पोस्ट्स

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेडच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद - आयपीओच्या पहिल्याच दिवशी २.१ पट प्रतिसाद. इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड चा आयपीओ २८ ऑगस्ट २०२६ रोजी उघडला, प्रति इक्विटी शेअर किंमत पट्टा (Price Band) ₹४०८ ते ₹४२९ निश्चित (दर्शनी मूल्य ₹१ प्रति शेअर). • प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा ₹४०८– ₹४२९ निश्चित. •बोली/इश्यू उघडण्याची तारीख – २८ ऑगस्ट २०२६ आणि बोली/इश्यू बंद होण्याची तारीख – १ सप्टेंबर २०२६. • किमान बोली लॉट ३४ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर ३४ इक्विटी शेअर्सच्या पटीत

इमेज
ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेडच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद - आयपीओच्या पहिल्याच दिवशी २.१ पट प्रतिसाद इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड चा आयपीओ २८ ऑगस्ट २०२६ रोजी उघडला ,  प्रति इक्विटी शेअर किंमत पट्टा (Price Band) ₹४०८ ते ₹४२९ निश्चित (दर्शनी मूल्य ₹१ प्रति शेअर) • प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा ₹४०८– ₹४२९ निश्चित • बोली/इश्यू उघडण्याची तारीख – २८ ऑगस्ट २०२६ आणि बोली/इश्यू बंद होण्याची तारीख – १ सप्टेंबर २०२६ • किमान बोली लॉट ३४ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर ३४ इक्विटी शेअर्सच्या पटीत       नाशिक : इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड कंपनीने तिच्या इनिशियल पब्लिक ऑफरसाठी (आयपीओ) ₹१ दर्शनी मूल्य असलेल्या प्रति इक्विटी शेअरचा किंमतपट्टा ₹४०८ ते ₹४२९ निश्चित केला आहे. कंपनीचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपी" किंवा इश्यू) सबस्क्रिप्शनसाठी २८ ऑगस्ट २०२६ रोजी उघडून १ सप्टेंबर २०२६ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान ३४ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ३४ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. इश्यू-पूर्व उर्वरित ₹१ दर्शनी मूल्याचे १००,४२७,७५३ इक्विटी ...

नाशिकच्या जडणघडणीत मविप्रचा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिमाखात उद्घाटन

इमेज
नाशिकच्या जडणघडणीत मविप्रचा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिमाखात उद्घाटन           नाशिक : कर्मवीरांच्या त्यागातून आणि अनेक समाजधुरीणांच्या अविरत परिश्रमातून ११२ वर्षांपूर्वी उभी राहिलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज या संस्था आज राज्यातली एक अग्रणी आणि सर्वात मोठी म्हणून या संस्थेकडे पहिले जाते. अवघ्या पाच विद्यार्थ्यापासून सुरु झालेली संस्था आज दोन लाखांहून अधिक विद्यार्थी, ११ हजारांहून अधिक शिक्षक, मोठा कर्मचारी वर्ग अशा पद्धतीने मविप्रचे एका मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. नाशिक जिल्ह्यात आज इतका मोठा विस्तार या संस्थेने उभा केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत मविप्र संस्थेचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.  मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेच्या दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथील १२८ एकरांच्या विस्तीर्ण परिसरासह अत्याधुनिक सुविधांनीयुक्त कर्मयोगी द...

कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वावलंबी व्हावे – हेमलता बिडकर

इमेज
कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वावलंबी व्हावे – हेमलता बिडकर जनशिक्षण संस्थानतर्फे महिलांना ब्युटी पार्लर किटचे वाटप           नाशिक (न्यूज मसाला सर्विसेस) : महिलांनी कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे. कौशल्याच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे. ब्युटी पार्लर प्रशिक्षणामुळे महिलांना रोजगाराची तसेच स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार असून, या किटचा उपयोग करून महिलांनी व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन डांग सेवा मंडळ अध्यक्षा हेमलता बिडकर यांनी केले.            अखिल भारतीय महिला परिषद, नवी दिल्ली, सिन्नर महिला मंडळ, सिन्नर आणि जनशिक्षण संस्थान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने वावी, ता. सिन्नर येथे महिलांना ब्युटी पार्लर किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून हेमलता बिडकर बोलत होत्या. जनशिक्षण संस्थानच्या माध्यमातून महिलांसह विविध वंचित घटकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. महिला सक्षमीकरण...

देहदात्यांच्या नातेवाईकांचा सन्मान ! देहदान करणाऱ्या कुटुंबांचा सन्मान म्हणजे समाजाप्रती कृतज्ञता

इमेज
मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार रुग्णालयात देहदात्यांच्या नातेवाईकांचा सन्मान ! देहदान करणाऱ्या कुटुंबांचा सन्मान म्हणजे समाजाप्रती कृतज्ञता : डॉ. हेमांगी पाटील नाशिक : कर्मवीरांच्या विचारांची मुहूर्तमेढ रोवून एका छोट्याशा विचाराचे रूपांतर मराठा विद्या प्रसारक समाजासारख्या क्रांतिकारी वटवृक्षात झाले आहे. आज सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) आव्हानात्मक काळात संवेदनशीलता व मूल्ये जपणे अधिक गरजेचे आहे. देहदान करणाऱ्या दात्यांचा सन्मान हा समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा निश्चितच कौतुकास्पद उपक्रम आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी डॉ. हेमांगी पाटील यांनी केले.              मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक यांच्या आडगांव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये मविप्र समाजाच्या समाजदिनानिमित्त आयोजित देहदान करणाऱ्या दात्यांच्या नातेवाईकांच्या कृतज्ञता सत्कार सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्त्र विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.     ...

आवाहन - बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत.स्थापन केलेल्या काम वाटप समितीच्या माध्यमातून १० लाखांपर्यंतची कामे विना निविदा देण्यात येणार !

इमेज
आवाहन - बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत. स्थापन केलेल्या काम वाटप समितीच्या माध्यमातून १० लाखांपर्यंतची कामे विना निविदा देण्यात येणार ! नाशिक शासकीय व निमशासकीय कार्यालयातील विविध प्रकारची रु. १० लाखांपर्यंतची कामे बेरोजगारांच्या नोंदणीकृत सेवा सहकारी संस्थांना विना निविदा देण्यासाठी शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद तसेच जिल्हास्तरीय काम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीकडे शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडून कामांचे प्रस्ताव प्राप्त होतात. त्यानुषंगाने नाशिक जिल्ह्यातील कार्यरत इच्छुक सेवा सहकारी संस्थांनी आपले प्रस्ताव दि. २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त वि. रा. रिसे यांनी केले आहे. प्रस्तावासोबत  १) सेवा सहकारी संस्थेचे ऑगस्ट २००० नंतर स्थापना करण्यात आल्याचे नोंदणी   प्रमाणपत्र (सहकार कायदा १९६० अंतर्गत).,  २) संस्थेच्या मागील दोन आर्थिक वर्षांच्या लेखा परीक्षण अहवालांच्या छायाप्रती,  ३) सेवा सहकारी संस्थेतील सभास...

रक्तातही भ्रष्टाचार? कथित बनावट ब्लड प्लाझ्मा रॅकेट उघडकीस आल्याच्या वृत्ताने संपूर्ण देशातील रक्तदाते, रुग्ण, डॉक्टर आणि समाजमन हादरले !

इमेज
रक्तातही भ्रष्टाचार? रक्तपेढी व्यवस्थेसमोरील वाढते प्रश्न आणि विश्वास पुनर्स्थापनेची गरज एक चिंतनात्मक अभ्यासलेख लेखक : डॉ. दिलीप के. कोठावदे, नाशिक चांगोदर (गुजरात) येथे कथित बनावट ब्लड प्लाझ्मा रॅकेट उघडकीस आल्याच्या वृत्ताने संपूर्ण देशातील रक्तदाते, रुग्ण, डॉक्टर आणि समाजमन हादरले आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. परंतु या घटनेने एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे—भारतातील रक्त संक्रमण व्यवस्था किती सुरक्षित, पारदर्शक आणि उत्तरदायी आहे?          रक्तदान हा व्यवहार नसतो; तो विश्वासाचा करार असतो. एक रक्तदाता कोणत्याही अपेक्षेशिवाय आपल्या शरीरातील रक्ताचा अंश एका अनोळखी व्यक्तीच्या जीवनासाठी अर्पण करतो. तो विश्वास ठेवतो की त्याचे रक्त योग्य पद्धतीने संकलित होईल, वैज्ञानिक निकषांनुसार तपासले जाईल, सुरक्षितरीत्या साठवले जाईल आणि ज्या रुग्णाला त्याची गरज आहे त्याच्यापर्यंत शुद्ध स्वरूपात पोहोचेल.         हा विश्वास तुटला तर त्याची किंमत केवळ एका प्रकरणापुरती मर्यादित राहत नाही; त...

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा १५वा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२६,

इमेज
दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा १५वा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२६, नासिक::- साप्ताहिक न्यूज मसाला च्या "लोकराजा" (वर्ष १५ वे) दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन संपादक नरेंद्र पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. 📍📍साहित्य ३० जुन २०२६ पर्यंत पाठविण्यात यावे !📍📍 संपादक, न्यूज मसाला, लोकराजा दिवाळी अंक  ३०३, राॅयल होम्स, कॅनडा काॅर्नर, शरणपूर, नासिक, ४२२००२ किंवा Email- newsmasala1@gmail.com अधिक माहितीसाठी मो. 7387333801 वर संपर्क करावा.              राष्ट्रीय विक्रम प्राप्त एकमेव दिवाळी विशेषांक तथा आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना स्पर्धेत निवड व गौरव पुरस्कार तसेच काव्यमंच पुरस्कारासह अनेक मान्यवरांनी गौरविलेल्या, ११ वर्षे मुखपृष्ठावर आजी-माजी संसद सदस्याचे छायाचित्र प्रकाशित करणारा एकमेव दिवाळी विशेषांक ठरला आहे व २०२३ ला प्रभू श्रीराम मंदीराचे मुखपृष्ठ, २०२४ ला श्री विठ्ठल मंदिर, २०२५ ला श्री साईबाबा मंदिराचे मुखपृष्ठ प्रकाशित करुन आणखी एका नवीन विक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरू करण्यात आली आहे. ...

महाराष्ट्राची लोकमाता : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

इमेज
३१ मे २०२६ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विशेष लेख महाराष्ट्राची लोकमाता : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्राच्या इतिहासाला अनेक थोर संत, समाजसुधारक आणि आदर्श राज्यकर्त्यांचा गौरवशाली वारसा लाभला आहे. त्या तेजस्वी परंपरेतील एक अद्वितीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. लोककल्याण, न्यायप्रियता, धर्मपरायणता आणि सक्षम प्रशासन यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. म्हणूनच इतिहासाने त्यांना ‘लोकमाता’ आणि ‘पुण्यश्लोक’ ही उपाधी बहाल केली.  अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील चौंडी या गावात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे गावचे पाटील होते. त्या काळात मुलींना शिक्षण देण्याची प्रथा फारशी नव्हती; परंतु माणकोजी शिंदे यांनी अहिल्यादेवींना धार्मिक, नैतिक आणि व्यवहारज्ञानाचे शिक्षण दिले. बालपणापासूनच त्यांच्यामध्ये करुणा, परोपकार आणि नेतृत्वगुण दिसून येत होते. असे सांगितले जाते की, मराठा साम्राज्याचे पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांनी एका मंदिरात लहान अहिल्यादेवींना भक्तिभावाने पूजा करता...

विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन : सुदृढ भारतीय कुटुंब व्यवस्थेकडे नेणारा काळ सुसंगत मार्ग,,,,,,,,,, भाग २- लेखक :- डॉ.दिलीप के.कोठावदे, नाशिक

इमेज
विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन : सुदृढ भारतीय कुटुंब व्यवस्थेकडे नेणारा काळ सुसंगत मार्ग भाग २-   लेखक :- डॉ.दिलीप के.कोठावदे, नाशिक आजचा काळ वेगवान आहे, तणावपूर्ण आहे आणि बदलत्या सामाजिक वास्तवांनी भरलेला आहे. शिक्षण, करिअर, आर्थिक स्वावलंबन, सोशल मीडिया, बदललेली जीवनशैली आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्या प्रभावामुळे विवाहसंस्थेचे स्वरूपही बदलत आहे. अशा परिस्थितीत विवाह ही केवळ दोन व्यक्तींची सामाजिक घटना राहिलेली नाही; तर ती भावनिक, मानसिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक समन्वयाची अत्यंत संवेदनशील प्रक्रिया बनली आहे. यामुळेच आजच्या काळात प्री मॅरेज (विवाहपूर्व) आणि पोस्ट मॅरेज (विवाहोत्तर) कौन्सिलिंग ही केवळ पर्यायी गोष्ट नसून, एक अत्यावश्यक सामाजिक गरज बनली आहे. *विवाहपूर्व समुपदेशन : योग्य सुरुवातीची शाश्वती* विवाह ठरण्यापूर्वी मुलगा-मुलगी यांचे शिक्षण, नोकरी, आर्थिक स्थिती किंवा बाह्य व्यक्तिमत्त्व पाहिले जाते; परंतु अनेकदा पुढील अत्यंत महत्त्वाचे विषय दुर्लक्षित राहतात — ◆ भावनिक परिपक्वता ◆ संवादशैली ◆ राग व मतभेद हाताळण्याची पद्धत ◆ कुटुंबाबद्दलची भूमिका ◆ आर्थिक सवयी ◆ वै...

विवाहसंस्कृती की दिखाऊपणाचा बाजार ? समाज कोणत्या दिशेने चालला आहे./ दिखाव्याच्या स्पर्धेने उद्ध्वस्त होत चाललेला मध्यमवर्ग / उशिरा होणारे विवाह आणि अवास्तव अपेक्षा,,,,,,,,

इमेज
विवाहसंस्कृती की दिखाऊपणाचा बाजार ? समाज कोणत्या दिशेने चालला आहे.. डॉ. दिलीप कोठावदे यांनी लिहिलेला भारतीय संस्कृतीत विवाह सोहळा याविषयी परखडपणे मांडलेले विचार आज समाजासाठी खूप महत्त्वाचे आहेत, यांत मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय भरला जातोय याची जाणीव आता नवविवाहित वधू-वरांनी तसेच त्यांच्या आई-वडिलांनी ठेवणे काळाची गरज आहे. भारतीय संस्कृतीत विवाह हा केवळ सामाजिक कार्यक्रम नाही; तो एक संस्कार आहे. दोन व्यक्ती, दोन कुटुंबे, दोन परंपरा आणि दोन आयुष्ये एकमेकांशी जोडण्याचा तो पवित्र क्षण मानला गेला आहे. पूर्वी लग्न म्हणजे घराघरांतला आनंद, नात्यांतील ऊब, आपुलकीचा सहवास आणि साधेपणातला समाधानाचा सोहळा असायचा. आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते. विवाह हा संस्कार कमी आणि दिखाऊपणा, प्रतिष्ठा, पैसा, स्पर्धा आणि सामाजिक बाजारपेठ यांचे प्रदर्शन अधिक बनला आहे.          आजचा विवाहसोहळा पाहिला की प्रश्न पडतो — लोक लग्न करत आहेत की एखादा चित्रपट शूट करत आहेत ? हजारो लोकांची गर्दी, लाखो रुपयांची सजावट, डीजेचा कर्णकर्कश आवाज, सोशल मीडियासाठी बनवलेले कृत्रिम हावभाव,...