पोस्ट्स

जिल्हा परिषद "ग्रामविकासाची शाळा" या पुस्तकाची राष्ट्रीय विक्रम म्हणुन नोंद !

इमेज
जिल्हा परिषद "ग्रामविकासाची शाळा" या पुस्तकाची राष्ट्रीय विक्रम म्हणुन नोंद !       नाशिक (प्रतिनिधी)::- जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभांचे पंचवार्षिक इतिवृत्त पुस्तक रुपात प्रसिद्ध करण्याची संकल्पना नाशिक जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागात मुख्य औषध निर्माण अधिकारी म्हणुन कार्यरत असणारे जी.पी. खैरनार यांनी तात्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती पत्राद्वारे केली होती. नाशिक जिल्हा परिषदेने या वैविध्यपूर्ण उपक्रमास नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नियमित विषय घेऊन अभिनंदनासह मान्यता दिली होती. नाशिक जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संपादकीय जबाबदारी घेऊन नाशिक जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त उपलब्ध करुन दिले होते. जी. पी.खैरनार यांनी सदर इतिवृत्त संकलित करुन जिल्हा परिषद नाशिक "ग्रामविकासाची शाळा" हे शीर्षक घेऊन पुस्तकाची बांधणी केली होती. प्रस्तुत पुस्तकाचे प्रकाशन नाशिक जिल्हा परिषदेने नाशिक जिल्हा परिषदेच्या दिनांक २८ फेब्रुवारी, २०२२ च्या सर्वसाधारण सभेत केले होते. ना

मंगळवारी जनजाती गौरव दिनी अभिवादन कार्यक्रम, प्रतिमापूजन आणि व्याख्यान !

इमेज
मंगळवारी जनजाती गौरव दिनी अभिवादन कार्यक्रम, प्रतिमापूजन आणि व्याख्यान !       नाशिक ( प्रतिनिधी )- मंगळवारी ( दि.१५ ) रोजी जनजाती क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिन हा जनजाती गौरव दिन म्हणून साजरा होणार आहे. या निमित्त जनजाती कल्याण आश्रमाच्या नाशिक शाखेतर्फेही अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता कल्याण आश्रमाच्या कृषी कॉलनी, कॉलेज रोड येथील मुख्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन, प्रतिमापूजन व प्रा. डॉ. बाळासाहेब घुटे यांचे व्याख्यान  होणार असल्याची माहिती आश्रमाचे प्रांत सचिव शरद शेळके आणि उपाध्यक्ष व नामवंत धावपटू कविता राऊत यांनी दिली.          वनवासी कल्याण आश्रमाच्या पाठपुराव्यामुळे गेल्या दीड दशकापासून दि. १५ नोव्हेंबर हा दिवस जनजाती गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. वनवासी कल्याण आश्रम जनजातींच्या सेवेत सन् १९५२ पासून आहे. या संस्थेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविले जातात. याचा आढावाही  सचिव शेळके यांनी मांडला. शेळके म्हणाले, सद्यस्थितीत आश्रमाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात २९

जनजाती गौरव दिनीअभिवादन कार्यक्रमप्रतिमापूजन आणि व्याख्यान !

इमेज
जनजाती गौरव दिनी अभिवादन कार्यक्रम प्रतिमापूजन आणि व्याख्यान !       नाशिक ( प्रतिनिधी )- मंगळवारी (दि.१५) रोजी जनजाती क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिन हा जनजाती गौरव दिन म्हणून साजरा होणार आहे. या निमित्त जनजाती कल्याण आश्रमाच्या नाशिक शाखेतर्फेही अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता कल्याण आश्रमाच्या कृषी कॉलनी, कॉलेज रोड येथील मुख्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन, प्रतिमापूजन व प्रा. डॉ. बाळासाहेब घुटे यांचे व्याख्यान  होणार असल्याची माहिती आश्रमाचे प्रांत सचिव शरद शेळके आणि उपाध्यक्ष व नामवंत धावपटू कविता राऊत यांनी दिली.          वनवासी कल्याण आश्रमाच्या पाठपुराव्यामुळे गेल्या दीड दशकापासून दि. १५ नोव्हेंबर हा दिवस जनजाती गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. वनवासी कल्याण आश्रम जनजातींच्या सेवेत सन् १९५२ पासून आहे. या संस्थेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविले जातात. याचा आढावाही  सचिव शेळके यांनी मांडला. शेळके म्हणाले, सद्यस्थितीत आश्रमाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात २९ शैक्षणिक प्

डॉ. राजेंद्र जाधव यांची यशाला गवसणी !

इमेज
डॉ. राजेंद्र जाधव यांची यशाला गवसणी !       नाशिक:- प्रख्यात सर्जन डॉ. राजेंद्र जाधव यांनी जळगाव येथे संपन्न झालेल्या ज्येष्ठांच्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत यशाला गवसणी घातली.      महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जळगाव आयएमए आयोजित महास्पोर्टस स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. त्यात साठ वर्षांवरील ज्येष्ठ बॅडमिंटन गटात एकेरी आणि दुहेरीत डॉ.राजेंद्र जाधव यांनी उपविजेतेपद संपादन केले. दुहेरीत डॉ. हेमंत साठे (सोलापूर) ह्यांनी त्यांना उत्तम साथ दिली. विजेत्यांना पदक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत राज्यभरातील ९८ डॉक्टरांनी भाग घेतला. सर्व थरातून डॉक्टरांचे अभिनंदन होत आहे.

स्थलांतरित रहिवाशी आंदोलनाच्या पवित्र्यात !ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास रखडला !!

इमेज
स्थलांतरित रहिवाशी आंदोलनाच्या पवित्र्यात ! ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास रखडला !!           मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळींतील तब्बल २० ते २५ टक्के सदनिकांमधील रहिवाशांचे स्थलांतर करण्यात म्हाडाचे मुंबई मंडळ अपयशी ठरले आहे. या इमारतींमध्ये रहिवासी वास्तव्यास असल्याने पुनर्विकासाच्या कामाला गती मिळू शकलेली नाही. पुनर्विकासाच्या कामाला नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरुवात करण्यात आली नाही तर डिसेंबरमध्ये गृहनिर्माण मंत्र्यांच्या बंगल्यावर रहिवासी सहकुटुंब मोर्चा काढतील, असा इशारा ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीने दिला आहे.         वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे करण्यात येत आहे. पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन २०१७ मध्ये करण्यात आले होते. रहिवाशांची पात्रता निश्चिती करून त्यांना स्थलांतरित करण्यात आले. तसेच ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांच्या घरासाठी पहिली सोडतही काढण्यात आली. असे असताना अद्यापही या चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात होऊ शकलेली नाही. पहिल्या टप्प्यात येथील ३२ पैकी १० इमारतींमधील रहिव

चव्हाणांच्या माघारीने सकाळेंचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा !

इमेज
चव्हाणांच्या माघारीने सकाळेंचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा ! नासिक::- नासिक जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघ मर्यादित नासिकच्या त्र्यंबकेश्वर तालुका  संचालक पदी संपतराव सकाळे यांचा एकमेव अर्ज राहील्याने त्यांची निवड बिनविरोध झाली असे गृहीत धरले जात आहे, प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर तशी घोषणा होईल,  अशोक गोटीराम चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सकाळेंचा एकमेव अर्ज राहीला, या बिनविरोध निवडीसाठी विनायक माळेकर, समाधान बोडके, रमेश पाटील, लक्ष्मण पाटील, हरीष गायकवाड, दिलीप चव्हाण, गणेश चव्हाण, अशोक चव्हाण, बापू सकाळे,अजित सकाळे यांनी प्रयत्न केले, यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी सकाळे यांचे अभिनंदन केले व उर्वरित निवडणूक ही बिनविरोध व्हावी असे सांगितले.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने राज्यस्तरीय युवा पुरस्कारांसाठी आवाहन !

इमेज
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने राज्यस्तरीय युवा पुरस्कारांसाठी आवाहन !           मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने युवांसाठी सातत्याने सर्जनशील व प्रोत्साहनपर उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून सामाजिक, क्रीडा, उद्योजकता, साहित्य रंगमंचीय कलाविष्कार, पत्रकारिता आणि इनोव्हेटर  या क्षेत्रांतील  विविध गुणवंत युवांना सन्मानित करण्यात येणार आहे.         रुपये २१,०००/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. त्या त्या क्षेत्रामधील अभ्यासू मान्यवर व्यक्तींचा सहभाग असलेल्या निवड समितीमार्फत अंतिम पुरस्कारार्थींची निवड करण्यात येणार आहे.          पुरस्कारासाठी व्यक्तीचे वय ३१ डिसेंबर २०२१ अखेरीस ३५ वर्षांच्या आत असले पाहिजे. पुरस्कारासंबंधीची संपूर्ण माहिती व ऑनलाइन फॉर्म www.chavancentre.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्ज ऑनलाइन भरण्याची अंतिम तारीख सोमवार, दि.१८ नोव्हेंबर २०२२ असून या पुरस्कारासंबधी अधिक माहितीकरीता संतोष मेकाले - 9860740569/मनिषा खिल्लारे - 9022716913 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटरच्या क

महाराष्ट्राला सुपरिचित असलेले नांव, निवेदक, अभिनेता, राष्ट्रीय पक्षाचे प्रवक्ते "अजित" यांच्या वाढदिवसानिमित्त !!!!!

इमेज
अजित चव्हाण... महाराष्ट्राला सुपारीचित असलेलं नाव निवेदक, अभिनेता, वक्ता भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते, अजित चव्हाण यांचा ९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस, खरं तर नाशिकच्या कला विश्वातून मुंबईला नशीब आजमावण्यासाठी गेलेल्या आणि यशस्वी ठरलेल्या नावांपैकी एक हे नाव, पण हे नाव पत्रकारितेत यशस्वी ठरलं. नाशिकच्या दैदीप्यमान इतिहास असलेल्या दीपक मंडळाचा सदस्य, बाबा थिएटरच्या माध्यमातून रंगभूमी वरती काम करणारा नाशिकच्या रंगभूमीवरचा गुणी कालावंत, उत्तम निवेदक, अभ्यासू वक्ता वाचक, पुस्तक प्रेमी, बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या एका देखण्या आणि गुणी कलावंत मराठी रंगभूमीपासून थोडासा दुरावला तो पत्रकारितेमुळे, पण अजित ने नाशिकहून मुंबईला जाऊन पत्रकारितेतही आपला एक आगळावेगळा ठसा उमटवला २००३ साली पहिला सिनेमा 'दिवस बालपणीचे' यामध्ये ज्येष्ठ अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यासोबत नाशिकच्या आधी चव्हाण, स्मिता सारंग या जोडीने बालकलाकार म्हणून सुरुवात केली, शाळेत असतानाच रंगभूमी वरती हौशी नाटकातून भूमिका करताना राज्य नाट्य स्पर्धातूनही अजितने आपली चमक दाखवली.  नाशिकचे दोन कलाकार अभिजीत खांडकेकर आणि अजित च

जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ! १०० वर्षापासूनचे शाळा सोडल्याचे दाखले डिजिटल ! एका क्लिकवर क्षणात मिळतोयं ‘शाळा सोडल्याचा दाखला’ !

इमेज
जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ! १०० वर्षापासूनचे शाळा सोडल्याचे दाखले डिजिटल ! एका क्लिकवर क्षणात मिळतोयं ‘शाळा सोडल्याचा दाखला’      अहमदनगर ( जिमाका, नासिक)::- कोपरगाव तालुक्यातील ‘संवत्सर’ येथील जिल्हा परिषद शाळेने ‘शाळा सोडल्याचा दाखला’ डिजिटलरित्या जतन करण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. या शाळेने १९०८ पासूनचे दाखले डिजिटल केल्यामुळे शंभर वर्षापूर्वीचा दाखला क्षणाचा विलंब न होता एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. ‘संवत्सर’ शाळेने राबविलेला हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.              ‘संवत्सर’ जिल्हा परिषद शाळेच्या अखत्यारित विविध वाड्या-वस्त्यांवरील ८ जिल्हा परिषद शाळा आहेत. ‘संवत्सर’ व उर्वरित ८ जिल्हा परिषद शाळांनी १९०८पासून ते आजपर्यंत प्रवेश घेतलेल्या १५ हजार १७४ विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले डिजिटलरित्या जतन करून ठेवले आहेत. पुण्याच्या ‘ई-प्रशासन सॉफ्टवेअर’ या कंपनीच्या मदतीने ‘संवत्सर’ शाळेने जिल्ह्यात प्रथमच नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचे प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे.         या उपक्रमास जिल्हा पर

समाजात अस्थिव्यंगत्वाविषयी जनजागृती होणे गरजेचे ! आज ( दि.५ ) आंतरराष्ट्रीय सोसायटी ऑफ प्रोटेटिक्स अँड ऑर्थोटिक्स (आयएसपीओ) संघटनेकडून प्रथमच जागतिक स्तरावर जनजागृती दिन

इमेज
समाजात अस्थिव्यंगत्वाविषयी  जनजागृती होणे गरजेचे !    अस्थिव्यंग जन्मतः असते किंवा काहीवेळा अस्थिरोगांंमुळे,अपघातांनी अस्थिव्यंग निर्माण होते. अस्थिरोग तज्ज्ञ त्यांच्यावर उपचार करतात. त्यातून रुग्ण बरे होतात. मात्र त्यामध्ये ऑर्थोटिक्स म्हणजे आधार देऊन बाह्योपचार व प्रोटेटिक्स म्हणजे कृत्रिम अवयव तयार करणाऱ्या तज्ज्ञांची भूमिकाही तेवढीच महत्वाची असते. आज ( दि.५ ) आंतरराष्ट्रीय सोसायटी ऑफ प्रोटेटिक्स अँड ऑर्थोटिक्स (आयएसपीओ) या संघटनेने प्रथमच जागतिक स्तरावर जनजागृती दिन जाहिर केला आहे. नाशिकमध्ये डॉ. दीपक सुगंधी त्यांच्या दीपक सर्जिकल्स संस्थेतर्फे ४४ वर्षे रुग्णसेवा करीत आहेत. या दिनाच्या निमित्ताने...     ऑर्थोटिक्स अँड प्रोथेटिक्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे ( ओपीएआय ) आज देशभर जनजागृतीपर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या विशेष प्रगत विज्ञान शाखेमुळे दिव्यांग व्यक्तींना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळण्यास मदत होते. वेगवेगळ्या क्षेत्रात जसा भारतात विकास होत आहे तसाच या क्षेत्रातही सातत्याने होतो आहे. त्यामुळे दिव्यांगांना सन्मानाने व आत्मविश्वासाने जीवन जगण्यास हातभार मिळतो. नवनवी