पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काॅग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली !

इमेज
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आवाहनानुसार नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेसच्या अंतर्गत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निवडणुकी बाबत चर्चा व सविस्तर माहिती देऊन मतदार याद्याचं सादरीकरण करून ब्लॉक अध्यक्षांकडे देण्यात आल्या. त्यावेळी शरद आहेर यांनी निवडणूक कशा प्रकारे होणार याबाबत सविस्तर विवेचन केले, निवडणुकीत उभं राहण्यासाठी सभासद हा सक्रिय सभासद असला पाहिजे असे सांगितले.  शिर्डी येथे १ व २ जून ला शिबीर संपन्न होणार आहे त्यात निवडक पदाधिकारी जाणार आहेत,  तसेच ११ जून ते १४ जून या कालावधीत शहर स्तरावरील एक दिवसीय शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.                       याप्रसंगी माजीमंत्री डॉ.शोभाताई बच्छाव , गटनेते शाहू खैरे, नगरसेविका वत्सलाताई खैरे, माजी नगरसेवक राजेंद्र बागुल,  केशव अण्णा पाटील, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विजय राऊत, अनुजाती विभागाचे प्रदेश सचिव सुरेश मारू, अल्पसं

विशेष लेख शासकीय सेवा बजावतांना सेवाभावी वृत्ती महत्वाची मानणारे साहेबराव जगताप !

इमेज
विशेष लेख शासकीय सेवा बजावतांना सेवाभावी वृत्ती महत्वाची मानणारे साहेबराव जगताप ! जुन्या आठवणींना उजाळा देत एक पाऊल सेवानिवृत्तीच्या दिशेने...      नाशिक : नेहमी सर्वांशी मनमिळावू, जीवाभावाचे नाते जोडणारे सर्व पत्रकारांचे परिचित व्यक्तीमत्व म्हणजे श्री.साहेबराव जगताप. आज त्यांच्याविषयी विशेष लिखाण करण्याचे कारण म्हणजे आज दिनांक ३१ मे २०२२ रोजी जगताप २७ वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेतून सेवानिृत्त होत आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचानलाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा माहिती कार्यालय धुळे यांच्या अधिनस्त प्रकर्षित प्रसिद्धी पथक कार्यालय, नवापूर, जि.धुळे येथून शासकीय सेवेची सुरुवात करत आज त्यांचा अतिशय गोड पद्धतीने नाशिकच्या जिल्हा माहिती कार्यालय, येथून सिनेयंत्रचालक पदावरुन सेवानिवृत्त होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. साहेबरांवाच्या बाबत थोडक्यात सांगायचे तर, एवढंच आहे की एका छोट्याशा दुर्गम आदिवासी भागातून कळवण तालुक्यातील पाटविहीर या गावात त्यांचा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थितीत जरी नाजूक असली तरी ईश्वरीय कृपने लहानपण खेळीमेळीने व आनंदात गेले. शिक्षण बी.ए (बी.जे ) पुर्ण केल्यानं

भावाच्या अपघाती निधनाची घटना 'काळजावर दगड ठेवत' पार पाडला प्रमोशन चा कार्यक्रम !

इमेज
भावाच्या अपघाती निधनाची घटना काळजावर दगड ठेवत पार पाडला प्रमोशन चा कार्यक्रम !          नाशिक, ता. २८ : चित्रपट कलाकार व 'लागिर झालं जी' या गाजलेल्या मालिकेचा नायक नितेश चव्हाण यांच्या मावस भावाचे अपघाती निधन झाल्याची दुःखद बातमी समजल्यानंतर त्यांनी व त्यांच्या चमूने नियोजित चित्रपट प्रमोशनचा कार्यक्रम 'काळजावर दगड ठेवून' शनिवारी नाशिक शहरात पार पाडला व सायंकाळी चव्हाण अंत्यसंस्कारासाठी घटनास्थळी रवाना झाले. 'मजनू' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते नासिकला आले होते. ______________,         "धुमस" या चित्रपटाच्या यशानंतर शिवाजी दोलताडे "मजनू" हा चित्रपट घेवून येत आहेत. प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले असून प्रमोशनावेळी ते म्हणाले, की प्रत्येकजन कॉलेजला गेल्या नंतर स्वतःला 'मजनू' समजतो, जे लोक हा चित्रपट पाहतील त्यांना त्यांच्या कॉलजेच्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाच्या काळात सर्व काळजी घेवून चित्रित झालेला हा चित्रपट आहे. "मजनू" चित्रपटात रसिकांना फाई

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकरांकडून मुलगा सोहमला वाढदिवसाच्या पोस्टर शुभेच्छा !! "तू आणि मी, मी आणि तू "

इमेज
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकरांकडून मुलगा सोहमला वाढदिवसाच्या पोस्टर शुभेच्छा !!  "तू आणि मी, मी आणि तू " अभिनेत्री शिल्पा ठाकरे आणि अभिनेता सोहम चाकणकर यांची फ्रेश जोडी झळकणार 'तू आणि मी, मी आणि तू' चित्रपटात ! अभिनेत्री शिल्पा ठाकरे आणि अभिनेता सोहम चाकणकर मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र ! 'जैन फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'तू आणि मी, मी आणि तू' चित्रपटाच्या पोस्टरचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते अनावरण सोहळा संपन्न !                बऱ्याच कवी-साहित्यिकांनी आपापल्या भाषांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे प्रेम नेमकं असतं तरी कसं हे विचारलं तर ते कोणालाही ठामपणे सांगता येणं शक्य नाही. कारण प्रेम ही भावना आहे, ज्याचा प्रत्येकव्यक्तीला एक वेगळा अनुभव असतो. त्यामुळे हे सोप्प वाटणार प्रेम अजिबात नाही त्यात येणारी वादळे कधी दिशा भरकटवतील हे सांगणाऱ्या 'जैन फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'तू आणि मी, मी आणि तू' या मराठी चित्रपटाचे पोस्टर

राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे आज दुपारच्या सत्रात झाली निदर्शने !

इमेज
राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे आज दुपारच्या सत्रात झाली निदर्शने ! राज्य सरकारी, जिल्हा परीषद कर्मचाऱ्याचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने...     नासिक::- जुनी पेन्शन लागू करा, रिक्त पदे त्वरीत भरा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा, आदि मागण्यांकरिता आज दि २७ मे रोजी दुपारचे सत्रात कर्मचाऱ्यांचा अखिल भारतीय मागणी दिनाचे आजोजन निदर्शनाव्दारे करण्यात आले.               अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे १७ वे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच बेगूसराय, बिहार येथे पार पडले. यात २७ राज्यातील प्रतिनिधींनी सहभाग घेवुन, केंद्र व राज्य सरकारचे कामगार कर्मचारी विरोधी धोरणा बाबत तिव्र आक्रोश व्यक्त केला आहे.         केंद्र सरकारची कार्पोरेट धार्जिणी अर्थनीती, कामगार कर्मचाऱ्यांच्या हक्कांना बाधा आणून धनदांडग्यांना लाभ होईल अशा  सुधारणा कामगार कायद्यात करणे, महागाईने भरमसाठ उच्चांक गाठवुन त्यात गरीब जनता होरपळून जात आहे., अव्यवहार्य अंशदायी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांच्या माथी मारणे, सरकारी क्षेत्रातील कार्यालयात लाखो पदे रिक्त ठेवुन  बेरोजगारांचा भ्रमनिरास करणे, खाजगीकरणाचा अतिरेकी वापर करून सरकारी

जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र १० जूनला ! "फनरल"

इमेज
जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा ‘फनरल’ १० जूनला चित्रपटगृहात    नाशिक ( प्रतिनिधी ) -असं म्हणतात... आयुष्यात दोनच दिवस महत्वाचे असतात आपण जन्मतो तो दिवस आणि ज्या दिवशी आपल्या जगण्याचा अर्थ कळतो तो दिवस ! जगण्याचा आनंद घेतला पाहिजे, आपल्या जवळच्या लोकांसोबत तो वाटूनही घेतला पाहिजे. अगदी छोट्या, साध्या, नैसर्गिक गोष्टींमधे, अनुभवांमध्ये ही आनंदाच्या अनेक छटा लपलेल्या असतात. त्यांचा शोध घेणं, त्यातली गंमत अनुभवणं यातच आपल्या जगण्याचा सारा अर्थ सामावलेला असतो. 'जगू आनंदे, निघू आनंदे' या टॅगलाईनसह जगण्यासोबतच मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा ‘बीफोर आफ्टर एंटरटेंन्मेंट’ प्रस्तुत 'फनरल' हा मराठी सिनेमा १० जूनला चित्रपटगृहांत येत आहे.पत्रकार परिषदेत अभिनेता आरोह वेलणकर यांनी माहिती दिली.       या चित्रपटाने पीफ, इफ्फी, राजस्थान,कोकण यांसारख्या देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीनं एक छान सामाजिक कथा 'फनरल' चित्रपट रू

भास्कर कृष्णा कोठावदे काळाच्या पडद्याआड ! सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात शोककळा !!

इमेज
नाशिक : नाशिक मर्चंट बँकेचे माजी संचालक, लाडशाखीय वाणी समाजाचे माजी अध्यक्ष भास्कर कृष्णा कोठावदे (वय ७४) यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. कोठवदे यांनी नाशिकच्या सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्राचे  भरून न निघणारे नुकसान झाले असून लाडशाखीय वाणी समाजाचे एक जेष्ठ छत्र हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहिणी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.         नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक, नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक तथा सुवर्णा नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन अशा विविध पदांवर ते कार्यरत होते. मंगळवारी (दि.२४ मे) रात्री १० वाजता अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. **********************     नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व संस्थेच्या सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर शाळेचे शालेय समिती अध्यक

महाराणा प्रतापसिंह यांची ४८२ वी जयंती समितीच्या अध्यक्षपदी रत्नदीप सिसोदियांची निवड !

इमेज
महाराणा प्रतापसिंह यांची ४८२ वी जयंती समितीच्या अध्यक्षपदी रत्नदीप सिसोदियांची निवड !    नासिक::- सालाबादा प्रमाणे राष्ट्रपुरुष महाराणा प्रतापसिंह यांची ४८२ वी जयंती जेष्ठ शु. ३ गुरुवार दि.०२ जून २०२२ रोजी साजरी करण्यात येणार आहे. नाशिक शहरातील विविध सामाजिक संस्था व महाराणा प्रेमींची सामुहिक नियोजन बैठक महाराष्ट्र चेंबरच्या कार्यालयात पार पडली. सदर बैठकीत सर्वानुमते रत्नदीप सिसोदिया यांची जयंती अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्य पदी जर्नादन पाटिल तसेच अँड. मोहनसिंह कनोजे सिसोदिया, सचिव, खजिनदार विकाससिंह गिरासे, प्रसिध्द प्रमुख करणसिंह बावरी, पुतळा समिती प्रमुख नाना जाधव, मिरवणुक प्रमुख विरेंद्र टिळे, सदस्य गनसिंह शिरसाठ, सोमनाथ भोंड, सचिन राजपूत अधिक पदाधिकाराची निवड सर्वानुमते झाली. यावर्षीच्या जयंतीचे मुख्य आकर्षन चितोडगड-मेवाड येथील रावत युग प्रदिपसिंहजी हमीरगड चे वतनदार तथा रावत परिवाराचे वशंज व विश्वदिपसिंह जयसिंह राऊळ, रंजाने संस्थान हे देखील जयंतीच्या सर्व उपक्रमांना सहभागी राहणार आहेत.               सुर्यतेज महाराणा प्रतापाच्या पुतळ्याचे पुजन सकाळी राणा प्रताप चौकात होईल. पा

न्यूज मसालाच्या अकराव्या "लोकराजा" दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन !

इमेज
न्यूज मसालाच्या अकराव्या "लोकराजा" दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! नासिक::- "लोकराजा" दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन साप्ताहिक न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना स्पर्धेत निवड व गौरव पुरस्कार तसेच काव्यमंच पुरस्कारासह अनेक मान्यवरांनी गौरविलेल्या, मुखपृष्ठावर आजी-माजी संसद सदस्याचे छायाचित्र प्रकाशित करण्यात येणारा "एकमेव" दिवाळी अंक "लोकराजा" !  "लोकराजा" दिवाळी अंक यंदा ११ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मराठी साहित्यिक विचारांचा गौरव व नव साहित्यिकांच्या लेखनाला यथोचित सन्मानाने स्थान देण्याचा मानस या वैशिष्ट्यांसह "लोकराजा" अंकाने सर्वदुर सहस्रावधी वाचकांची आवड जोपासली आहे. लेखक, कवी, विचारवंतानी आपण स्वत: लिहिलेली साहित्य कृती (कथा, कविता, ललित लेख यापैकी फक्त एकच साहित्य रचना ) खालील पत्यावर पोष्टाने किंवा ई-मेल १० आॅगस्ट २०२२ पर्यंत पाठवावे. कथा, कविता, लेख यांना विषयाचे बंधन नाही मात्र अश्लिलता विरहीत असावे. आपली भारतीय संस्कृति, चाली रित

सुभाषित दिवाळी अंकाला प्रकाशक संघाचा प्रथम पुरस्कार जाहीर !

इमेज
सुभाषित दिवाळी अंकाला प्रकाशक संघाचा प्रथम पुरस्कार जाहीर !        नाशिक-२३(वार्ताहर) अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने आयोजित केलेल्या उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये नाशिकच्या सुभाषित या विनोदी दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रकाशक संघाचे कार्यकारीणीने नुकतेच हे पुरस्कार जाहीर केले. स्पर्धेतील उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पुरस्कार विविध विषयांवरील दिवाळी अंकास जाहीर करण्यात आले आहेत. नाशिक येथुन प्रकाशित होणाऱ्या सुभाष सबनीस संपादक असलेल्या सुभाषित दिवाळी अंकाला यावर्षी मिळालेला दुसरा पुरस्कार असुन गेल्या अकरा वर्षात एकुण तेरा पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत सुध्दा सुभाषितने दिवाळी अंक प्रकाशनात खंड पडु दिला नाही हे विशेष. सुभाष सबनीस यांचे मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्था, नाशिक कवी, मराठी कथालेखक संघ, या संस्थां तसेच सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात आले.

२७ मे रोजी शिवशंभूप्रेमींच्या भेटीला "सरसेनापती हंबीरराव मोहिते". "परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट"… "युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे" ... "मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरा आहेत" !

इमेज
महाराष्ट्राचा महासिनेमा ‘सरसेनापती हंबीरराव’ २७ मे  रोजी येणार शिवशंभूप्रेमींच्या भेटीला !     नाशिक ( प्रतिनिधी ) सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या महाराष्ट्राच्या महासिनेमाची घोषणेपासूनच जगभरातील शिवशंभूप्रेमींच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली होती. अंगावर रोमांच उभे करणाऱ्या "हंबीर तू..." या गाण्याने ती अजून वाढली.  "सरसेनापती हंबीरराव" च्या  ट्रेलरमुळे ही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. २७ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे अशी माहिती प्रवीण तरडे यांनी पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली.      "परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट"… "युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे" ... "मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरा आहेत" असे जबरदस्त संवाद आणि धमाकेदार ऍक्शन सिक्वेन्स असलेल्या या चित्रपटातून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्यासाठी गाजवलेले अतुलनीय शौर्य पाहायला मिळणार आ

बालविवाह रोखणे यंत्रणेतील प्रत्येकाची जबाबदारी - लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जि.प.

इमेज
महिला बालकल्याण विभाग व यूनिसेफची एकत्रित बैठक !  बालविवाह रोखणे यंत्रणेतील प्रत्येकाची जबाबदारी - लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जि.प. नाशिक         नाशिक - जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आज महिला व बालकल्याण विभाग आणि यूनिसेफ (UNICEF) या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, महिला व बालकल्याण विभागाच्या एक मूठ पोषण कार्यक्रम, नवजात बालकांची संख्या व कमी वजनाची बालके, सर्वसाधारण वजनाची बालके त्याचबरोबर बाल आधार नोंदणी यासंदर्भात आढावा घेत प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली, ग्रामीण भागात बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणेतील सर्व घटकांनी एकत्र येत काम करावे, अंगणवाडी सेविकांनी किशोरवयीन मुलींचे मेळावे घ्यावे व महिला बचत गटांच्या मासिक सभा, ग्रामसभा यामध्ये बालविवाह रोखण्यासाठी प्रबोधन करत लोकसहभागातून बालविवाह थांबवण्यासह बालविवाह करण्याच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी काम करावे असे निर्देश या बैठकीत दिले, उपस्थित बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी यावेळी कश

जायंटस् वेल्फेअर फाऊंडेशनचे कार्य समाजोपयोगी - आ. सीमाताई हिरे

इमेज
जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे कार्य समाजोपयोगी - आ. सीमा हिरे        नाशिक ( प्रतिनिधी ) जायंट्स ही सेवाभावी संघटना समाजोपयोगी सेवाकार्ये सातत्याने करते. आदर्श नेतृत्वाखाली अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवता येतात. नाशिकचे अनुपकुमार जोशी यांनी गेल्या १५ वर्षात विविध महत्वाची पदे भूषवली आहेत. आता ते अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेत आहेत. आपल्या कार्यकाळात सहकाऱ्यांसह ते उत्तम कार्याचा ठसा नक्कीच उमटवतील असा विश्वास आ. सीमा हिरे यांनी व्यक्त केला. जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशन २ अ च्या शपथविधी व पदग्रहण समारंभात त्या बोलत होत्या.            आ.सीमा हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील चिंतामणी मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जायंट्स फेडरेशन २ अ चे नूतन अध्यक्ष अनुपकुमार जोशी व कौन्सिल सदस्य यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहात झाला. याप्रसंगी १० नेत्रहीन बांधवांना पांढऱ्या काठीचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. आ.सीमा हिरे यांनी आपल्या भाषणात जायंट्स करीत असलेले उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले, पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सन २०२१ मध्ये ज्या ग्रुपने व सदस्यांनी उत्कृष्ट कार्य केले त्

जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे कार्य समाजोपयोगी - आ. सीमा हिरे

इमेज
जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे कार्य समाजोपयोगी - आ. सीमा हिरे        नाशिक ( प्रतिनिधी ) जायंट्स ही सेवाभावी संघटना समाजोपयोगी सेवाकार्ये सातत्याने करते. आदर्श नेतृत्वाखाली अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवता येतात. नाशिकचे अनुपकुमार जोशी यांनी गेल्या १५ वर्षात विविध महत्वाची पदे भूषवली आहेत. आता ते अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेत आहेत. आपल्या कार्यकाळात सहकाऱ्यांसह ते उत्तम कार्याचा ठसा नक्कीच उमटवतील असा विश्वास आ. सीमा हिरे यांनी व्यक्त केला. जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशन २ अ च्या शपथविधी व पदग्रहण समारंभात त्या बोलत होत्या.            आ.सीमा हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील चिंतामणी मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जायंट्स फेडरेशन २ अ चे नूतन अध्यक्ष अनुपकुमार जोशी व कौन्सिल सदस्य यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहात झाला. याप्रसंगी १० नेत्रहीन बांधवांना पांढऱ्या काठीचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. आ.सीमा हिरे यांनी आपल्या भाषणात जायंट्स करीत असलेले उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले, पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सन २०२१ मध्ये ज्या ग्रुपने व सदस्यांनी उत्कृष्ट कार्य केले त्

भगवान बुद्धांचे पर्यावरणवादी विचार ! १६ में बुद्ध जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

इमेज
भगवान बुद्धांचे पर्यावरणवादी विचार !        १६ मे ला बुद्ध जयंती साजरी होत आहे. सद्यपरिस्थितीमध्ये मानव आणि निसर्ग सुखरूप कसे राहतील? हाच सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. गौतम बुद्धांच्या मते, मानवाने निसर्गातील झाडे-झुडपे तसेच तमाम जीवजंतु बरोबरच नदी-तलावांतील पाणी स्वच्छ ठेऊन या सर्वांचे रक्षण केले तरच मानव स्वतःही सुरक्षित आणि स्वस्थ राहील. ‘भवतु सब्ब मंगलम्’ या त्यांच्या वचनाप्रमाणे माणूसच नव्हे  तर सर्व प्राणिमात्र, जीवसृष्टीचेच कल्याण व्हावे यासाठी त्यांची धडपड चालली होती. आपल्या शिष्यांच्या मदतीने त्यांनी आपल्या लोककल्याणकारी संदेशांचा आणि वचनांचा प्रसार आणि प्रचार केला. त्यांचे संदेश आणि वचने ‘उदान’ नावाने ओळखली जातात. माणसाने जागृत म्हणजेच डोळस किंवा प्रज्ञावान व्हावे, बुद्धिवंत म्हणजेच  बुद्ध व्हावे, परावलंबी न राहता  स्वावलंबी बनावे, प्रकाश पुंज  म्हणजेच दीपक व्हावे, ‘अत: दीप भव:’ असे ते सांगतात. कारण मनुष्य जन्म दुर्लभ असून तो पुनः मिळण्याची शाश्वती नसल्याने माणसाने तात्काळ जागे व्हावे असे म्हणतात.         गौतम बुद्ध सांगतात की प्रदूषण हे दोन स्तरावर समझून घेऊन ते रोखले पाहिजे.

अधिवेशनात मांडला ठराव-विद्युत कर्मचाऱ्यांसाठी ‘एक राष्ट्र, एक नियम’ असावा !

इमेज
विद्युत कर्मचाऱ्यांसाठी ‘एक राष्ट्र, एक नियम’ असावा ! समारोप : अखिल भारतीय विद्युत मजदूर संघाच्या अधिवेशनात ठराव ! नाशिक(प्रतिनिधी):-ऊर्जा क्षेत्र कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचा दुवा आहे. भारतात देखील ऊर्जा क्षेत्र गेल्या कित्येक दशकापासून आर्थिक विकासात मोठा हातभार लावत आहे. त्यामुळे भारत सरकारने २०२२ पर्यंत ऊर्जा क्षेत्रात २२७ गीगावॅट क्षमता प्राप्त करण्यासाठी रोड मॅप तयार करायला हवा. सध्या भारतात कोळशावर आधारित २०२.४१ गीगावॅट वीज अपेक्षित आहे. त्यासाठी सरकारने वीज कर्मचाऱ्यांसाठी ‘एक राष्ट्र, एक ग्रीड, एक नियम’ याबाबतचे धोरण आखावे असा प्रस्ताव अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाच्या दोन दिवशीय अधिवेशनात मांडण्यात आला. पुणे विद्यार्थी वसतीगृह संचलित देवधर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी कार्यकारिणीकडून पाच प्रस्ताव मांडण्यात आले. त्यामध्ये ‘विद्युत उत्पादन, पारेषण आणि वितरण उद्योगावर औद्योगिक त्रिपक्षीय समितीचे पूर्णगठण करणे, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात एक संयुक्त उद्यमच्या माध्यमातून राज्य विद्युत निगम तथा कंपन्यांना

आशापुरी मातेचा आंनदोस्तव सोहळा व माहेरवाशिणीचे स्नेहमिलन उत्साहत संपन्न !!

इमेज
खामखेडा येथे आशापुरी मातेचा आंनदोस्तव सोहळा व माहेरवाशिणीचे स्नेहमिलन उत्साहत संपन्न !!         देवळा, महेश शिरोरे (प्रतिनिधी )--  देवळा तालुक्यातील खामखेडा येथे अक्षय तृतीयेच्या  साडेतीन मुहूर्तावर (८ मे रोजी) खामखेडा नगरीत आई आशापुरी आंनदोस्तव सोहळा, माहेरवाशिणी स्नेहमिलन आणि शिरोरे परिवाराचे स्नेहसंमेलन हा त्रिवेणी, त्रिसूत्री कार्यक्रम  दिमाखदार सोहळ्यात आनंददायी वातावरणात संपन्न झाला.      ब्रम्ह वृंदाच्या साक्षीने सकाळी पहाटे पाच वाजेपासून ते साडे अकरा वाजेपर्यंत होम हवन विधी करण्यात आला तर परिवारातील आलेल्या सर्व माहेरवाशिणी व जावाई, भाचे, शिरोरे परिवारातील सर्व सदस्य, खामखेडा वासीय यांच्या उपस्थितीत आई आशापुरी मातेची रथातून मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गावात रांगोळी काढून गांव सुशोभित करण्यात आले होते. सर्व माहेरवाशिणी व उपस्थितांनी देवीच्या गाण्यांच्या तालावर तल्लीन होऊन नाचण्याचा आनंद लुटला. मिरवणुकीत जांभळ्या रंगाची साडी व फेटा परिधान केलेल्या माहेरवाशिणी सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या, पुरुषांना सफेद ड्रेस कोड , तर भाचींना लाल साडी, सासरवाशिनींना केशरी रंगाची साडी असल्याने

धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंधेला त्यांच्यावरील चरित्रपट ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ सिनेमाची झाली घोषणा !

इमेज
धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंती दिनीच्या पूर्वसंधेला त्यांच्यावरील चरित्रपट ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ सिनेमाचा झाली घोषणा !             मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, संभाजी महाराज ह्यांच्या जयंती दिनी त्यांच्यावरील 'छावा-दि ग्रेट वॉरियर' ह्या चित्रपटाचा मुहूर्त झाला. डॉ. जयसिंगराव पवार लिखीत ‘छत्रपती संभाजी महाराज’ ग्रंथावर आधारित ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ चित्रपट असणार आहे. मल्हार पिक्चर्स प्रस्तुत, वैभव भोर आणि सनी रजानी निर्मित आणि राहुल जनार्दन जाधव दिग्दर्शित ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ संभाजी महाराजांच्या साहस आणि शौर्याची गाथा असेल.           ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ सिनेमाचे दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणतात, ” शंभूराजे खरे 'युथ आयकॉन' आहेत. वयाच्या नवव्या वर्षांपासून राजकारणाचे धडे घेत असलेल्या स्वराज्याच्या पहिल्या युवराजांची फक्त युद्धकौशल्यावरच नाही तर चौदा भाषांवर आणि साहित्यावरदेखील मजबूत पकड होती. कल्पनेतल्या सुपरहिरोंपेक्षा वास्तवातील सुपरहिरोवर सिनेमा बनवण्याची इच्छा होती. जी छावा-दि ग्रेट वॉरियर मधून पूर्ण होतेय.”          थोर इतिहासकार आणि काद

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी व व्हीजे-एनटी यांचे आरक्षण ! समर्पित घटित आयोग राज्याच्या दौऱ्यावर ! नासिकला २२ में रोजी,,,,

इमेज
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी व व्हीजे-एनटी यांचे आरक्षण ! समर्पित घटित आयोग २२ मे रोजी नाशिक विभागीय दौऱ्यावर ! नागरिकांना व सामाजिक संघटनांना मते व निवेदने सादर करण्यासाठी अगोदरच करावी लागणार नाव नोंदणी !       नाशिक, दि.१३ मे, (जिमाका वृत्तसेवा): राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील ओबीसी, व्हिजे-एनटी यांना आरक्षणासाठी घटित केलेल्या समर्पित आयोगाचा राज्यभर विभागस्तरावर भेटींचा कार्यक्रम जाहिर झाला असून, २२ मे, २०२२ रोजी आयोग नाशिक विभागीय दौऱ्यावर असून, या दौऱ्यात नागरिकांची व या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थांची निवेदने स्विकारण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आगेादर नाव नोंदणी करावी लागणार आहे.            यासंदर्भात आयोगामार्फत जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकानुसार महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, शहरी क्षेत्रातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास म्हणजे ओबीसी, व्हिजे-एनटी  यांना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयान

आरोग्य सेवा देताना फ्लाॅरेंस नाईटिंगेल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आरोग्य सेवा द्यावी - डॉ. सुशीलकुमार वाकचौरे

इमेज
आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रामध्ये जागतिक परिचारिका दिन संपन्न !         नासिक::- १२ मे २०२२ रोजी आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे फ्लाॅरेंस नाईटिंगेल यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉक्टर सुशीलकुमार वाकचौरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले, याप्रसंगी कार्यालयातील कार्यरत कर्मचारी तसेच विभागीय जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी उपस्थित होते, यावेळी फ्लोरेंस नाईटिंगेल यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या कामाचे महत्त्व सगळ्यांना सांगण्यात आले उपस्थित आरोग्य सेविकांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला सर्व आरोग्य सेवक सेविका यांना आपली आरोग्य सेवा देताना त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आरोग्य सेवा द्यावी असे आवाहन याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर सुशील कुमार वाकचौरे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती अर्चना जोशी, श्रीमती सरिता पानसरे, अधिपरीचारिका श्रीमती अस्मिता गेडाम यांनी विशेष प्रयत्न केले.

नाशकात होणाऱ्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात विविध प्रस्ताव पारित करणार ! --आर. मुरली कृष्णन, अखिल भारतीय विद्युत मजदूर संघ

इमेज
अखिल भारतीय विद्युत मजदूर संघाचे १४ व १५ मे ला १७ वे त्रैवार्षिक अधिवेशन  दोन दिवसीय अधिवेशनात विविध प्रस्ताव पारित करणार !         नाशिक : भारतीय मजदूर संघ या देशातील एक क्रमांकाच्या केंद्रीय कामगार संघटनेला संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्युत कामगार महासंघाच्या सुवर्ण जयंती वर्षातील १७ वे त्रैवार्षिक अधिवेशन १४ व १५ मे रोजी नाशिक येथे संपन्न होत असल्याची माहीती अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे अध्यक्ष  आर.मुरली कृष्णन, महामंत्री अमर सिंह, उप महामंत्री अरूण देवांगण, प्रभारी विद्युत क्षेत्राचे अख्तर हुसेन, केंद्रीय सचिव जयेंद्र गढवी, संघटन मंत्री विलास झोडगेकर व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एल.पी.कटकवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.           कोविड प्रतिबंधासाठी शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करून पुणे विद्यार्थी वसतीगृह संचलित देवधर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रशास्त प्रांगणात होत असलेल्या अधिवेशनासाठी २० राज्यातील ५०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.           १४ मे २०२२ रोजी होणार्‍या ऐतिहासिक अधिवेशनाचे उद्घाटन अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे संस्थापक सदस्य

ब्रह्माकुमारी मुख्यालयाकडून शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न..!

इमेज
नाशिकच्या ब्रह्माकुमारी मुख्यालयाकडून पिंपळगाव बसवंत येथे शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न..!      नाशिक (तेजश्री उखाडे) :- ब्रह्माकुमारी नाशिकच्यावतीने पिंपळगाव बसवंत येथे भव्य आत्म निर्भर शेतकरी मेळावा उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न झाला.     विशेषतः यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी योगिक व सेंद्रिय शेतीचा कानमंत्र प्राप्त करून घेतला.  बांबू लागवड ही अतिशय सोपी विना खर्चिक व अनासायास होणारे उत्पादन असून या फायदेशीर शेती कडे शेतकऱ्यांनी आपले योगदान द्यावे असे पाशाभाई पटेल यांनी विषद केले. तसेच पिंपळगाव बसवंत येथे जगातील १९८ देशातील ५०० शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन चार हजार पानांचा रिपोर्ट वातावरणीय बदलाविषयी तयार केला आहे. यानुसार २०५० पर्यंत जगातील सागर किनारपट्टीवरील अनेक शहरे, बेट् व देश पाण्याखाली जाणार आहेत. भविष्या आपली पिढी अबाधित ठेवायचे असेल तर वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करणे अतिशय गरजेचे आहे. थर्मल पावर किंवा इतर अनेक मार्गांनी वातावरणात मोठ्या प्रमाणात co2 हा सोडला जातो. यापासून वाचायचे असल्यास बांबू लागवड अतिशय उपयुक्त असल्याचे मत पाशा पटेल यांनी बोलतांना प्रतिपादित केले.

आजचे नवोन्मेषी शोध ही भविष्याची जीवनशैली असेल- डॉ. भारती प्रवीण पवार

इमेज
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी अटल इनोव्हेशन मिशन- प्राइम प्लेबुक आणि स्टार्ट-अप शोकेसचे केले उद्घाटन. आजचे नवोन्मेषी शोध ही भविष्याची जीवनशैली असेल: डॉ भारती प्रवीण पवार        नवी दिल्ली::- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार  यांनी आज नवी दिल्ली डॉ आंबेडकर अंतरराष्ट्रीय केन्द्र येथे अटल इनोव्हेशन मिशन- प्राइम (PRIME संशोधकांसाठी नवोन्मेष, बाजारपेठेची उपलब्धता आणि उद्यमशीलतेसाठी कार्यक्रम) प्लेबुक आणि स्टार्ट-अप शोकेसचे उद्घाटन केले.           "केन्द्र सरकारने "चौकटीबाहेरच्या संकल्पना हेरल्या" आणि मेक-इन-इंडिया कार्यक्रम सुरू केला.  त्याने आरोग्य आणि वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रांना चालना दिली आहे. "येत्या दशकात,  वैद्यकीय उपकरणे, निदान प्रणाली, प्रथिने-आधारित जीवशास्त्र, पारंपारिक औषध इत्यादींसह आरोग्य सेवा उत्पादनांचा भारत प्रमुख निर्यातदार बनेल. जर आपल्याला संशोधन-आधारित नवकल्पना आणि संपत्ती निर्मितीचे एक शाश्वत व्यवस्था  तयार करायची  असेल, तर आपल्याला तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण करणे आवश्यक