पोस्ट्स

गटविकास अधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
गटविकास अधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !      नासिक(नंदुरबार)::- गट विकास अधिकारी (वर्ग १) विजय लोंढे व सहाय्यक लेखाधिकारी रवींद्र सुखदेव लाडे पंचायत समिती अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.          दोन्ही आलोसेे यांची एकुण २६०००/- रु. अशी लाचेची मागणी आलोसे लाडे यांनी केली. गटविकास अधिकारी लोंढे साठी १८०००/- रुपये व सहाय्यक लेखाधिकारी लाडे यांनी स्वतः साठी ८०००/- रु. लाचेची मागणी केली होती .           तक्रारदार यांनी पंचायत समिती अक्कलकुवा  व  ग्रामपंचायत डाब अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे. नमुद तिन्ही कामांच्या बिलाची रक्कम  ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तक्रारदार यांनी सहाय्यक लेखाधिकारी यांना वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु तक्रारदार यांची बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केली नाही. यानंतरही तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असता, आलोसे यांनी तक्रारदार यांच्या एका कामाचे  बिल २४६८५०/- रु.  ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केले जे तक्रारदार यां

एकदा सर्वांनी कवयित्री फरझाना इकबाल यांची पंढरीच्या "विठ्ठलाच्या भेटीसाठी मन विठाई विठाई" रचना ऐकायला हवी !

इमेज
ख्यातनाम कवयित्री फरझाना इकबाल यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या कवितेला गायक रमेश गुजर यांनी दिलेली चाल आणि त्यांच्याच सुमधुर आवाजात गायिलेल्या कवितेच्या ओळींनी विठ्ठल प्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे. सध्या पंढरीच्या वारीची लगबग सुरू आहे. वारक-यांचे अनेक विडीओ बघून मन प्रसन्न होते. मात्र या कवितेने विठ्ठल वारी साहित्यात नवीन भर टाकली आहे असे कवयित्री फरझाना इकबाल यांनी सांगितले. गायक रमेश गुजर यांचे आभार मानत विठ्ठल चरणी आपली सेवा रूजू झाली अशा भावना व्यक्त केल्या.  सर्वांनी सदर रचना एकदा ऐकायला हवी !

'श्री दत्त माहात्म्य कथामृत' ग्रंथाचे लोकार्पण !

इमेज
'श्री दत्त माहात्म्य कथामृत' ग्रंथाचे लोकार्पण !             नाशिक( प्रतिनिधी ) प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी लिहिलेल्या ' श्री दत्त महात्म्य ' या ग्रंथाचा आजच्या सुलभ मराठीत भावानुवाद असलेला निरुपणकार पद्माकर देशपांडे यांचा 'श्री दत्त महात्म्य कथामृत ' हा ग्रंथ आषाढ शुद्ध प्रतिपदा टेंबे स्वामी यांच्या पुण्यस्मरणदिनी त्यांचे जन्मस्थान असलेल्या माणगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग  येथील दत्त मंदिरात लोकार्पण करण्यात आला. मुंबईच्या प्रसिद्ध नवचैतन्य आणि हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.  या सोहळ्यास प. प. दंडी स्वामी वल्लभानंद महाराज, दंडी स्वामी वामनानंद महाराज, दत्त मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सुभाष भिसे, दीपक साधले, ट्रस्टी गुरुनाथ गाणपत्ये, परमपूजनीय विमल भाई, वैभव पेंढारकर, नाशिकच्या श्री दत्त सेवा समितीचे संस्थापक प्रभाकर पाठक,  समितीचे अध्यक्ष व नाशिकच्या गणेश बाबा देवस्थानचे विश्वस्त विवेक महाराज दंडवते, माणगाव देवस्थानचे व्यवस्थापक शिवराम काणेकर, अनिल राज कवीश्वर आदींसह राज्यभरातून आलेले वासुदेवानंद सरस्वती यांचे परंपरेतील भाविक अनुयाय

महाराष्ट्राला ‘मार्वल’ च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ..

इमेज
महाराष्ट्राला  ‘ मार्वल ’  च्या माध्यमातून मिळणार आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची साथ..                आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्ध‍िमत्ता किंवा एआय हा सध्या तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय शब्दांपैकी एक झाला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकते. याच उद्देशाने आता जगभर विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र पोलीस दलालाही आता  ‘ मार्वल ’  कंपनीच्या स्थापनेमुळे गुन्ह्यांची उकल गतीने करण्यासाठी कृत्रिम बुद्ध‍िमत्तेची जोड मिळाली असून भविष्यात सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी महाराष्ट्राला याचा मोठा लाभ मिळणार आहे.          मागील काही वर्षांत कृत्रिम बुद्ध‍िमत्तेच्या माध्यमातून अनेक नवकल्पना निर्मित होऊन प्रगती साधली जात आहे. अनेक वर्षांपूर्वी ज्या बाबी कल्पनेबाहेरच्या वाटत होत्या त्या वैज्ञानिक सिद्धांताद्वारे मान्य होऊन हळूहळू वास्तविकतेत रूपांतरित झाल्या. त्याचेच आजचे आधुनिक स्वरूप म्हणून आपण कृत्रिम बुद्धीमत्तेकडे पाहू शकतो.                 कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवाप्रमाणे विचार करण्यासाठ

अंध व्यक्तींच्या सामान्य मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

इमेज
अंध व्यक्तींच्या सामान्य मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ! नाशिक::- येथील ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अँड‌ डिझॅबल्ड या संस्थेच्या वतीने डॉ. हेलेन केलर यांच्या जयंती निमित्त २७ जुन २०२४ रोजी साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट येथे दिव्यांग व्यक्तींच्या सामान्य मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलिस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ व एम.एस.एल. ड्राइवलाइन सिस्टीम कंपनीचे पर्सनल मॅनेजर हेमंत राख उपस्थित होते. दोन्ही पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याचे कौतुक करून संस्था राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती करून घेतली व आपण देखील संस्थेला सर्वतोपरी मदत करू असे सांगितले. तसेच या प्रसंगी उपस्थित असलेले इतर मान्यवर पिंपळगाव कृषी उत्पन्न समिती चे अध्यक्ष पाटील व विंचूरहून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले अशोक लोळगे व परिवार यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन उपक्रमासाठी आर्थिक मदत केली. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, कृष्णकुमार चावरे, विद्या जगताप, नीमिता शेजवळ आदी उपस्थित होते. या प्रसंगी संस्थ

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

इमेज
दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४, नासिक::- साप्ताहिक न्यूज मसाला च्या  "लोकराजा" (वर्ष १३ वे)  दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन संपादक नरेंद्र पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.            राष्ट्रीय विक्रम प्राप्त एकमेव दिवाळी विशेषांक तथा आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना स्पर्धेत निवड व गौरव पुरस्कार तसेच काव्यमंच पुरस्कारासह अनेक मान्यवरांनी गौरविलेल्या, ११ वर्षे मुखपृष्ठावर आजी-माजी संसद सदस्याचे छायाचित्र प्रकाशित करणारा एकमेव दिवाळी विशेषांक व २०२३ ला प्रभू  श्रीराम मंदीराचे मुखपृष्ठ प्रकाशित करण्यात आले.            न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी अंक यंदा १३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मराठी साहित्यिक विचारांचा गौरव व नव साहित्यिकांच्या लेखनाला यथोचित सन्मानाने स्थान देण्याचा मानस या वैशिष्ट्यांसह "लोकराजा" अंकाने सर्वदुर सहस्रावधी वाचकांची आवड जोपासली आहे. लेखक, कवी, विचारवंतानी आपण स्वत: लिहिलेली साहित्य कृती (कथा, कविता, ललित लेख यापैकी फक्त एकच साहित्य रचना )

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इमेज
विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !                  नाशिक ( प्रतिनिधी) -अफलातून म्युझिक लव्हर्स व संतोष फासाटे यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक ग्रुपतर्फे सूरसम्राज्ञी लता (भाग २) हा हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी दि.२९ रोजी संध्याकाळी ५.४५ वाजता ही विनामूल्य मैफल परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रंगेल. यावेळी लतादीदींचा सुरेल सुवर्णकाळ अनुभवायला मिळणार आहे.     सुप्रसिद्ध गायिका नमिता राजहंस, अपर्णा देशपांडे, डॉ. विशाखा जपताप, अश्विनी सरदेशमुख, मीनाक्षी भुतडा, सीमा जाधव, स्वाती जाधव, अर्चना सोनवणे लतादीदींनी गायलेली लोकप्रिय गाणी सादर करतील. त्यांना ख्यातनाम सुमधुर गायक हरीशभाई ठक्कर, मयूर तुकडिया, मनोज पळसकर, राजू पवार व उमेश मालवी स्वरसाथ करणार आहेत. त्याचबरोबर संतोष फासाटे यांच्या खुमासदार निवेदनामध्ये लतादीदींचा प्रदीर्घ जीवनप्रवास, त्यांचा संघर्ष, अलौकीक प्रतिभा व अविस्मरणीय आठवणींनाही उजाळा देण्यात येणार आहे. प्रकाश गोसावी पाहुणे गायक तर विशेष सहकार्य सुनील भुतडा यांचे लाभले आहे. पवन वंजारी ध्वनी संयोजन करतील. कार्यक्

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इमेज
"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी ! छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)::- ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिग्दर्शित केलेला "राजकारण गेलं मिशीत" हा विनोदी चित्रपट नुकताच सगळीकडे प्रदर्शित झालेला आहे.             सुप्रसिद्ध साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या कथेवर आधारित या चित्रपटातील  बहुतांश कलाकार मराठवाड्यातील असून छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ कवी आणि गीतकार उद्धव भयवाळ यांच्या 'लावण्य बहार' या अल्बम मधील एक लावणी या चित्रपटात घेण्यात आलेली आहे.              या लावणीच्या निमित्ताने उद्धव भयवाळ यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले असून समाजातील सर्व स्तरांमधून भयवाळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. २० एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील प्रोझोन मॉल मधील आयनॉक्स चित्रपटगृहात या चित्रपटाचा प्रिमियर शो झाला. यावेळी दिग्दर्शक मकरंद अनासपुरे, संगीतकार अतुल दिवे, गीतकार उद्धव भयवाळ तसेच चित्रपटातील इतर कलाकार उपस्थित होते.

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

इमेज
इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !  नाशिक ( प्रतिनिधी ) इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग व एअर कंडीशनींग इंजिनिअर्स (इशरे) या संस्थेच्या नाशिक शाखेचा नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचा पदग्रहण व शपथग्रहण समारंभ  शनिवारी (दि. २०) एप्रिल रोजी हाॅटेल ग्रॅन्ड रिओ येथे करण्यात आला. शपथग्रहण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुप बालानी, उपाध्यक्ष मिहीर संघवी, पश्चिम विभागीय व्यवस्थापक  मनीष गुलालकरी उपस्थित होते.     नवनिर्वाचित अध्यक्ष अशफाक कागदी, उपाध्यक्ष वरुण तिवारी, सचिव अनिकेत चौधरी, खजिनदार अनिता बोराडे व कार्यकारिणी सदस्य  गुलाम हुसेन, प्रविण कामाले, प्रविण पातुरकर, सारंग दिडमिशे, रोहिणी मराठे, शामसुंदर कापसे यांनी शपथ घेतली. संस्थेचे मावळते अध्यक्ष गोविंद नायर यांनी  २०२३ - २४ या वर्षातील संस्थेच्या कार्यक्रमांचा आढावा घेतला व विविध उपक्रमातील सहकार्याबद्दल मावळत्या संचालक मंडळाचे आभार मानले. नवनिर्वाचित अध्यक्ष अशफाक कागदी यांनी आगामी संकल्पित कार्यक्रमांची रूपरेषा विषद केली.       यावेळी इतर सोसायटीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची उपस्थ

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

इमेज
निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते ! लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार घ्यावी लागते शपथ नाशिक::- लोकसभा, राज्यसभा,  विधानसभा आणि विधानपरिषदेसाठी  निवडणूक लढविणा-या उमेदवारांना भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार त्यांचा उमेदवारी अर्ज म्हणजेच नामनिर्देशन पत्र दाखल करतांना भारताच्या संविधानावर माझा खरा विश्वास आणि निष्ठा असेल आणि आणि मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखेल अशी शपथ किंवा प्रतिज्ञा घ्यावी लागते. ही शपथ आयोगाने निर्देशित केलेल्या व्यक्तींपुढेच घ्यावी लागते, ही माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास सर्वसाधारणपणे निवडणूक होणा-या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेपुढे अशी शपथ घेता येते. तसेच आयोगाचे निर्देशानुसार प्रथम वर्ग दंडाधिकारी, जिल्हा न्यायाधीश यांच्यापुढे देखील उमेदवारांना अशी शपथ घेता येते. नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी निवडणूक लढविणारा उमेदवार जर प्रतिबंधात्मक स्थानबद