पोस्ट्स

मार्च, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"असे ही एकदा व्हावे" असं वाटत असेल तर ६ एप्रिलला बघायलाच हवा !

इमेज
नरेंद्र पाटील, संपादक-न्यूज मसाला,नासिक +91 07387333801 पुणे(२६)::- "असे ही एकदा व्हावे" या आशेवर प्रत्येक व्यक्ती जीवन व्यथित करीत असतांना तो अनेक नात्यांना जपत त्यांची जबाबदारी पेलत, गुंतागुंतीच्या आयुष्यात रंग भरित असतो. अशा या नात्याच्या याच आशावादी पैलुंवर आधारित झेलू इंटरटेंटमेंट निर्मित आणी सुश्रुत भागवत दिग्दर्शित "असे ही व्हावे" हा सिनेमा येत्या ६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. प्रेमाची नवी परिभाषा मांडण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यांत आला आहे. अवधूत गुप्तेंच्या मार्गदर्शनाखाली सिनेमाची गाणी तयार झालीत. रोमँटीक गाणं, एक गझल व एक शास्रीय ठुमरी संगीतबद्ध केली आहे. या गाण्यांमधील "किती बोलतो आपण" या गाण्याला किर्ती किल्लेदारचा आवाज लाभला आहे. तसेच "भेटते ती अशी" या गाण्यासोबत "यु नो व्हाट" या कवितेने रसिकांना प्रदर्शनापूर्वीच मोहीनी घातली आहे. ही कविता उमेश कामत व तेजश्री प्रधान ने म्हटली आहे. तीला वैभव जोशी ने शब्दबद्ध करतांना या कवितेचे गाण्यांत रूपांतर न करता दोन्ही कलाकारांकडून वदवून घेण्याची किमया सुश्रुत भागवतने साधली.

संजय राऊत मराठा शिवसैनिकांना प्रभावहीन करणारे कुटील व्यक्तिमत्व-अँड.शिवाजी सहाणे

इमेज
नाशिक/प्रतिनिधी मातोश्रीला वेठीस धरून राजकीय नफेखोरीचा ठेला चालविणार्या संजय राऊत यांनी निष्ठावान शिवसैनिकांना विशेषतः मराठा समाजातील शिवसैनिकांना वारंवार प्रभावहीन करण्याची कुटील खेळी खेळल्याचा इतिहास ताजा असताना क्रांती मोर्चाला सक्रीय पाठींबा देणारे निष्ठावंत  मराठा शिवसैनिक आ.अॕड.शिवाजी सहाणे यांची हकालपट्टी करून त्यांच्या नसानसात मराठा द्वेष भरला असल्याचे सिध्द केले आहे.मराठा क्रांती मोर्चाच्या व्यासपीठावरून सकल मराठा समाज या द्वेषी प्रवृत्तीचा तिव्र निषेध करीत असून सारी ताकद आ.अॕड.शिवाजी सहाणे यांच्या पाठीशी उभी उभी करण्याचा निर्धार केला आहे.असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी पञकार परिषदेत सांगीतले.आपली भुमिका स्पष्ट करतांना अॕड.शिवाजी सहाणे म्हणाले,अन्यायाविरूध्द संघर्ष करणे ही आम्हा शिवसैनिकांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नेहमीच प्रोत्साहित करते.ही शिकवण मला यावेळी निश्चित बळ देईल. गेल्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत अवघ्या सत्तर मतदारांच्या जीवावर शिवसेनेने दिलेली उमेदवारी करून अॕड.शिवाजी सहाणे यांनी प्रतिकुल परिस्थितीतही विजय मिळवला होता.तत्कालीन ब

अँड. संदीप गुळवे यांची प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती

इमेज
नरेंद्र पाटील, न्यूज मसाला, नासिक नासिक::(२६):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांनी नासिकचे अँड.संदिप गुळवे यांची आज महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी पार्टीच्या चिटणीसपदी निवड केली. गुळवेंची निवड झाल्याबद्दल अजित पवार, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंढे, आम. जयंत पाटील,आम. जितेंद्र आव्हाड, प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, नासिक जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी अभिनंदन केले, निवड पत्र स्विकारताना आम.हेमंत टकले, आम. जयंत जाधव, आम. विद्या चव्हाण, ज्ञानेश्वर लहाने व कार्यकर्ते उपस्थित होते.     गुळवेंची चिटणीस पदी निवड झाल्याने ईगतपुरी परीसरांसह नासिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नासिक पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल हरलेत !

इमेज
 नरेंद्र पाटील संपादक-न्यूज मसाला,नासिक  विडंबनात्मक लिखाण पद्धत धर्तीवर हा लेख असुन कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.-संपादक नासिक::-नासिकचे पोलीस आयक्त रविंद्रकुमार सिंघल आजच्या परिस्थितीत हरलेत असे म्हटल्यास हि नासिककरांच्या भविष्यात डोकावल्यास संयुक्तिक वाटणार नाही.    साहेब आपण हरलात ही बाब आपणांस रूचणार नाही व तशी मान्यही करायला नको या मताचा मीही आहे, आपले बालपण दिल्लीत गेले, तेथेच इंजिनियरींगची पदवी प्राप्त केली, मास कम्युनिकेशन मधील पदविका, मानवाधिकार यांत पदव्युत्तर शिक्षण व डाँक्टरेट मिळविली, या इतक्या मोठ्या शिक्षणाच्या जोरावर राबवित असलेले उपक्रमांबाबत थोडा वेगळा विचार केल्यास, का करताहेत जनहितासाठी कार्य जे आज कुणाला कौतुकास्पद वाटणार नाही, आज रामनवमीचा दिवस , प्रभु रामचंद्रानाही वनवास भोगावा लागला व यांच कारणामुळे त्यांचे पदस्पर्श नासिकला लागले तीच हि पुण्यनगरी तेथे आपणही यांवे व अफलातून कार्य करावे, फरक इतकाच की आपण वनवास भोगायला आला नाहीत पण वर्षानुवर्षे समाजातील काही घटक वनवास भोगत होते त्यांना पावण करण्याच्या शक्तीचा (बुद्धी) वापर करित आहात इथेच आपण 'हरलात

सरकारवाडा पोलीसांचे स्काटलँडच्या धर्तीवर पोलिसींग !

इमेज
न्यूज मसाला, नासिक नरेंद्र पाटील नासिक::-शहरांत वाहनचोरीचे अनेक गुन्हे घडत असतांना त्यांचा तपास करणे पोलींसांपुढे नेहमीच आव्हान ठरत आहे, नवनवीन टोळ्या तयार होत असतांना प्रत्येक वेळी नवीन दिशा ठरवावी लागत असते, अशा परिस्थितीत सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी जे वाहनचोर पकडले , ती कारवाई कौतुक करण्यासारखी आहे, पोलीस नेहमीच त्यांचे कर्तव्य पाड पाडीत असतात , तो त्यांच्या कार्याचा भाग आहे , मात्र या वाहनचोरीतील गुन्हेगार पकडले याचा उल्लेख मुद्दामहून करावा लागतो, तो स्काटलँडच्या धर्तीवर, कारण , वाहनमालकाला माहीत नाही की आपले वाहन चोरीस गेलेले आहे, व सकाळच्या प्रहरी सरकारवाडा पोलीस वाहनमालकाला त्याच्या घरी जाऊन झोपेतून उठवून खबर देतात !       याप्रकरणी तीन अल्पवयीन मुले आपली वाहन चालविण्याची हौस भागविण्याकरीता वाहने चोरी करतात, सरकारवाडा पोलीसांचे गस्ती पथकाला संशयास्पद हालचालींची जाणीव होते व या वाहनचोरांना पकडले जाते,     बातमी नेहमीसारखीच आहे फक्त वाहनमालकाने वाहनचोरीचा गुन्हा दाखल केल्यानंतर चोर पकडले जातात तेथे ही उलट ब

रिजर्व बँकेने दंडात्मक रकमेबाबत सर्वसामान्यांना परवडेल अशी नियमावली तयार करायला हवी काय ?

इमेज
अर्थ तज्ञांनो उत्तर द्या ! एक बातमी, तीन बँकांनी आपले व्याजदरांत केली वाढ ! पीएनबी नेही केली वाढ         पूर्वी कधी किमान शिल्लकवर आजच्या इतकी दंड आकारणी होत नव्हती, आजची परिस्थिती काय ?           धनादेश खात्यावर पुरेशा शिल्लक अभावी परत गेल्यास किती दंड आज बँका घेतात ?            देशाचा जीडीपी आटोक्यात कसा ?          मित्रों, बँकांचे अनेक घोटाळे तसेच कर्ज बुडवून परदेशांत पळून जाणे या बाबींकडे सर्व सामान्यांनी जरूर लक्ष द्यायला हवे !          कर्ज बुडवून परदेशांत निघून गेलेल्यांचा भुर्दंड सर्वसामान्याकडून यामार्गाने वसुल केला जात आहे असे वाटते का ?          मित्रों, जीडीपीची व्यवस्था बँक खात्यातील किमान शिल्लक नसल्यास, धनादेशाचा अनादर झाल्यास दोन्ही खातेदारांना भुर्दंड, बँक आणी ग्राहक यांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा व या सर्वांवर जीएसटी, सीजीएसटी च्या माध्यमातून वसुल करून सरकारचा खजिनाही वाढवायचा हि हुशार अर्थतज्ञांची खेळी वाटते काय ?            मित्रों, तरीही बँकांची भूक भागत नाही मग व्याजदरांत वाढ केली जाते, हे कारण संयुक्तिक वाटते काय ?             मित्रो, आपल्याला अशा पद्ध

मिसेस भारत आयकाँन २०१८ चा दुसरा सीजन येत आहे-अखिल बन्सल

रॉयल हेरिटेज ग्रुपतर्फे मिस आणि मिसेस भारत आयकॉन हा थाटामाटाचा भारतातील कार्यक्रम आहे.प्रत्येक घरातील मिस आणि मिसेससाठी हा सन्मान सोहळा आहे.                                 मिस आणि मिसेस भारत आयकॉनचे आयोजक आणि दिग्दर्शक श्री.अखिल बन्सल मिसेस भारत आयकॉन्च्या उत्तुंग यशानंतर श्री.अखिल बन्सल रॉयल हेरिटेजचे अध्यक्ष हे मिस आणि मिसेस भारत आयकॉन्चा दुसरा सिझन घेऊन येत आहेत.हा प्रथिष्टीत आणि अद्वितीय असा कार्यक्रम आहे.श्री.अखिल बन्सल म्हणतात की,टीम मिस आणि मिसेस भारत आयकॉन 2018 हे सांगताना आनंद होतो की शीतल अरपल यांची पुणे  दिग्दर्शक  म्हणून बोर्डावर यांची नियुक्ती झाली आहे.                                                             पुण्यातील ऑडिशन या त्यांच्या मार्गदर्शनाखाली होतील. शीतल अरपल म्हणतात की त्यांना पुण्यातील फॅशन आणि मीडिया क्षेत्रातून खूप  चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि त्यांना त्याबद्दल सर्वांचे आभार मानायचे आहेत.या कार्यक्रमाचे ऑडिशन्स प्रत्येक शहरात होतील आणि मुंबई मध्ये अंतिम सोहळा होईल. मिस आणि मिसेस भारत आयकॉन ही प्रत्येक भारतीय / NRI मुली आणि लग्न झालेल्या बायकांसाठी खु

नावा नासिकची शान, व्यावसायिकताच नसुन कौटुंबिक भान असलेले आदर्श कुटुंब

इमेज
नावा'  चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न नाशिक- नाशिक अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज् वेल्फेअर असोसिएशन (नावा) चे कुटुंबियांसमवेत असलेले स्नेहसंमेलन आणि वार्षिक सर्वसाधारण सभा त्र्यंबक रोडवरील हाॅटेल संस्कॄती येथे उत्साहात संपन्न झाली. सभेमध्ये नवीन कार्यकारिणी कार्यरत झाल्यापासून आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय जाहिरात दिन, माध्यमांमधील क्रिकेट स्पर्धा आणि भविष्यातील उपक्रमांवर चर्चा करण्यात आली .  सभासदांच्या जाहिरात व्यवसायातील समस्यांबद्दल महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यावेळी विविध स्पर्धांचे कुटुंबियांसाठी आयोजन करण्यात आले ,त्यामध्ये सभासदांचे कुटुंबीय व त्यांची मुले मुली  उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. सर्व महिलांनी सहभागी होऊन कार्यक्रमात रंगत आणली. याप्रसंगी अध्यक्ष विठ्ठल देशपांडे, संस्थापक अध्यक्ष, माजी अध्यक्ष  मोतीराम पिंगळे, विठ्ठल राजोळे ,  नितीन राका,  माजी सचिव मंगेश खरवंडीकर , कार्याध्यक्ष   राजेश शेळके,  सरचिटणीस दिलीप निकम, मिलिंद कोल्हे पाटील, गणेश नाफडे,  खजिनदार अमोल कुलकर्णी   सुहास मुंदडा,  अनिल अग्निहोत्री, अमित काळे, सुनील महामुनी, किरण पाटील, सतीश बोरा, महेश कलं

वाईन फेस्टिवलमुळे नासिकचे पर्यटनात वाढ होईल-आ.सीमा हिरे. अविस्मरणीय क्षणांचा अनोखा संगम म्हणजे नासिक व्हँली वाईन क्लस्टर व ग्रेप काउंटी-एक वाईन प्रेमी

इमेज
शुक्रवार ९ मार्च १८ नाशिक - एका बाजूला  "महेंगी हुई शराब के थोडी थोडी पिया करो" सारख्या मनाला भावणाऱ्या गझल आणि दुसरीकडे वाईनचे ग्लासवर ग्लास रिचवणारे दर्दी रसिक प्रेक्षक अशा अपूर्व योगात "हॉटेल ग्रेप काऊंटी" येथे नाशिक व्हॅली वाईन क्लस्टर आयोजित इंडिया ग्रेप हार्वेस्ट च्या पाचव्या सत्रास शुक्रवारी सुरुवात झाली . दुपारी ४ वाजेपासूनच शेतकरी बाजार मध्ये शेकडो ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती . अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला येथे विक्रीस आणला होता . त्याबरोबरच जिल्ह्यातील अनेक नामांकित वाईन उत्पादक कंपन्यांनी आपली उत्पादने टेस्टिंगसाठी  आणि ग्राहकांसाठी सादर केलीत . यावेळी शेतकऱ्यांच्या यशोगाथाही चित्रफितीद्वारे दाखविण्यात आल्या . यावेळी ग्रेप काउंटीचे किरण चव्हाण , इंडिया ग्रेप हार्वेस्ट चे अध्यक्ष जगदीश होळकर, सेक्रेटरी राजेश बोरसे , राजेश जाधव , प्रदीप पाचपाटील , मनोज जगताप , समीर रहाणे उपस्थित  होते . रात्री सत्यम आनंद यांचा गझल गायनाचा कार्यक्रम उशिरापर्यंत चांगलाच रंगात आला होता . "होश वालोंको खबर क्या" , "चाँदी जैसा रंग

लोकराज्य मासिकाचे जिल्हा परिषदेला वावडे ,शासनाला प्रशासनाचा आहेर !

इमेज
         नासिक::-महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र "लोकराज्य" जिल्हा परिषद सदस्यांना वाचण्यास मिळावे व शासनाचे कार्य, कार्यक्रम, योजनांची माहीती सर्वसामान्यांपर्यंत पोहचली पाहीजे या हेतूने तत्कालीन जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या अर्थसंकल्पात तरतूद केली होती.    गेल्या काही वर्षांपासुन रू  २५०००/- ची तरतूद असतांना आजपर्यंत सदस्यांना जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून "लोकराज्य" मासिकाचा अंक बघायलाही मिळालेला नाही.     काल झालेल्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्प सभेत सदस्यांनी या तरतूदीच्या वेळी आश्चर्य व्यक्त केले की मासिक बघायला मिळाले नाही मात्र दरवर्षी तरतूद केली जाते ? या प्रश्नावर प्रदीप चौधरी यांनी उत्तरात सांगीतले, "दरवर्षी सेसमध्ये फक्त तरतूद करून ठेवतो, लोकराज्यची वार्षिक फी भरत नाही त्यामुळे सदस्यांना मासिक मिळत नाही".     यामुळे सभा आटोपल्यानंतर अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत, शासन जनतेसाठी काय करते हेच मुळी जनसामान्याना कळू द्यायचे नाही अशा प्रकारचा उपहासात्मक आरोप जिल्हा परिषद प्रशासनावर केला.