पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पंधराव्या वित्त आयोगाच्या पहिल्या हप्त्यापोटी ग्रामपंचायतींना रुपये ६५ कोटी वितरीत – बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद. निधी तत्काळ ग्रामपंचायत स्तरावर वितरीत करून जनहिताचे कामे विहित मुदतीत करणार- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नासिक. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
पंधराव्या वित्त आयोगाच्या पहिल्या हप्त्यापोटी ग्रामपंचायतींना रुपये ६५ कोटी वितरीत –  बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिक         नाशिक (नरेंद्र पाटील)::- जिल्हा परिषदेस पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत निधी प्राप्त झाालेला आाहे. प्राप्त निधीतुन ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना तर जिल्हा परिषद १० टक्के व पंचायत समित्यांना १० टक्के निधी वितरीत करण्याबाबत शासनाच्या सुचना आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून पहिल्या हप्त्यापोटी रुपये ८२ कोटी ४ लाख ३७ हजार रुपये प्राप्त झालेले आहेत. नाशिक जिल्हयातील १३८५ ग्रामपंचायतींना शासन निर्देशानुसार रुपये ६५ कोटी ६३ लाख ४९ हजार रुपये पहिला हप्ता वितरीत करण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत स्तरावरील निधीच्या वितरणाचे नियोजन, संनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची असणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर विकास कामांचा निधी उपलब्ध नसल्यामुळे कृती आराखड्यातील मंजुर असलेली विकास कामे सुरु करण्यास विलंब होत होता. नाशिक जिल्ह्यात माहे मार्च २०२० पासुन आजतागायत कोविड - १९ च्या प्रादुर्भाव ल

तब्बल १२० अनुकंपा धारकांना समक्ष बोलावून समुपदेननाने नियुक्ती ! कौतुकास्पद- कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जिप अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केलेले प्रयत्न व प्रशासनाने घेतलेले परिश्रम ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिक – जिल्हा परिषदेच्या वतीने अनुकंपा अंतर्गत १२० अनुकंपाधारकांना समक्ष बोलावून समुपदेशन पद्धतीने नियुक्ती आदेश देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या परिचर, आरोग्य सहाय्यक, स्थापत्य अभियंता, शिक्षण सेवक, मुख्य सेविका, पशुधन पर्यवेक्षक या रिक्त पदांवर सर्व उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन महिन्यात पारदर्शक पध्दतीने मोठया प्रमाणात  कर्मचा-यांचे प्रश्न मार्गी लावण्यात आल्याने कर्मचा-यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.            अनुकंपा अंतर्गत १२० उमेदवारांना समुपदेशनाने नियुक्ती देण्यात आली आहे. यामध्ये परिचर पदावर ४६, ग्रामसेवक पदावर १९, शिक्षण सेवक पदावर १२, पर्यवेक्षिका पदावर १, आरोग्य सेवक पदावर २८, आरोग्य सेविका १, प्रयोग शाळा तंत्रज्ञ १, पशुधन पर्यवेक्षक २, स्थापत्य अभियंता सहाय्यक ५, कनिष्ठ अभियंता २ व विस्तार अधिकारी कृषी १ अशा ११८ जणांना नियुक्ती आदेश देण्यात आले असून २ पदांवर नियुक्ती आदेश देणे बाकी असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यां

"लोकराजा" संपादक नरेंद्र पाटील यांचा सत्कार संपन्न ! दिवाणखान्यात स्थान मिळविलेला दिवाळी विशेषांक - ना. बाळासाहेब क्षीरसागर. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नामदारांनी केला न्यूज मसाला संपादकाचा सत्कार ! न्यूज मसाला चा प्रसिद्ध दिवाळी विशेषांक "लोकराजा" यांस आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना २०१९ चा उत्कृष्ट विशेषांक पुरस्कार जाहीर झाला यानिमित्ताने नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षीरसागर यांनी संपादक नरेंद्र पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अशोक मस्के व इतर मान्यवर उपस्थित होते.        सत्कारप्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षीरसागर यांनी सांगितले की "लोकराजा" दिवाळी विशेषांक हा सामाजिक भान ठेवत आपली वाटचाल करीत आहे. आजपर्यंतच्या प्रकाशित झालेल्या "लोकराजा" दिवाळी अंकातील साहित्य खऱ्या अर्थाने आबालवृद्धांना सामावून घेणारे व भारत सरकारच्या लोकसभा तथा राज्यसभा सदनात नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना "लोकराजा" दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर स्थान देण्याची परंपरा कायम राखत असल्याने प्रत्येक वाचकाच्या घरातील दिवाणखान्यात स्थान मिळवणारा विशेषांक ठरला आहे. भविष्यात "लोकराजा" दिवाळी अंकाची ही परंपरा कायम राखावी व समाजाल

आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना (IDAA) स्पर्धा २०१९ चा, न्यूज मसालाच्या "लोकराजा" दिवाळी विशेषांकास पुरस्कार !न्यूज मसालाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ! अंक दि. २७ आॅगस्ट २०२० न्यूज मसाला सर्विसेस 7387333801 सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
"लोकराजा" दिवाळी विशेषांकास आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना (IDAA) २०१९ चा पुरस्कार ! नासिक:- न्यूज मसालाच्या लोकराजा दिवाळी विशेषांकास आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेच्या (IDAA) चा सन  २०१९ स्पर्धेत चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून कोव्हिड-१९ मुळे पुरस्कार वितरण लांबणीवर पडले आहे,  न्यूज मसाला परीवाराचे वाॾमयीन क्षेत्रातून तसेच हितचिंतक, जाहीरातदार यांचेकडून अभिनंदन करण्यात येत आहे.       लोकराजा दिवाळी विशेषांकाच्या मुखपृष्ठावर आजी-माजी संसंद सदस्यांचे छायाचित्र प्रकाशित करण्याचा उपक्रम राबविणारा एकमेव विशेषांक आहे. अंकाच्या सुरूवातीला संसद सदस्यांची थोडक्यात त्यांनी केलेल्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला  जातो, इतर मजकूर हा निखळ आनंद देणारा, आबालवृद्धांना सामावून घेत समाविष्ट केला जातो त्यामुळे घराघरात "सेंट्रल टेबलावर" स्थान प्राप्त करतो, मराठी भाषेतील नामवंत लेखक कवी यांच्या निवडक उत्तम लिखाणाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते.         सन २०१२ मा. खा.  डॉ. दौलतराव आहेर यांचे मुखपृष्ठ छायाचित्र प्रकाशित करून सुरू

गणेशाची विविध रुपे आणि प्रतिमा ! वारली चित्रशैलीचे विद्रुपीकरण नको-प्रसिद्ध वारली चित्रकार संजय देवधर. न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. वारली चित्रकलेचा लेख सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
गणेशाची विविध रुपे आणि प्रतिमा !     गणपती म्हणजे बुद्धीची देवता. गणेशाचे रूप अत्यंत सृजनात्मक आहे. कलाकारांना अनेक रुपात गणराया दिसतो. साध्यासोप्या आकारातून गणेशप्रतिमा आकाराला येते. गजवदन, लंबोदर, एकदंत, शूर्पकर्ण अशा त्याच्या विविध नावातूनच त्याच्या रूपाचे वर्णन दिसते. मूर्तिकार व चित्रकारांनी वेगवेगळ्या आकारात गणेशप्रतिमा साकारल्याचे आढळते.आदिवासी वारली कलाकार भौमितिक मुलाकार वापरुन त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैलीत गणेशाची प्रतिमा साकारतात.               आदिवासी वारली जमातीत मूळातच मूर्तिपूजा नव्हती. नंतरच्या काळात  आदिशक्तीची, पंचतत्वांंची प्रतिकात्मक पूजा केली जाऊ लागली. वारली जमात कलेतच देवत्व शोधते आणि निसर्गालाच परमेश्वर मानते. त्यांचे देवदेवता दगडावर किंवा मोठ्या लाकडी फळीवर कोरलेले असतात. बऱ्याच ठिकाणी घरातील देव तांदळाच्या टोपलीतही ठेवले जातात. अलीकडे शहरी संस्कृतीशी येणाऱ्या संपर्कातून काही वारली पाड्यांवर गणेशोत्सव साजरा केला जातो. त्रिकोण,चौकोन, वर्तुळ या भौमितिक मुलाकारांचा वापर करुन गणपतीची प्रतिमा साकारण्यात येते. मूळात वारली चित्रकलेचा जन्मच परमेश्वराच

दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई होणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवेदन ! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
पावसाने नाशिक महानगरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थे बाबत दोषी अधिकारी व संबंधीत कंत्राटदारांवर कारवाई व्हावी -  मनसेचा आयुक्तांना इशारा. नाशिक : महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांच्या पावसाने झालेल्या दुरावस्थेस दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई होणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.       गत तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाच्या संततधारेने नाशिक महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून रस्त्यांच्या कामाच्या दर्ज्याबाबत समाजातील विविध स्तरांवरून अनेक तक्रारी येत आहेत. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते व तत्सम कामांसाठी असलेल्या व महानगरपालिकांसाठी बंधनकारक असलेल्या नियमावली प्रमाणे रस्ते बनविणाऱ्या कंत्राटदारांनी ठराविक मुदती करीता (DLP) संबंधीत रस्त्यांची देखरेख ठेवणे बंधनकारक आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या व ठेकेदारांच्या संगनमतामुळे दरवर्षी पावसाळा संपल्यावर रस्ते दुरुस्तीच्या कामांची नव्याने निविदा काढून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या क

जनसुविधा योजने अंतर्गत निधी वेळेत खर्च करा - बाळासाहेब क्षिरसागर ! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
जनसुविधा योजने अंतर्गत निधी वेळेत खर्च करा - बाळासाहेब क्षिरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिक             नाशिक - नाशिक जिल्हा परिषदेने सन २०१९-२० या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात जनसुविधा योजने अंतर्गत कामे प्रस्तावित करुन जिल्हा नियोजन मंडळास सादर केलेली होती. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावरील कामांची निकड, लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रमाणात जनसुविधेची कामे मंजुर करण्यात आली होती. सदर योजनेत मंजूर कामांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे, स्मशानभूमी बांधकाम करणे, दफनभूमी बांधकाम करणे, दशक्रिया विधी शेड बांधकाम करणे व तत्सम अनुषंगिक कामे आदी कामांचा समावेश असून यासाठी रुपये (२६,५७,७६,०००/-) सव्वीस कोटी सत्तावन्न लक्ष शहात्तर हजार रकमेची २५७ जनसुविधेची कामे मंजुर करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यात माहे मार्च २०२० पासुन आजतागायत कोविड - १९ च्या प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागात विकास कामांवर मोठा परिणाम झालेला होता. ग्रामपंचायत स्तरावर विकास कामांचा निधी उपलब्ध नसल्यामुळे मंजुर असलेली विकास क

माजी आमदार रामनाथ दादा मोते काळाच्या पडद्याआड !! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. न्यूज मसाला परीवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली !!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस कुंभारी चे भूमिपुत्र माजी आमदार रामनाथ मोते काळाच्या पडद्याआड निफाड तालुक्यातील कुंभारी सारक्या छोठ्या गावाला आमदारकी  ती पण  कोकण पट्यात  मिळवून देणारा  आज काळाच्या पडद्याआड !           नाशिक::- जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कुंभारी  गावचे भुमीपुत्र माजी शिक्षक आमदार  रामनाथ मोते वय ६८ यांचे दु: खद निधन झाले. महाराष्ट्रातील शिक्षकांचे प्रश्न अत्यंत तळमळीने मांडणारे व सोडविणारे  शिक्षक नेते म्हणून कोकणासह  संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यांचे निधन झाल्याने मोते परिवारासह  राज्यातील शिक्षकांवर गणरायाच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्याने त्यांच्या जन्मगावी कुंभारीत स्वयंस्फुर्तीने गाव बंद करत त्यांना श्रद्धांजली वाहून व्यवहार बंद ठेवले याबाबत अधिक माहिती अशी की,      आज सकाळी ७ वा. कोकण विभागाचे माजी शिक्षक आमदार रामनाथ दादा मोते यांचे वयाच्या ६८  व्या वर्षी  दु:खद निधन झाले. त्यांच्यावर जवाहर बाग स्मशानभुमी,  दादोजी कोंडदेव स्टेडीयम समोर , ठाणे ( प. ) येथे दुपारी 12 वा. शासकीय नियमांचे पाल

उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कृषी विभाग ! रानभाजी व सेंद्रिय शेतीमाल नियमित आठवडी बाजार-स्तुत्य उपक्रम !! !! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
    नाशिक-   ग्रामीण भागातील रानभाजी व सेंद्रिय शेतीमाल नियमित आठवडी बाजारच्या माध्यमातून शहरात उपलब्ध व्हावा या उद्देशाने उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कृषी विभाग, जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहकार्याने आज नाशिक पंचायत समिती आवारात आयोजित रानभाज्या महोत्सवास उत्तम प्रतिसाद मिळाला. अवघ्या तीनच तासात २८००० रुपयांच्या शेतमालाची विक्री झाली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आणि जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आज या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कृषी विभाग,जिल्हा परिषद नाशिक यांनी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते. रानभाज्या महोत्सवास १३ महिला स्वयंसहायता समूहांनी आणि ३ शेतकरी उत्पादक गटानी सहभाग नोंदविला .पहिल्याच प्रयत्नात ग्राहकाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून तीन तासात २८००० रुपयांच्या शेतमालाची विक्री झाली.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून रानभाज्या आणि इतर सेंद्रिय भाज्यांचा हा महोत्सव प्रत्येक

यंदा तरी साखर कारखान्याचे बाॅयलर पेटणार का ? !!! !!!! न्यूज मसाला सर्विसेस ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस यंदा तरी रासाकाचे बाॅयलर पेटणार का ?           नासिक::-निफाड तालुक्यातील साखर कारखान्यांचा अवघ्या दोन महिन्यावर उसाचा गळीत हंगाम येऊन ठेपला आहे. गेल्या हंगामातील शिल्लक ऊस आणि यंदाच्या हंगामातील ऊस तसेच जिल्हाभरातील कादवा आणि द्वारकाधीश हे दोन साखर कारखाने सोडले तर निसाका, रासाका, गिसाका, वसाका, रावळगाव, के.जी.एस. सर्व कारखाने बंद असल्याने मोठ्या प्रमाणात अतिरिक्त असलेल्या उसासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील कारखान्यांचे उंबरे झिजवावे  लागणार आहेत, त्यासाठी यंदा तरी रासाका अर्थात कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचे बाॅयलर पेटलेच पाहिजेत या मागणीवरून आक्रमक होत रासाका कृती समितीचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे, वर्षाच्या  सुरवातीला निसाका रासाका सुरु होण्याच्या अपेक्षांचे धुमारे फुटण्यास विधानसभा निवडणुकीत झालेला सत्तापालट अन निवडणुकीपुर्वी दिलेले  निसाका, रासाका सुरु करण्याचे आश्वासन कारणीभुत आहे, तसेच कोरोना महामारीमुळे कादवा गोदा खोऱ्यातील उत्पादीत ऊसाला असलेल्या रसवंती, चाऱ्याच्या बाजारपेठा बंद, ऊसतोड करण्

रिस्क" घ्यायला जे लोकप्रतिनिधी पुढे आले आहेत ते जनतेच्या कौतुकास पात्र ठरत आहेत, हे ही नसे थोडके,,,,,,,,,,,,,. प्रशासनाकडून आॅफलाईन सभा अटी-शर्तीनुसार घेतल्या जाणार !! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क 7387333801. सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
                      कोव्हिड-१९ च्या पार्श्र्वभूमीवर संपूर्ण भारतात अनलाॅक प्रक्रीया सुरू झाली आहे. या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आॅफलाईन सभा घेण्याचा मार्ग अटी-शर्तीनुसार मोकळा झाला आहे. अनेक ठिकाणी आॅनलाईन सभा घेण्यावरून मतभेद निर्माण झाले होते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात गेल्या तीन महिन्यांपासून कलगीतुरा रंगला असल्याचे आपण सारेच बघत आलो होतो. मात्र आता कोव्हिड-१९ चां प्रादुर्भाव व त्याच्या अनुषंगाने होणाऱ्या मृत्युंच्या संख्येवर नियंत्रण तसेच संसर्ग झालेल्यांना आजारातून बरे करण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे संपूर्ण देशात अनलाॅक प्रक्रीयेने सुरूवात केली आहे.          लोकप्रतीनिधींकडून आॅफलाईन सभांसाठी प्रशासनावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते परंतु जनहितासाठी अशा दबावाला प्रशासन बळी पडले नाही. अनेकांकडून खडेबोल सुनावण्याचे "राजकारण" करण्यात आले. यांत प्रामुख्याने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. प्रशासनाला आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळू लागले तेव्हाच प्रशासनाकडून अटी-शर्ती नुसार मेट्रो सुरू करणे, रेल्वेच्या काही मार्गिकांवरील वाहतूक, आंतरराष्

पोलिस उपनिरीक्षक नवनाथ सोनवणे यांना मातृशोक ! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क 7387333801.

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस निफाड तालुक्यातील गोदाकाठावर असलेल्या   मांजरगाव येथील माजी सरपंच  सखूबाई रामनाम सोनवणे यांच्या सासूबाई व प्रगतशील शेतकरी रामनाम नथु सोनवणे यांच्या मातोश्री भागीरतीबाई नथु सोनवणे यांचे( वय ९५ ) दुःखद निधन झाले ,त्यांचे पश्चात चार मुले ,दोन मुली,सूना नातवंडे असा परिवार आहे,    मुंबई पोलीस दलात सेवा बजावणारे उपनिरीक्षक नवनाथ सोनवणे यांच्या त्या  मातोश्री होत.

कर्मवीरांच्या त्यागामुळेच मविप्रचा वटवृक्ष बहरला : बाळासाहेब क्षिरसागर! करंजगाव जनता विद्यालयात समाजदिन साजरा !! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क: 7387333801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस कर्मवीरांच्या त्यागामुळेच मविप्रचा वटवृक्ष बहरला : बाळासाहेब क्षिरसागर करंजगाव जनता विद्यालयात समाजदिन साजरा          नासिक::-कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्यापासून ते स्वर्गीय डॉ.वसंतराव पवार यांच्यापर्यंत सर्वच कर्मवीरांनी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या उत्कर्षासाठी योगदान दिले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील लाखो विद्यार्थी मविप्रच्या शाखांमध्ये शिक्षण घेत आहे. शंभर वर्षांपूर्वी रोपटे लावलेल्या मविप्रचा वटवृक्ष कर्मवीरांच्या त्यागातुनच बहरला आहे, असे प्रतिपादन जि.प अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. गोदाकाठच्या करंजगाव मविप्र जनता विद्यालयात  त्यांच्या अध्यक्षतेखाली समाजदिन उत्साहात साजरा करून कर्मवीरांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर मविप्र तालुका संचालक प्रल्हाददादा गडाख, शालेय समिती अध्यक्ष भास्करदादा राजोळे, पंचायत समिती सदस्य शहाजी राजोळे, सरपंच अनिता भगूरे, मा.सरपंच खंडू बोडके-पाटील, धोंडूमामा भगूरे, सुरेशबापू राजोळे, राजेंद्र राजोळे, नंदू राजोळे, सोमनाथ राजोळे, देवकर भाऊसाहेब

न्यूज मसाला अंक दि. १३ आॅगस्ट २०२०,. संपादकीय- पत्रकार महापूरावर लिहीता लिहीता वाहून गेला ! इतर बातम्यांसह सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !! 7387333801, न्यूज मसाला संपर्क भ्रमणध्वनी !!!

इमेज
संपादकीय पत्रकार महापुरावर लिहीता लिहीता वाहून गेला ! समृद्ध मराठी भाषेतील म्हणी, "दिव्याखाली अंधार" "आई जेवू घालेना, बाप भिक मागू देईना" "वैद्याचं पोरगं पांगळं"       अर्थ सर्वसामान्यांसाठी खूप काही सांगून जातो मात्र पत्रकारिता क्षेत्रात या म्हणी फक्त वापर म्हणून वापरायच्या असतात  काय ? जगाला प्रकाशाकडे नेणारा पत्रकार इतका उपेक्षित असू शकतो हे आजच्या परिस्थितीने त्याला त्याचे अस्तित्व दाखवून दिले, अरे बाबा आधी तुझ्या बुडाखाली अंधार असताना तू जो प्रकाश दाखवतो त्यावर किती विश्र्वास ठेवावा ?     माध्यमांचे मालक यांनाच प्रती आईबाप मानणारी पत्रकार जमात इतकी "निर्बुद्ध" असू शकते की मालक आई जेवू घालेना आणि मालक बाप भिक मागू देईना तरीही शांत बसू शकतो यापलीकडे त्याच्या हाती कोणताही निर्णय घेऊ शकण्याची शक्ती नसणे ही शोकांतिकाच आहे.       सामाजिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारा वैद्य-पत्रकार आपल्या स्वत:च्या कुटुंबासाठी एका पांगळ्या जबाबदारीचा बाप गणला जावा यांसारखे दुर्देव काय ?        माध्यमांनी जाहीराती मिळविण्याचा जो बाजार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क- 7387333801.

इमेज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण!  - डॉ मुरहरी सोपानराव केळे निर्माते बाळासाहेब कर्णवर - पाटील आणि सूर्यकांत कडाकने यांच्या "पुण्यश्लोक प्रॉडक्शन्स"द्वारे दिग्दर्शक दिलीप भोसले दिग्दर्शित "पुण्यश्लोक अहिल्यादेवी" या हिंदी आणि मराठी चित्रपटाची विशेष चर्चा निर्माण झाली होती. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या चित्रपटाच्या मुखचित्राचे प्रकाशन झाल्याने राजकीय वर्तुळातही  चित्रपटाविषयी विविध चर्चा रंगू लागल्या होत्या. २० मान्यवर तज्ज्ञ, लेखक-साहित्यिकांच्या सहकार्याने डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांनी अल्पावधीत कथानक पूर्ण करून पुढील कार्याला गती दिली आहे. "पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा" दुर्लक्षित इतिहास जगभरातील प्रेक्षकांना परिचित व्हावा यासाठी निर्माते बाळासाहेब कर्णवर - पाटील आणि दिग्दर्शक दिलीप भोसले यांनी डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांच्या मार्गदर्शनाखाली खास, (महाराष्ट्र,गुजरात , राज्यस्थान,कर्नाटक,गुजरात, ) संशोधनासाठी २० मान्यवर तज्ज्ञ लेखक - साहित्यिकांना आमंत्रित करून लेखन कार्याची सुरुवात

करंजगाव येथे आज दि.१० विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण ! आमदार अनिल कदम यांच्या हस्ते, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! न्यूज मसाला सर्विसेस संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक 7387333801.

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस करंजगाव येथे आज दि.१० विविध विकासकामांचे भूमिपूजन व  लोकार्पण         नासिक::-निफाड तालुक्यातील गोदाघाट परिसरात निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या विशेष प्रयत्नाने करंजगाव येथे साकारलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन आज सोमवार दि १० ऑगस्टला करंजगाव ग्रामपालिका पटांगणात सकाळी १० वाजता होणार आहे. माजी आमदार अनिल कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष  नामदार बाळासाहेब क्षीरसागर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती अनुसया जगताप, उपसभापती शिवा पाटील सुरासे, गट विकास अधिकारी संदीप कराड, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, पंचायत समिती सदस्या कमलताई शहाजी राजोळे, भास्करदादा राजोळे, कचरू राजोळे, सागर जाधव, रमेश राजोळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.              माजी आमदार अनिल कदम यांच्या विशेष प्रयत्नाने करंजगावी प्रगतीपथावर काम सुरू असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत एक कोटी ६८ लक्ष रुपयांच्या नळपाणीपुरवठा योजनेचे भूमिपुजन यावेळी करण्यात येणार आहे.

रोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्टतर्फे कोरोना योध्याना संजीवनी ! प्रभावी व सुरक्षित व्हिएलटीएम किट्सचे वितरण !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! न्यूज मसाला भ्रमणध्वनी क्रमांक 7387333801,.

इमेज
रोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्टतर्फे कोरोना योध्याना संजीवनी ! नाशिक - कोरोना योद्ध्यांनी केलेल्या बहुमूल्य अनमोल कार्याचे कौतुक सर्वत्र होत आहे. हा त्यांचा स्तुत्य उपक्रमच आहे. परंतु त्या बरोबरच या योध्यांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या व्हीएलटीएमच्या  किटचे वितरण रोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्ट तर्फे होत आहे. नाशिक व नागपूरमधील वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषद व महानगरपालिकांना परिषदा व महानगरपालिकांना व्हीएलटीएम या किट्सचे वितरण करून एका भव्य व उदात्त हेतूसाठी रोटरी क्लब कार्यरत आहे. सामान्यत: नाकातील आणि घशातील नमुने साठविण्यासाठी (व्हीएलटीएमच्या) व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडीयम किटस काचेच्या सिलेंडरचा वापर होतो. तदनंतर हे कोविडचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात.  परंतु हे करत असतांना असे निदर्शनास आले कि, या कोरोना पद्धतीने काम करत असतांना कोरोना योध्यांना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.  कोरोना योध्यांची जोखीम कमी करण्याचा भाग म्हणुन ही महत्वपूर्ण व आवश्यक बाब लक्षात घेऊन व्हीएलटीएमच्या किट्स हे अत्यंत प्रभावी व  सुरक्षित आहे. कारण या किटस वापरले गेलेल्या घटका

आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रात समतोल बिघडणार असल्याने जिल्हा परिषदेने सार्वत्रिक बदली प्रक्रिया रदद केली !! न्यूज मसाला संपर्क क्रमांक 7387333801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिक- जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत असलेल्या रिक्त पदांमुळे बदली प्रक्रिया केल्यास आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रात समतोल बिघडणार असल्याने जिल्हा परिषदेने सार्वत्रिक बदली प्रक्रिया रदद केली आहे. नियमानुसार आपसी बदल्या १० ऑगस्टपर्यत करण्यात येणार आहे.                      शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार वर्ग ३ संर्वगातील सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविण्यासाठी १० ऑगस्टपर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या विविध विभाग निहाय बदली प्रक्रियेचा आढावा घेतल्यावर गेल्या चार वर्षापासून पदभरती न झाल्यामुळे तसेच आरक्षण पदावरची पदोन्नतीबाबत शासनाने दिलेल्या स्थगितीमुळे मोठया प्रमाणात पद रिक्त असल्याचे निर्दशनास आले आहे. आदिवासी क्षेत्रामध्ये सध्या पदे रिक्त असून विनंती बदलीने पुन्हा आदिवासी क्षेत्रातीलच पदे रिक्त होण्याची शक्यता आहे. आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासकीय बदलीने बिगर आदिवासी क्षेत्रातून मोठया प्रमाणात बदल्या कराव्या लागतील. त्यामुळे बिगर आदिवासी क्षेत्रातील पदे मोठया प्रमाणात रिक्त होऊन त्या भागातील समतोल बिघड

धनगर ऐक्य अभियान -- धनगर समाज सरकारला देणार स्वतःच्या रक्ताने लिहून निवेदन - डॉ शशिकांत तरंगे ! १३ आॅगस्ट राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी दिनी देणार निवेदन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य.. धनगर समाज सरकारला देणार स्वतःच्या रक्ताने लिहून निवेदन - डॉ शशिकांत तरंगे १३ ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करून संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक तहसील कार्यालय वरती धनगर समाज बांधव धनगर ऐक्य अभियान मार्फत राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये स्व:ताच्या रक्ताने लिहून निवेदन देणार आहे     .....निवेदन मधील विषय.... धनगर समाज STआरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करा ! धनगर समाजाच्या विकासासाठी घोषित केलेल्या 22 योजनांची अंमलबजावणी करा व 1000 कोटीची तरतूद ताबडतोब करा. मेंढपाळांना संरक्षण द्या त्याच्यावर होणारे हाल्ले थांबवा. यासाठी राज्यभरातून आपल्या मागण्यांसाठी धनगर बांधव स्वतःच्या रक्ताने निवेदन लिहून मे. तहसीलदार मार्फत राज्य सरकारला निवेदन देणार आहे, यामध्ये सरकारला पंधरा दिवसाचा वेळही ही दिला जाणार आहे. अन्यथा पंधरा दिवसानंतर राज्यभर महा विकास आघाडी सरकार विरोधात धनगर समाज अतिशय उग्र आंदोलन घोषित करणार असल्याचे डॉ शशिकांत तरंगे यांनी जाहीर केले...

न्यूज मसाला दि. ६ आॅगस्ट २०२० चा प्रकाशित अंक

इमेज
न्यूज मसाला दि. ६ आॅगस्ट २०२० चा प्रकाशित अंक

शेतकरी कुटुंबातील कांचन बनली सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
शेतकरी कुटुंबातील कांचन बनली सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक !  नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (तांत्रिक) परीक्षा चा निकाल जाहीर झाला असून  निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील  कांचन शंकर आवारे हिने सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. या बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.           कांचन ही शेतकरी व सर्वसामान्य घरातील मुलगी असून तिचे शालेय शिक्षण चांदोरी येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये व त्यांनतर मेकॅनिकल डिप्लोमा हा चांदोरी येथील कर्मवीर काकासाहेब वाघ आभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्ण केला, पदवी शिक्षण नाशिक येथील गोखले  महाविद्यालयात पूर्ण केले, कांचन ने  पदवी महाविद्यालयात प्रवेश घेतल्या बरोबरच स्पर्धा परीक्षा चा अभ्यास सुरू केला. महाविद्यालयातील अभ्यासिका व घरी अभ्यास करीत २०१७ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. काही  कारणास्तव त्याचा निकाल जाहीर होण्यास विलंब झाला होता. मोठ्या प्रतिक्षेनंतर निकाल जाहीर झाला व त्यात कांचनने यशाला गवसणी घातल्याचे घोषित झाले, यांत अरुण नागरे ,महेंद्र धनाईत ,अमोल टाके यांचे मार्गदर्शन लाभले, वडील

सुमित जगताप वयाच्या २४ व्या वर्षी आयपीएस ! तालुक्यातील पहीला आयपीएस अधिकारी होण्याचा मान अन् गांवात दिवाळी साजरी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
            नासिक::- निफाड तालुक्यातील उत्तर-पूर्व पट्ट्यातील सरहद्दीवर असणाऱ्या वावी ठुशी गावचे भूमिपुत्र सुमित कैलास जगताप वय (२४) यांनी   पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत निफाड तालुक्यातील पहिला आयपीएस होण्याचा  मान मिळवत देशात  ५०७ वे  मानांकन मिळविले. तालुक्याबरोबर वावी ठुशी चे नाव  कानाकोपऱ्यात  पोहोचवल्याने तालुक्यात  तसेच गावात दिवाळी पूर्वीच दिवाळी साजरी होत असून फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत वावी ठुशीकरांनी आनंदोत्सव साजरा केला,           सुमीत जगताप यांचे प्राथमिक शिक्षण वावी ठुशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत , काकासाहेब नगर येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात इयत्ता पाचवीचे तर इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतचे शिक्षण कळवण-मानूर येथील  शरद पवार पब्लिक स्कूल येथे होऊन इयत्ता अकरावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण नाशिक येथील अशोका कॉलेज येथे घेतले, के के वाघ शिक्षण संस्थेत केमिकल इंजीनियरिंग ची पदवी २०१७ मध्ये घेत यूपीएससीचा अभ्यास पुणे, नाशिक, दिल्ली येथे सुरू करून पहिल्याच प्रयत्नात यशाचा झेंडा रोवला. यूपीएससी परीक्षेत पूर्व मुख्य प

कष्टकरी कुटुंबातील मुलींनी दहावीत मिळवलेल्या यशाचे मान्यवरांकडून कौतुक व सत्कार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक – जिल्हा परिषदेच्या शासकिय कन्या शाळेतील कष्टकरी कुटुंबातील मुलींनी दहावीत मिळवलेल्या यशाचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कौतूक केले. गुणवंत विद्यार्थीनींचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.       जिल्हा परिषदेच्या शासकिय कन्या शाळेत कष्टकरी तसेच शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थीनी शिक्षण घेतात. सन २०१९-२० मध्ये दहावी परिक्षेत बसलेल्या ६९ पैकी ५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ८५.५० टक्के लागला आहे. प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थीचे कौतुक करण्यासाठी जिल्हा परिषदेचया मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषदेत या विद्यार्थींचा सत्कार करण्यात आला. अश्विनी गांगुर्डे ही विद्यार्थीनी ८८.५० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. ही विद्यार्थीनी सर्वसाधारण कुटुंबांतील असून जातेगाव येथे आत्याच्या घरी राहुन शिक्षण घेत आहे. ८७.०० गुणांसह व्दितीय क्रमांकाने उत्तीण झालेली अनुजा मेढे ही वासाळी गावातील

कांदा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलनाचा उद्रेक होईल. शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले पाटील यांचा इशारा. !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी न्यूज मसाला सर्विसेस कांदा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलनाचा उद्रेक होईल.    शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले पाटील यांचा इशारा . !!           नासिक::-कोरोना संकटामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, भाजीपाला, मका, सोयाबीन इत्यादी पिकांना प्रसंगी मातीमोल भावात विक्री करावी लागल्याने आधीच कोलमडलेल्या शेतकऱ्यांना आता कांदा दराच्या घसरणीला तोंड द्यावे लागत आहे. कांद्याची अर्धेअर्धास उत्पादन शिल्लक असून ऑक्टोबर महिन्या पर्यंत नवीन कांदा बाजारात  येईल परंतु आज रोजी कांदा दरात प्रचंड घसरण झाली असून यातून मार्ग निघाला नाही तर शेतकरी मोठ्या संकटात सापडेल. केंद्र सरकारने तातडीने निर्यात प्रोत्साहन योजना लागू करून निर्यातीला चालना देण्याची आवश्यकता आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीमा बंदी करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा आज होणारी निर्यात सुद्धा थांबेल. पर्यायांने पुन्हा दरात घसरण होईल यासाठी आताच नियोजन होण्याची आवशकता आहे. मागच्या काळात रेल्वे वॅगन्स उपलब्ध करून दिल्या होत्या त्याच प्रकारे वॅगन्स उपलब्ध करून दिल्या

आमदार दिलीपराव बनकरांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांसाठी २ कोटी मंजूर... सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
संतोष गिरी यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस आमदार दिलीपराव बनकरांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांसाठी २ कोटी मंजूर...          नासिक::-निफाड तालुक्यातील विकास कामांचा झंझावात आमदार दिलीपराव बनकर यांनी कोरोनाच्या या वैश्चिक  संकटातही सुरूच ठेवल्याने निफाड शहराच्या पाच कोटी निधी नंतर तालुक्यातील रस्ते  व सभामंडप यासाठी सन  २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा (२५१५) पुरविणे अंतर्गत निफाड विधानसभा मतदार संघातील रु.२ कोटीची खालील विकास कामांना मंजुरी मिळाली असल्याचे आमदार दिलीपराव बनकर यांनी माहिती दिली. यामध्ये १) पिंपळगांव बसवंत येथे पाचोरे वणी हायवेलगत शिवरस्त्याची सुधारणा करणे. (रु.३ लक्ष) २) रामा ते पिंपळगांव जॅकवेल रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१५ लक्ष) ३) पिंपळगांव बसवंत येथील शिवाजीनगर अंतर्गत रस्त्याची सुधारणा करणे. (रु.२५ लक्ष) ४) पिंपळगांव बसवंत ते जुना शिरसगांव रस्त्याची सुधारणा करणे. (रु.५ लक्ष) ५) पाचोरे वणी येथील प्रताप नागरे ते प्रकाश नागरे व दिलीप वाळुंज रस्ता करणे. (रु.१० लक्ष) ६) सावरगांव येथील बेघर वस्तीमध्ये सभामंडपा

महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री यांना देण्यात आलेले निवेदन (जसे आहे तसे). विषय: राज्याचे कालच निवृत्त झालेले   माजी सचिव   यांनी राज्यातील कंत्राटदार बाबतीत काढलेला अन्यायकारक शासन निर्णय तातडीने रद्दच करण्यात यावा !! सविस्तर निवेदन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

मा . ना.अशोकजी चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य मा.ना.दत्तात्रयजी भरणे राज्य मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग विषय: राज्याचे कालच निवृत्त झालेले   माजी सचिव   यांनी राज्यातील कंत्राटदार बाबतीत काढलेला अन्यायकारक शासन निर्णय तातडीने रद्दच करण्यात यावा संदर्भ : कंत्राटदार नामनोदंणी ( Enlistment of pwd contrctors) शासन निर्णय क्रमांक/ संकीर्ण- २०२० / प्र.क्र१४७/ इमारत -२ दिनांक ३० जुलै २०२० महोदय साहेब आज या आमच्या राज्य संघटनेच्या जवळपास तीन लाख  कंत्राटदाराच्या व त्यावर अवलंबून असणाऱ्या लाखो घटकांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्यातील कालच निवृत्त झालेले सचिव आता ते माजी सचिव झालेले आहेत यांनी केलेल्या मागील चार वर्षातील अनागोंदी कारभाराबाबत व चुकीचे स्वतास जसे पाहिजे तसे व एखादे मोठ्या आर्थिक गोष्टी,घबाड प्राप्त करण्यासाठी व स्वताचे हितचिंतकाचे Consultancy company ,व प्रति स्वताचे खासगी सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण करण्यासाठी घेतलेल्या शासन निर्णय चा दुष्टहेतु व कारनामे आपणासमोर मांडीत आहोत यावरून कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता,मजुर सहकारी संस