हिमांशू राय, भैय्युजी महाराज यांच्या आत्महत्या आणी नासिक शहरांतील गेल्या सहा महिन्यातील आत्महत्या !!! धकाधकीच्या जीवनांत थोडा वेळ काढून विचार करायला हवा !! आज लिंक वर क्लिक करा म्हणणार नाही,,,,,पण. सामाजिक दायित्वापोटी लिंक शेअर करा, कमेंट मध्ये अभिप्राय नोंदवा !!
आत्महत्यांचे शहर म्हणून नासिक बदनाम व्हायला लागले आहे, की इतर ठिकाणांचीही अशीच परिस्थिती आहे ? जगांत आत्महत्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, फास घेणे, जलसमाधी घेणे, उडी घेणे, औषध घेणे, अग्निकाष्ठ घेणे, व अलीकडच्या काळात वाहनाखाली उडी मारून, बंदुकीची गोळी झाडून घेणे इ. मात्र जीवन संपविणे हे निषेधार्हच मानायला हवे, पुरातन काळापासुन आत्महत्या करणे याबाबत मतमतांतरे आहेत, काही धर्म समर्थन करतात तर काही धर्म निषेधात्मक पवित्रा घेतात, मुसलमान निषिद्ध मानतात त्यामुळे जगांत सर्वात कमी प्रमाण (अगदीच नगण्य) आढळून येते, त्याखालोखाल बौद्ध धर्मिंयामध्ये ही "अहिंसा परमोधर्म" या तत्वानुसारच्या शिकवणुकीमुळे प्रमाण कमी आहे, मात्र इतर धर्मिंयांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक आढळून येते.(हिंदू व ख्रिश्चनांमधील काही गटांत अधिक प्रमाण जागतिक पातळीवर नोंदविले गेले आहे, ) काही दिवसांपूर्वी आयएएस अधिकारी हिमांशु राय व राष्ट्रसंत भैय्युजी महाराज यांनी केलेला देहत्याग....... (आत्महत्या म्हणण्याचे धाडस होत नाही पण समर्थन ही करत नाही). एक पोलीस प्रशासनातील कायद्याचं ज्ञान असलेल्