पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक .ना. डॉ कदम ! अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर "भारतरत्न पुरस्कार” मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येणार ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन सकारात्मक .ना. डॉ  कदम ! अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर "भारतरत्न पुरस्कार” मिळावा यासाठी  राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येणार.        नाशिक ::-मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर “भारतरत्न पुरस्कार” मिळावा यासाठी .केंद्र सरकारला राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येईल असे मातंग समाजाच्या विविध प्रकारच्या प्रश्नांच्या बाबत शासन   सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात पार पडलेल्या बैठकीत बोलतांना डॉ. कदम यांनी स्पष्ट केले.      राज्यातील हा समाज आर्थिक ,सामजिक दृष्टीने मागासलेला असून तो  गावखेड्यात राहतो.  त्यांच्या विविध प्रकारच्या मागण्या लक्षात घेऊन शासन स्तरावरुन सकारात्मक दृष्टिकोनातून मार्ग काढण्यात येईल असेही यावेळी डॉ. कदम म्हणाले. तसेच  क्रांतीवीर लहुजी साळवे स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत थेट कर्ज योजना तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योज

रस्ता उखडून फेकल्याने संपर्कच तुटल्यामुळे फणसपाडा ग्रामस्थ संतप्त ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
रस्ता उखडून फेकल्याने संपर्कच तुटल्यामुळे फणसपाडा ग्रामस्थ संतप्त ! सुरेश भोर यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस,    नाशिक::-तालुक्यातील गंगाम्हाळुगी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या फणसपाडा गावास  १००वर्षापुर्वीपासून दळणवळणाच्या दुष्टीने जोडणारा मुख्य व महत्त्वाचा रस्ता येथील काही नागरिकांनी उखडून फेकल्यानेआता संपर्कच तुटल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहे.       याबाबत ची माहिती अशी की तालुकच्या पश्चिम पट्टयातील आदिवासी व दुर्गम भागातील फणसपाडा ग्रामस्थ गेल्या वर्षभरापासून तालुका प्रशासनाकडे मजबूत व हक्काच्या रस्त्यासाठी मागणी करून पाठपुरावा करत आहेत.व याबाबत तहसिलदार अनिल दौंडे यांनी कार्यवाही ही सुरू केली आहे. मात्र आता यंत्रणा ग्रामपंचायत निवडणूकीत व्यस्त असल्याचा फायदा घेऊन काही मोजक्याच नागरिकांनी रस्ता उखडून फेकून पुर्ण गावास वेठीस धरले आहे. अशी तक्रार येथील ग्रामस्थांनी केली आहे. व तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पण निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे .अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व व्यक्त केली आहे.

Today's NEWS MASALA ISSUE,. संपादकीय. कोरोनाने काय दिले ? यापेक्षा जगाने आता काही किमान समान कार्यक्रमावर एकत्र येणे आवश्यक आहे ! इतर बातम्यांसह सविस्तर वाचा,. विशेष-मोफत जाहिरात, मोफत जाहिरात ! जाणण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा !

इमेज
संपादकीय कोरोनाने काय दिले ? यापेक्षा जगाने आता काही किमान समान कार्यक्रमावर एकत्र येणे आवश्यक आहे ! नरेंद्र पाटील, संपादक- न्यूज मसाला       जगाने अर्थात मानवजातीने धर्म प्रांत भौगोलिक विविधता या बाबींवर लक्ष केंद्रित न करता काही किमान समान कार्यक्रमावर एकत्र येणे आवश्यक आहे.,,,,,,,,,,,,,,,,,,,          भ्रष्ट, व्यभिचारी यांना त्यांचे पोट भरत नाही तोपर्यंत सर्वसामान्य जनतेने वाट पहाणे धोकादायक आहे, ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, अतिजल्लोषात आणखी मोठे नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवा, ब्रिटनमधून कोरोनाचं नवीन बाळ (ट्रेन) अधिक घातक असल्याचे सांगितले जात आहे !,,,,,,,,,,,,,,,,,,,,       

घुसमट, पोरखेळ लघुपटांचा दिग्दर्शक ! आयुष्याला पोरखेळ न समजता जीवनाची घुसमट होऊ न देता, जिद्दीने उभा राहीलेला दिग्दर्शक ! सध्याचा नासिककर विजय जाधव ! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
घुसमट, पोरखेळ लघुपटांचा दिग्दर्शक ! आयुष्याला पोरखेळ न समजता जीवनाची घुसमट होऊ न देता, जिद्दीने उभा राहीलेला दिग्दर्शक ! सध्याचा नासिककर विजय जाधव ! न्यूज मसाला सर्विसेस, नासिक असं म्हणतात की मुलांचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे अगदी बालपणापासून लेखन दिग्दर्शन अभिनयाची आवड असलेल्या विजय जाधव यांनी स्वतः ला सिध्द करण्यासाठी जिद्द आणि चिकाटीने अनेक लघुपटांची निर्मिती केली आहे. त्यांनी अनेक प्रसंगाला सामोरे जात आत्मविश्वासाने दर्जेदार लघुपटाची निर्मिती केली आहे. त्यांच्या या कार्याची लघुपट चित्रपट महोत्सवामध्ये दखल घेण्यात आली असून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विजय रामप्रसाद जाधव हे मूळचे हिंगोली जिल्हातील काळकोंडी येथील असून सध्या नाशिक मध्ये स्थायिक आहेत. त्याच्या कुटुंबातील आर्थिक परिस्थिती तशी बेताची आहे. पण मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अशक्य गोष्टी शक्य होतात. ११९१ मध्ये जाधव यांचे वडील गवंडी कामानिमित्त कुटुंबासह नाशिकमध्ये आले. मुलांच्या शिक्षणाची  जबाबदारी आल्याने जाधव यांचे वडील परत गावाकडे आलेत. जाधव यांचे पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण गावी झाले. आठ

माडसांगवीच्या सूनबाई प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या पथसंचलाचे नेतृत्व करणार ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
अरूण बिडवे यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस,            नासिक (माडसांगवी)::- २६ जानेवारी २०२१ रोजी राजपथ दिल्ली येथे होणाऱ्या पथसंचलनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या भारतीय संघात महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नाशिक येथील नवजीवन विधी महाविद्यालय कार्यक्रम अधिकारी सौ.शालिनी मनोज पेखळे - घुमरे यांची निवड करण्यात आली आहे.   २० नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२० या कालावधीत पश्चिम क्षेत्र राष्ट्रीय सेवा योजना पूर्व प्रजासत्ताक पथसंचलन शिबिर हैदराबाद येथे संपन्न झाले यामध्ये महाराष्ट्रातून २८ मुले आणि २८ मुली अशी एकूण ५६ स्वयंसेवकांची व २ कार्यक्रम अधिकारी यांची निवड करण्यात आली होती. हैदराबाद येथे महाराष्ट्र, गोवा, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, दादर हवेली, या सहा राज्यातील दोनशे निवडक विद्यार्थी व ११ कार्यक्रम अधिकारी शिबिरात सहभागी झाले होते. उत्कृष्ट लिडरशिप करून सहभागी विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन उत्कृष्ट संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम  यांचे उत्तम सादरीकरण करून घेत महाराष्ट्रातील १४ विद्यार्थ्यांची गोवा येथील २ व १ कार्यक्रम अधिकारी यांची दिल्ली येथे पथसंचालना कारीता नि

सांभळ, तूरथाळी वाद्यांच्या गजरात विकास कामांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा ! आमदार नितीन पवार यांच्या हस्ते संपन्न !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
ग्रामपंचायत मांधा येथे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन संपन्न भागवत गायकवाड यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस     नासिक(२७)::-आज सुरगाणा तालुक्यातील गृप ग्रामपंचायत मांधा व नाईकपाडा गावातील विविध कामांचा रू १ कोटी रकमेचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा नुकताच कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते आदिवासी परंपरेनुसार सांभळ, तूर थाळी अशा वाद्यांच्या स्वरूपात मोठ्या आनंदाने हा भूमिपूजन सोहळा पार पडला, मांधा गावातील परिस्थिती लक्षात घेऊन आमदार नितीन पवार यांनी तेथील जनतेच्या समस्या दूर व्हाव्यात, ही गोष्ट लक्षात घेऊन आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नातून मांधा व नाईकपाडा येथे विविध विकास कामे व्हावे म्हणून आज हा भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यांनतर  माकपमध्ये कार्यरत असलेल्या जाणू पांडुरंग ठाकरे, अशोक थोरात, सुकर मळू गावित, , आदी कार्यकर्त्यांनी माकपाला सोड चिठ्ठी देत आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, चिंतामन गावित, वसंत झिरवाळ, नवसु गायकवाड, भास

ब्रह्माकुमारी संस्थेत ख्रिसमस सण उत्साहात साजरा ! ख्रिसमस हा सण आनंद, स्नेह व नवीनतेचा दिवस- ब्रह्माकुमारी शक्ती दीदी,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
ब्रह्माकुमारी संस्थेत ख्रिसमस सण उत्साहात साजरा ख्रिसमस हा सण आनंद, स्नेह व नवीनतेचा दिवस- ब्रह्माकुमारी शक्ती दीदी नाशिकरोड - (दि. 25 डिसेंबर) ख्रिसमस हा सण आनंद, स्नेह व नवीनतेचा दिवस आहे. आपल्या जीवनात नेहमी नवीन चांगल्या व सकारात्मक गोष्टी घडाव्यात, सांताक्लॉज घेऊन ज्याप्रमाणे सर्वांना गोड पदार्थ वाटतात त्याप्रमाणे आपल्या जीवनातही गोडवा राहावा अशा  शुभेच्छा नाशिकरोड येथील  ब्रह्माकुमारी सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी शक्ती दीदी यांनी उपस्थितांना दिला.        सेंट फिलोमिना स्कूल समोरील सागर हेरिटेज इमारतीतील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रातील सभागृहात ख्रिसमस हा सण मोठ्या हर्षल उल्हासाने साजरी करण्यात आला.  याप्रसंगी ब्रह्मकुमार दिलीप यांनी ख्रिसमस सणाची माहिती संताक्लौज रूप परिधान करून सांगितले तर  ब्रह्माकुमार मोहन भाई यांनी ख्रिस्तमस चे गीत गायले. ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी सर्व उपस्थितांना भेटवस्तू व प्रसादाचे वाटप केले.  भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण आपल्याला एकात्मतेचा संदेश देतो व आनंदी राहण्याचा व नवीन काही शिकण्यासाठी प्रेरित करतो असेही शक्ती दीदी यांनी याप्रसं

जल है तो कल है ! डोल्हारे येथे श्रमदानातून दोन वनराई बंधारे निर्मिती !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
डोल्हारे येथे श्रमदानातून  वनराई बंधारे निर्मिती भागवत गायकवाड यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस सुरगाणा ता:२६::- तालुक्यातील आदिवासी भागातील निसर्गाचं वरदान लाभलेल्या डोल्हारे ता.सुरगाणा येथे गावातील जेष्ठ माणसं, जागरूक युवावर्ग, महिला भगिनी, कृषी विभाग, ग्रामपंचायत कर्मचारी व शाळा कर्मचारी यांच्या श्रमदानातून "जल है, तो कल है!" या उद्देशाने प्रेरित होऊन गावात लोक सहभागाने श्रम दानातून गावातील विहरीजवळ व शिवारात एका ठिकाणी असे दोन वनराई बंधारे बांधण्यात आले. सदर बंधाऱ्यांमुळे गाव पाणवठ्याच्या विहीरीची पाणी पातळी वाढेल. गुरांसाठी पिण्याचे पाणी राहील. कपडे धुणे व घर कामासाठी पाणी टिकून राहणार आहे. यावेळी गावाच्या हिताच्या कार्यात कृषी सहायक हरिभाऊ गावित, ग्रामसेवक प्रविण भोये ग्रामसेवक, राजु पाडवी, वसंत पाडवी, बाळू पाडवी, लक्ष्मण वळवी, हेमंत पाडवी नारायण पाडवी, रामदास पवार, मनु पाडवी यांनी प्रत्यक्ष श्रमदानाने परिपूर्ण नियोजन करत सहभाग घेतला. नियोजना साठी कृषीपर्यवेक्षक एम.वाय. चव्हाण, सुरगाणा मंडळ कृषी अधिकारी जे.एच.आढळ, तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे, परशराम पाडवी सर 

न्यूज मसाला अंक २४ डिसेंबर २०२०,. संपादकीय-- बाळासाहेबांची घरवापसी ! निवड, संधी आणि बदल या तिन्ही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. "संधी" दिसता "निवड" करता आली तर "बदल" आपोआप होतो.  "संधी" समोर दिसूनही ज्याला "निवड" करता येत नाही त्याच्यात कधीच "बदल" घडत नाही....        भाजपात घरवापसी झालेले नासिक चे माजी आमदार "कार्यसम्राट"  बाळासाहेब सानप ! कधीकाळी ग्रामीण भागातून नासिक शहरात आले आणि नशीब आजमावून पहात असताना त्यांनी जी "निवड" केली तिचं "संधीत" रुपांतर करुन जो "बदल" घडवून आणला,,,,,,,,,,,. सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!

इमेज
बाळासाहेबांची घरवापसी ! निवड, संधी आणि बदल या तिन्ही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. "संधी" दिसता "निवड" करता आली तर "बदल" आपोआप होतो.  "संधी" समोर दिसूनही ज्याला "निवड" करता येत नाही त्याच्यात कधीच "बदल" घडत नाही....        भाजपात घरवापसी झालेले नासिक चे माजी आमदार "कार्यसम्राट"  बाळासाहेब सानप ! कधीकाळी ग्रामीण भागातून नासिक शहरात आले आणि नशीब आजमावून पहात असताना त्यांनी जी "निवड" केली तिचं "संधीत" रुपांतर करुन जो "बदल" घडवून आणला तो डोळे विस्फारणा ठरला होता, संधीच्या शोधातले बाळासाहेब नासिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले, त्याक्षणी महापौर पदाची माळ गळ्यात पडते, माळेतील फुलं कोमजण्याआधीच आमदार होतात, भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष पदही एक व्यक्ती एक पद याला फाटा देत सांभाळतात ! हा बदल त्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरला, अती महत्त्वाकांक्षी होण्यास कारणीभूत ठरला, मंत्रीपदाचा मुकुट चढायलाच हवा अशी कार्यकर्त्यांची, नासिककरांची इच्छा होती की नाही याची चाचपणी करण्यात गल्लत झाली,

दिव्यांग साहील चौधरी ला रोशनी इंटरनॅशनल शाॅर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये द्वितीय पुरस्काराने गौरविण्यात आले !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
साहिल चौधरी ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय बालकलाकार द्वितीय  पुरस्कार... भागवत गायकवाड यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस नासिक (मनखेड): - ता.२२ नुकत्याच झालेल्या रोशनी इंटरनॅशनल शाॅर्ट फिल्म फेस्टीवल औरंगाबाद येथे भारताबरोबर १५ देशातील ६५० हून जास्त चित्रपटांनी सहभाग नोंदविला होता.या सर्व लघूपटातून एका सत्य घटनेवर आधारीत  दिग्दर्शक बलराम माचरेकर निर्मित "पाठलाग स्वप्नांचा" या लघूपटामधील  बाल कलाकार सुरगाणा तालुक्यातील  चिकारपाडा (दे) येथील  साहिल चौधरी ला सर्वोत्कृष्ट बालकलाकार द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार जाहीर झाले.   या फिल्म फेस्टीवल चे आयोजक तुषार थोरात यांनी साहिल चे विशेष कौतूक केले.   नाशिक जिल्ह्यातील अनेक भागातून साहिल चौधरी वर अभिनंदनचा वर्षाव होतांना दिसत आहे.    साहिल दोन्ही पायांनी दिव्यांग होता परंतु आपल्या अपंगत्वावर जिद्दीने मात करून शिक्षक बलराम माचरेकर यांच्या प्रयत्नातून चालायला लागला, यांचा खुप आनंद पाहावयास मिळत आहे. ---------     साहिल हा दोन्ही पायांनी दिव्यांग असलेला माझा विद्यार्थी. सतत प्रयत्न करून साहिल ला सामाजिक संस्थेच्या मदतीने दोन्ही पाया

अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांची जिल्हापरिषदेला भेट ! जलजीवन मिशनचा घेतला आढावा ! महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविणे हे प्रमुख ध्येय ठेवुन जलजीवन मिशन योजना जिल्हयात राबविण्यात येत आहे- मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
  नाशिक – राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनी आज जिल्हा परिषदेला भेट देऊन जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामकाजाबाबत आढावा घेतला. तसेच ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवकांकडील पाणी पुरवठयाच्या नमुना नंबर ९ नुसार नळ कनेक्शनची स्वत: शासन संकेतस्थळावर पडताळणी केली. स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत नाशिक पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या मित्रा या प्रशिक्षण केंद्रात  केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त   सचिव अरुण   बरोका यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले हेाते. या बैठकीसाठी आलेल्या डॉ. संजय चहांदे यांनी जिल्हा परिषदेला भेट देऊन जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान टप्पा-२ अभियानाचा आढावा घेतला. जलजीवन मिशन अंतर्गत राज्यामध्ये घरोघरी नळजोडणी करण्यात येत आहे. या कामाबाबत त्यांनी आढावा घेत ऑनलाईन करण्यात आलेल्या माहितीची ग्रामपंचायतीकडील नमुना नंबर ९ नुसार पडताळणी केली. यावेळी यादृच्छिक पध्दतीने जिल्हयातील १० ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेत बोलावून नमुना नंबर ९ वरील नळकनेक्शन धारकांच्या नोंदी व केंद्र शासनाच्या

दि. १७ डिसेंबर २०२० चा अंक ! संपादकीय- बातमीत संस्कार ओतने काळाची गरज !! सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!

इमेज
संपादकीय- बातमीत संस्कार ओतने काळाची गरज ! पीतपत्रकारितेचा शिरकाव हा पत्रकारिता क्षेत्राला भविष्यात मोठा अडसर ठरेल काय ? या विषयावर अनेक दिग्गज पत्रकारांनी, संघटनांच्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केले असून ठोस निर्णयापर्यंत कसे पोहचावे ही द्विधा मनस्थिती अनेक पत्रकारांसाठी डोकेदुखी ठरू पहात आहे. पत्रकारिता क्षेत्रात करीअर करायचे असल्यास कमीतकमी १२ वी पर्यंत चे शिक्षण असावे असे माहीती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने सांगितले जाते किंवा पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण असावा परंतु माध्यम मालक, संपादक यांच्या कडून सर्रास दहावी किंवा विना शिक्षणाची अट काय दर्शविते हा संशोधनाचा विषय आहे.       पत्रकारितेत अशा व्यक्तिंचा शिरकाव होत असेल तर याबाबत  माध्यम मालक-संपादक यांनीच निर्णय घ्यावा, निर्णय योग्य की अयोग्य याचा उहापोह या लेखातून करायचा नाही मात्र बातम्यांचा सामाजिक जीवनावर काय परिणाम होतो हे तरी लक्षात  घ्यायला हवे.       मध्यंतरीच्या काळातील एक बातमी "बापाचा मुलीवर बलात्कार !", या बातमीला कुणी आक्षेप घ्यावा असे प्रथमदर्शनी मुळीच वाटत नाही परंतू ग्रामीण भारतातील अनेक स्त्रि

संपूर्ण जिल्ह्यात १५ ते ३१ डिसेंबर दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार- अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षीरसागर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आज झालेल्या शिबिरात रक्तदान करून महीला वर्गापुढे एक आदर्श निर्माण केला ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
जिल्हा परिषदेत रक्तदान शिबीर संपूर्ण जिल्ह्यात १५ ते ३१ डिसेंबर दरम्यान राबवली जाणार मोहीम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनीही केले रक्तदान नाशिक : जिल्हा परिषदेतर्फे मंगळवार दि. १५ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या कै. रावसाहेब थोरात सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील सरकारी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा भरुन काढण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.  या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यात १५ ते ३१ डिसेंबर या काळात टप्प्या-टप्प्याने रक्तदान शिबीर घेण्याचा मनोदय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी व्यक्त केला होता. या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात दिनांक १५ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद, नाशिक व जिल्हा शासकीय रुग्णालयाची शासकीय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर पार पडले. या रक्तदान शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसो

सामाजिक दातृत्वाची अनुभूती,. निमाकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास ६० मेडिकल किट भेट ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
निमाकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास ६० मेडिकल किट भेट नासिक ::-  'निमा' नाशिक च्या वतीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास ६० मेडिकल किट त्याच बरोबर थर्मामीटर गन, पल्स ऑक्सिमीटर हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागास प्रदान करण्यात आले. या मेडिकल किट मध्ये दोन गॉगल, २ एन९५ मास्क, २५ डिस्पोझेबल मास्क, १००मिली. सॅनिटायझर बॉटल, २५० मिली. सॅनिटायझर बॉटल अशा स्वरूपाच्या वस्तू आहे, या वस्तू ग्रामीण भागात काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले, निमाच्या या सामाजिक दायित्वाबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी उपस्थित निमाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले, यावेळी निमाचे मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, निमाचे उपाध्यक्ष श्रीपाद कलकर्णी, बाळासाहेब गुंजाळ, निमा हेल्थ कमिटीचे चेअरमन जयंत पवार, कैलास वराडे, लिगल कमिटीचे चेअरमन संजय महाजन, निमाच्या कार्यकारी सचिव सोनाली देवरे आदी उपस्

लासलगाव मंडल पदाधिकारी नियुक्ती वितरण सोहळा संपन्न ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
लासलगाव मंडल पदाधिकारी नियुक्ती वितरण सोहळा संपन्न संतोष गिरी यांजकडून,         नासिक: – लासलगाव येवला मतदार संघातील निफाड येवला तालुक्यातील ४६ गावातील मंडल पदाधिकारी नियुक्ती सोहळा येथील शिवमंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भारती पवार होत्या तर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार राहुल आहेर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा ताई जगताप यांनी केले. खासदार भारती पवार यांनी शेतकरी बांधवांसाठी केंद्राच्या विविध योजनांचा उहापोह केला. मोदी सरकार हे शेतकरी हिताचे सरकार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार राहुल आहेर, सरचिटणीस सुनील बच्छाव, लासलगाव जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या वेळी लासलगाव मंडल मध्ये विविध पदाधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी निफाड मंडल अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, प्रदेश सरचिटणीस शंकरराव वाघ, नामको चे माजी अध्यक्ष प्रकाश दायमा, भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे, लासलगाव मर्चंट चे

आजचा न्यूज मसाला अंक ! संपादकीय- छत्रपतींच्या घराण्यात कोल्हापूर-सातारा न पेटलेला वाद पेटविल्याचा आव आणणाऱ्या औलादींना छत्रपती संभाजीराजे यांनी नासिक दौऱ्यात चांगलीच चपराक लगावली !! इतर बातम्यांसह वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क-7387333801. बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव साप्ताहिक !!!!!

इमेज
संपादकीय छत्रपतींच्या घराण्यात ( कोल्हापूर-सातारा )  न पेटलेला वाद पेटविल्याचा आव आणणाऱ्या औलादींना छत्रपती संभाजीराजे यांनी नासिक दौऱ्यात चांगलीच चपराक लगावली, छत्रपती उदयनराजे यांचे भाचे अर्थातच छत्रपती संभाजीराजे यांचे ही भाचे यांची झालेली भेट व दिवसभर एकत्र, एकाच वाहनातून मामा-भाचे यांचा एकमेकांस लाभलेला सहवास !            तोडा फोडा आणि राज्य करा या इंग्रजाळलेल्या नीतीचा भारतीय लोकशाहीत वारेमाप वापर केला गेला आहे, भारतीय राजकारणाला लाभलेला मोठा शाप आहे मात्र छत्रपती घराणे या शापाला कालच्या भेटीने अपवाद ठरले व ते आजतागायत गेली साडेचारशे वर्षे टिकून आहे, छत्रपतींच्या दरबारात ही इंग्रजांना नतमस्तक व्हावे लागले, इतिहास साक्षीला असलेल्या छत्रपतींना जगाचे, रयतेचे एकमेव राजा बिरूद लागले त्याला जगात तोड नाही तेथे काही बुजगावणे फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची अवकाद न बोलता दाखविण्याची धमक आजही छत्रपतींमधील प्रगल्भतेच्या माध्यमातून समाजाला दिसली,  दाखवून दिली.         छत्रपती संभाजीराजे भोसले व उदयनराजे भोसले यांचे कार्यक्षेत्र वेगळं आहे मात्र मर्यादीत नाही,  हे न समजल्यामुळे काही

मराठा क्रांती मोर्चाच्या तांबडी-रोहा येथील आंदोलनाला अभूतपूर्व यश ! सिंघमसारख्या अपेक्षा करू नका- पोलिस आयुक्त दीपक पांडेय !! विकासकामामध्ये राजकारण व दुजाभाव नाही- जिप अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर !!! न्यूज मसाला सर्विसेस 7387333801. सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती मोर्चे निघाले आणि जगाला शिस्तप्रिय आणि मोर्चा कसा असतो दाखवून गेले कोरोना लॉकडाऊन काळात अनेक आंदोलन,मोर्चे होत आहेत पण त्यातही मराठा क्रांती मोर्चा चे रोहा तांबडी येथे झालेले आंदोलन शिस्तबद्ध आणि आंदोलन कसे आदर्श असावे याचे आगळेवेगळे उदाहरण ठरले त्याची दखल महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा घेत आंदोलकर्त्यांचे समनव्यकांचे कौतुक करत सर्व मागण्या मान्य करत लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्याचे वचन व्हीडिओ कॉन्फरन्स झुम मिटींग द्वारे दिले आणि यशस्वी आंदोलनाची नोंद घेतली. या श्रध्दांजली अर्पण व निवेदन देण्याचा कार्यक्रम मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र,  मराठा क्रांती मोर्चा तांबडी, सकल मराठा समाज, पंचक्रोशीतील सरपंच यांच्याकडून आयोजित करण्यात आला होता.

न्यूज मसाला प्रकाशनाच्या "कळी उमलली" कथासंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार ! नरेंद्र पाटील, संपादकीय-राष्ट्रीय विकासाची काळजी तसेच घसरलेल्या जीडीपीबद्दल काळजी करू नका !! जगायला जातो- प्रसिद्ध वारली चित्रकला अभ्यासक संजय देवधर यांचा लेख !! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संपादकीय नरेंद्र पाटील राष्ट्रीय विकासाची काळजी तसेच घसरलेल्या जीडीपीबद्दल फार काळजी करू नका !! एका कुटुंबात कमावणारा एक आणि खाणारे चार धष्टपुष्ट पोरं असतात. बाप कमावतो म्हणून ते निश्चिंत असतात‌. एका अपघातात कुटुंब प्रमुखाला आपला हात गमवावा लागतो. कुटुंबप्रमुख त्याच्या कामाशी संबंधित आस्थापनेत प्रामाणिकपणे काम करत असतो. म्हणूनच संबंधित आस्थापना अर्ध्या पगारावर कुटुंब प्रमुखाला नोकरीवर कायम ठेवते. पण अर्ध्या पगारात त्याच्या कुटुंबाचे अर्थचक्र प्रभावित होते. शुद्ध बिजापोटी रसाळ फळे उपजतात, हे प्रमाणभूत सत्य. त्यान्वये, बापाची झालेली आर्थिक कोंडी सोडविण्यासाठी हे चार पोरं पुढे येतात. मिळेल ते काम करतात. पैसे कमवत आपल्या कुटुंबाला तारतात. कुटुंबाची आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठा वर्धिष्णू करतात. 'वसुधैव कुटुंबकम' या भारतीय संस्कृतीचे हे उदाहरण एक उत्तम निदर्शक.       उपरोक्त उल्लेखित उदाहरण आज घराघरांत पाहावयास मिळेल. कारण आहे कोरोना नावाची वैश्विक महामारी आणि त्यामुळे प्रभावित झालेली अर्थव्यवस्था. घसरलेला जीडीपी हा या महामारीचा दृश्य परिणाम आहे. हवं तर सुरुवातही म्हणूयात.  

पंधराव्या वित्त आयोगाच्या पहिल्या हप्त्यापोटी ग्रामपंचायतींना रुपये ६५ कोटी वितरीत – बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद. निधी तत्काळ ग्रामपंचायत स्तरावर वितरीत करून जनहिताचे कामे विहित मुदतीत करणार- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नासिक. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
पंधराव्या वित्त आयोगाच्या पहिल्या हप्त्यापोटी ग्रामपंचायतींना रुपये ६५ कोटी वितरीत –  बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिक         नाशिक (नरेंद्र पाटील)::- जिल्हा परिषदेस पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत निधी प्राप्त झाालेला आाहे. प्राप्त निधीतुन ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना तर जिल्हा परिषद १० टक्के व पंचायत समित्यांना १० टक्के निधी वितरीत करण्याबाबत शासनाच्या सुचना आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून पहिल्या हप्त्यापोटी रुपये ८२ कोटी ४ लाख ३७ हजार रुपये प्राप्त झालेले आहेत. नाशिक जिल्हयातील १३८५ ग्रामपंचायतींना शासन निर्देशानुसार रुपये ६५ कोटी ६३ लाख ४९ हजार रुपये पहिला हप्ता वितरीत करण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत स्तरावरील निधीच्या वितरणाचे नियोजन, संनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची असणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर विकास कामांचा निधी उपलब्ध नसल्यामुळे कृती आराखड्यातील मंजुर असलेली विकास कामे सुरु करण्यास विलंब होत होता. नाशिक जिल्ह्यात माहे मार्च २०२० पासुन आजतागायत कोविड - १९ च्या प्रादुर्भाव ल

तब्बल १२० अनुकंपा धारकांना समक्ष बोलावून समुपदेननाने नियुक्ती ! कौतुकास्पद- कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जिप अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केलेले प्रयत्न व प्रशासनाने घेतलेले परिश्रम ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिक – जिल्हा परिषदेच्या वतीने अनुकंपा अंतर्गत १२० अनुकंपाधारकांना समक्ष बोलावून समुपदेशन पद्धतीने नियुक्ती आदेश देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या परिचर, आरोग्य सहाय्यक, स्थापत्य अभियंता, शिक्षण सेवक, मुख्य सेविका, पशुधन पर्यवेक्षक या रिक्त पदांवर सर्व उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन महिन्यात पारदर्शक पध्दतीने मोठया प्रमाणात  कर्मचा-यांचे प्रश्न मार्गी लावण्यात आल्याने कर्मचा-यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.            अनुकंपा अंतर्गत १२० उमेदवारांना समुपदेशनाने नियुक्ती देण्यात आली आहे. यामध्ये परिचर पदावर ४६, ग्रामसेवक पदावर १९, शिक्षण सेवक पदावर १२, पर्यवेक्षिका पदावर १, आरोग्य सेवक पदावर २८, आरोग्य सेविका १, प्रयोग शाळा तंत्रज्ञ १, पशुधन पर्यवेक्षक २, स्थापत्य अभियंता सहाय्यक ५, कनिष्ठ अभियंता २ व विस्तार अधिकारी कृषी १ अशा ११८ जणांना नियुक्ती आदेश देण्यात आले असून २ पदांवर नियुक्ती आदेश देणे बाकी असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यां

"लोकराजा" संपादक नरेंद्र पाटील यांचा सत्कार संपन्न ! दिवाणखान्यात स्थान मिळविलेला दिवाळी विशेषांक - ना. बाळासाहेब क्षीरसागर. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नामदारांनी केला न्यूज मसाला संपादकाचा सत्कार ! न्यूज मसाला चा प्रसिद्ध दिवाळी विशेषांक "लोकराजा" यांस आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना २०१९ चा उत्कृष्ट विशेषांक पुरस्कार जाहीर झाला यानिमित्ताने नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षीरसागर यांनी संपादक नरेंद्र पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अशोक मस्के व इतर मान्यवर उपस्थित होते.        सत्कारप्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षीरसागर यांनी सांगितले की "लोकराजा" दिवाळी विशेषांक हा सामाजिक भान ठेवत आपली वाटचाल करीत आहे. आजपर्यंतच्या प्रकाशित झालेल्या "लोकराजा" दिवाळी अंकातील साहित्य खऱ्या अर्थाने आबालवृद्धांना सामावून घेणारे व भारत सरकारच्या लोकसभा तथा राज्यसभा सदनात नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना "लोकराजा" दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर स्थान देण्याची परंपरा कायम राखत असल्याने प्रत्येक वाचकाच्या घरातील दिवाणखान्यात स्थान मिळवणारा विशेषांक ठरला आहे. भविष्यात "लोकराजा" दिवाळी अंकाची ही परंपरा कायम राखावी व समाजाल

आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना (IDAA) स्पर्धा २०१९ चा, न्यूज मसालाच्या "लोकराजा" दिवाळी विशेषांकास पुरस्कार !न्यूज मसालाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ! अंक दि. २७ आॅगस्ट २०२० न्यूज मसाला सर्विसेस 7387333801 सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
"लोकराजा" दिवाळी विशेषांकास आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना (IDAA) २०१९ चा पुरस्कार ! नासिक:- न्यूज मसालाच्या लोकराजा दिवाळी विशेषांकास आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेच्या (IDAA) चा सन  २०१९ स्पर्धेत चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून कोव्हिड-१९ मुळे पुरस्कार वितरण लांबणीवर पडले आहे,  न्यूज मसाला परीवाराचे वाॾमयीन क्षेत्रातून तसेच हितचिंतक, जाहीरातदार यांचेकडून अभिनंदन करण्यात येत आहे.       लोकराजा दिवाळी विशेषांकाच्या मुखपृष्ठावर आजी-माजी संसंद सदस्यांचे छायाचित्र प्रकाशित करण्याचा उपक्रम राबविणारा एकमेव विशेषांक आहे. अंकाच्या सुरूवातीला संसद सदस्यांची थोडक्यात त्यांनी केलेल्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला  जातो, इतर मजकूर हा निखळ आनंद देणारा, आबालवृद्धांना सामावून घेत समाविष्ट केला जातो त्यामुळे घराघरात "सेंट्रल टेबलावर" स्थान प्राप्त करतो, मराठी भाषेतील नामवंत लेखक कवी यांच्या निवडक उत्तम लिखाणाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते.         सन २०१२ मा. खा.  डॉ. दौलतराव आहेर यांचे मुखपृष्ठ छायाचित्र प्रकाशित करून सुरू

गणेशाची विविध रुपे आणि प्रतिमा ! वारली चित्रशैलीचे विद्रुपीकरण नको-प्रसिद्ध वारली चित्रकार संजय देवधर. न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. वारली चित्रकलेचा लेख सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
गणेशाची विविध रुपे आणि प्रतिमा !     गणपती म्हणजे बुद्धीची देवता. गणेशाचे रूप अत्यंत सृजनात्मक आहे. कलाकारांना अनेक रुपात गणराया दिसतो. साध्यासोप्या आकारातून गणेशप्रतिमा आकाराला येते. गजवदन, लंबोदर, एकदंत, शूर्पकर्ण अशा त्याच्या विविध नावातूनच त्याच्या रूपाचे वर्णन दिसते. मूर्तिकार व चित्रकारांनी वेगवेगळ्या आकारात गणेशप्रतिमा साकारल्याचे आढळते.आदिवासी वारली कलाकार भौमितिक मुलाकार वापरुन त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैलीत गणेशाची प्रतिमा साकारतात.               आदिवासी वारली जमातीत मूळातच मूर्तिपूजा नव्हती. नंतरच्या काळात  आदिशक्तीची, पंचतत्वांंची प्रतिकात्मक पूजा केली जाऊ लागली. वारली जमात कलेतच देवत्व शोधते आणि निसर्गालाच परमेश्वर मानते. त्यांचे देवदेवता दगडावर किंवा मोठ्या लाकडी फळीवर कोरलेले असतात. बऱ्याच ठिकाणी घरातील देव तांदळाच्या टोपलीतही ठेवले जातात. अलीकडे शहरी संस्कृतीशी येणाऱ्या संपर्कातून काही वारली पाड्यांवर गणेशोत्सव साजरा केला जातो. त्रिकोण,चौकोन, वर्तुळ या भौमितिक मुलाकारांचा वापर करुन गणपतीची प्रतिमा साकारण्यात येते. मूळात वारली चित्रकलेचा जन्मच परमेश्वराच

दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई होणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवेदन ! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
पावसाने नाशिक महानगरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थे बाबत दोषी अधिकारी व संबंधीत कंत्राटदारांवर कारवाई व्हावी -  मनसेचा आयुक्तांना इशारा. नाशिक : महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांच्या पावसाने झालेल्या दुरावस्थेस दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई होणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.       गत तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाच्या संततधारेने नाशिक महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून रस्त्यांच्या कामाच्या दर्ज्याबाबत समाजातील विविध स्तरांवरून अनेक तक्रारी येत आहेत. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते व तत्सम कामांसाठी असलेल्या व महानगरपालिकांसाठी बंधनकारक असलेल्या नियमावली प्रमाणे रस्ते बनविणाऱ्या कंत्राटदारांनी ठराविक मुदती करीता (DLP) संबंधीत रस्त्यांची देखरेख ठेवणे बंधनकारक आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या व ठेकेदारांच्या संगनमतामुळे दरवर्षी पावसाळा संपल्यावर रस्ते दुरुस्तीच्या कामांची नव्याने निविदा काढून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या क

जनसुविधा योजने अंतर्गत निधी वेळेत खर्च करा - बाळासाहेब क्षिरसागर ! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
जनसुविधा योजने अंतर्गत निधी वेळेत खर्च करा - बाळासाहेब क्षिरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिक             नाशिक - नाशिक जिल्हा परिषदेने सन २०१९-२० या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात जनसुविधा योजने अंतर्गत कामे प्रस्तावित करुन जिल्हा नियोजन मंडळास सादर केलेली होती. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावरील कामांची निकड, लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रमाणात जनसुविधेची कामे मंजुर करण्यात आली होती. सदर योजनेत मंजूर कामांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे, स्मशानभूमी बांधकाम करणे, दफनभूमी बांधकाम करणे, दशक्रिया विधी शेड बांधकाम करणे व तत्सम अनुषंगिक कामे आदी कामांचा समावेश असून यासाठी रुपये (२६,५७,७६,०००/-) सव्वीस कोटी सत्तावन्न लक्ष शहात्तर हजार रकमेची २५७ जनसुविधेची कामे मंजुर करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यात माहे मार्च २०२० पासुन आजतागायत कोविड - १९ च्या प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागात विकास कामांवर मोठा परिणाम झालेला होता. ग्रामपंचायत स्तरावर विकास कामांचा निधी उपलब्ध नसल्यामुळे मंजुर असलेली विकास क