        सत्याग्रह से