पोस्ट्स

2024 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इमेज
"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी ! छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)::- ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिग्दर्शित केलेला "राजकारण गेलं मिशीत" हा विनोदी चित्रपट नुकताच सगळीकडे प्रदर्शित झालेला आहे.             सुप्रसिद्ध साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या कथेवर आधारित या चित्रपटातील  बहुतांश कलाकार मराठवाड्यातील असून छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ कवी आणि गीतकार उद्धव भयवाळ यांच्या 'लावण्य बहार' या अल्बम मधील एक लावणी या चित्रपटात घेण्यात आलेली आहे.              या लावणीच्या निमित्ताने उद्धव भयवाळ यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले असून समाजातील सर्व स्तरांमधून भयवाळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. २० एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील प्रोझोन मॉल मधील आयनॉक्स चित्रपटगृहात या चित्रपटाचा प्रिमियर शो झाला. यावेळी दिग्दर्शक मकरंद अनासपुरे, संगीतकार अतुल दिवे, गीतकार उद्धव भयवाळ तसेच चित्रपटातील इतर कलाकार उपस्थित होते.

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

इमेज
इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !  नाशिक ( प्रतिनिधी ) इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग व एअर कंडीशनींग इंजिनिअर्स (इशरे) या संस्थेच्या नाशिक शाखेचा नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचा पदग्रहण व शपथग्रहण समारंभ  शनिवारी (दि. २०) एप्रिल रोजी हाॅटेल ग्रॅन्ड रिओ येथे करण्यात आला. शपथग्रहण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुप बालानी, उपाध्यक्ष मिहीर संघवी, पश्चिम विभागीय व्यवस्थापक  मनीष गुलालकरी उपस्थित होते.     नवनिर्वाचित अध्यक्ष अशफाक कागदी, उपाध्यक्ष वरुण तिवारी, सचिव अनिकेत चौधरी, खजिनदार अनिता बोराडे व कार्यकारिणी सदस्य  गुलाम हुसेन, प्रविण कामाले, प्रविण पातुरकर, सारंग दिडमिशे, रोहिणी मराठे, शामसुंदर कापसे यांनी शपथ घेतली. संस्थेचे मावळते अध्यक्ष गोविंद नायर यांनी  २०२३ - २४ या वर्षातील संस्थेच्या कार्यक्रमांचा आढावा घेतला व विविध उपक्रमातील सहकार्याबद्दल मावळत्या संचालक मंडळाचे आभार मानले. नवनिर्वाचित अध्यक्ष अशफाक कागदी यांनी आगामी संकल्पित कार्यक्रमांची रूपरेषा विषद केली.       यावेळी इतर सोसायटीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची उपस्थ

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

इमेज
निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते ! लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार घ्यावी लागते शपथ नाशिक::- लोकसभा, राज्यसभा,  विधानसभा आणि विधानपरिषदेसाठी  निवडणूक लढविणा-या उमेदवारांना भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार त्यांचा उमेदवारी अर्ज म्हणजेच नामनिर्देशन पत्र दाखल करतांना भारताच्या संविधानावर माझा खरा विश्वास आणि निष्ठा असेल आणि आणि मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखेल अशी शपथ किंवा प्रतिज्ञा घ्यावी लागते. ही शपथ आयोगाने निर्देशित केलेल्या व्यक्तींपुढेच घ्यावी लागते, ही माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास सर्वसाधारणपणे निवडणूक होणा-या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेपुढे अशी शपथ घेता येते. तसेच आयोगाचे निर्देशानुसार प्रथम वर्ग दंडाधिकारी, जिल्हा न्यायाधीश यांच्यापुढे देखील उमेदवारांना अशी शपथ घेता येते. नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी निवडणूक लढविणारा उमेदवार जर प्रतिबंधात्मक स्थानबद

अनंत कान्हेरे मैदान विकसित तरी समस्या कायम ! आयुक्तांना निवेदन !

इमेज
अनंत कान्हेरे मैदान विकसित तरी समस्या कायम ! आयुक्तांना निवेदन !            नासिक::- नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान कोट्यवधी रुपये निधी मंजूर होऊन खर्च करण्यात आला परंतु तिथे अद्यापही पूर्णपणे सुविधा जॉगर्स धारकांना मिळत नाहीत. पुर्वी ज्या समस्या होत्या त्या अजूनही जशाच्या तशा कायम आहेत. मैदान विकसीत होऊन समस्या मिटतील असे वाटत होते. परंतु त्या समस्या तत्पूकाळ सुटण्याऐवजी हळूहळू पूर्व पदावर येत आहेत मग मैदान विकसित करून मिळवले काय हा प्रश्न कायम आहे, आज मैदानात झाडांना पाणी मारले जात नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. हिरवळ तयार करून हिरवाईचा हिरवा रंग राहिला नाही, संध्याकाळी मैदानात वाहने येतात अन जातात  यावर कुठलेही निर्बंध नाही. मैदानात रात्री टवाळखोरांची मनसोक्त सोय होते, प्रेमीगुलांचा तर प्रेमाचे अड्डे निर्माण झाले आहेत. मग या मैदानाला सुसज्ज कसे म्हणता येईल. मैदान विकसित केले तरी मैदानाची देखभाल होत नाही. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मैदानाची अशी अवस्था असेल तर बाकीच्या मैदांनाचे काय ? या सर्व बाबीकडे प्रशासनाकडून लक्ष देण्यात यावे म्हणून मोरया ज

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड युके कडून उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर सन्मानित !

इमेज
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड युके कडून उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर सन्मानित !        छत्रपती संभाजीनगर::- येथील प्रथितयश लेखिका, प्रेरक व्याख्यात्या तथा उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांना रविवार दिनांक दहा मार्च रोजी शिर्डी येथे एका समारंभात लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् (युनायटेड किंगडम) या संस्थेचे अध्यक्ष संतोष शुक्ला यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र आणि पदक देऊन गौरविण्यात आले. समाजातील सर्व स्तरातून अंजली धानोरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !

इमेज
सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !        नासिक::-  दिनांक ७ मार्च २०२४ रोजी जिल्हा परिषद नाशिक मधील अनिल गीते व अनिल सानप यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी मधून सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. तसेच वरिष्ठ सहाय्यक श्रीमती छाया सोनवणे, राजेंद्र येवला, धनराज पवार, दिलीप पाटील, विलास ननावरे, मंगेश चव्हाण, ओम प्रकाश पाटोळे, किरण माळवे, चंद्रकांत पगारे यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. गजेंद्र घाडगे व जीवन पारधी यांना कनिष्ठ सहाय्यक पदावरून वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात आली.       पदोन्नती चार प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता आज हा प्रश्न मार्गी लागल्याने लिपिक वर्गीय कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले. सदरच्या पदोन्नती पारदर्शकपणे राबविल्याने व कर्मचाऱ्यांची गैरसोय न झाल्याने कर्मचारी यांनी समाधान व्यक्त करत परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्रीमती वर्षा फडोळ, मुख्य

सार्वजनिक आरोग्य विभागाची १९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान विशेषमोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम, पंधरवड्यात १ लाख शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट !

इमेज
सार्वजनिक आरोग्य विभागाची १९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम पंधरवड्यात १ लाख     शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट               मुंबई  :    राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षिणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत दि. १९ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२४ दरम्यान राज्यभरात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे.    या कालावधीत १ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.    शासकीय रुग्णालय ,  मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालय येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा ,  असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.           या मोहिमेंतर्गत १ लाख शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हानिहाय नियोजन केले असून संबंधित आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्र शासनामार्फत  ‘ राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान ’  ही विशेष मोहीम जून , २०२२  पासून राबविण्या

प्रेरणादायी गोष्टींमधून विशेष बालकांनी अनुभवले छत्रपती शिवाजी महाराज !

इमेज
प्रेरणादायी गोष्टींमधून विशेष बालकांनी  अनुभवले छत्रपती शिवाजी महाराज !         नाशिक ( प्रतिनिधी ) निरागस विशेष  बालकांनी शिवचरित्र समजून घेत स्वराज्य संस्थापक शिवरायांच्या गोष्टींमधून नवे स्वप्न बघितले. स्वतःतील न्यूनगंड दूर करून प्रगती करण्याची प्रेरणा घेतली. प्रेरणादायी गोष्टींमधून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज अनुभवले.     रायझिंग चाईल्ड डेव्हलपमेंट अँड लर्निंग सेंटरतर्फे आज ( दि. १८ ) शिवजयंतीच्या औचित्याने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गतीमंद विशेष बालकांच्या या प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका मोनिका गोडबोले - यशोद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या छोट्या प्रेरक कथा सांगितल्या. मुलांनी मावळ्यांचा वेष परिधान करून शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला.‌ शिवरायांचा‌ जयजयकार केला. मुलांनी कुतुहलाने अनेक प्रश्न विचारले. त्यांची समर्पक उत्तरे मिळाल्याने त्यांचे समाधान झाले. यावेळी अनुष्का यशोद, ऋतुजा ढोरे, लीना काळे, मयूर कारंडे यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. पालकांनीही सहभाग नोंदवला.

'Maharashtra MSME Defence Expo' to be held in Pune from Feb 24

इमेज
'Maharashtra MSME Defence Expo' to be held in Pune from Feb 24 Mumbai, Feb 17: In order to further strengthen the progress of self-reliant India in the sector of defence production and to promote the micro, small and medium industries producing defence materials in Maharashtra through the Industries Department of the State Government, a 3-days 'Maharashtra MSME Defence Expo' has been organized in Pune from 24th to 26th February 2024. Notably, this is the first of its kind Defence Expo in Maharashtra to enable the Micro, Small and Medium Enterprises (MSMEs) of the state to contribute significantly to the defence manufacturing sector and is being held at the International Exhibition and Convention Center in Pune.        All the three armed forces namely navy, army and air force are going to play an important role in this with the aim of promoting the coordination of industries with advanced technology and expertise in the sector of defence production. More than two hundre

अभियंता महेश व डॉ.नरेश बागूल यांच्या मातोश्री निलादेवी यांचे निधन !

इमेज
अभियंता महेश व डॉ.नरेश बागूल  यांच्या मातोश्री निलादेवी यांचे निधन !        नासिक::- रा. भालेर ह.मु. नासिक येथील पर्यटन विभागाचे विभागीय अभियंता महेश बागूल यांच्या मातोश्री, बागूल कुटुंबियांचा आधारवड स्व.निलादेवी शिवाजीराव बागुल (ताई) यांना आज दि.१६ शुक्रवार रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास देवाज्ञा झाली.            डॉक्टर नरेश शिवाजीराव बागुल वैद्यकीय अधिकारी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पुणे, व महेश बागूल, विभागीय अभियंता पर्यटन विभाग, नाशिक यांच्या त्या मातोश्री.     स्व.ताईंचा अंत्यविधी उद्या दि.१७/२/२०२४ शनिवार रोजी दुपारी १२ वा नाशिक पंचवटी अमरधाम येथे आहे.

अश्विन अघोर यांच्या रूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार गमावला : सुधीर मुनगंटीवार

इमेज
अश्विन अघोर यांच्या रूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार गमावला : सुधीर मुनगंटीवार   चंद्रपूर/मुंबई::-" राष्ट्र प्रथम" हा विचार प्रखरपणे मांडणारे पत्रकार श्री अश्विन अघोर यांचे अकाली निधन धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या रूपाने एक प्रखर राष्ट्रभक्त पत्रकार आपण गमावला आहे ,  अशा शब्दात सांस्कृतिक कार्य ,  वने व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिवंगत पत्रकार श्री अश्विन अघोर यांच्या निधनाबद्दल आपले दुःख व्यक्त केले आहे.        ते पुढे म्हणाले की त्यांच्या स्वभावात वैदर्भीय दिलखुलासपणा आणि मिश्किलपणा ठासून भरला होता. जीवनात यश मिळवतांना अनेक संकटांना त्यांनी खिलाडूपणे हसतमुखाने तोंड दिले. अनेक वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनेल्समधील यशस्वी कारकिर्दीनंतर आपल्या "घनघौर" या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलवरून खऱ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या सत्याचा शोध अव्याहतपणे मांडणाऱ्या अश्विनजींच्या अकाली जाण्याने तयार झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील. आपल्या लिखाणातून आणि व्हिडियो वार्तापत्रातून मांडलेल्या विश्लेषणातून त्यांनी जनजागृतीचे मोठे कार्य सातत्याने केले. माध्यम क्षेत्

बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिले १००० दिवस महत्वाचे !

इमेज
बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी  पहिले १००० दिवस महत्वाचे !         नाशिक ( प्रतिनिधी) - माता गर्भवती राहिल्यापासून ते जन्मलेले बाळ दोन वर्षांचे‌ होईपर्यंतच्या काळात बाळाच्या‌ मेंदूची ७५ टक्के वाढ पूर्ण होते. बाळ गर्भावस्थेत असल्यापासून पहिले १००० दिवस त्याच्या‌ सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वाचे असतात. या काळात बाळाला योग्य पोषण, माया देऊन त्याचे उत्तम संगोपन केले तरच मेंदूची पूर्णपणे वाढ होते. मेंदूतील अनेक केंद्रांची जोडणी होऊन बाळाची आकलन शक्ती, समाजिक कौशल्ये विकसित होते. त्याचा योग्य दिशेने संज्ञात्मक‌ व गुणात्मक विकास होतो. हा विकासाचा अतिआवश्यक टप्पा असून बाळाला स्पर्श, प्रेम आणि पोषणाची जरुरी असते. आई देखील सशक्त, निरोगी व आनंदी असणेही महत्वाचे आहे.  मुलाच्या वाढीसाठी आवश्यक सर्व गोष्टी त्याला वेळच्यावेळी मिळणे हा त्याचा अधिकार आहे. युनिसेफ व सर्वजणी महिला उत्कर्ष संस्थेच्या कार्यशाळेत अशी माहिती देण्यात आली.       प्रारंभी सुजाता शिर्के यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, या संदर्भात  पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे. जनजागृतीसाठी पत्रकारांनी आपल्या माध्यमाद्वारे स

जिल्हा परिषदेतील ५१ परिचर यांना कनिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती !

इमेज
जिल्हा परिषदेतील ५१ परिचर यांना कनिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती !        नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत ५१ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कै.रावसाहेब थोरात सभागृहात समुपदेशनाने पदोन्नती प्रक्रिया पार पडली. यामध्ये परिचर या पदावरून कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा परिषद अधिनस्त सर्व विभागांनी पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश दिले होते, यानुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या तत्परतेने मागील महिन्यात अनुकंपा कर्मचारी गट ड मधून गट क संवर्गात समुपदेशनाचे समायोजन करण्यात आले. यानंतर आज सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने परिचर संवर्गातुन पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात आली. परिचर संवर्गातून ४९ तर वाहन चालक संवर्गातून २ कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आली.          दि. ८ फेब्रुवारी रोजी सामान्य प्रशासन विभागांतर्गत परिचर कर्मचारी पदोन्नती संदर्भात मुख्य

संविधानात सर्वांना एकत्र ठेवण्याची ताकद- हफिजुल्लाह खान

इमेज
संविधानात सर्वांना एकत्र ठेवण्याची ताकद- हफिजुल्लाह खान            नाशिक::- सर्व भारतीयांना गुण्यागोविंदाने एकत्र ठेवण्याची ताकद आपल्या संविधानामध्ये आहे. अशा संविधानाची अमोल भेट पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना दिली. संविधानाच्या जोरावर व मार्गावर आपण सर्व भारतीयांनी आपला देश व देशातील लोकशाही मजबूत ठेवण्याचे आवाहन अल्जामीयातुल इस्लामिया एजुकेशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष हफिजुल्लाह खान यांनी केले.             सातपूर - अंबड लिंकराेडवरी आझादनगर येथील अल्जामीयातुल इस्लामिया एज्यकेशनल स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरस्कार वाटपासह विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्षा फिदा हूसैन ताबीर अली चाैधरी, जनरल सेक्रेटरी आबीद अली हफिजुल्लाह खान, सदस्य अबरार अहमद अजिमुल्लाह खान, हुसैन अली माेहम्मद खान, मौलाना अब्दुल हमीद चौधरी  उपस्थित हाेते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका अमिरूनिस्सा, शिक्षक शाहिद, शोएब, झुबेर, संदीप, मुसद्दीक यांन

मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
    नासिक(धुळे)::-  शासकीय प्राथमिक आश्रम शाळा, म्हळसर कॅम्प सुलवाडे, ता. शिंदखेडा जि. धुळे येथील मुख्याध्यापक प्रदीप कुमार वामनराव राठोड व शासकीय प्राथमिक आश्रम शाळा म्हळसर शिरपूर जि. धुळे येथील कार्यालय अधीक्षक हनुक फुलसिंग भादले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.           यातील तक्रारदार यांच्या पत्नी महिला आदिवासी बचत गटाच्या सचिव आहेत. त्यांच्या बचत गटाने शासकीय प्राथमिक आश्रम शाळा म्हळसर, कॅम्प सुलवाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे शालेय पोषण आहारा करिता भाजीपाला पुरवठा करण्याचे कंत्राट घेतले असून तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करत असतात. सदर महिला बचत गटास वरील आश्रम शाळेकडून भाजीपाला पुरवठ्याचे मागील ९ महिन्याचे देयक मंजूर करून दिले होते. त्याचा मोबदला म्हणून तसेच उर्वरित २ महिन्याचे पुढील देयक अदा करण्यास मदत करण्यासाठी वरील आलोसे क्र. १ व आलोसे क्र. २ यांनी तक्रारदार यांच्याकडून २००००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती १२०००/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. सदरची लाच रक्कम ही वरील आलोसे क्र.२ यांनी पंचांसमक्ष स्वीकारल्याने त्यांना रं

जागृती श्रवण विकास विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा ! स्वामी श्री कंठानंद महाराज यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत !

इमेज
जागृती श्रवण विकास विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा ! स्वामी श्री कंठानंद महाराज यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत !       मखमलाबाद (नासिक)::- सह्याद्री शिक्षण प्रसारक व समाज विकास मंडळ संचलित अमर बन्सीलाल छाजेड जागृती श्रवण विकास विद्यालय मखमलाबाद नाशिक येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख मान्यवर स्वामी श्री कंठानंद अध्यक्ष श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान, प्रवर्तक जागृत नाशिक जागृत भारत अभियान यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील दिव्यांग बालकांनी आपले विविध कलाविष्कार प्रमुख मान्यवरांच्या समोर सादर केले. तसेच या कार्यक्रमास स्वामी श्रीकंठानंद, साप्ताहिक न्यूज मसाला चे संपादक नरेंद्र पाटील, प्रदीप बंब कोपरगाव, निनाद पुरोहित, विलास पंचभाई, विजय शंकपाल, श्रीकांत चिंचोलीकर, श्रीकांत कुलकर्णी, संस्था अध्यक्ष डॉ.सतीष लुंकड, सचिव  कोठारी, उपाध्यक्ष प्रशांत मुथा, उपसचिव शरद शिरोडे, संस्थापक रामचंद्र सूर्यवंशी, संचालक संदीप लुंकड, बाळासाहेब गिरी, शालेय समितीचे सर्व सदस्य
NEWS MASALA 

हृदयातील राम ! नागेश शेवाळकर, पुणे

इमेज
हृदयातील राम !             'राम' या पवित्र शब्दात प्रचंड ऊर्जा, अलौकिक शक्ती आहे. जो या शब्दाचा सातत्याने उच्चार करतो त्याचे जीवन बदलून जाते. रस्त्याने चालताना, घरात बसलेले असताना कुठेही ही दोन अक्षरे कानावर पडली की, अंतःकरणात आणि शरीरात एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह संचारला जातो, आपल्याही मुखातून रामनाम बाहेर पडते, हात भक्तिभावाने जोडले जातात कारण राम सर्वांच्या मनात, हृदयात वसलेला आहे. हा भाव हनुमंताने स्वतःची छाती फाडून व्यक्त केला. प्रत्येकाच्या हृदयात आहे परंतु प्रत्येक जण हनुमंत नाही म्हणून आपण तशी कृती करू शकत नाही. इतकेच नाही तर रत्नाकरला राम नामाची संथा, मंत्र देऊन अंतर्धान पावलेले नारदमुनी अनेक वर्षांनंतर त्याच मार्गाने जात असताना त्यांना 'राम... राम...' हा मंत्र कानी पडला. नारदमुनींनी तो आवाज कुठून येतोय ह्याचा शोध घेतला. आवाज मानवाचा होता परंतु कुणी दिसत नव्हते. एकवेळ अशी आली की, त्या आवाजाचा मागोवा घेताना त्यांच्या लक्षात आले की, त्या परिसरातील झाडे, वेली, पक्षी इतकेच काय पण दगड मातीपासून तो रामनामाचा ध्वनी येत आहे. बाजूला असलेले एक वारूळ त्या ध्वनी -प्रतिध्

साप्ताहिक न्यूज मसाला ची वाटचाल एक सकारात्मक पत्रकारितेची !

इमेज
साप्ताहिक न्यूज मसाला ची वाटचाल एक  सकारात्मक पत्रकारितेची !               सन २०१२ मध्ये न्यूज मसाला या साप्ताहिकाला प्रारंभ झाला. काही उद्दिष्टे व पथ्ये ठरवून व ती नेटाने पाळून वाटचाल करण्यात आली. सकारात्मक पत्रकारितेला यंदा बारा वर्षे म्हणजे एक तप पूर्ण करतांना राजकीय उलथापालथ, सामाजिक स्थित्यंतरांचा अनुभव आपण घेतला. तीन वर्षांपूर्वी जागतिक महामारी कोरोना सारख्या संकटाला तोंड देत आपली सर्वांची वाटचाल कधी सुखाचे क्षण तर कधी दु:खाचे चटके सोसत झाली. आयुष्यातील जगण्याचे निकष बदलत गेले. अनेकांनी आपले आप्तस्वकीय, स्नेही गमावले. काहींनी संकटाला संधी मानून लुबाडणूक केली. मानवी स्वभावाचे नमुने समजले. एका सूक्ष्म विषाणूच्या संसर्गामुळे बऱ्यावाईट अनुभवांनी खूप काही शिकवले. हे नमूद करताना मनाच्या संमिश्र भावनांचा सर्वसामान्यांसोबत परामर्श घेत आहोत.  न्यूज मसाला साप्ताहिक कायमच न डगमगता वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवीत आहे.          एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस हा त्याच्या आयुष्यातील आनंदाचा ठेवा असतो.  सिंहावलोकन करण्याचा क्षण असतो. त्याचबरोबरीने जीवनात काय कमावले ? काय गमावले याचा ताळमेळ जमवण्याचाह

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

इमेज
।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।           २२ जानेवारी रोजी अयोध्या नगरीत रामाच्या मूर्तीची स्थापना होत आहे. त्या दृष्टीने गेल्या काही दिवसापासून घरोघरी कार्यक्रमाची पत्रिका, मंदिराचा फोटो, आणि अक्षदा पोहोचवल्या गेलेल्या आहेत. २२ जानेवारी रोजी घरोघरी उत्सव साजरा होत आहे . बारा वाजून वीस मिनिटांनी अयोध्याला मूर्तीची स्थापना होणार आहे. याप्रसंगी आपल्याकडे आपल्या अक्षदा रामाला वहायच्या आहे. राम नामाचा जप करायचा आहे. रामरक्षा स्तोत्र पठण करायचे आहे. दिवे लावायचे आहे. रोषणाई करायची आहे. पंजीरीचा, पेढ्याचा नैवेद्य दाखवा.( पंजीरी म्हणजे, गुळ, धनेपावडर, सुंठ, खडीसाखर, खोबरे. एकत्रित पावडर.) दिवाळी साजरी करायची आहे.  राम नामाचा झेंडा हाती घेतलेला प्रत्येकाने फोटो काढायचा आहे. एकूणच सर्वदूर राममय वातावरण झालेले आहे. अनेक ठिकाणी अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. काही ठिकाणी गेल्या चार-पाच दिवसांपासून एकत्रित जप रामरक्षा स्तोत्र पठण सुरू आहे. शाळांमधून रामरक्षा स्तोत्र म्हटले जात आहे. रामरक्षा स्तोत्र पठणाचे महत्त्व खूप मोठे आहे. त्या दृष्टीने गावोगावी ते सुरू आहेत. जेणेकरून 

"होशवालों को खबर क्या,,,,,,,,!" सुरेल संगीत मैफलीने स्नेहमेळावा स्वरसुगंधित !

इमेज
"होशवालों को खबर क्या,,,,,,,,!" सुरेल संगीत मैफलीने  स्नेहमेळावा स्वरसुगंधित !        नाशिक ( प्रतिनिधी)  बडी नाजूक है ये मंझिल..., होशवालो को खबर क्या..., जिंदगी जब भी तेरी याद..., बडी खूबसूरत वो..., मजा लेना है..., हंगामा है बरका... तेरी आंखो के दरिया मे..., तेरे रशके कमर...,या व अश्या गाण्यांची मेजवानी गायक कलाकारांनी उपस्थित रसिक श्रोत्यांना दिली. सुप्रसिद्ध गायक संजय वत्सल ( बानुबाकोडे), त्यांच्या पत्नी संज्योत व पुत्र श्लोक यांनी सुरेल गाणी सादर करुन वन्समोअर मिळवले. विविध गझल, गाजलेली हिंदी चित्रपट गाणी यांनी स्नेहमेळावा स्वरसुगंधित झाला.    पेठे विद्यालयातील १९७५ एसएससी बॅचच्या मित्रांचा स्नेहमेळावा ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक संजीव आडगांवकर यांनी आयोजित केला. हॉटेल पाल्म शेलच्या हिरवळीवर  झालेल्या कार्यक्रमाला ६० पेक्षा जास्त मित्र उपस्थित होते. तबल्यावर विजय खिस्ती यांनी तर सिन्थेसायझरवर गौरव काळगे यांनी सुरेल साथसंगत केली. मध्यंतरात घनश्याम पटेल यांनी बदन पे सितारे लपेटे हुए... या गायलेल्या गाण्यावर सर्वांनी ताल धरत नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. संजीव आडगांवकर यांचा

दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार !

इमेज
दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार !           मुंबई::- आज दि. १६ रोजी दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत २५ हजार कोटींचा करार !             ग्रीन हायड्रोजनच्या महाराष्ट्राच्या धोरणाला आज चांगली बळकटी मिळाली. दावोस येथे आयनॉक्स एअर प्रोडक्शन बरोबर २५ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.              यावेळी कंपनीचे सिद्धार्थ जैन यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. आयनॉक्स ही कंपनी अमेरिकेतील एक मोठी औद्योगिक वायू उत्पादित करणारी कंपनी असून महाराष्ट्र मध्ये ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सुरू करण्यात त्यांना रुची आहे. या संदर्भात महाराष्ट्रामध्ये ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी जै

२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा रंगारंग कार्यक्रमाने समारोप !

इमेज
२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा रंगारंग कार्यक्रमाने समारोप !     नासिक::- मागील १२ जानेवारी ते १६ जानेवारी २०२४ या पाच दिवसापासून नाशिकमध्ये सुरू असलेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या समारोप समारंभात महायुवा ग्राम हनुमान नगर मधील रंगारंग कार्यक्रमाने झाला.             देशभरातील सुमारे आठ हजार युवकांनी युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाने आयोजित केलेल्या पाच दिवसीय महोत्सवात सहभाग घेतला. नेहरू युवा केंद्र संघ आणि एनएसएस च्या स्वयंसेवकांनी कठोर परिश्रम करून हा महोत्सव यशस्वी करण्यात मदत केली. स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक शहरात प्रथमच आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. हा योग सोळा वर्षानंतर जुळून आला. महाराष्ट्र सरकारला राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्याची यानिमित्ताने पुन्हा एकदा संधी मिळाली. आज १६ जानेवारी रोजी झालेल्या समारंभ सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्य क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली

हॉटेल व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा तरतूदींचे पालन करावे !

नाशिक शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा तरतूदींचे पालन करावे !                                                                            नाशिक, दिनांक (जिमाका वृत्तसेवा)::-  नाशिक शहरात होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी येणाऱ्या अभ्यांगतांची शहरातील विविध हॉटेल्समध्ये निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाने नाशिक कार्यालयात कार्यरत अन्न सुरक्षा अधिकारी यांची आवश्यकतेनुसार अन्न नमुने तपासणीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. त्यादृष्टीने शहरातील हॉटेल व्यावसायिक यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा तरतुदींचे पालक करावे, असे आवहन सं.भा. नारागुडे, सह आयुक्त (नाशिक विभाग) अन्न व औषध प्रशासन यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.           राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते होणार आहे, या महोत्सावासाठी येणाऱ्या अभ्यागतांसाठी शहरातील विविध हॉटेल्ससह महायुवाग्राम, हनुमाननगर तपोवन, पंचवटी, उधोजी महाराज वास्तू संग्रहायल मैदान, के.टी.एच.एम कॉलेजजवळ आणि  महाकवी कालिदास कलामंदिर मैदान येथे मध्यवर्ती

लाखाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
लाखाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !        नासिक/जळगाव::- आलोसे प्रशांत विकास जगताप, (कंत्राटी वायरमन) जळगांव जि.जळगांव याने १६००००/- लाचेची मागणी केली होती, त्यातील १०००००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.    यातील तक्रारदार यांचे घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून त्यांनी घराला वीज मीटर बसवण्यासाठी यापूर्वीच अर्ज केला होता. परंतु त्यांना मीटर बसवले नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराला MSEB जळगांव च्या पथकाने भेट दिली होती. सदर भेटीनंतर त्यांना आता चार लाख ६० हजार रुपये दंडाची रक्कम भरली तरच वीज मीटर कनेक्शन मिळेल असा निरोप कंत्राटी वायरमन यांनी दिला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली असता एक लाख साठ हजार रुपयांमध्ये प्रकरण मिटवतो असे सांगून लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचा समक्ष पडताळणी केली असता कंत्राटी वायरमन यांनी तडजोडी अंती एक लाख ४० हजार रुपयांची मागणी करून पंचा समक्ष एक लाख रुपये आज रोजी स्वीकारताना रंग

पाणी मागणी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत !

इमेज
शेतकऱ्यांनी १४ जानेवारीपर्यंत पाणी मागणी अर्ज सादर करावेत !        नाशिक (जिमाका वृत्तसेवा)::- मालेगाव पाटबंधारे विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील पाटबंधारे उपविभाग सटाणा अंतर्गत असलेले लघु प्रकल्प पठावे, दसाणे, जोखाड यांचे जलाशय व नदीवरील मंजूर उपसा सिंचन व कालवा प्रवाही तसेच कालव्यावरील मंजुर उपसा सिंचन द्वारे पाणी पुरवठा करणेसाठी  शेतकऱ्यांनी १४ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत पाणी मागणी अर्ज सादर करावेत असे आवाहन  कार्यकारी अभियंता, मालेगाव पाटबंधारे विभाग म.नं डोके यांनी केले आहे.        रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये पिण्यासाठी आरक्षित पाण्या व्यतिरिक्त उपलब्ध पाण्यातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन देण्याचे नियोजन संबंधित कालावा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे. संबंधित लघु प्रकल्पांमधील सिंचनासाठी उपलब्ध होणारा पाणीसाठा विचारात घेवून रब्बी हंगामात पेरणी झालेली पिके व उभ्या पिकांना हंगामी पद्धतीने पाणी देण्याचे नियोजन आहे.         वरील प्रमाणे करण्यात येणारा पाणीपुरवठा हा महाराष्ट्र शासन सिंचन कायदा सन १९७६ व महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे व्यवस्थापन कायदा २००५ यातील तरतुद

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानातंर्गत विविध योजनांचे शिबीर संपन्न !

इमेज
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानातंर्गत विविध योजनांचे शिबीर संपन्न !                                                                                 नाशिक, दिनांक : १० जानेवारी २०२४ (जिमाका वृत्तसेवा)::- नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियांतनर्गत इगतपूरी, पेठ व त्र्यंबकेश्वर येथे विविध योजनांच्या शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या माध्यमातून  लाभार्थ्यांना मोठया प्रमाणात लाभ देण्यात येत असून विविध योजनांचे प्रमाणपत्र व कार्ड वितरीत करण्यात आले आहे, असे नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जितीन रहमान यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.           या शिबीरात जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी विविध योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच  प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियांतनर्गत लाभार्थ्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड, प्रधानमंत्री उज्वला योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री विश्वकर्मा, जनधन योजन

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर ओंकार कापले (निवृत्त) यांचे आवाहन !

इमेज
माजी सैनिकांनी पेंशन, इसीएचएस व सीएसडी कँटीन विषयी अडचणींबाबत १५ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन !                                     नाशिक, दिनांक : १० जानेवारी २०२४ (जिमाका वृत्तसेवा)::- रक्षा लेखा प्रधान नियंत्रण कार्यालय, अलाहाबाद आणि दक्षिणी कमान, पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यातील माजी  सैनिक, माजी सैनिक वीरमाता, वीरपत्नी, विधवा यांच्या पेंशन, इसीएचएस (ECHS) व कँटीन याविषयीच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी फेब्रुवारी २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात पुणे येथे पेंशन अदालत घेण्याचे नियोजित आहे. त्याअनुषंगाने ज्या माजी  सैनिकांच्या अडचणी असतील त्यांनी सर्व कागदपत्रांसह १५ जानेवारीपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक येथे प्रत्यक्ष अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर ओंकार कापले (निवृत्त) यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.