पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आजीबाईंच्या निधनानंतर नातू हार्दिक निगळ याने कशाप्रकारे वाहीली श्रद्धांजली !! , , सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! ,

इमेज
प्रकाश उखाडे यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस कष्टप्रद ‘आजीबाईं’ च्या निधनानंतर आपल्या शेतातच अस्थिविसर्जन व वृक्षरोपणाने जपल्यात आठवणी..!’         नासिक::- काळी आई धन धान्य देई.. म्हणूनच आपल्या मायभुमीवर प्रेम अन् सतत कष्ट करता-करता मायभुमीमुळेच आपले जीवन सफल झाले..आज सारंच कुटूंब गुण्यागोविंदाने जीवन जगत आहे..ते केवळ आपल्या आजीबाईंमुळेच..म्हणून आजीबाईंच्या निधनानंतर आठवण कायम रहावी यासाठी म्हसरूळच्या निगळ कुटूंबाकडून अस्थिविसर्जन कुठल्याही तीर्थक्षेत्री न करता आपल्याच शेतात खड्डे खोदून अस्थि विसर्जनासह विविध प्रकारचे वृक्षारोपण करून आजीबाईंना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.             आजीबाईंनी आपले संपुर्ण जीवनच शेतात घालवलं..अन् शेतातच राबतां-राबतां आपल छोटंस कुटूंब बहरलं..अशा या आजच्या छोट्यातून मोठया सदस्यात बहरलेल्या आनंदमय कुटूंबातील कष्टमय माऊलीच देवाघरी निघून गेली..त्यानंतर मात्र त्याच माऊलीच्या आठवणी शेतातच रहाव्यात यासाठी आजी माऊलीचा नातू हार्दिक निगळ याच्या संकल्पनेतून व सर्वांच्या एक विचाराने अखेर सदर वयोवृध्द आजीबाईंचे निधनानंतर अस्थिविसर्जन हे  त्यांच्याच शेतात करण

वैनतेय विद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाची १० वी बोर्डाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस वैनतेय विद्यालयाचा  इयत्ता १० वी बोर्डाचा   निकाल  ९४.६०  टक्के          नासिक::-निफाड  शहरातील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या वैनतेय  विद्यालयाचा गत अनेक वर्षांपासूनचा  इयत्ता १० वी  बोर्डांच्या निकालाची उत्तुंग परंपरा याही वर्षी सुरू ठेवत ९४.६०  टक्के लागला आहे, विद्यालयाने या वर्षीही यशाची परंपरा कायम ठेवली आहे. वैष्णवी मनोज लाहोटी ही विद्यार्थिनी  ९८  टक्के गुण मिळवून या विद्यालयात प्रथम क्रमांकाने आली आहे. १० वी परीक्षेसाठी या विद्यालयाचे   ३८९  विद्यार्थी प्रविष्ट झाले  होते यातील ३६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले  आहेत, यातील विशेष प्राविण्य श्रेणीत   १७७ विद्यार्थी, प्रथम  श्रेणीत ८६  विद्यार्थी , द्वितीय  श्रेणीत  ८३ विद्यार्थी , तृतीय  श्रेणीत २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त  गुण मिळाले आहेत       या विद्यालयात आलेले  प्रथम ५ गुणवंत  विद्यार्थी   पुढीलप्रमाणे प्रथम-  वैष्णवी मनोज  लाहोटी ( ९८ टक्के) -  ,द्वितीय - अमित ज्ञानेश्वर कापसे - ( ९६.२० टक्के ) ,  तृतीय-  विजया यशवंत  कुंद

बातमी अशी कुठे असते का ? एका शाळेतील दोन विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेत समान गुण !! हेच विशेष आहे या बातमीत, खालील लिंकवर क्लिक करून वाचा व कमेंट बाॅक्समध्ये अभिप्राय नोंदवा !!!

इमेज
                             नासिक::- येथील बाॅईज टाऊन शाळेतील दोन विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेत समान ८८.२०% गुण मिळाले. यांत काही विशेष नाही असे आपल्याला वाटत असेल तर ही बातमी वाचायलाच हवी.         ओम आणि शिवानी यांनी जे समान गुण मिळविले हा नासिक नव्हे तर जगभरातील तमाम वाचकांसाठी कुतुहलाचा व चर्चेचा विषय ठरला आहे. त्याला कारणही तसेच आहे, असा विक्रम भविष्यातही लवकर घडेलच असं छातीठोकपणे कुणीही सांगू शकत नाही.           नाशिक येथील आई इव्हेंट्स या संस्थेचे संचालक सुनील बिरारी हे मूळचे पाळे ता.  कळवण येथील असून सध्या व्यवसायानिमित्त वास्तव्यास नाशिक येथे आहेत. यांचे जुळे मुलगा व मुलगी (भाऊ बहीण) यांना इयत्ता दहावी शालांत परीक्षेत (२०१९-२०) दोघांनी समान (८८.२०%) गुण मिळविले आहेत, विश्वात अनेक विक्रम प्रस्थापित होत असतात मात्र असा विक्रम प्रथमताच घडल्याचे दिसून येते व भविष्यात लवकर कधी होणार हे सांगणे शक्य नाही,  कौतुकास्पद बाब तसेच हा विशेष योगायोग आहे.      जुळ्यांचा चेहरा राम और शाम असतो असे अनेक चित्रपटात वा वास्तवात आढळून येते, मात्र मुलगा आणि मुलगी हा जन्मताच बदल असलेले ओम आ

कोविड रुग्ण तात्काळ शोधणे व उपचार होणेकामी "सच प्रणाली" नामक ऑनलाईन ऍपचे उदघाटन ! सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक - बाळासाहेब क्षीरसागर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
"सच प्रणाली" ऍपचे उदघाटन संपन्न ! ******************************        नासिक::-कोरोना प्रतिबंधात्मक पार्श्वभूमीवर सिन्नर तालुका आढावा सभेप्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षिरसागर,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड, जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सीमंतिनी कोकाटे, पंचायत समिती सभापती सौ.शोभाताई बरके, उपसभापती संग्राम कातकाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता बाल व संगोपन अधिकारी डॉ. चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन बच्छाव, गटविकास अधिकारी डॉ.लता गायकवाड, ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. निर्मला गायकवाड, पंचायत समिती सदस्य जगन भाबड, सौ.संगीता पावसे, भगवान पथवे, सौ. सुमन बर्डे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.          कोरोना प्रादुर्भाव या संदर्भात लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या समस्या व त्यावर करावयाची उपाययोजना या संदर्भात समन्वयाने चर्चा करण्यात आली. कोरोना हे देशावरील संकट असल्याने सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याची भूमि

न्यूज मसालाचा अंक दि. ३० जुलै २०२०. संपादकीय-मुलाखतीचा सोस !! दीपक दंडवतेंच्या लेखणीतून-सारस्वतांच्या नगरीतील संतोष !!! रासाका-निसाका सहकार विशेषांक !!! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
संपादकीय                      मुलाखतींचा सोस !! मुलाखतीला जायचं म्हणजे तयारी करावी लागते पण कितीही अभ्यास करून जा, जर मुलाखत घेणाऱ्यांनी आधीच ठरवलेले असेल तर काय कुणाची बिशाद की तुमची निवड होईल ? बरं मुलाखत कोणी कोणाची घ्यावी याचे काही संकेत असतात, अनेक ठिकाणी स्पष्ट लिहीलेले असते की परीक्षार्थी ने जर कुणाची ओळख दाखविली, मुलाखत घेणाऱ्यावर दबाव आणला किंवा अनैतिक मार्गाचा अवलंब केला तर उमेदवाराला मुलाखत देण्यापासून रोखले जाईल ! आणि रोखले जातेच ! मात्र आज कुणीही मुलाखत घ्यायला येतो आणि स्वत:ची पाठ थोपटून घेत असतो ! अनाकलनीय असे वाटते. माध्यमांमध्ये मुलाखतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे हा संशोधनाचा विषय आहे तरीही अनेक माध्यमे मुलाखत या गोंडस नावाखाली उखळ पांढरे करून घेतात, सर्वच मुलाखती अशा असतात असे नाही.          मुलाखतीची प्रश्नावली कशी, कधी कुणाला अडचणीत आणेल हे सांगता येत नाही व कधी किती सोयीस्कर असेल हेही सांगता येत नाही. मुलाखतीला विचारले जाणारे प्रश्न एकसारखे असतील तरीही ज्याची निवड करायचे ठरविले तोच निवडला जातो ! हे कसं ?       एका नोकरीसाठीच्या मुलाखतीमध्ये प्रत्येका

पक्षीय जोडे बाजूला ठेवून मॅरेथॉन बैठकांनी सहकार क्षेत्राला नवसंजीवनी मिळण्याची आशा ! आता मात्र निर्णायक लढाईसाठी सर्व एकत्रित येणार ? सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस,           नासिक::-निफाड तालुक्यातील सहकार चळवळ कर्मवीरांनी ज्या अनुषंगाने स्थापन केली होती त्यासाठी आपण समाजाचे देणे लागतो या लोक भावनेतून आपण सर्वांनी काम केले तर पुन्हा संस्थांना व सहकारला उर्जिता अवस्थेत आणणे अवघड नाही, निफाड सहकारी साखर कारखाना, कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना हे दोन सहकारी व केजीएस शुगर इन्फ्रा प्रा.ली., हा खाजगी कारखाना बंद अवस्थेत असल्याने हे कारखाने सुरु करणे कामी निफाड तालुक्यातील सर्व पक्षीय जेष्ठ नेत्यांशी विचारविनिमय करावा या दृष्टिकोनातून निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी पुढाकार घेऊन पिंपळगाव बसवंत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये सोमवारी बैठक आयोजित करून आपली भूमिका मांडली. सदर बैठकीचे अध्यक्षस्थानी तालुक्यातील जेष्ठ नेते माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील होते. यावेळी विलास बोरस्ते यांनी बैठकीचा मुख्य हेतू काय आहे हे विशद करून आमदार दिलीप बनकर यांनी प्रास्ताविका मध्येच बैठकीचा मुख्य हेतू तालुक्यातील सहकार चळवळ टिकली पाहिजे या दृष्टिकोनातून जेष्ठाचे मार्गदर्शन व सह

मे. तहसीलदार चर्चेचा विषय ठरले ! मग चर्चा तर होणारच !! काय केले मे. तहसीलदारांनी, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस,        नासिक::- निफाड तालुक्याचे तहसीलदार म्हणून असलेले दीपक पाटील हे आज चर्चेचा विषय ठरले आहेत. आपल्याला मिळालेल्या शासकीय वाहनाने  लासलगाव-विंचूर रस्त्याने जात असताना त्यांचा कडून झालेल्या कार्यामुळे चर्चा होत आहे. यापूर्वीही त्यांनी आपल्या कामकाजातून अनेक घटनांतून संवेदनशील अधिकारी असल्याचे  दाखवून दिले आहे.      काल दि. २७ जुलै रात्री विंचूर रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे दीपक पाटलांची माणुसकी व संवेदनशीलतेचा जनतेला प्रत्यय आला, कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्हा भरात नव्हे तर महाराष्ट्रात वाढत चाललेला असतांना संकटसमयी ही मदतीला धावणारे विरळाच, गाडीला लिफ्ट मागितली तर ती मिळत नाही, अनोळखी व्यक्तिला गाडीवर बसवून घ्यायला तयार नाही, जो तो सोशल डिस्टन्स ठेवण्याचा प्रयत्न करत कोरोनाच्या  प्रादुर्भावापासून अलग करीत आहेत, अशा वेळी  दोन तरूण अपघात होऊन रस्त्यावर पडलेले असताना निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी सरकारी गाडीत त्यांना उचलून टाकत त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल केले,  या दोघा तरुणांना कोरोणाच्या काळात एक प्रकारे जीवनदा

मुख्याध्यापक दिनेश साळुंके अर्थात मदतीला धावून जाणारा खरा कोरोना योद्धा ! त्यांचा सत्कार म्हणजे सामाजिक भान असलेले सहृदयी व्यक्तिमत्वाचा सत्कार - प्रशांत जानी, डिस्ट्रिक गव्हर्नर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
कोरोना योद्धा सन्मान     कोरोना संचारबंदी,लाॅकडाऊन काळात नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात गरजू कुटुंबांना मदत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, खाजगी डाॅकटरांना पी.पी.ई. किटचे वाटप,माकस्चे मोफत वाटप, कोविड १९ आजारा संदर्भात जनजागृती करून अवरॅनेसचे काम, काळजी व उपाय संदर्भात सोशल मिडीया द्वारे माहिती प्रसिध्द केली.           २३ मार्चपासून सुरू असलेल्या लाॅकडाऊनमध्ये मुख्याध्यापक दिनेश साळुंके यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक गरजूंना मदत केली, मदतीसाठी मित्रपरिवारामार्फत गरजूंची माहीती घेत शक्यहोईल तितकी मदत पोहोचविली. शाळेला सुट्टी असूनही नंदूरबार व विखरण येथेच थांबणे पसंत केले, याची दखल घेत अनेक संस्थांनी त्यांचा कोविड योद्धा म्हणून प्रशस्तीपत्राद्वारे सत्कार केला. मात्र आंतरराष्ट्रीय रोटरी क्लब ऑफ नंदनगरी यांनी साळुंके यांचे कार्य फक्त प्रशस्तीपत्राने न करता महाराष्ट्र राज्याचे डिस्ट्रिक गव्हर्नर प्रशांत जानी यांच्या हस्ते केले. यावेळी जानी यांनी सांगितले की, साळुंके यांच्यासारखे मुख्याध्यापक म्हणजे सामाजिक भान असलेले सहृदयी व्यक्तिमत्व आहे.          आपासो.आ.ध.देवरे माध्यमिक विद्

नासिकच्या शिक्षकाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद !!! शैक्षणिक उपक्रम 'रविवारचा विरंगुळा" !!! कौतुक तर होणारच पण का ? उपक्रमाच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नितीन प्रभू केवटे यांच्या ‘रविवारचा विरंगुळा’ या शैक्षणिक उपक्रमाची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद            नासिक::-त्र्यंबकेश्वर येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचे शिक्षक नितीन प्रभू केवटे (जन्म ०२ नोव्हेंबर १९८९) यांनी प्रत्येक रविवारी मुलांना वर्गाबाहेरचे अनौपचारिक आणि व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी 'रविवारचा विरंगुळा' या आदर्श शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात केली. शिक्षण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया चार भिंतीच्या बंदिस्त खोलीत पूर्णत्वास येऊ शकत नाही. शिक्षण हे सहज निरीक्षणातून व कृतीतून घडते आणि समृद्ध होते. अनौपचारिक शिक्षणात व्यवसाय शिक्षण व जीवन शिक्षण देण्यासाठी मुलांच्या साह्याने शाळेत सिमेंटचा १२ x १४ फूट जागेवर ३ फूट उंच असा मजबूत किल्ला उभारला, सिंटेक्सच्या टाकाऊ टाकी पासून शौचालय निर्मिती, झाडाला सिमेंटचे चबुतरे, जुन्या लाईटच्या खांबाचा उपयोग करून हँडबॉल व व्हॉलीबॉल कोर्टची निर्मिती, शाळेतील टाकाऊ बँडच्या पत्र्यापासून घड्याळ व संख्यावाचन शैक्षणिक साहित्याची निर्मिती, गावातील भजनी मंडळाचा कार्यक्रम, मातीकाम, माळीकाम प्रशिक्षण, गावच्या पाणवठ्या

सर्वपक्षीय नेते एकत्र येत तालुक्यातील जनतेला पक्षविरहीत राजकारणाचा दिला सकारात्मक संदेश !! आज झालेल्या बैठकीच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
संतोष गिरी यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस निसाका-रासाका सुरू करण्याबाबत पिंपळगाव बाजार समितीत जेष्ठ नेत्या सह सर्वपक्षीय आज बैठक संपन्न       नासिक::-निफाड तालुक्यातील जनतेसाठी जीवन-मरणाचा प्रश्न असलेल्या ऊस उत्पादक शेतकरी, सभासद कामगार व संपूर्ण तालुक्यात आर्थिक गणित या दोन्ही संस्थांवर असलेल्या निसाका व रासाका या दोन्ही संस्था सुरु होण्यासाठी व तालुक्‍यातील गेलेले गतवैभव परत येण्यासाठी आज पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली निफाड तालुक्यातील सर्वपक्षीय जेष्ठ नेत्यांची बैठक झाली. यावेळी दोन्ही कारखाने सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. माजी आमदार अनिल कदम  यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली. निसाका-रासाकाच्या मुद्द्यावर शेतकरी हितासाठी आपण आमदार दिलीप बनकर यांना राजकीय जोडे बाजूला ठेवून सहकार्य करणार असून बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे अनिल कदम यांनी यावेळी जाहीर केले. निसाकाच्या बाबत जिल्हा बँकेच्या बैठकीत चर्चा झाली असून इतर सक्षम संस्थाना कारखाने चालवण्यास देण्यासाठी अध्यादेश काढून विधानसभेत कायदा

माजी आमदाराच्या प्रयत्नाने शहरविकासासाठी पाच कोटींचा निधी आणण्याच्या प्रयत्नांना यश ! शहराच्या विकासासाठी आजी-माजी सत्ताधारी पक्षांच्या आमदारांमध्ये स्पर्धा !! कोणत्या शहराच्या विकासासाठी होत आहे स्पर्धा, सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस, माजी आमदार अनिल कदम यांच्या प्रयत्नाने निफाड शहराच्या विकास कामांसाठी पाच कोटी रुपये मंजूर निफाडचा विकासासाठी आजी-माजी आमदारांमध्ये स्पर्धा         नासिक::-जिल्ह्यातील निफाड शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी माजी आमदार अनिल कदम यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, नाशिकचे पालकमंत्री छगनराव भुजबळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून निफाड शहराच्या विकासकामांसाठी  पाच कोटी रुपये मंजूर केले आहे.! त्यामुळे निफाडकरांनी समाधान व्यक्त केले.            नगरपालिकांना  वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी ठोस तरतूद विशेष अनुदान या योजनेअंतर्गत लेखाशीर्ष-४२१७०६०३/२०२० अंतर्गत माजी आमदार अनिल कदम यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत निफाड च्या  विकासासाठी आमदार नसलो तरी तालुक्याच्या विकासासाठी आपण मागे नाही हे माजी  आमदार अनिल पाटील कदम यांनी पाच कोटी निधी आणत जनतेला दाखवून दिले. सदर निधी मंजूर केला असल्याबाबतचे  व अनिल कदम यांचे पत्र व मंजूर विकासकामांचा शासन निर्णय निफाड नगरपंचायतीला नुकताच प्राप्

१३०४९ रक्तदात्यांचे रक्तदान !! २९ वर्षांपासून रक्तदान यज्ञ होत आहे साजरा !! निमित्त- वडील व दोन मोठ्या भावांच्या स्मृतीप्रित्यर्थ !!! आजच्या ५०५ दात्यांमध्ये सामाजिक, राजकीय, प्रशासकीय व्यक्तिंचा समावेश !!!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
आमदार बनकर यांच्या रक्तदान यज्ञास पिंपळगावी ५०५ रक्तदात्यांचे रक्तदान संतोष गिरी निफाड, न्यूज मसाला सर्विसेस,        नासिक::- निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे आज तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांच्या वडील व दोन मोठे भाऊ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गत अनेक वर्षापासून सुरू असलेला रक्तदान महायज्ञ  सोहळ्याच्या आवाहनाला तालुक्यातील रक्तदात्यांनी उत्तम प्रतिसाद देत सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत  रक्तदान शिबिरात ५०५ नागरिकांनी रक्तदान केल्याने ५०५ रक्त बाटल्यांचे संकलन झाले, आजपर्यंत १३०४९ इतक्या रक्त बाटल्यांचे संकलन नाशिक येथील अर्पण रक्तपेढी ला बनकर यांच्या माध्यमातून आजपर्यंत झालेले आहे. तर आमदार दिलीप बनकर यांच्या रक्तदानाचा फायदा हा सर्वसामान्य जनते समोर  तालुक्यातील रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णांना नाशिक येथील अर्पण रक्तपेढी मध्ये जाऊन होतो, जेव्हा ही निफाड  तालुक्यातील  रुग्णांना गरज लागते तेव्हा हक्काने अर्पण रक्त पेढी मध्ये बनकर यांच्या   मार्गदर्शनाखाली संबंधित रुग्णाला रक्त पुरवठा विनामूल्य होत असल्याने आमदार बनकर यांनी घेतलेला हा सामाजिक वसा गत अनेक वर्षा सुरू असल्याने या  कार

वय वर्षे फक्त ६८ ! विहिरीत जलयोग करणार्‍या योगपटू प्रकाश बेल्लद यांची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
६८ व्या वर्षीही विहिरीत जलयोग करणार्‍या योगपटू प्रकाश बेल्लद यांची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद कोल्हापूर::-कब्बुर येथील योगपटू प्रकाश बेल्लद (जन्म १९ एप्रिल १९५३) यांची ३३ वर्षांपासून जलयोगसाधना सुरू आहे. योगासनामध्ये जलयोग सर्वाधिक कठीण मानला जातो. पण, कब्बुर, तालुका चिक्कोडी येथील ६८ वर्षीय ज्येष्ठ योगपटू गेल्या ३३ वर्षांपासून १०० फूट खोल विहिरीत  जलयोग करत आहेत. पाण्यात सरळ थांबून केला जाणारा स्तंभासन हा योग प्रकार अवघड आहे. त्यासाठी खूप सराव करावा लागतो. आपली कला इतरांनाही शिकवण्यात योगपटू प्रकाश बेल्लद धन्यता मानतात. त्यांनी आजपर्यंत ५०० पेक्षा अधिक मुलांना पोहण्याचे व जलयोगाचे धडे दिले असून सध्या ते अत्यंत निरोगी जीवन जगत आहेत, पूर्वी ७७ किलो असलेले त्यांचे वजन आज ६४ किलो असून; त्यांनी आपली पत्नी सौ. जयश्री बेल्लद यांच्यासह देहदानाचा संकल्पसुद्धा केला आहे. योगपटू प्रकाश बेल्लद यांनी आपले संपूर्ण जीवन योगासाठी वाहून घेतले आहे. अन्य व्यक्ती जमिनीवर करत असणारी कठीण योगासने ते अगदी सहजरीत्या १०० फूट खोल विहिरीच्या पाण्यावर तरंगत करतात. यात पद्मासन, पर्वतासन, गरुडास

साप्ताहिक न्यूज मसाला चा दि. २३ जुलै २०२० चा अंक ! @@ आॅनलाईन शिक्षणासाठी 'डोनेट अ डिवाईस' चळवळ, @@ पत्रकारांसाठी उघडली जिल्हा माहिती कार्यालयाची दारे, @@ ऐतिहासिक बौद्ध लेणी जतन करा अन्यथा सिडकोला टाळे ठोकू-पॅंथर आॅफ सम्यक योद्धाचा इशारा ! @@ पुण्यस्मरणानिमित्त भक्ताने पुतळ्यावरील अंधार केला दूर ! @@ बाजार समित्यांनी कोरोनाबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात-आदेश ! @@ गटविकास अधिकाऱ्यांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार ! @@ अष्टपैलू व्यक्तिमत्त्व-संजय देवधर ! @@ जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या चे कोरोनाने निधन ! @@ प्रसिद्ध सायंदैनिकाचे संपादक शहा यांना मातृशोक ! @@ छावा मराठा कृती समितीकडून सॅनिटायजर फवारणी ! @@ स्थायीची सभा व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारेच होणार ! @@ सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
साप्ताहिक न्यूज मसाला चा दि. २३ जुलै २०२० चा अंक ! @@ आॅनलाईन शिक्षणासाठी 'डोनेट अ डिवाईस' चळवळ, @@ पत्रकारांसाठी उघडली जिल्हा माहिती कार्यालयाची दारे, @@ ऐतिहासिक बौद्ध लेणी जतन करा अन्यथा सिडकोला टाळे ठोकू-पॅंथर आॅफ सम्यक योद्धाचा इशारा ! @@ पुण्यस्मरणानिमित्त  भक्ताने पुतळ्यावरील अंधार केला दूर ! @@ बाजार समित्यांनी कोरोनाबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात-आदेश ! @@ गटविकास अधिकाऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार ! @@ अष्टपैलू व्यक्तिमत्त्व-संजय देवधर ! @@ जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या चे कोरोनाने निधन ! @@ प्रसिद्ध सायंदैनिकाचे संपादक शहा यांना मातृशोक ! @@ छावा मराठा कृती समितीकडून सॅनिटायजर फवारणी ! @@ स्थायीची सभा व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारेच होणार ! @@ सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

पुण्यस्मरणानिमित्ताने भक्ताने पुतळ्यावरील अंधार केला दूर ! कोणी व कसा केला पुतळ्यावरील अंधार दूर व त्यावरील प्रतिक्रिया सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
संतोष गिरी यांजक डून, न्यूज मसाला सर्वि सेस,          नासिक: :- निफाड तालुक्यातील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना अर्थात रासाकाच्या कार्यस्थळावर कर्मवीर काकासाहेब वाघ यांचा पूर्णाकृती पुतळा गत अनेक वर्षांपासून रासाकाचा  वीजपुरवठा खंडित असल्याने अंधारात असल्याने कर्मवीर प्रेमींमध्ये नाराजीची भावना संपूर्ण तालुक्यात होती. ही जन भावना रासाका चे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील डुकरे यांच्या लक्षात आली. त्यात दत्तात्रय पाटील अध्यक्ष असताना कर्मवीर काकासाहेब वाघ यांचा पूर्णाकृती पुतळा महाराष्ट्र राज्याचे दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते व दिवंगत लोकनेते मालोजीराव मोगल यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत वीस वर्षांपूर्वी रासाका कार्यस्थळावर उभारण्यात आला होता, रासाका बंद असल्याने   पुतळ्याची देखभाल होत नसल्याने कर्मवीरांच्या या पुतळ्याला कोणीच वाली नसल्याचे चित्र होते, पुतळा कायम अंधारात होता, कर्मवीरांनी या परिसरात सर्वप्रथम वीज आणून  या परिसराला उजेडात आणले त्यांचाच पुतळा आज अंधारात असल्याची बाब डुकरे  पाटील यांना खटकत होती म्हणूनच आज त्यांच्या पुण्यस्मरणा न

सामान्य रुग्णालयाची स्थापना ग्रामीण जनतेच्या आरोग्यासाठी स्थापन करण्यात आली असून अत्यवस्थ संदर्भित रूग्णांना दाखल करून घेण्याचे निर्देश देण्यात यावेत-जिल्हा परिषद अध्यक्ष !!

इमेज
           नासिक::- ग्रामीण भागातील कोरोणाग्रस्त रुग्णांना सामान्य रुग्णालय नाशिक व नाशिक शहरातील खाजगी रुग्णालय कोविड सेटर येथे दाखल करुन घेणेबाबत नासिक चे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी विनंतीपत्राद्वारे मागणी केली.         नाशिक जिल्हयात ग्रामीण व शहरी भागात कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागामध्ये कोरोना बाधीत रुग्णावर उपचार स्थानिक स्तरावर सुरु आहेत. परंतु जे रुग्ण अत्यवस्थ होतात अशा रुग्णांना जिल्हा स्तरावरील शासकिय रुग्णालय येथे संदर्भित करण्यात येते. परंतु ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्णांना संदर्भित केल्यावर देखील सदर रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक व वैद्यकिय महाविदयालय नाशिक येथे दाखल करुन घेतले जात नसल्याबाबत मोठया प्रमाणात तक्रारी येत आहेत. सामान्य रुग्णालयाची स्थापना हि ग्रामीण भागातील जनतेसाठी आरोग्य सुविधा पुरविणे कामी स्थापन करण्यात आलेली असताना ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा मिळत नाही. नाशिक शहरातील काही खाजगी रुग्णालय हे कोवीड सेंटर म्हणून घोषित करण्यात आलेली असून त्यांचे संपूर्ण नियंत्रण हे मह

साप्ताहिक न्यूज मसाला चा १६ जुलै २०२० अंक ! https://drive.google.com/file/d/1-1P2myIY46qogPirwQpPCiDnur0z7-KT/view?usp=drivesdk

इमेज
साप्ताहिक न्यूज मसाला चा १६ जुलै २०२० अंक, https://drive.google.com/file/d/1-1P2myIY46qogPirwQpPCiDnur0z7-KT/view?usp=drivesdk

छावा मराठा कृती समितीच्या वतीने एक हात मदतीचा उपक्रम तसेच महाराष्ट्रातील व परराज्यातील कोव्हिडं योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
छावा मराठा कृती समितीच्या अनिकेत पवार यांनी केला कोव्हिडं योद्धांचा सन्मान       नासिक::- कोरोना पार्श्वभूमीवर प्राथमिक सेवा देणारे डॉक्टर्स , नर्सेस, सफाई कर्मचारी , सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता सामान्य जनतेची सेवा केली.  या सेवकांचा, वीरांचा सन्मान छावा मराठा कृती समितीकडून करण्यात येत आहे. छावा मराठा कृती समितीचे संस्थापक चंद्रकांत भराट, उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रमोद बोरसे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अमोल निकम , उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत भामरे व नाशिक जिल्हाध्यक्ष राकेश खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हिडं योद्धा २०२० हे सन्मानपत्र देऊन गौवरविण्यात येत आहे, यात संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील राज्य व शहरांमध्येही सन्मानपत्राचे ऑनलाइन वितरण करण्यात आले, तेलंगणा , गुजरात , दिल्ली , वडोदरा , हैद्राबाद , अहमदाबाद आदी ठिकाणच्या खऱ्या योद्ध्यांना प्रशस्तीपत्राद्वारे सन्मानित करण्यात आले. छावा मराठा कृती समितीच्या अंतर्गत २०० हुन अधिक सन्मानपत्रांचे क्रियाशील व्यक्तींना वाटप करण्यात आले, लाॅकडाऊनमुळे ऑनलाइन सन्मा

राजकारण विरहित वातावरणात यंदा बाॅयलर पेटणार की पेटवणार ! कृषीमंत्र्यांना घातलेले साकडे पूर्णत्वास जावे अशी शेतकऱ्यांची इच्छा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस "निसाका"साठी कृषिमंत्री दादा भुसे यांना गोदाकाठवासीयांचे साकडे नासिक::-निफाड तालुक्यातील जनतेच्या जीवन मरणाचा विषय असलेल्या निसाका-रासाका शासन दरबारी लवकर प्रयत्न करून कार्यान्वित करावा, या मागणीचे निवेदन देऊन आज गोदाकाठ वासीयांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना साकडे घातले. आढावा बैठकीसाठी आज सायंकाळी निफाडमध्ये आलेल्या कृषिमंत्री दादा भुसे यांची निफाड सेवा सहकारी सोसायटीच्या सभागृहात करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांच्या पुढाकाराने गोदाकाठच्या शिष्टमंडळाने माजी आमदार अनिल  पाटील कदम व जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत भेट घेऊन चर्चा केली.! यावेळी निसाकासाठी शासन दरबारी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दादा भुसे यांनी शिष्टमंडळाला दिले.!          करंजगावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपालिका सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज रोजी निफाड तालुक्यात साडेपाच हजार हेकटर पेक्षा अधिक ऊस उभा आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे उन्हाळ्यात रसवंतीगृहे बंद असल्

आढावा - टुकार नोकरशाही, सामान्यांचे कैवारी फक्त राजकारणी ! मुख्यमंत्र्यांनी यांत लक्ष द्यावे ! सविस्तर माहितीसाठी न्यूज मसालाचा स्पेशल आढावा बैठक रिपोर्ताजसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
टुकार नोकरशाही, सामान्यांचे कैवारी फक्त राजकारणी ! महाराष्ट्रातील नोकरशाही वर राजकारण्यांचा विश्र्वास नाही का ? असे चित्र सध्या दिसत आहे, सत्ताधाऱ्यांचा बैठका व विरोधकांचे दौरे यातून सामान्य जनतेला कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर किती दिलासा मिळतो हा प्रश्र्न उपस्थित होतो काय असे चित्र महाराष्ट्रात दिसत आहे !            सर्वसामान्य जनतेला कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेवरच अवलंबून राहावे लागणार हे सर्वज्ञात असताना प्रशासनावरील आणखी ताण वाढविण्यात राजकारणाचा हस्तक्षेप कितपत योग्य आहे ? जनतेने निवडून दिले तर जनतेची काळजी विश्वस्त या नात्याने राजकारण्यांवर येऊन पडते मात्र इतकीही काळजी घेणे आज योग्य वाटत नाही, ७५ वर्ष जुने प्रशासन आपत्कालीन परिस्थितीत आपले कौशल्य दाखवत आले आहे तेथे प्रशासनाच्या जीवनमरणाचा भाग नव्हता अशावेळी प्रशासनाकडून आणखी चांगले कार्य करुन घेण्यासाठीचा राजकीय हस्तक्षेप कौतुकास्पद असतो, विषाणू शी प्रशासनाने लढणे म्हणजे सीमेवरील जवानासारखे काम असते, स्वत:चां जीवही जाऊ शकतो तरीही जर प्रशासनिक सैन्य लढत असेल तर त्याचा आढावा किती प्रमाणात घ्यावा याचे

कुणाचे मन दुखावले असल्यास मी दिलगीरी व्यक्त करतो- सिद्धार्थ वनारसे

इमेज
कुणाचे मन दुखावले असल्यास मी दिलगीरी व्यक्त करतो- सिद्धार्थ वनारसे                 माझ्या शेतकरी बांधवांनो मी ही शेतकरी पुत्र आहे, चांदोरी गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या सहकार्याने काम करीत आहे, राजकारण करताना पक्षाशी व पक्ष नेत्यांबरोबरच्या बांधिलकीची जाण ठेवून काम करावे लागते, विकासाचे राजकारण करताना विरोधकांना विश्वासात घ्यावे लागते त्याप्रमाणे तालुक्यातील प्रश्नासाठी मी सदैव सर्वांसोबत आहे, पक्षनिष्ठेशी प्रामाणिक असताना रासाका व निसाका बातमी च्या माध्यमातून   कुणाचे मन दुखावले जाणारे शब्द वापरले गेले असतील तर मी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांप्रती दिलगीरी व्यक्त करतो. सदैव आपलाच सिद्धार्थ वनारसे, जिल्हा परिषद सदस्य चांदोरी गट,

संजय देवधर- काय विशेषणे लावावीत या नांवापुढे,. चित्रकार, कलासमिक्षक, वारली शैली अभ्यासक, वार्ताहर, उपसंपादक, मुक्त पत्रकार, सहकारी, गुरू, बांद्रा स्कूल आॅफ आर्टचा विद्यार्थी, जे जे स्कूल ऑफ आर्ट चा विद्यार्थी, कलाविषयक संस्थांचे विश्वस्त, वारली चित्रसृष्टी या मराठी पुस्तकाचे लेखक की वारली आर्टवर्ल्ड या इंग्रजी पुस्तकाचे लेखक, आदर्श पती, आदर्श पिता वगैरे अपुरी पडतील !! नासिकच्या कलाक्षेत्रातील एक सुवर्णाक्षरांनी कोरलेले नांव-अभिमान नासिककरांचा !!! आज वयाची एकसष्टी पुर्ण करीत आहेत, या व्यक्तिमत्वाला शब्दबद्ध केले अजय हातेकरांनी !!! प्रेरणेचा स्त्रोत वाचायलाच हवा, यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!! न्यूज मसाला परीवाराकडून नासिकच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा- संपादक, नरेंद्र पाटील

इमेज
अष्टपैलू व्यक्तिमत्व !   चित्रकार, कलासमीक्षक, वारली चित्रशैलीचे अभ्यासक, वार्ताहर, उपसंपादक आणि सेवानिवृत्ती नंतर आता मुक्त पत्रकार एवढे सगळे पैलू एकाच व्यक्तीत असणे विरळाच. सहकारी व गुरु या दोन्ही नात्यांनी आमचे ऋणानुबंध जुळले. ज्येष्ठ स्नेही, मार्गदर्शक संजय देवधर दि.१३ जुलै रोजी वयाची ६१ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांच्यातील मला भावलेल्या व्यासंगी व्यक्तिमत्वाचे हे शब्दचित्र...        नाशिकमध्ये मध्यमवर्गीय परिवारात संजय देवधर यांचा १३ जुलै १९५९ रोजी जन्म झाला. त्यांचे पणजोबा प्राणाचार्य कृष्णशास्त्री देवधर प्रख्यात वैद्य होते. त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. रविवार पेठेतील त्यांचा वाडा असलेल्या गल्लीला तत्कालीन नगरपालिकेने सन्मानार्थ देवधर गल्ली असे नाव दिले. अशा घराण्यात जन्मलेल्या संजय देवधर यांना चित्रकलेची उपजत आवड होती. पेठे विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याचे त्यांनी ठरवले. नाशिक कलानिकेतन या संस्थेत एक वर्षाचा फाउंडेशन कोर्स त्यांनी पूर्ण केला. नंतर उपयोजित कलेचे उच्चशिक्षण घेण्यासाठी मुंबईतील बांद्रा स्कुल ऑफ आर्ट व ज

हा घ्या पुरावा ! प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती ? पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे !! जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला !!! क्रियाशील कोण आमदार आहेत ? सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या  पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य  सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत  आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे ! परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती   ?? आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड !! नासिक: :- निफाड तालुक्यात सध्या  पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका  बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून  हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा   बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या  विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा,   "सब्र का फल मीठा होता है" अशा शब्दांत टिकाकारांना   चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांन