पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माथी मुकुट, हाती कलश !मुखातून शत शत नमन !!महामस्तकाभिषेक सोहळा १० जुलै पर्यंत वाढवला...!

इमेज
माथी मुकुट, हाती कलश ! मुखातून शत शत नमन !! महामस्तकाभिषेक सोहळा   १० जुलै पर्यंत वाढवला...! ऋषभदेवपुरम- मांगीतुंगी(प्रतिनिधी) गुरुवारी (दि.३०) प्रत्येक अभिषेककर्त्याच्या माथ्यावर मुकुट, हाती कलश आणि मुखामध्ये शत शत नमनचा जयघोष असे प्रसन्नता वाढवणारे चित्र दिसत होते. सलग १६ दिवस सुरू असलेल्या महामस्तकाभिषेक  महोत्सवात गुरुवारी (दि.३०) आनंदमय वातावरणात भाविकांनी ऋषभदेव व सर्व तीर्थंकरांच्या नावांनी जयघोष केला. उपस्थित सर्व श्रावक- श्राविकांनी अतिशय श्रद्धापूर्वक अभिषेक, पूजनाचा व रत्नवृष्टीचा सात्विक आनंदही मिळवला. यावेळी पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामींनी असंख्य भाविकांच्या मागणीनुसार दि. १० जुलैपर्यंत सोहळा सुरू राहील अशी भाविकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात घोषणा केली.          गुरुवारी (दि.३०) पहाटेपासून भाविकांची सहकुटुंब, सहपरिवार ऋषभदेवपुरम येथून ऋषभगीरीवर जाण्यासाठी रीघ लागली होती. सकाळपासून पवित्र वातावरणात व उत्साहात भगवान ऋषभदेवांच्या १०८ फुटी उंच अखंड पाषाण मूर्तीवर पंचामृत महामस्तकाभिषेक झाला. प्रथम कलशाचा मान मुंबईचे सुनील गंगवाल, मेरठ येथून आलेले सुनील सराफ व जयपूरचे मनोज जैन य

बारावी पास झालेल्या गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजना !

इमेज
बारावी पास झालेल्या गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजना !       नासिक::- सन २०२२-२३ या वर्षापासून नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनुसुचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील निवडक गुणवंत आणि होतकरु मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 'कमवा आणि शिका' योजनेअंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामध्ये, तीन वर्षासाठी प्रशासकीय काम करण्याची आणि पदवीनंतरच्या नोकरीसाठी आवश्यक विेविध ज्ञान- कौशल्ये आत्मसात करून देणे साठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) यांच्या BBA (Service Management) या अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद सेस फंडातून २०% मागासवर्गीय निधी अंतर्गत विद्यावेतन देणेची नाविन्यपूर्ण योजना राबविली जाणार आहे.           सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या कामापोटी पहिल्या वर्षी रु.८,०००/- दुसऱ्या वर्षीं रु.९,०००/- आणि शेवटच्या वर्षासाठी रु. १०,०००/- इतके विद्यावेतन प्रत्येक महिन्यासाठी अदा केले जाईल, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवास आणि भोजनासाठीचा खर्च भागविण्यासाठी मदत म्हणून दरमह

सर्व धर्मोस्तू मंगलम् जयघोषात महामस्तकाभिषेक ! जैन तीर्थंकरांच्या शिकवणीनुसार सर्व धर्म समभावाचे दर्शन !!

इमेज
सर्व धर्मोस्तू मंगलम्   जयघोषात महामस्तकाभिषेक !  ऋषभदेवपुरम- मांगीतुंगी(प्रतिनिधी)::-  काल मंगळवारी ( दि.२८) मांगीतुंगी सिद्धक्षेत्र येथे जैन तीर्थंकरांच्या शिकवणीनुसार सर्व धर्म समभावाचे दर्शन घडले.  सर्व धर्म मंगलम् अश्या  जयघोषात विश्व कल्याणाची प्रार्थना करण्यात आली. उपस्थित भाविकांनी ऋषभदेव व सर्व तीर्थंकरांच्या नावांनी जयघोष केला. उपस्थित सर्व श्रावक- श्राविकांनी अतिशय श्रद्धापूर्वक अभिषेक, पूजनाचा व रत्नवृष्टीचा सात्विक आनंदही मिळवला.                 सोमवारी रात्री परराज्यातील भाविक बसेस व खासगी वाहनांनी ऋषभदेवपुरम येथे दाखल झाले. त्यामुळे काल विविध प्रांतातील दिगंबर जैन समाजाचा मोठा मेळा जमला होता. उत्तरप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात येथून अनेकजण आले. काल मंगळवारी ( दि. २७) पहाटेपासून भाविकांची सहकुटुंब, सहपरिवार ऋषभदेवपुरम येथून ऋषभगीरीवर जाण्यासाठी रीघ लागली होती. सकाळपासून  पवित्र वातावरणात व उत्साहात भगवान ऋषभदेवांच्या १०८ फुटी उंच अखंड पाषाण मूर्तीवर पंचामृत महामस्तकाभिषेक झाला. प्रथम कलशाचा मान जैन समाजातील सर्व संत परंपरेचे पाईक असलेले श्रीपाल ग

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथाची यात्रेदरम्यान रोज सजावट ! मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीतून सजावट करण्याचे अवघड कार्य !

इमेज
माडसांगवी(करण बिडवे)::- श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी आणि चांदीचा रथ पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या यात्रे साठी मार्गस्थ झाला असून या रथयात्रेत हजारो भाविक सहभागी झाले आहेत.  गेली दोन वर्षे कोरोना महामारी मुळे पायी वारी बंद होती यंदा मात्र या वारीत नवचैतन्य निर्माण झाले आहे. पायी वारकऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे . कोरोनामुळे गेली दोन वर्षे रथ सजावटीची परंपरा बंद होती त्यामुळे सजावटकार मंडळी नाराज झाली होती. यंदा मात्र या मंडळीत चैतन्य संचारले आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या चांदीच्या रथाला दररोज नवनवीन प्रकारची फुले, हार, तुरे, सजावटीच्या वस्तू वापरून आकर्षक सजावट केली जाते.  माडसांगवी येथील ह.भ.प. स्वर्गीय शिवाजी महाराज पेखळे यांच्या संकल्पनेतून ही रथ सजावट परंपरा आजही उत्साहात सुरू आहे. यात्रा मार्गात मुक्कामाच्या ठिकाणी निरनिराळ्या मित्रमंडळी कडून दररोज रात्री रथाच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचून हि मंडळी सुंदर सजावट करतात. साधारण एक महिना रथ वारी पंढरपूर पर्यंत चालत जाते. दररोज निराळ्या पद्धतीने नैसर्गिक फुलांच्या माध्यमातून सुग

माधव सटवाणी यांना ३० जून रोजी कविकुलगुरू महाकवी कालिदास पुरस्कार प्रदान !

इमेज
माधव सटवाणी यांना ३० रोजी कालिदास पुरस्कार प्रदान ! कोकण मराठी परिषद, गोवा उपक्रम . डॉ. महेश खरात यांची उपस्थिती ! पणजी ::- कोकण मराठी परिषद गोवा या संस्थेतर्फे दरवर्षी कविकुलगुरू महाकवी कालिदास पुरस्कार यंदा गोव्यातील ज्येष्ठ कवी माधवराव सटवाणी यांना जाहीर झाला असून येत्या ३० जून रोजी सायंकाळी ३.३० वाजता होणाऱ्या इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात होणाऱ्या समारंभात औरंगाबाद येथील डॉ. महेश खरात यांच्या हस्ते हा पुरस्कार माधव सटवाणी यांना प्रदान करण्यात येईल. पुरस्काराचे हे चौदावे वर्ष असून यापूर्वी गोव्यातील अनेक नामवंत साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.  माधव सटवाणी यांचा अल्प परिचय          माधव सटवाणी हे वाळपई तालुक्यातील वेळूस येथील असून गेली दशकांपासून त्यांचे कविता व इतर लेखन सातत्याने सुरू आहे. त्याचे ‘निमग्न’ आणि ‘एक शुभ्र टिंब’  हे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या तिसऱ्या मराठी कवितासंग्रहाचे प्रकाशन लवकरच करण्यात येणार आहेत. इंग्रजी  वाङ्मय आणि सौंदर्यशास्त्र हे विषय घेऊन एम. ए.आणि एम. एड. असलेले प्रा. सटवाणी यांनी सत्तरी तालुक्यात १९६५ ते २००५ या

अमास सेवा ग्रुपतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना मदत !

इमेज
अमास सेवा ग्रुपतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना मदत !        नाशिक ( प्रतिनिधी ) अमास सेवा संस्था (मुंबई) यांच्या माध्यमातून जॉय ऑफ गिव्हिंग या सेवाभावी उपक्रमात डोल्हारमाळ केंद्रातील तेरा शाळेतील ५३३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. त्यामध्ये स्कूलबॅग, रेनकोट ,वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, चित्रकला वही, रंगपेटी, पाटी, पेन्सिल बॉक्स, शार्पनर, कंपास पेटी, लाकडी पट्टी, पेन्सिल पाऊच अश्या दैनंदिन आवश्यक शैक्षणिक साहित्याचा समावेश करण्यात आला. जॉय ऑफ गिव्हींगचे प्रमुख  विक्रमभाई मेहता व सहकाऱ्यांनी मनोगतात कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा नव्याने शैक्षणिक सत्र जोमाने सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला व शुभेच्छा दिल्या. दिलेल्या मदतीचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांनी प्रगती करावी असे त्यांनी नमूद केले.            अमास सेवा संस्थेचे समन्वयक चंदकांतभाई देढिरा यांचे याप्रसंगी मोलाचे सहकार्य, योग्य नियोजन व मार्गदर्शन मिळाले. कुळवंडी केंद्रातील सहकारी शिक्षक विजय भोये, बहीरम, बोरसे, कोकणे, घंटेवाड तसेच मानकापूर शाळेचे माजी सहकारी दिलीप शिंदे या शिक्षकांचे अनमोल सहकार्य मिळाले. या कार्यक्रमाच

वर्षाऋतूत बरसल्या भक्तीधारा, महामस्तकाभिषेक संपन्न !

इमेज
वर्षाऋतूत बरसल्या भक्तीधारा,  महामस्तकाभिषेक संपन्न ! ऋषभदेवपुरम- मांगीतुंगी  ( प्रतिनिधी )  सतत तेरा दिवस सुरू असलेल्या सोहळ्याची रंगत वाढत आहे. काल सोमवारी ( दि.२७) मांगीतुंगी सिद्धक्षेत्र येथे सकाळपासूनच मेघ दाटून आले होते. वर्षाऋतूमध्ये पावसाची सगळ्यांना आस लागली आहे. मोरांचा केकारव देखील सुरू आहे. अश्या अमृतमय वातावरणात भक्तीधारा बरसल्याने उपस्थित भाविकांनी जल्लोष केला. उपस्थित सर्व श्रावक- श्राविकांनी अतिशय श्रद्धापूर्वक अभिषेक, पूजनाचा व रत्नवृष्टीचा सात्विक आनंद मिळवला. अभिषेकानंतर दुपारी प्रत्यक्ष पर्जन्यवृष्टी सुरू झाली.    रविवारी रात्री मुंबई, डोंबिवली, कोल्हापूर, सोलापूर, नांदगांव, शिर्डी, मालेगाव, नाशिक, सटाणा येथून असंख्य भाविक खासगी वाहनांनी ऋषभदेवपुरम येथे दाखल झाले. त्यामुळे काल महाराष्ट्रातील दिगंबर जैन समाजाचा आणि मराठी मातीचा मोठा सहभाग होता. चेन्नई येथूनही काहीजण आले. काल सोमवारी( दि. २७) पहाटेपासून भाविकांची सहकुटुंब, सहपरिवार ऋषभदेवपुरम येथून ऋषभगीरीवर जाण्यासाठी रीघ लागली होती. सकाळपासून  पवित्र वातावरणात व उत्साहात भगवान ऋषभदेवांच्या गिनीज विश्वविक्रमी १०८ फु

नासिक येथील अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेची करमाळा जि. सोलापूर येथे शाखा...

इमेज
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेची करमाळ्याला शाखा...        नाशिक..दि.२४::-आखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिकच्या करमाळा येथे नविन केंद्राचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला. संस्थेचे कार्याध्यक्ष उदयकुमार मुंगी, सहकार्यवाह गंगाधर कुलकर्णी, कार्यकारीणी सदस्य सर्वश्री सचिन पाडेकर, सुभाष सबनीस, उल्हास पंचाक्षरी रोहीणी कुलकर्णी, सुप्रिया सबनीस आणि केंद्राचे पदाधिकारी संतोष कुलकर्णी, सदस्य सुधीर पुराणिक, नरहरी होशिंग, सारंग पुराणिक, सुनिल कुलकर्णी, सुनिल देशमुख, राजेंद्र सुर्यपुजारी, निलिमा पुंडे, सागर कुलकर्णी उपस्थित होते.                उद्घाटनाच्या निमित्ताने सामुदायिक व्रतबंधाचे आयोजन करण्यात आले होते. अठरा बटुंचा व्रतबंध यावेळी पार पडला. केंद्राच्या केंद्रप्रमुखपदी संतोष कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. आखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिकच्या ध्येय धोरणानुसार आणि संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा केंद्राच्या माध्यमातून समाजाची सेवा करू‌, तसेच विविध उपक्रम राबवून संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करू असे आश्वासन केंद्रप्रमुख संतोष कुलकर्णी यांनी यावेळी दिले. शेखर जोगळ

युवा वर्गातील वाढती व्यसनाधीनता हातात हात घालून हदयास हदय जोडून बंधू सहाय्याला लाहो बलसागर भारत होवो - साने गुरुजी

इमेज
युवा वर्गातील वाढती व्यसनाधीनता             हातात हात घालून             हदयास हदय जोडून             बंधू सहाय्याला लाहो             बलसागर भारत होवो                                   - साने गुरुजी         आज आपण २१ व्या शतकात पदार्पण करत आहोत. आपला भारत देश विश्वगुरू होण्याच्या शर्यतीत एकेक पाऊल पुढे टाकत आहे. या २१ व्या शतकात " युवा वर्गातील वाढती व्यसनाधीनता " यासारखा निबंध लिखानाचा विषय ठरावा. यासारखे दुर्देव कुठेच नसेल.         जगातील सर्वात जास्त युवक असलेला देश म्हणून भारताची ओळख आहे. कारण १८ ते ३५ या वयोगटातील ५५ टक्के युवक भारतात आहे. हा युवकवर्ग निरोगी, विवेकी, सुदृढ, विज्ञाननिष्ठ, व्यसनमुक्त असणे हीच देशाची खरी ताकद आणि यश आहे. परंतू भारतात विचित्र स्थिती पहावयास मिळते. किशोरवयींन लहान मुलांपासून ते युवकापर्यंतचे सर्वच घुटखा, मावा, तंबाखू, सिगारेट, बिडी, चरच, गांजा, ड्रग्स अशा विविध पदार्थांचे सेवन करून रस्त्यावर थुंकतांना दिसतात. अशी व्यसनाच्या जाळ्यात अडकलेली युवा पिढी देशाचे भवितव्य कसे ठरू शकेल हाच गंभीर प्रश्न आज भारतासमोर निर्माण झाला आहे.        शाळा, महाविद्

आपल्याकडे शेती नसेल तरीही प्रत्यक्ष शेतात जाऊन विषमुक्त भाजीपाला लागवडीसह सुदृढ जीवनशैलीचा मूलमंत्र !

इमेज
विषमुक्त भाजीपाला लागवडीसह मिळणार सुदृढ जीवनशैलीचा मूलमंत्र! नाशकातील मृद‍्गंध @ यंदे फार्म कडून अनोखी व्यवस्था सादर !        नाशिक::- शहरी जीवनशैलीचा अंगीकार करणार्‍यांना एकाच वेळी सेंद्रिय भाजीपाला उत्पादनाचा वेगळा अनुभव देताना दुसरीकडे दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करणारी अभिनव व्यवस्था नाशिक शहरात उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती यंदे फार्मच्या संचालिका स्मिता यंदे यांनी दिली. पुण्यामधील मृद‍्गंध स्टार्ट-अपच्या ​संयुक्त विद्यमाने नाशकात त्र्यंबकरोडवर हा प्रकल्प आकारणीस येत असल्याचे यंदे यांनी सांगितले.         यासंदर्भात अधिक माहिती देताना यंदे यांनी सांगितले की, शेतामध्ये भाडेतत्वावर उपलब्ध करून दिलेल्या सुमारे ७५० चौरस फूट जागेत गादीवाफे तयार करून भाज्यांची शेती करण्याची संधी यामध्ये दिली जाणार आहे. हे प्लॉट्स किमान सहा महिन्यांसाठी देताना त्यामधून सेंद्रिय पध्दतीने भाजीपाल्याची लागवड करता येणार आहे. यासाठी आवश्यक ते साहित्य मृद‍्गंध @ यंदे फार्मच्या वतीने पुरवण्यात येणार असून बिया आणि तत्सम वस्तू उत्पादक आणू शकतात. विषमुक्त भाजीपाल्याची लागवड करून सुदृढ जीवनशैलीचा मूलमंत्र

२५ जून भारतीय इतिहासातील सुवर्ण दिनच !

इमेज
२५ जून भारतीय इतिहासातील सुवर्ण दिनच !        २५ जून १९८३ हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली हा संघ विश्वचषकात सहभागी होण्यासाठी इंग्लंडला गेला तेव्हा या संघाकडून कोणालाच अपेक्षा नव्हती ,  पण युवा भारतीय संघाने आपल्या समर्पणाने आणि मेहनतीने जगातील सर्व संघांना गुडघे टेकायला लावून २५ जून १९८३ ला क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्डस वर दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचा अंतिम फेरीत पराभव करून विश्वचषक जिंकला. त्या विजयानंतर क्रिकेट हा खेळ भारतात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. या स्पर्धेतील झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात भारताच्या १७ धावांत पाच विकेट पडल्यानंतर तरूण कर्णधार कपिल देवची नाबाद १७५ धावांची खेळी क्रिकेटच्या इतिहासात एक दंतकथा बनली आहे.   विश्वचषक विजय हा सामूहिक विजय होता. त्या विजयात प्रत्येक खेळाडूने आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कामगिरी केली. हा ऐतिहासिक विजय सर्व खेळाडूंसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. त्या विजयानंतर भारतीय संघाकडे आदराने पाहिले जात होते. क्रिकेटप्रेमी तो दिवस कधीच विसरणार नाहीत. तो

"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातून सुवर्ण भारताच्या दिशेने". व्याख्यान::- स्वर्णिम भारताच्या निर्मितीत महीलांचे योगदान !

इमेज
नाशिक - "स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातून सुवर्ण भारताच्या दिशेने" हे घोष वाक्य घेऊन  अंतरराष्ट्रीय स्थरावरील संस्था प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय तर्फे  जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ दरम्यान संपूर्ण भारतातील तसेच देश विदेशातील  विविध सेवाकेंद्र  तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.         याच शृंखलेत दिनांक १९ जून रोजी म्हसरूळ कलानगर येथील प्रभू प्रसाद या ब्रह्माकुमारी च्या मुख्य सभागृहांमध्ये स्वर्णिम भारत निर्मितीत महिलांचे योगदान या  विषयान्वये महिलांसाठी  एक दिवसीय व्याख्यानाचे आयोजन दिनांक १९ जून रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख प्रमुख वक्ता म्हणून शिर्ड्डी साईबाबा संस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत, प्राचार्या डॉ. जेडी  सोनखासकर महिलांना विशेष मार्गदर्शन करणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दिदीजी स्वर्णिम भारत निर्मितीत  महिलाचे योगदान या विषयी आपले मनउदगार प्रस्तुत करणार आहेत. या कार्यक्रमासाठी अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहित

प्रस्थापित पक्षांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करणार्‍या लोकशाही आघाडीची २० जून रोजी विभागीय बैठक !

इमेज
प्रस्थापित पक्षांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करणार्‍या लोकशाही आघाडीची नागपूरमध्ये २० जून रोजी विभागीय बैठक !        मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार मागासवर्गीयांना न्याय देण्यात कमी पडले आहे. फुले-शाहू-आंबेडकर, आण्णा भाऊ साठे यांच्या नावाने मागासवर्गीयांची, बहुजनांची मते घेऊन ह्या पक्षांनी सत्ता मिळवली आहे. मात्र ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळू नये, असा ह्या प्रस्थापित पक्षांचा डाव आहे. म्हणून एकमेकांवर आरोप करत आहेत, मात्र मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांच्या पदोन्नतीतील आरक्षण दोन्ही पक्षांनी असेच अडकवून ठेवले आहे. ओबीसींना पदोन्नतीतील आरक्षण सुरू करण्यासाठी २००६ ला कॅबिनेटच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही, मागासवर्गीयांच्या शैक्षणिक सवलती, सरकारी नोकरीतील लाखांचा शिल्लक असलेला अनुशेष, खाजगीकरण कंत्राटीकरण, कोतवालांना चतुर्थ श्रेणी नाकारणे, कामगार विरोधी कायदे, गगनाला भिडणारी महागाई, पेट्रोल डिझेलचे भाव शंभरावर कधीच गे

देहू येथील शिळा मंदिराबद्दल माहिती !

इमेज
देहू येथील शिळा मंदिराबद्दल माहिती !     पुणे::-१७ व्या शतकातील संत, जगतगुरू तुकाराम यांच्या सन्मानार्थ पुण्याजवळ देहू येथे उभारण्यात आलेल्या शिळा मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रार्पण केले. पंतप्रधानांनी यावेळी संत तुकाराम यांची भक्ती करणाऱ्या आणि महाराष्ट्रात पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांशी संवाद देखील साधला.             विशिष्ट प्रकारच्या राजस्थानी दगडापासून बांधण्यात आलेले हे मंदिर, संत तुकाराम यांनी ज्या शिळेवर बसून १३ दिवस ध्यानधारणा केली त्या शिळेला समर्पित करण्यात आले आहे. पंढरपूरची वारी सुरु करण्यापूर्वी तुकाराम महाराजांचे भक्त असलेले वारकरी या शिळेचे दर्शन घेऊन प्रार्थना करतात.            या शिळा मंदिराच्या जवळच उभारण्यात आलेल्या संत तुकाराम यांच्या नव्या पुतळ्याचे अनावरण देखील पंतप्रधानांनी केले.          १७ व्या शतकात होऊन गेलेले भक्तिमार्गाचे उपासक कवी आणि संत तुकाराम त्यांच्या ‘अभंग’ या प्रकारच्या भक्तीभावाने भरलेल्या काव्यरचनांसाठी तसेच ‘कीर्तने’ म्हणून प्रसिध्द असलेल्या अध्यात्मिक रचनांसाठी सुप्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील वारकरी समुदायामध्ये त्या

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लढवय्यांचे नव्या पिढीने स्मरण ठेवावे – अनिल गणाचार्य, कार्यक्रमात श्रीकांत बेणी यांचा सत्कार !

इमेज
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लढवय्यांचे नव्या पिढीने स्मरण ठेवावे – अनिल गणाचार्य कार्यक्रमात श्रीकांत बेणी यांचा सत्कार ! मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कॉ. गुलाबराव गणाचार्य यांच्या तीन पिढ्या तुरुंगात होत्या, ते स्वतः नाशिक रोड, त्यांची पत्नी आशालता सोबत लहान मुलगी जयश्रीसह ऑर्थर रोड, भाऊ प्रभाकर येरवडा तर आई साबरमती कारागृहात यातना सहन करत होत्या, अशा या चळवळीत सर्व लढवय्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा त्याग, समर्पण नव्या पिढीने कायम लक्षात ठेवले पाहिजे, असे विचार त्यांचे सुपुत्र अनिल गणाचार्य यांनी व्यक्त केले.  मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढ्यात लढलेल्या घराण्याच्या प्रतिनिधींचा प्रातिनिधिक सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघात आचार्य अत्रे यांच्या ५३ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या पुढाकाराने अत्रेय संस्था तसेच मनिषा प्रकाशन यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार आणि संयुक्त महाराष्ट्राचे नेते उद्धवराव पाटील यांचे नातू अविष्कार पाटील, कै. प्रभाकर पाटील यांची मुलगी म

जिल्हा परिषदेत पूर्व व पश्चिम या ऐवजी एकच लघु पाटबंधारे विभाग !

इमेज
जिल्हा परिषदेत पूर्व व पश्चिम या ऐवजी एकच लघु पाटबंधारे विभाग जिल्हा संधारण अधिकारी लघु पाटबंधारे यांचे अंतर्गत जिल्ह्यात सात उपविभाग होणार कार्यरत नाशिक - शासन निर्णय क्र. आस्थाप २०२२/प्र.क्र.१४०/जल-२ दिनांक २६ मे २०२२ नुसार पुर्नस्थापीत करण्यात येत असलेल्या सात उपविभाग व त्या उपविभागाचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे. तसेच यापुर्वी कार्यरत असलेले लघु पाटबंधारे (पुर्व /पश्चिम) विभाग जिल्हा परिषद नाशिक ऐवजी एकच कार्यालय ठेवण्यात आलेले असून सदर कार्यालय "जिल्हा जलसंधारण अधिकारी लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद नाशिक" या नावाने पुर्नस्थापीत करण्यात आलेले आहे.         लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत कार्यरत सर्व संवर्गाच्या कर्मचाऱ्यांचे यांचे समायोजन करुन पुर्नस्थापनेने पदस्थापना देण्यात आलेले आहे. त्यात प्रामुख्याने कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहायक लिपिक, कनिष्ठ सहायक लिपिक, वाहनचालक, परिचर कर्मचारी यांचे समायोजन करण्यात आलेले असून उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांचे शासन आदेशाचे अधिनस्त राहून तात्पुरते स्वरुपात तालुका निहाय जिल्हा परिषद अधिन

डॉ. विजय दहिफळे साम टीव्ही ग्लोबल अ‍ॅचिव्हर्स अ‍ॅवॉर्डने सन्मानित !

इमेज
डॉ. विजय दहिफळे साम टीव्ही ग्लोबल अ‍ॅचिव्हर्स अ‍ॅवॉर्डने सन्मानित ! नाशिक । आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सेक्सॉलॉजिस्ट, एन्ड्रॉलॉजिस्ट आणि युरॉलॉजिस्ट डॉ. विजय दहिफळे यांना साम टीव्ही ग्लोबल अ‍ॅचिव्हर्स अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. दुबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या सोहळ्यात डॉ. दहिफळे यांचा गौरव करण्यात आला.              याप्रसंगी अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी डॉ. दहिफळे यांना पुरस्कार प्रदान केला. साम टीव्हीचे बिझनेस हेड अमित सिंग तसेच साम टीव्हीचे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. डॉ. विजय दहिफळे यांनी आजवर लैंगिक समस्यांचा सामना करणार्‍या लाखो जोडप्यांवर अत्याधुनिक उपचार करून त्यांच्या जीवनात नवचैतन्य फुलवले आहे. साम टीव्हीवर सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम गेल्या पाच वर्षांपासून अविरत सुरू आहे. या मालिकेतून समुपदेशन करून सुखी जीवनाचा मंत्र, लैंगिक शिक्षण, जागृती, आणि सुरक्षा यांवर ते देश-विदेशात मार्गदर्शन करतात. याविषयी मराठी, हिंनदी आणि इंग्रजी भाषांतील त्यांची पुस्तकेदेखील जगभरात वाचली जातात.             आज समाजात धकाधकीचे जीवन

कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे जिल्हास्तरीय जीवनगौरव व आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर !

इमेज
कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे जिल्हास्तरीय जीवनगौरव व आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर ! नाशिक : येथील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना व अंजनेरी येथील सपकाळ नॉलेज हब यांच्या संयुक्त विद्यमाने, १० वी, १२ वीत विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ व शिक्षक सन्मान सोहळा, विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत, जुनच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय " जीवनगौरव, आदर्श शिक्षक व युवा आदर्श शिक्षक पुरस्कारांची " घोषणा आज संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत, संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे व सपकाळ नॉलेज हब चे संचालक रविंद्र सपकाळ यांनी केली.          यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार, ३२ वर्षे अध्यापनाचे कार्य केलेले व उद्धव अकॅडमी चे संचालक सुधीर गायधनी यांना जाहीर झाला आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये, परांजपे संस्कृत क्लासेस च्या संचालिका सुषमा परांजपे, नील काबरा अकॅडमीच्या विशाखा काबरा, ब्रिलीयन्स अकॅडमीचे अमिर शेख, परांजपे प्रोफेशनल अकॅडमीचे कौस्तुभ परांजपे, आयडियल