राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे आज दुपारच्या सत्रात झाली निदर्शने !

राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे आज दुपारच्या सत्रात झाली निदर्शने ! राज्य सरकारी, जिल्हा परीषद कर्मचाऱ्याचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने... नासिक::- जुनी पेन्शन लागू करा, रिक्त पदे त्वरीत भरा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा, आदि मागण्यांकरिता आज दि २७ मे रोजी दुपारचे सत्रात कर्मचाऱ्यांचा अखिल भारतीय मागणी दिनाचे आजोजन निदर्शनाव्दारे करण्यात आले. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे १७ वे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच बेगूसराय, बिहार येथे पार पडले. यात २७ राज्यातील प्रतिनिधींनी सहभाग घेवुन, केंद्र व राज्य सरकारचे कामगार कर्मचारी विरोधी धोरणा बाबत तिव्र आक्रोश व्यक्त केला आहे. केंद्र सरकारची कार्पोरेट धार्जिणी अर्थनीती, कामगार कर्मचाऱ्यांच्या हक्कांना बाधा आणून धनदांडग्यांना लाभ होईल अशा सुधारणा कामगार कायद्यात करणे, महागाईने भरमसाठ उच्चांक गाठवुन त्यात गरीब जनता होरपळून जात आहे., अव्यवहार्य अंशदायी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या माथी मारणे, सरकारी क्षेत्रातील कार्यालयात लाखो पदे रिक्त ठेवुन बेरोजगारांचा भ्रमनिरास करणे, खाजगीकरणाचा अतिरेकी वापर करून सरकारी