पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सदाचारी बनो जीवन में आगे बढो !

इमेज
सदाचारी बनो जीवन में आगे बढो !    नासिक::- बॉईज टाऊन पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम व्यक्तिमत्व व बदलत असलेली शिक्षण पद्धती यांचे महत्व सांगण्यासाठी  दि. २५ नोव्हेंबर रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ यांचे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.        आजच्या समाजात शिक्षणाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शिक्षणाचे बरेच उपयोग आहेत परंतु त्यास एक नवीन दिशा देणे आवश्यक आहे. शिक्षण आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आवश्यक साधन आहे. आपल्या जीवनात शिक्षणाची ही साधने वापरुन आपण काहीही चांगले साध्य करू शकतो. उच्च स्तरीय शिक्षण लोकांना सामाजिक आणि कौटुंबिक आदर ठेवण्यास आणि एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करते. शिक्षणाचा काळ हा सर्वांसाठी, सामाजिक आणि वैयक्तिकरित्या खूप महत्वाचा काळ आहे, यामुळेच आपल्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व  आहे.आजच्या आधुनिक  आजच्या काळात शिक्षणाची पातळी वाढवण्यासाठी अनेक पद्धती अवलंबल्या जातात हे सांगताना त्यांनी गुरुकुल पद्धतीचे शिक्षण व त्याचे फायदे देखील विविध उदाहरणांतून विद्यार्थ्यांसमोर मांडले; तसेच करोना महामारी

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक

इमेज
महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतावर मागील अनेक शतकांत विविध परकीय शक्तींनी आक्रमण केले तरीही आपण कायमच देश म्हणून अखंड राहिलो. संस्कृती, आहार, विचारात विविधता असूनही एवढा मोठा खंडप्राय देश म्हणून कसा टिकला, याचे आश्चर्य वाटते, पण अनेक आक्रमणानंतरही भारताला काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत महाभारत आणि रामायण या दोन महाकाव्यांनी एकत्र जोडून ठेवले, ही साहित्याची ताकद असून ते अमोघ आहे, जोपर्यंत हे दोन ग्रंथ आहेत तोपर्यंत देशाच्या धर्माला धोका नाही. भारताचा एकच धर्म तो म्हणजे साने गुरुजींनी आम्हाला शिकवलेला मानवता धर्म. जगाला प्रेम अर्पावे, हाच आमचा धर्म, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले.          यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा यशवंतराव चव्हाण पुरस्कार त्यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर,

संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज (२६ नोव्हेंबर, २०२३) संविधान दिन साजरा करण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील उद्देशिकेचे ऑनलाइन वाचन आणि प्रश्नमंजुषा याकरिता काल पोर्टल्सचा केला प्रारंभ !

इमेज
संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी  (२६ नोव्हेंबर, २०२३) संविधान दिन साजरा करण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील उद्देशिकेचे  ऑनलाइन वाचन  आणि प्रश्नमंजुषा याकरिता काल पोर्टल्सचा केला प्रारंभ ! भारतीय राज्यघटना स्वीकारली गेल्याच्या दिवसाची आठवण  आणि राज्यघटनेच्या निर्मात्यांनी दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.                                           यावर्षीही २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमातले सक्रिय सहभागी म्हणून संसदीय कामकाज मंत्रालयाने दोन डिजिटल पोर्टल्स  सुधारित आणि अद्ययावत केले आहेत. खास संविधान दिन, २०२२ साठी केलेल्या या पोर्टल्सपैकी एक राज्यघटनेची उद्देशिका इंग्रजी आणि आणि राज्यघटनेच्या ८ व्या अनुसूचीअंतर्गत नमूद केलेल्या २२ इतर भाषांमध्ये वाचण्यासाठी ( https://readpreamble.nic.in/  ) असून दुसरे  "भारतीय संविधानावरील ऑनलाइन प्रश्नमंजुषा" ( https://constitutionquiz.nic.in/  ) यासाठी आहे. संविधान दिनाच्या पूर

‘कवी डॉ.यशवंत मनोहर’ यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार ! गौरव२८ नोव्हेंबर रोजी समता भूमी, महात्मा फुले स्मारक पुणे येथे होणार ‘समता पुरस्काराचे’ वितरण

इमेज
‘कवी डॉ.यशवंत मनोहर’ यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव २८ नोव्हेंबर रोजी समता भूमी, महात्मा फुले स्मारक पुणे येथे होणार ‘समता पुरस्काराचे’ वितरण ! मुंबई, पुणे, नाशिक, दि. २५ नोव्हेंबर :- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ कवी, समीक्षक डॉ.यशवंत मनोहर यांना देण्यात येणार आहे. या पुरस्करामध्ये रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे. सदर पुरस्कार दि.२८ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता समता भूमी, फुले वाडा, पुणे येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, पुणे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, वैष्णवी सातव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.         या सोहळ्यासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातून समता सैनि

सचिन बेंडभर यांची आजोळ कविता शिष्यवृत्ती परीक्षेत !

इमेज
सचिन बेंडभर यांची आजोळ कविता शिष्यवृत्ती परीक्षेत ! - मंथन प्रकाशनाने कवितेला दिले मानाचे स्थान   पुणे २५ (प्रतिनिधी)::-पुणे जिल्ह्यातील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या वाघोबाचा मोबाईल या काव्यसंग्रहातील "आजोळ" या कवितेचा समावेश मंथन प्रकाशनाच्या शिष्यवृत्तीच्या तिसऱ्या प्रश्नपत्रिकेत करण्यात आला आहे. या कवितेला मंथन प्रकाशनाने मानाचे स्थान दिले असून सलग दुसऱ्यांदा त्यांच्या कवितेचा समावेश थेट प्रश्नपत्रिकेत करण्यात आला आहे.                     पुणे जिल्ह्यातील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांची एकूण पन्नास पुस्तके प्रकाशित आहेत. कळो निसर्ग मानवा या त्यांच्या कवितेचा समावेश इयत्ता सहावीच्या सुगम भारती या पाठ्यपुस्तकात आहे. आता त्यांच्या वाघोबाचा मोबाईल या काव्यसंग्रहातील "आजोळ" या कवितेचा समावेश मंथन प्रकाशनाच्या पाचवीच्या शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिकेत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावर्षी त्यांच्याकडे पाचवीचा वर्ग असून विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती सराव चालू आहे. मंथन प्रकाशनाकडून त्यांनी प्रश्नपत्रिकेचे दहा संच मागवले होते. त्यातील तिसऱ्या संचात गुरुजींना व विद्यार्थ्

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये तांत्रिक सहाय्य विषयक कार्यशाळा संपन्न !

इमेज
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये तांत्रिक सहाय्य विषयक कार्यशाळा संपन्न !     मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बदलत्या तंत्रज्ञानातील अद्यावतपणाचे आकलन विद्यार्थ्यांना व्हावे, यासाठी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक सहाय्य विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली.         यावेळी या क्षेत्रातील दिग्गज आस्थापने असलेले केपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, आयबीएम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले, पायथन आणि एसक्यूएल याबाबतची माहितीदेखील विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच व्यावसायिक क्षेत्रातील अनेक बाबीदेखील समजून घेता आल्या. यात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आयटी तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विभागातील एकूण ७८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना कंपनीकडून प्रमाणपत्रे देण्यात आली. त्याचा उपयोग या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटच्या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात होतो. संस्थेचे सेक्रेटरी अॅड. आप्पासाहेब देसाई, अध्यक्ष नंदकुमार काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संचालक प्रा. अशोक चव्हाण, नियुक्ती अधिकारी स्वप्निल देसा

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

इमेज
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे तिसऱ्या जागतिक उच्च-स्तरीय एएमआर परिषदेत सहभागी !     नवी दिल्ली::- ही एक मूक आणि अदृश्य महामारी आहे ज्याकडे इतर सार्वजनिक आरोग्य प्राधान्यक्रमांद्वारे दुर्लक्ष होऊ  शकत नाही , असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी म्हटले आहे. ओमान मधील मस्कत येथे  सूक्ष्मजीवप्रतिबंधकांना प्रतिरोध करण्याची क्षमता (एएमआर) यावरील तिसऱ्या जागतिक उच्च-स्तरीय परिषदेत मंत्रिस्तरीय पूर्ण सत्रात त्या आज बोलत होत्या. १५ हून अधिक देशांतील २२ प्रतिनिधी  या परिषदेत सहभागी झाले होते. या कार्यक्रमात चार संस्थांद्वारे एएमआर वर बहु -भागधारक भागीदारी मंचाची सुरुवात करण्यात आली. एएमआर चा प्रसार आणि त्यानंतरच्या जीवघेण्या  परिणामांवर भर देत डॉ. पवार यांनी अधोरेखित केले की एएमआर  हा जागतिक आरोग्याला धोका असून त्याचे  आरोग्य, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या  गंभीर परिणाम होऊ शकतात. एएमआरचा सामना करण्यासाठी भारताने केलेल्या उपाययोजनांवर  लक्ष केंद्रित करत आरोग्य राज्यमंत्री म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेत

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

इमेज
आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशी कोणताही संबंध नाही - दातार         नाशिक ( प्रतिनिधी ) - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तुपादेवी फाट्याजवळ असलेल्या आधारतीर्थ आश्रमात एका बालकाचा संशयास्पद मृत्यू झाला. काल ( दि.२३)भ विविध वृत्तपत्रात हे वृत्त प्रसिद्ध झाले. नाशिकमध्ये आधाराश्रम ही संस्था घारपुरे घाट, अशोकस्तंभ येथे गेली ६८ वर्षे निराधार बालकांचे संगोपन, पुनर्वसन करते. या संस्थेचा संबंधित वृत्ताशी कोणताही संबंध नाही असे संस्थेचे अध्यक्ष विजय दातार यांनी सांगितले.    आधाराश्रमाचे सचिव सुनीता परांजपे व हेमंत पाठक म्हणाले,  सुप्रसिद्ध वैद्य आण्णाशास्त्री दातार यांनी १९५४ साली या संस्थेची स्थापना केली. अधिकृतपणे बालके दत्तक देणारी आधाराश्रम ही नाशिक जिल्ह्यातील एकमेव सरकारमान्य संस्था आहे. सदर बातमीतील नामसाधर्म्यामुळे बऱ्याच हितचिंतक यांचे फोन आल्यामुळे व जनतेचा कोणताही गैरसमज होऊ नये यासाठी आम्ही हा खुलासा करीत आहोत. यापूर्वी काहीवेळा आधाराश्रम ही आमचीच संलग्न संस्था असल्याचा खोटा प्रचार काही सस्थांनी केला होता, हे देखील  निदर्शनास आले होते असे पाठक यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !

इमेज
आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !   दि.१ ते ३० नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून घोषित करण्यात आला आहे. निराधार बालक आणि अपत्यासाठी आसुसलेले पालक या दोन टोकांना दत्तक विधान एकत्र आणते. मात्र या क्षेत्रात अपप्रवृत्ती शिरल्याने आर्थिक देवाणघेवाण होऊन फसवणूक देखील केली जाते. बेकायदेशीर दत्तक प्रकरणे घडतात. नाशिकमध्ये आधाराश्रम ही सेवाभावी संस्था समाजाने नाकारलेल्या निरागस बालकांचे संगोपन करते. त्यांचे शैक्षणिक, मानसिक पालनपोषण करते. आरोग्याची काळजी घेते. अधिकृत दत्तक प्रक्रिया राबवून बालकांना हक्काचे पालक, कुटुंब मिळवून देते. आतापर्यंत सुमारे ९५० पेक्षा जास्त बालके देश-परदेशात दत्तक देण्यात आली आहेत.    रस्त्यावर टाकून दिलेल्या बेवारस बालकांनाही इतरांसारखे आपल्याला आईबाबा असावेत, आपले घर असावे असे वाटते. प्रेम करणारी, हक्काची माणसे आजूबाजूला असावीत अशी सर्वसाधारण मुलांप्रमाणेच अनाथ बालकांचीही  साहजिक इच्छा असते. दुसरीकडे चारचौघांप्रमाणे आपल्याही संसारवेलीवर बाळाच्या रूपाने  फूल फुलावे, आपला वंश पुढे सुरु राहावा असे अपत्य नसलेल्या जोडप्यांचे स्वप्न असते. या दोन्

कर्मचारी बँक- सरकारी कर्मचारी यांची आधारवड-

इमेज
कर्मचारी बँक- सरकारी कर्मचारी यांची आधारवड-        नाशिक मधील राज्य सरकारी व जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांची नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी ही बँक आधारवड म्हणून ओळखली जाते. स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वी दिनांक २२ सप्टेंबर १९२० रोजी दिंडोरी येथे कै.माधवराव रामचंद्र तथा एम. आर. देशपांडे साहेब यांनी या बँकेची स्थापना केली. सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीसाठी तात्काळ मदत व्हावी आणि त्याचबरोबर त्यांना बचतीची देखील सवय लागावी या दूरदृष्टी विचाराने व उदात्त हेतूने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या बँकेची त्यावेळी स्थापना करण्यात आली.    आज बँकेला १०२ वर्षे पूर्ण होऊन १०३ व्या वर्षात बँकेने पदार्पण केलेलं आहे. या १०२ वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासात बँकेने अनेक चढउतार बघितलेले आहे, आणि अनेक संकटाशी देखील सामना करावा लागला आहे, हे जरी खरी असले तरी त्या त्या वेळी कार्यरत प्रामाणिक संचालक आणि पदाधिकारी यांची बँके प्रति असणारी निष्ठा, सन्माननीय सभासदांचा बँकेवर असणारा अतूट विश्वास आणि त्याचबरोबर बँकेची एक निष्ठेने सेवा करीत असणारे माजी व विद्यमान सेवक वर्ग यांचे योगदान निश्चितच मोजण्या

हमारे बाद हाल-ए-गम सुनाने कौन आएगा…?हंसाने तो सब आएंगे मगर हाल-ए-दर्द सुनानेवाला कौन आएगा ? खुलासे अधुरेच राहतात आणि निघायची वेळ होते…. रणजित राजपूत.

इमेज
खुलासे अधुरेच राहतात आणि निघायची वेळ होते… आदरणीय…          गेल्या ३२ महिन्यांपासून मी नाशिक चा जिल्हा माहिती अधिकारी म्हणून आपल्या सोबत होतो. आज मी या पदाची सूत्रे माझ्या ज्युनियर सहकारी श्रीमती अर्चना देशमुख मॅडम यांच्याकडे सोपवून नंदुरबार येथे जिल्हा माहिती अधिकारी पदावर रूजू होणार आहे.            ऐन कोरोनाच्या पहिल्या लाटेत १३ मार्च २०२० रोजी मी जिल्हा माहिती अधिकारी, नाशिकची सुत्र स्वीकारली. तेव्हापासून आजतागायत जवळ जवळ २४ तास सोबत राहिलो. माझ्या नाशिकच्या पोस्टींगची २ वर्षे कोरोनासोबत गेली. विशेष म्हणजे कोरोना काळातील सर्व बातम्यांना आम्ही *C* ने क्रमांकाने सुरूवात केली. भविष्यात या बातम्यांच्या C क्रमांकाने आपण कधीही कोरोना काळातील संदर्भ म्हणून उपयोगात आणू शकाल. विशेष म्हणजे या सर्व काळातील वृत्तपत्रीय बातम्यांच्या कात्रणांचे डिजिटल संकलन ही एक मोठी उपलब्धी जिल्हा माहिती कार्यालयात भविष्यात सर्वांसाठी असेल. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा काळ आश्वासकपणे पार पाडू शकलो. असेच सहकार्य आपण भविष्यात श्रीमती देशमुख मॅडम व माझ्या सहकाऱ्यांना देत रहावे, विनंती.            जिल्हा माहिती

जिल्हा परिषद "ग्रामविकासाची शाळा" या पुस्तकाची राष्ट्रीय विक्रम म्हणुन नोंद !

इमेज
जिल्हा परिषद "ग्रामविकासाची शाळा" या पुस्तकाची राष्ट्रीय विक्रम म्हणुन नोंद !       नाशिक (प्रतिनिधी)::- जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभांचे पंचवार्षिक इतिवृत्त पुस्तक रुपात प्रसिद्ध करण्याची संकल्पना नाशिक जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागात मुख्य औषध निर्माण अधिकारी म्हणुन कार्यरत असणारे जी.पी. खैरनार यांनी तात्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती पत्राद्वारे केली होती. नाशिक जिल्हा परिषदेने या वैविध्यपूर्ण उपक्रमास नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नियमित विषय घेऊन अभिनंदनासह मान्यता दिली होती. नाशिक जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संपादकीय जबाबदारी घेऊन नाशिक जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त उपलब्ध करुन दिले होते. जी. पी.खैरनार यांनी सदर इतिवृत्त संकलित करुन जिल्हा परिषद नाशिक "ग्रामविकासाची शाळा" हे शीर्षक घेऊन पुस्तकाची बांधणी केली होती. प्रस्तुत पुस्तकाचे प्रकाशन नाशिक जिल्हा परिषदेने नाशिक जिल्हा परिषदेच्या दिनांक २८ फेब्रुवारी, २०२२ च्या सर्वसाधारण सभेत केले होते. ना

मंगळवारी जनजाती गौरव दिनी अभिवादन कार्यक्रम, प्रतिमापूजन आणि व्याख्यान !

इमेज
मंगळवारी जनजाती गौरव दिनी अभिवादन कार्यक्रम, प्रतिमापूजन आणि व्याख्यान !       नाशिक ( प्रतिनिधी )- मंगळवारी ( दि.१५ ) रोजी जनजाती क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिन हा जनजाती गौरव दिन म्हणून साजरा होणार आहे. या निमित्त जनजाती कल्याण आश्रमाच्या नाशिक शाखेतर्फेही अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता कल्याण आश्रमाच्या कृषी कॉलनी, कॉलेज रोड येथील मुख्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन, प्रतिमापूजन व प्रा. डॉ. बाळासाहेब घुटे यांचे व्याख्यान  होणार असल्याची माहिती आश्रमाचे प्रांत सचिव शरद शेळके आणि उपाध्यक्ष व नामवंत धावपटू कविता राऊत यांनी दिली.          वनवासी कल्याण आश्रमाच्या पाठपुराव्यामुळे गेल्या दीड दशकापासून दि. १५ नोव्हेंबर हा दिवस जनजाती गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. वनवासी कल्याण आश्रम जनजातींच्या सेवेत सन् १९५२ पासून आहे. या संस्थेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविले जातात. याचा आढावाही  सचिव शेळके यांनी मांडला. शेळके म्हणाले, सद्यस्थितीत आश्रमाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात २९

जनजाती गौरव दिनीअभिवादन कार्यक्रमप्रतिमापूजन आणि व्याख्यान !

इमेज
जनजाती गौरव दिनी अभिवादन कार्यक्रम प्रतिमापूजन आणि व्याख्यान !       नाशिक ( प्रतिनिधी )- मंगळवारी (दि.१५) रोजी जनजाती क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिन हा जनजाती गौरव दिन म्हणून साजरा होणार आहे. या निमित्त जनजाती कल्याण आश्रमाच्या नाशिक शाखेतर्फेही अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता कल्याण आश्रमाच्या कृषी कॉलनी, कॉलेज रोड येथील मुख्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन, प्रतिमापूजन व प्रा. डॉ. बाळासाहेब घुटे यांचे व्याख्यान  होणार असल्याची माहिती आश्रमाचे प्रांत सचिव शरद शेळके आणि उपाध्यक्ष व नामवंत धावपटू कविता राऊत यांनी दिली.          वनवासी कल्याण आश्रमाच्या पाठपुराव्यामुळे गेल्या दीड दशकापासून दि. १५ नोव्हेंबर हा दिवस जनजाती गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. वनवासी कल्याण आश्रम जनजातींच्या सेवेत सन् १९५२ पासून आहे. या संस्थेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविले जातात. याचा आढावाही  सचिव शेळके यांनी मांडला. शेळके म्हणाले, सद्यस्थितीत आश्रमाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात २९ शैक्षणिक प्

डॉ. राजेंद्र जाधव यांची यशाला गवसणी !

इमेज
डॉ. राजेंद्र जाधव यांची यशाला गवसणी !       नाशिक:- प्रख्यात सर्जन डॉ. राजेंद्र जाधव यांनी जळगाव येथे संपन्न झालेल्या ज्येष्ठांच्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत यशाला गवसणी घातली.      महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जळगाव आयएमए आयोजित महास्पोर्टस स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. त्यात साठ वर्षांवरील ज्येष्ठ बॅडमिंटन गटात एकेरी आणि दुहेरीत डॉ.राजेंद्र जाधव यांनी उपविजेतेपद संपादन केले. दुहेरीत डॉ. हेमंत साठे (सोलापूर) ह्यांनी त्यांना उत्तम साथ दिली. विजेत्यांना पदक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत राज्यभरातील ९८ डॉक्टरांनी भाग घेतला. सर्व थरातून डॉक्टरांचे अभिनंदन होत आहे.

स्थलांतरित रहिवाशी आंदोलनाच्या पवित्र्यात !ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास रखडला !!

इमेज
स्थलांतरित रहिवाशी आंदोलनाच्या पवित्र्यात ! ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास रखडला !!           मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळींतील तब्बल २० ते २५ टक्के सदनिकांमधील रहिवाशांचे स्थलांतर करण्यात म्हाडाचे मुंबई मंडळ अपयशी ठरले आहे. या इमारतींमध्ये रहिवासी वास्तव्यास असल्याने पुनर्विकासाच्या कामाला गती मिळू शकलेली नाही. पुनर्विकासाच्या कामाला नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरुवात करण्यात आली नाही तर डिसेंबरमध्ये गृहनिर्माण मंत्र्यांच्या बंगल्यावर रहिवासी सहकुटुंब मोर्चा काढतील, असा इशारा ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीने दिला आहे.         वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे करण्यात येत आहे. पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन २०१७ मध्ये करण्यात आले होते. रहिवाशांची पात्रता निश्चिती करून त्यांना स्थलांतरित करण्यात आले. तसेच ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांच्या घरासाठी पहिली सोडतही काढण्यात आली. असे असताना अद्यापही या चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात होऊ शकलेली नाही. पहिल्या टप्प्यात येथील ३२ पैकी १० इमारतींमधील रहिव

चव्हाणांच्या माघारीने सकाळेंचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा !

इमेज
चव्हाणांच्या माघारीने सकाळेंचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा ! नासिक::- नासिक जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघ मर्यादित नासिकच्या त्र्यंबकेश्वर तालुका  संचालक पदी संपतराव सकाळे यांचा एकमेव अर्ज राहील्याने त्यांची निवड बिनविरोध झाली असे गृहीत धरले जात आहे, प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर तशी घोषणा होईल,  अशोक गोटीराम चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सकाळेंचा एकमेव अर्ज राहीला, या बिनविरोध निवडीसाठी विनायक माळेकर, समाधान बोडके, रमेश पाटील, लक्ष्मण पाटील, हरीष गायकवाड, दिलीप चव्हाण, गणेश चव्हाण, अशोक चव्हाण, बापू सकाळे,अजित सकाळे यांनी प्रयत्न केले, यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी सकाळे यांचे अभिनंदन केले व उर्वरित निवडणूक ही बिनविरोध व्हावी असे सांगितले.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने राज्यस्तरीय युवा पुरस्कारांसाठी आवाहन !

इमेज
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने राज्यस्तरीय युवा पुरस्कारांसाठी आवाहन !           मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने युवांसाठी सातत्याने सर्जनशील व प्रोत्साहनपर उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून सामाजिक, क्रीडा, उद्योजकता, साहित्य रंगमंचीय कलाविष्कार, पत्रकारिता आणि इनोव्हेटर  या क्षेत्रांतील  विविध गुणवंत युवांना सन्मानित करण्यात येणार आहे.         रुपये २१,०००/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. त्या त्या क्षेत्रामधील अभ्यासू मान्यवर व्यक्तींचा सहभाग असलेल्या निवड समितीमार्फत अंतिम पुरस्कारार्थींची निवड करण्यात येणार आहे.          पुरस्कारासाठी व्यक्तीचे वय ३१ डिसेंबर २०२१ अखेरीस ३५ वर्षांच्या आत असले पाहिजे. पुरस्कारासंबंधीची संपूर्ण माहिती व ऑनलाइन फॉर्म www.chavancentre.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्ज ऑनलाइन भरण्याची अंतिम तारीख सोमवार, दि.१८ नोव्हेंबर २०२२ असून या पुरस्कारासंबधी अधिक माहितीकरीता संतोष मेकाले - 9860740569/मनिषा खिल्लारे - 9022716913 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटरच्या क

महाराष्ट्राला सुपरिचित असलेले नांव, निवेदक, अभिनेता, राष्ट्रीय पक्षाचे प्रवक्ते "अजित" यांच्या वाढदिवसानिमित्त !!!!!

इमेज
अजित चव्हाण... महाराष्ट्राला सुपारीचित असलेलं नाव निवेदक, अभिनेता, वक्ता भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते, अजित चव्हाण यांचा ९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस, खरं तर नाशिकच्या कला विश्वातून मुंबईला नशीब आजमावण्यासाठी गेलेल्या आणि यशस्वी ठरलेल्या नावांपैकी एक हे नाव, पण हे नाव पत्रकारितेत यशस्वी ठरलं. नाशिकच्या दैदीप्यमान इतिहास असलेल्या दीपक मंडळाचा सदस्य, बाबा थिएटरच्या माध्यमातून रंगभूमी वरती काम करणारा नाशिकच्या रंगभूमीवरचा गुणी कालावंत, उत्तम निवेदक, अभ्यासू वक्ता वाचक, पुस्तक प्रेमी, बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या एका देखण्या आणि गुणी कलावंत मराठी रंगभूमीपासून थोडासा दुरावला तो पत्रकारितेमुळे, पण अजित ने नाशिकहून मुंबईला जाऊन पत्रकारितेतही आपला एक आगळावेगळा ठसा उमटवला २००३ साली पहिला सिनेमा 'दिवस बालपणीचे' यामध्ये ज्येष्ठ अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यासोबत नाशिकच्या आधी चव्हाण, स्मिता सारंग या जोडीने बालकलाकार म्हणून सुरुवात केली, शाळेत असतानाच रंगभूमी वरती हौशी नाटकातून भूमिका करताना राज्य नाट्य स्पर्धातूनही अजितने आपली चमक दाखवली.  नाशिकचे दोन कलाकार अभिजीत खांडकेकर आणि अजित च

जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ! १०० वर्षापासूनचे शाळा सोडल्याचे दाखले डिजिटल ! एका क्लिकवर क्षणात मिळतोयं ‘शाळा सोडल्याचा दाखला’ !

इमेज
जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ! १०० वर्षापासूनचे शाळा सोडल्याचे दाखले डिजिटल ! एका क्लिकवर क्षणात मिळतोयं ‘शाळा सोडल्याचा दाखला’      अहमदनगर ( जिमाका, नासिक)::- कोपरगाव तालुक्यातील ‘संवत्सर’ येथील जिल्हा परिषद शाळेने ‘शाळा सोडल्याचा दाखला’ डिजिटलरित्या जतन करण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. या शाळेने १९०८ पासूनचे दाखले डिजिटल केल्यामुळे शंभर वर्षापूर्वीचा दाखला क्षणाचा विलंब न होता एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. ‘संवत्सर’ शाळेने राबविलेला हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.              ‘संवत्सर’ जिल्हा परिषद शाळेच्या अखत्यारित विविध वाड्या-वस्त्यांवरील ८ जिल्हा परिषद शाळा आहेत. ‘संवत्सर’ व उर्वरित ८ जिल्हा परिषद शाळांनी १९०८पासून ते आजपर्यंत प्रवेश घेतलेल्या १५ हजार १७४ विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले डिजिटलरित्या जतन करून ठेवले आहेत. पुण्याच्या ‘ई-प्रशासन सॉफ्टवेअर’ या कंपनीच्या मदतीने ‘संवत्सर’ शाळेने जिल्ह्यात प्रथमच नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचे प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे.         या उपक्रमास जिल्हा पर

समाजात अस्थिव्यंगत्वाविषयी जनजागृती होणे गरजेचे ! आज ( दि.५ ) आंतरराष्ट्रीय सोसायटी ऑफ प्रोटेटिक्स अँड ऑर्थोटिक्स (आयएसपीओ) संघटनेकडून प्रथमच जागतिक स्तरावर जनजागृती दिन

इमेज
समाजात अस्थिव्यंगत्वाविषयी  जनजागृती होणे गरजेचे !    अस्थिव्यंग जन्मतः असते किंवा काहीवेळा अस्थिरोगांंमुळे,अपघातांनी अस्थिव्यंग निर्माण होते. अस्थिरोग तज्ज्ञ त्यांच्यावर उपचार करतात. त्यातून रुग्ण बरे होतात. मात्र त्यामध्ये ऑर्थोटिक्स म्हणजे आधार देऊन बाह्योपचार व प्रोटेटिक्स म्हणजे कृत्रिम अवयव तयार करणाऱ्या तज्ज्ञांची भूमिकाही तेवढीच महत्वाची असते. आज ( दि.५ ) आंतरराष्ट्रीय सोसायटी ऑफ प्रोटेटिक्स अँड ऑर्थोटिक्स (आयएसपीओ) या संघटनेने प्रथमच जागतिक स्तरावर जनजागृती दिन जाहिर केला आहे. नाशिकमध्ये डॉ. दीपक सुगंधी त्यांच्या दीपक सर्जिकल्स संस्थेतर्फे ४४ वर्षे रुग्णसेवा करीत आहेत. या दिनाच्या निमित्ताने...     ऑर्थोटिक्स अँड प्रोथेटिक्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे ( ओपीएआय ) आज देशभर जनजागृतीपर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या विशेष प्रगत विज्ञान शाखेमुळे दिव्यांग व्यक्तींना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळण्यास मदत होते. वेगवेगळ्या क्षेत्रात जसा भारतात विकास होत आहे तसाच या क्षेत्रातही सातत्याने होतो आहे. त्यामुळे दिव्यांगांना सन्मानाने व आत्मविश्वासाने जीवन जगण्यास हातभार मिळतो. नवनवी