पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निर्मिती पतसंस्थेस दिड कोटीचा विक्रमी नफा ! सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर !!

इमेज
निर्मिती पतसंस्थेस दिड कोटीचा विक्रमी नफा !  सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर  !!        नाशिक ( प्रतिनिधी ) निर्मिती पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून राजलक्ष्मी बँकेचे संचालक जगन (अण्णा) पाटील व नाशिकमधील प्रख्यात वास्तुविशारद अरुण काबरे उपस्थित होते. यावेळी गतवर्षीच्या तुलनेत ४४ लाखांची वाढ होऊन १ कोटी ५४ लाख रुपयांचा नफा झाला असल्याचे सांगण्यात आले. सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.   प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. निर्मिती पतसंस्था ही बांधकाम व्यावसायिकांसाठी चांगले काम करत असल्याचे जगन(अण्णा) पाटील यांनी नमुद केले. संस्थेच्या संचालकांनी योग्य नियोजनामुळे संस्थेचा कारभार  प्रगतीपथावर नेला आहे.त्यामुळे सहकार क्षेत्रात संस्थेने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. संस्थेचे कामकाज हे कौतुकास्पद असल्याचे नमुद केले. आर्कि.अरुण काबरे यांनी मनोगतात संस्थेची वाटचाल कौतुकास्पद असल्याचे सांगितले व निर्मिती पतसंस्थेने जीवनगौरव केल्याबद्दल आभार मानले. ३१ मार्च अखेर निर्मिती पतसंस्थेस १ कोटी

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

इमेज
८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन ! मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते नियुक्ती ! नाशिक - जिल्हा परिषद सेवेत अनुकंपा नियुक्ती मिळालेल्या ८४ परिचर कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अहर्तेनुसार पदोन्नती देण्यात आली, कनिष्ठ सहायक ५८, वरिष्ठ सहायक २, विस्तार अधिकारी सांख्यिकी ५, विस्तार अधिकारी कृषी १, विस्तार अधिकारी पंचायत १ कंत्राटी ग्रामसेवक १७ अशा परिचर कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हतेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते पदोन्नती देण्यात आल्या.         जिल्हा परिषद सेवेत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येते शैक्षणिक अर्हतेनुसार पद शिल्लक नसल्याने अशा उमेदवारांना परिचर पदावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात आली होती. अशा ८४ परिचर कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याहस्ते पदोन्नती देण्यात आली. मुख्य कार्यकारी लीना बनसोड यांच्या कार्यकाळात सर्वाधिक अनुकंपा नियुक्ती करण्यात आल्या याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे व ग्रामपंचायत विभागा

'विक्रम वेधा' मधील 'बंदे.......' लाॅंच !३० सप्टेंबर ला जगभरात होणार प्रदर्शित !!

इमेज
'विक्रम वेधा' मधील 'बंदे.......'  लाॅंच ! ३० सप्टेंबर ला जगभरात होणार प्रदर्शित !!   हृतिक-सैफचं 'विक्रम वेधा'मधील अ‍ॅक्शन पॅक्ड थीम साँग 'बंदे' रिलीज...        हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेलं 'विक्रम वेधा' चित्रपटातील 'बंदे...' हे थीम साँग काल  ऑनलाइन लाँच करण्यात आले.            'बंदे...' या गाण्यात विक्रमच्या भूमिकेतील सैफ अली खान आणि वेधाची व्यक्तिरेखा साकारणारा हृतिक रोशन अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसतात. या गाण्यातील शब्दरचना विक्रम आणि वेधा या दोन व्यक्तिरेखांमधील द्वंद्व अधोरेखित करणारी आहे. सत्याच्या शोधात निघालेल्या विक्रम वेधाच्या नैतिक अस्पष्टतेचं वर्णन या गाण्यात घडवण्यात आलं आहे.           गीतकार मनोज मुंतशीर यांनी लिहिलेलं 'बंदे...' हे थीम साँग सॅम सी एस यांनी कंपोझ, अ‍ॅरेंज आणि प्रोग्राम केलं असून, शिवम यांनी गायलं आहे.          धडाकेबाज अ‍ॅक्शनचा समावेश असलेल्या 'विक्रम वेधा'मध्ये विक्रम आणि वेधाच्या रूपात पोलिस आणि गुंड यांचा पाठशिवणीचा खेळ बघायला मिळेल.            या थीम साँगमधील ब

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी !

इमेज
जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष  एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी ! नाशिक (दि. २४ प्रतिनिधी)::- शिक्षण घेताना केवळ पुस्तकी ज्ञानात न अडकवता विद्यार्थ्यांवर सामाजिक भान जपण्याचे संस्कार एसएमबीटीच्या औषधनिर्माण शास्र (फार्मसी कॉलेज) मध्ये केले जात आहेत. येथील विद्यार्थी रुग्णसेवेसोबतच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्यसनमुक्तीपर पथनाट्य सादर करून जनजागृती करतात.          नंदीहिल्स, धामणगाव घोटी खुर्द (ता. इगतपुरी, जि. नाशिक)  येथे १७ वर्षांपूर्वी एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी आणि डी. फार्मसी कॉलेज सुरु झाले असून औषधनिर्माणशास्त्रचे पदवी आणि पदविका असे दोन्ही अभ्यासक्रम याठिकाणी घेतले जातात. येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास, खेळ, संशोधन कॅम्पस इंटरव्ह्यू आदींना महत्व दिले जात असून निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या कॅम्पसमध्ये विद्यार्थी सामाजिक बांधिलकी जपताना दिसतात. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण आर्थिक दुर्बल घटकातील आहेत. या रुग्णांना डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या औषधे समजावून सांगण्याचे काम येथील

" कर्मचारी बँक सभेत सभासदांचा अनावश्यक व अवाजवी खर्चास सभासदांचा कडाडून विरोध "

.           *प्रेस नोट* " कर्मचारी बँक सभेत  सभासदांचा अनावश्यक व अवाजवी खर्चास सभासदांचा कडाडून विरोध "        नाशिक(प्रतिनिधी)::-नासिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेच्या दि.२४/०९/२०२२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेच्या स्मरणिका छपाई व तारांकित हॉटेल येथे झालेल्या अनावश्यक व अवाजवी खर्चास विरोध करून खर्च नामंजूर करण्यात आला.        तसेच सभासदांना ५ %  वरून ७ % अशी लाभांश मागणी करून वाढवून घेतले.    कर्जाचे व्याजदर कमी करावे. ठेवी वरील व्याज दर वाढवावे, कर्ज घेताना ठेव व एक हप्ता आगाऊ घेण्यात येऊ नयेत. संचालक मंडळाची मुदत संपली असल्यामुळे धोरणात्मक निर्णय घेऊ नका असा सहकार कायदा असून येवला येथे जागा घेण्यास विरोध करण्यात आला अशा सभासद हिताच्या सूचना रवींद्र थेटे, उत्तमराव (बाबा) गांगुर्डे, निलेश देशमुख, दादाभाऊ निकम, विक्रम पिंगळे, अभिजीत घोडेराव, उमेश देशमानकर, नंदकिशोर सोनवणे, सचिन विंचुरकर, सचिन पाटील आदींनी मांडल्या

विजयादशमीला शिवप्रताप गरूडझेप ! ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’ !!

इमेज
‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’. विजयादशमीला पडद्यावर  ‘शिवप्रताप गरुडझेप’          नाशिक( प्रतिनिधी ) : समर्थ रामदासांनी दासबोधात एका ठिकाणी म्हटले आहे की, ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’. शत्रूच्या बेसावधपणाचा फायदा करून घेण्यात तर छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी कोणीच करू शकणार नाही. आग्य्राहून शिताफीने करून घेतलेली सुटका हा शिवचरित्रातील विलक्षण अध्याय होता. त्यावर आधारित भव्य मराठी चित्रपट ' शिवप्रताप गरुडझेप ' येत्या ५ ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नासिकला झालेल्या पत्रकार परिषदेत अभिनेते खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी अशी माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत  सहनिर्माते घनश्याम राव उपस्थित होते.     औरंगजेबासारख्या धूर्त आणि कुटील बादशहाला देखील बेसावध ठेवून महाराज त्याच्या हातावर तुरी देऊन कैदेतून निसटून गेले. एखाद्या कादंबरीतच शोभावी अशी ही घटना प्रत्यक्षात घडवून आणणे, हे एका अतिशय बुद्धिमान आणि सावध व्यक्तीलाच शक्य होते. शत्रू सावध नसतानाच त्याच्यावर घाला घालायचा, ही

स्वच्छता ही सेवा मोहिमेत सर्व गावांनी व सरपंचांनी हिरारीने सहभागी होऊन शाश्वत स्वच्छतेसाठी काम करावे- लीना बनसोड

इमेज
स्वच्छता ही सेवा मोहिमेत सर्व गावांनी व सरपंचांनी हिरारीने सहभागी होऊन शाश्वत स्वच्छतेसाठी काम करावे- लीना बनसोड        नाशिक (प्रतिनिधी::- जिल्हयात सुरु असलेल्या स्वच्छता ही सेवा मोहिमेत सर्व गावांनी व सरपंचांनी हिरारीने सहभागी होऊन शाश्वत स्वच्छतेसाठी काम करावे तसेच कुटुंबस्तरावरुन कचरा वर्गीकरण करुन कचरामुक्त गाव करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले.          स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत आज सरपंच संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत जिल्हयातील सर्व सरपंच व ग्रामसेवकांना ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. पुढे बोलताना श्रीमती लीना बनसोड यांनी स्वच्छता अभियानांतर्गत विविध घटकांविषयी मार्गदर्शन करताना स्वच्छ व सुंदर गाव तयार करण्यासाठी सरपंच व लोकप्रतिनिर्धीचा सहभाग महत्वाचे असल्याचे सांगितले. प्रत्येक गावाने कचरामुक्त गाव करण्यासाठी नियोजन करुन प्रत्येक घरातूनच चार प्रकारे कच-याचे वर्गीकरण करण्याचा संकल्प करावा. स्वच्छता ही सेवा मोहिमेत गावातील नदी, नाले तसेच महत्वाच्या जागांची स्वच्छता करावी, उकिरडेमुक

नविन पेन्शन योजना रद्द करून सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करा ! "कर्मचाऱ्यांचे बाईक रॅलीव्दारे आंदोलन...!!"

इमेज
नविन पेन्शन योजना रद्द करून सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करा... "   कर्मचाऱ्यांचे बाईक रॅलीव्दारे आंदोलन...          नासिक (प्रतिनीधी )::-राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परीषद कर्मचारी मंहासंघाचे निर्देशानुसार आज दि.२१ सप्टे. रोजी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक - शिक्षकेत्तर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी समन्वय समितीचे वतीने नविन पेन्शन योजना रद्द करुन सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करा. या मागणीसाठी जिल्हा स्थरावर गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय समोर छत्रपती शिवाजी स्टडीयम वर रॅलीची सांगता करण्यात आली. तालुका स्थरावर सर्व पंचायत समित्या ते तहसिल कार्यालये असे बाईक रॅलीचे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफाडे यांचे मार्फत निवेदन दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण आहेर, परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय कुमार हळदे, सरचिटणीस महेंद्र पवार, कार्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील, विक्रम पिंगळे यांनी दिली.        राज्य

स्वतःचे अंधत्व बाजुला ठेवून आपल्या बांधवासाठी संघर्ष करणारे डि.पी जाधव एक आदर्श व्यक्तीमत्व - पंडीत अविराज तायडे

इमेज
स्वतःचे अंधत्व बाजुला ठेवून आपल्या बांधवासाठी संघर्ष करणारे डि.पी जाधव एक आदर्श व्यक्तीमत्व - पंडीत अविराज तायडे    नासिक (नरेंद्र पाटील यांजकडून)::- बालपणीच्या पहिल्या टप्प्यात अंधत्व आले म्हणून दु:ख न करता सर्व अंध बांधवांसाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे दत्तात्रय जाधव हे खरे समाजसेवी आहेत. त्यांचे आत्मचरीत्र प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरावे असे आहे. सुदृढ व्यक्ती आणि दिव्यांग यांची तुलना करता आपल्या बांधवासाठी पायाला भिंगरी लावून फिरणारे दत्तात्रय जाधव हे दिव्यदृष्टीचे आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही असे उद्गार पंडीत अविराज तायडे यांनी काढले. ते सुभाषित प्रकाशन आणि एसडब्लूएस आयोजित "माझी ओळख" या दत्तात्रय जाधव यांच्या आत्मचरीत्राच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन प्रसंगी बोलत होते. लेखक राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राचे महासचिव दत्तात्रय जाधव हे याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माझे अनुभव आणि संघर्ष लोकांना भावला म्हणूनच एका वर्षात मला दुसरी आवृत्ती प्रकाशित करावी लागली हे माझे भाग्य समजतो.          पाहुण्यांचा परीचय एसडब्लूएसचे सीईओ रघुवीर अधिकारी यांनी करून दिल

स्वराज्य संघटनेच्या पहिल्या विजयाची नासिक मधून सुरुवात !

इमेज
स्वराज्य संघटनेचा पहीला विजय ! नासिक (प्रतिनिधी)::- छत्रपती संभाजीराजे यांनी व्यापक व समाजाभिमुख राजकारण करण्याच्या दृष्टीने प्राथमिक स्तरावर स्थापन केलेल्या स्वराज्य संघटना प्रणित ग्रामपंचायत निवडणूक माध्यमातून पहीला विजय नासिक जिल्ह्यात नोंदविला.           जिल्ह्यातील नागलवाडी ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत स्वराज्य संघटना प्रणित उमेदवार सौ. भारती प्रवीण भोर या सदस्यपदी निवडून आल्या. स्वराज्य संघटनेच्या नासिक स्थित कार्यकर्त्यांच्या वतीने लवकरच त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती नवनाथ शिंदे यांनी दिली.

अनुभव घेऊनच मराठी शाळांची सदिच्छादूत झाले –अभिनेत्री चिन्मयी सुमीत

इमेज
अनुभव घेऊनच मराठी शाळांची सदिच्छादूत झाले –अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुंबई (प्रतिनिधी)::-‘मी माझ्या मुलांना मराठी शाळेत घातलं. मराठी शाळा सहज आनंददायी शिक्षण देतात याची खात्री झाल्यावरच मी मराठी शाळांची सदिच्छादूत झाले म्हणजे अनुभव घेतला मगच मी मराठी शाळांची जाहिरात करते’, असे अभिनेत्री चिन्मची सुमीत म्हणाल्या. शनिवार दि. १७ रोजी डॉ. बाळ भालेराव सभागृह, मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव येथे मुंबई मराठी साहित्य संघ आणि मराठी अभ्यास केंद्र यांच्या एकत्रित प्रयत्नांनी आयोजित केलेल्या मराठीप्रेमी पालक मेळाव्यात बोलत होत्या.         मराठी संस्कृती टिकवायची असेल तर मराठी भाषा टिकली पाहिजे आणि मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, असे मुंबई मराठी साहित्य संघाचे कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी म्हटले. मराठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत घातले पाहिजे. त्यासाठी पालकांनी एकत्र येऊन ठिकठिकाणी असे मेळावे आयोजित केले पाहिजेत, असे मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आनंद भंडारे यांनी म्हटले.  चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापक विजयालक्ष्मी शिंदे आणि चिकित्सक समूह तेलंग बालोद्यान

भाजपा गणेशोत्सव स्पर्धा २०२२ कोण ठरणार "विजेता ?"उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या होणार बक्षीस वितरण सोहळा !

इमेज
भाजपा गणेशोत्सव स्पर्धा २०२२ कोण ठरणार "विजेता ?" उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या होणार बक्षीस वितरण सोहळा !         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई भाजपा यांच्या वतीने अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ व कोकण विकास आघाडी यांच्या सहकार्याने, 'मुंबईचा मोरया गणेशोत्सव स्पर्धा २०२२' चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उद्या दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी, सायंकाळी ६.०० वाजता शिवाजी मंदिर, दादर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्तें, तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत, संपन्न होणार आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष अॅड. आशिष शेलार, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे प्रमुख कार्यवाह सुरेश सरनौबत व कोकण विकास आघाडीचे सुहास आडीवरेकर यांनी निमंत्रणपत्राद्वारे दिली आहे.        या स्पर्धेचे संयोजक मुंबई बँकेचे अध्यक्ष - आमदार प्रवीण दरेकर व संचालक प्रसाद लाड आहेत. या स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट मूर्ती, सर्वोत्कृष्ट सज

नासिक जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिंदे गटात !

इमेज
नासिक जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिंदे गटात ! नाशिक पंचायत समिती माजी सभापती तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल ढिकले यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नासिक जिल्हाप्रमुख पदावर त्यांची निवड करण्यात आली.       या प्रसंगी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्व.आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरित संघटीत  नवनिर्वाचित शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, खासदार हेमंत गोडसे, यांसह सरपंच परिषदेचे अध्यक्ष तानाजी गायकर, भाऊसाहेब काका ढिकले, भाऊसाहेब नाना ढिकले, मनोज जाधव, अंबादासपंत ढिकले, दत्ता भाई ढिकले, त्र्यंबक पगार, बाळासाहेब ढिकले,नामदेव ढिकले यांचा प्रवेश करण्यात आला.

आई हे जगण्याचे शहाणपण देणारे संस्कारपीठ : प्राचार्य यशवंत पाटणे

इमेज
आई हे जगण्याचे शहाणपण देणारे संस्कारपीठ : प्राचार्य यशवंत पाटणे      नेवासा जि.अहमदनगर : “आई हे सेवेचे, समर्पणाचे आणि वासल्याचे प्रतीक असते, आई हे जगण्याचे शहाणपण देणारे संस्कारपीठ असून कर्तबगार लेकरे हेच आईचे खरे वैभव असते, लक्ष्मीबाई कानडे या मांगल्याचा मंत्र जपणाऱ्या आदर्श माता होत्या, त्यांच्या संस्कारातून घरदार समृद्ध झाले, आईचे मातृत्व हे मुलाबाळाच्या कर्तृत्वातून सिद्ध होत असते.”  असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक, व्याख्याते, प्राचार्य यशवंत पाटणे यांनी केले.    जेऊर हैबती ता.नेवासा येथे माजी जि.प.सदस्य तुकाराम शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मीबाई कडूभाऊ कानडे यांच्या स्मृतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, बुलढाणा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे, जिल्हा कॉंग्रेसचे सचिव अंकुशराव कानडे, औरंगाबाद मनपाचे कनिष्ठ अभियंता शेषराव पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी बन्शी सातपुते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.     पुढे बोलताना प्राचार्य यशवंत पाटणे म्हणाले की,” ‘सध्या अतिरेकी चंगळवादाने जीवनसौंदर्याची आणि संस्कृतीची हान

२३ सप्टेंबर ला महाराष्ट्रात "राडा" बघायला मिळणार !!

इमेज
 २३ सप्टेंबर ला महाराष्ट्रात "राडा"  बघायला मिळणार !!        नाशिक ( प्रतिनिधी )- साऊथ स्टाईल कमालीची ऍक्शन आणि कॉमेडीसह सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' सिनेमा येत्या २३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.  'राडा' सिनेमाने सोशल मीडियावर चांगलीच हवा करत राडा घातला आहे. चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर, आणि चित्रपटातील दमदार गाणी रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आता रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी 'राडा' सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे. पत्रकार परिषदेत अभिनेते मिलिंद गुणाजी,  आकाश शेट्टी, अभिनेत्री हीना पांचाळ या कलाकारांनी अशी माहिती दिली.     राम शेट्टी निर्मित 'राडा' या सिनेमाचा हिरो समा म्हणजेच अभिनेता आकाश शेट्टी- तुप्तेवार 'राडा' या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे. तर राम शेट्टी निर्मित, रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प - पडगीलवार कॉर्पोरेशन यांच्या या चित्रपटात आकाश शेट्ट

भारतीय कला प्रभावी असल्याचे युनायटेड किंग्डमचे डॉ. जॉफ्री फिशर, ले फिशर दाम्पत्य व ऑस्ट्रेलियाच्या फरझाना युसुफ या तीन परदेशी शिक्षणातज्ञांचे मत !

इमेज
भारतीय कला प्रभावी असल्याचे युनायटेड किंग्डमचे डॉ. जॉफ्री फिशर, ले फिशर दाम्पत्य व ऑस्ट्रेलियाच्या फरझाना युसुफ या तीन परदेशी  शिक्षणातज्ञांचे मत ! वारली कला ही प्रभावी चित्रभाषा !         नाशिक ( प्रतिनिधी )- युनायटेड किंग्डमचे डॉ. जॉफ्री फिशर, ले फिशर हे दाम्पत्य व ऑस्ट्रेलियाच्या फरझाना युसुफ या तीन आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञांनी वारली चित्रशैली अभ्यासक संजय देवधर यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांनी महाराष्ट्राची आदिवासी वारली कला जाणून घेतली. भिंतीवर केलेले चित्र व विविध रेखाटने, तारपा वाद्य बघून ते मोहित झाले. वारली चित्रशैली ही प्रभावी चित्रभाषा असून त्यातील कथाविश्व जगाला कवेत घेणारे आहे असे त्यांनी नमूद केले. नव्या भारतीय शैक्षणिक धोरणात कलानिर्मितीला महत्वाचे स्थान असेल त्याचे स्वागत केले पाहिजे असेही मत त्यांनी मांडले. सुचित्रा देवधर यांनी भारतीय संस्कृतीनुसार कुंकूमतिलक लावून त्यांचे औक्षणाने स्वागत केले. सुप्रिया देवधर हिने विविध चित्रांचा तपशीलवार आढावा घेतला. संजय देवधर यांनी शंकानिरसन करून वारली चित्रसृष्टीची सफर त्यांना घडवून आणली.

'मृतकाचे नांव काय ?'विनोदाचा आस्वाद विनामूल्य घ्या !बाबाज् थिएटर्सच्या वर्धापनदिनानिमित्तपाच दिवसांचा ' रोटरी कल्चरल फेस्ट !

इमेज
'मृतकाचे नांव काय ?' विनोदाचा आस्वाद विनामूल्य घ्या ! बाबाज् थिएटर्सच्या वर्धापनदिनानिमित्त पाच दिवसांचा ' रोटरी कल्चरल फेस्ट !        नाशिक ( प्रतिनिधी ) बाबाज् थिएटर्स या ख्यातनाम सांस्कृतिक संस्थेचा २२ वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने ५ दिवसांच्या ' रोटरी कल्चरल फेस्ट ' चे आयोजन करण्यात आले आहे. दि.१४ ते १८ सप्टेंबर दरम्यान प. सा. नाट्यगृहात दररोज सायंकाळी ५.३० वाजता हा विनामूल्य सोहळा होणार आहे. काल पत्रकार परिषदेत बाबाज् थिएटर्सचे अध्यक्ष प्रशांत जुन्नरे, रोटरी क्लब ऑफ नाशिकरोडच्या अध्यक्षा वर्षा जोशी, सचिव ज्ञानेश वर्मा यांनी अशी माहिती दिली.        दि.१४ रोजी ज्ञानेश वर्मा प्रस्तुत 'रागरंग 'हा हिंदी चित्रपटातील रागदारीवर आधारित कार्यक्रम होईल. दि.१५ रोजी रोहित पगारे लिखित व दिग्दर्शित ' मृतकाचे नाव काय ? ' या सामाजिक व विनोदी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे. दि.१६ रोजी ' एव्हरग्रीन लता - आशा '  ही सुरेल गीतांची मैफल अमोल पाळेकर व सहकारी सादर करतील. दि.१७ रोजी झी मराठी प्रस्तुत ' उत्सव नात्यांचा ' कार

समाजाने बौद्धिक संपदेची गुणात्मकता वाढवून विकास साधावा- सुहास शुक्ल !

इमेज
समाजाने बौद्धिक संपदेची गुणात्मकता वाढवून विकास साधावा- सुहास शुक्ल !         सिन्नर ( प्रतिनिधी) बौद्धिक संपदेबद्दल असलेला आत्मविश्वास, संस्कृती व आधुनिकता यांचा मेळ प्रगतीकडे नेतो. सुसंस्कार, सत्शील वर्तणूक आणि अंगभूत देशभक्ती हे ब्राह्मण समाजाचे विशेष गुण आहेत. त्यांची गुणात्मकता वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. त्यातून व्यक्तिगत, सामाजिक आणि देशाचाही विकास साधता येईल असे प्रतिपादन नाशिक येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिक सुहास शुक्ल यांनी केले. सिन्नर येथील सीताराम मंदिर न्यासाच्या वतीने आयोजित ब्राह्मण समाजाच्या ३२ व्या गुणगौरव समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक एम.जी. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास पत्रकार व वारली चित्रशैली तज्ज्ञ संजय देवधर, पी. एल. देशपांडे, ज्योतिषी संजय रत्नाकर व्यासपीठावर उपस्थित होते.      या कार्यक्रमात विविध शैक्षणिक स्तर, कला, क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविणारे विद्यार्थी,  पारितोषिकांचे प्रायोजक योगिता व अभिलाष पंडित, तसेच सेवानिवृत्त व वयाचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या ज्ये

शिक्षण विभागातर्फे कविसंमेलन व मुशायऱ्याचे आयोजन !!

इमेज
शिक्षण विभागातर्फे कविसंमेलन व मुशायऱ्याचे आयोजन !!         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : करीरोड येथील शिक्षणाधिकारी कार्यालयातील सभागृहात बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील कवी, लेखक शिक्षकांसाठी कवी संमेलन आयोजित करण्यात आले. 'कल्पनेतून जग निर्माण झाले' या कवितेनं जग बदलले असे विचार मांडणारे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ त्यांच्या स्वरचित कवितेत म्हणतानाच 'माणसातला माणूस असा घडवत जाते कवितेतून खदखदून हसवताना नकळत डोळ्यातून अश्रू येणे भाग पाडतात. कंकाळ यांच्या कवितेनं रसिक श्रोत्यांना अंतर्मुख करत सभागृह जिंकून घेतलं.          शिक्षणाधिकारी राजू तडवी (मध्यवर्ती) यांनी हरीवंशराय बच्चन यांची कविता ऐकवून अभिजात कवितेचा अनुभव रसिकांना दिला. या कार्यक्रमाचे संयोजक मनपा अधीक्षक निसार खान यांनी शिक्षण विभागात कार्यरत कवी, शायर, लेखक ज्यांनी देशभर नाव कमावलं आहे त्यांचा उचित सन्मान व्हावा या उद्देशाने या सत्कार सोहळ्याचे, कविसंमेलनाचे आयोजन केल्याचे सांगितले.            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी किसन पावडे पाटील यांनी करून सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण

अलास्का हॉलमध्ये राजयोग मेडिटेशन शिबिराचे यशस्वी आयोजन !

इमेज
अलास्का हॉलमध्ये राजयोग मेडिटेशन शिबिराचे यशस्वी आयोजन !       नासिक ( सुचेता बच्छाव)::- चांदशी येथील भूमिपुत्र मंडलिक परिवाराकडून त्यांच्या अलास्का हॉल मध्ये ५ दिवसीय राजयोग मेडिटेशन आयोजन गणपती उत्सवानिमित्त करण्यात आले.       प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय संस्था, गंगापूर रोड सेंटरच्या संचालिका आदरणीय मनीषा दिदी यांनी परिसरातील नागरिकांना संबोधित केले. सकारात्मक विचार कसे करायचे, संकल्पशक्तीच्या माध्यमातून आपल्या जीवनाला चांगली दिशा कशी दाखवावी या बद्दल मार्गदर्शन केले.          अध्यात्मिक मार्ग ज्ञानातून आपल्याला सामाजिक मुल्ये, नैतिक मुल्ये जोपासून पुन्हा एक मुल्यानिष्ठ समाज निर्माण करू शकतो. प्रसादाचे महत्व सांगताना त्यांनी शुद्ध आणि सात्विक शाकाहाराचे महत्व पटवून दिले.        ध्यानधारणेच्या फायद्यांबद्दलही त्यांनी विश्लेषण केले. मेडिटेशन शिबिरात सुखद आणि सुखद अनुभव आल्याचे आणि आत्मिक शांती मिळाल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी शांतीलाल भाई, किरण भाई, अशोक भाई , नंदलाल भाई, नानाभाई, सुचेता बच्छाव बहेन, सोनी बहेन यांनी सहयोग दिला. शरद मंड

जिल्ह्यातील ७५ आरोग्य संस्थांमध्ये गरोदर मातांना आरोग्य सेवा देऊन आरोग्य विभाग साजरा करणार आजादीका अमृत महोत्सव !

इमेज
  जिल्ह्यातील ७५ आरोग्य संस्थांमध्ये गरोदर मातांना आरोग्य सेवा देऊन आरोग्य विभाग साजरा करणार आजादीका अमृत महोत्सव !     नासिक (प्रतिनिधी)::- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वस्थ भारत चे स्वप्न साकार करण्यासाठी जि. प. आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय नाशिक, स्त्री रुग्णालय मालेगाव, ३२ ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे १३ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांच्या संकल्पने नुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांच्या प्रमुख मार्गदर्शनानुसार जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचे सनियंत्रणाखाली विशेष गरोदर माता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गरोदर मातांचे आरोग्य चांगले राहावे. गरोदरपणामध्ये विशेष स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी व्हावी तसेच त्यांना औषधोपचार, आहार सल्ला, बालकाची काळजी याविषयी मार्गदर्शन मिळावे तसेच जोखमीच्या मातांचे प्रमाण कमी करणे, माता व बालक मृत्यू कमी करण्यासाठी आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्ग

डॉ. ज्योती विनायक मेटे अस्थी विसर्जनासाठी नाशिकला येणार - अमित जाधव

इमेज
डॉ. ज्योती विनायक मेटे अस्थी विसर्जनासाठी  नाशिकला येणार - अमित जाधव   : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय आमदार विनायकराव मेटे यांचे ऑगस्ट मध्ये मुंबई येथे राज्य सरकारने आयोजित केलेल्या मराठा आरक्षण बैठकीसाठी मुंबईच्या दिशेने जात असतांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर  पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झाले आणि सर्व महाराष्ट्र राज्यातील शिवसंग्राम कार्यकर्ते व मराठा समाज बांधव पोरका झाला. नाशिक जिल्ह्यात २२ ऑगस्टला स्वर्गीय आमदार विनायक मेटे यांचा अस्थी कलश नाशिक येथे आला व नाशिक जिल्ह्यात अनेक गावात ही कलश यात्रा अस्थी दर्शनासाठी गेली परंतु अस्थिंचे विसर्जन हे बाकी असल्याने ते रविवारी १० सप्टेंबर ला डॉ. ज्योती विनायक मेटे यांच्या उपस्थितीत होणार आहे डॉ. ज्योती मेटे या नाशिक येथे सहनिबंधक या पदावर कार्यरत आहे त्यामुळे त्यांना सांत्वनास्पद भेटण्यासाठी अनेक लोक इच्छुक आहेत. यासाठी मेटे यांचे निकटवर्तीय व शिव संग्रामचे जिल्ह्याचे नेते अमित जाधव यांच्या पिंपळगाव खांब च्या निवास्थानी शनिवारी वारी सकाळी ८ ते १० या वेळेत ज्योती ताई या लोकांना भेटणार आहे व त्यानंतर १० वाजता पिंपळगाव खांब येथू

शिक्षकांचे न्यायालयीन प्रश्न सोडविण्याचे ऍड.. अप्पासाहेब देसाई ह्यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण पुरस्कार प्रदान !

इमेज
शिक्षकांचे न्यायालयीन प्रश्न सोडविण्याचे ऍड.. अप्पासाहेब देसाई ह्यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण पुरस्कार प्रदान !       मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पालिकेच्या शाळा बंद पडण्याची कारणे शोधताना त्यावर उपाय म्हणून पालक आणि मुलांनी एकत्र येऊन पुढाकार घेतला पाहिजे परंतु त्यापेक्षाही शासनाने सरकारी आणि खासगी शाळा नीट चालल्या पाहिजेत, ह्यासाठी आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे, नियम आणि धोरणात शिथिलता आणली पाहिजे, असे विचार सुप्रसिद्ध विधिज्ञ आणि वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे जनरल सेक्रेटरी ऍड. आप्पासाहेब देसाई यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केले. महापालिका माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात त्याचे वितरण शिक्षक दिनी करण्यात आले. ह्यापूर्वी हे पुरस्कार प्रकाशभाई मोहाडीकर,  सरोज पाटील आदींना देण्यात आले आहेत.           शिक्षकांचे न्यायालयीन प्रश्न सोडविणारे सुप्रसिद्ध विधिज्ञ तसेच वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे जनरल सेक्रेटरी ऍड. आप्पासाहेब देसाई यांनी गेल्या अनेक दशकांपासून शिक्षण क्षेत्रात अविरत कार्य केले आहे. वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या शिक्षण संकु

अन त्यांनी कथन केला 'आदर्श' प्रवास ! जि. प. आदर्श शिक्षकांचे अनुभव कथन !!

इमेज
अन त्यांनी कथन केला 'आदर्श' प्रवास  ! जि. प. आदर्श शिक्षकांचे अनुभव कथन !!        नाशिक - शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात २०२१-२२ वर्षाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी संवाद साधला. यावेळी शिक्षकांनी स्वतः केलेल्या उपक्रमांबद्दल माहिती देत शालेय जीवनातील अनुभवांचे कथन केले. जिल्ह्यातील एक मुख्याध्यापक, नऊ शिक्षक आणि पाच शिक्षिका अशा १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले, या शिक्षकांशी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी संवाद साधत त्यांनी केलेल्या उपक्रमांची माहिती घेतली यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाना पुस्तक भेट देत पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले, गेल्यावर्षी कोविड काळात अध्यापन करताना शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला या अडचणींवर मात करत शिक्षकानी अध्ययनाचे काम सुरु ठेवले. यामध्ये काही शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून  विद्यार्थ्यांना शिकवले तर दुर्गम आदिवासी भागात ज्या ठिकाणी अध्यापनाला तंत्रज्ञानाची जोड देता येत ना

नवनवीन जीवनकौशल्ये आत्मसात करून व्यक्तिमत्त्व विकास घडवावा - समीर भुजबळ

इमेज
नवनवीन जीवनकौशल्ये आत्मसात करून व्यक्तिमत्त्व विकास घडवावा - समीर भुजबळ  तीन दिवसीय कार्यशाळेचा उत्साहात समारोप    नाशिक ( प्रतिनिधी ) - विद्यार्थ्यांनी जगाच्या पाठीवर नवीन काय घडतंय हे जाणून घेतले पाहिजे. नवनवीन जीवनकौशल्ये शिकून आत्मसात केली पाहिजेत. त्यातूनच व्यक्तिमत्त्व विकास होतो. सर्वांगीण जीवन समृद्ध होते असे प्रतिपादन भुजबळ नॉलेज सिटीच्या मेट स्कूल आर्किटेक्चर आणि इंटेरियर डिझाईनचे विश्वस्त समीर भुजबळ यांनी केले. सात यशस्वी कार्यशाळांच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.      संस्थेच्या वतीने गोवर्धन कॅम्पस येथे  दि. १ ते ३ सप्टेंबर २०२२ दरम्यान " आर्ट अँड क्राफ्ट  कार्यशाळांचे  आयोजन करण्यात आले. त्यात चित्रपट निर्मिती, नाट्याविष्कार, डिझाइन थिंकिंग, विणकाम, पॉटरी, बांबू रचना,  लाकडावरील कोरीवकाम व प्रिंट यांचा समावेश होता.काल त्याचा समारोप झाला. यावेळी विश्वस्त समीर भुजबळ, ट्रस्टच्या संचालिका शेफाली भुजबळ, इन्स्टिट्यूटचे संचालक वास्तुविशारद भालचंद्र चावरे, प्राचार्या कृष्णा राठी तसेच अक्षता मोकाशी, योगेश कांबळे , आर्कि. श्रेयांक खेमलापुरे व आर्कि. अजय सोनार, अक्षय इंदलकर, अ

२३ वे ग्रामीण साहित्य संमेलन नाशिक मध्ये ! आयोजकांकडून संमेलनाची रुपरेषा जाहीर !!

इमेज
२३ वे ग्रामीण साहित्य संमेलन नाशिक मध्ये ! वाडीव-हे ::- इगतपुरी तालुका साहित्य मंडळाचे २३ वे ग्रामीण साहित्य संमेलन ५ व ६ नोव्हेंबर २०२२ मध्ये नाशिक येथे होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा जेष्ठ ग्रामीण साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली आहे.         हे दोनदिवसीय साहित्य संमेलन नाशिक येथील मानवधन सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या पाथर्डी फाटा येथील शैक्षणिक प्रांगणात आयोजित करण्यात येणार आहे.हे दोन दिवशीय साहित्य संमेलन सहा सत्रात संपन्न होणार असून ग्रंथ दिंडी, उद्घाटन सोहळा, निमंत्रितांचे कवी संमेलन, व्याख्यान, परिसंवाद, पुरस्कार वितरण, कथा कथन, खुले कवी संमेलन असा भरगच्च कार्यकम होणार असून सहित्यिकांनी या साहित्य संमेलनात अवश्य सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.       या अगोदर इगतपुरी तालुका साहित्य मंडळाने २२ ग्रामीण साहित्य संमेलन इगतपुरी तालुक्यातील विविध भागात भरवून अनेक नव सहित्यिकांना प्रेरणा देणारे ठरले आहे, यातून प्रेरणा घेवून अनेक साहित्यिक महाराष्ट्रात साहित्याची परंपरा जोपसत आहे. या साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील अनेक मान्यवर सहित्यिकांचा सहभाग असत

अंमलबजावणी व गुणवत्तेबद्दल केंद्रस्तरीय पथकाकडून जिल्ह्यातील गावांना भेटी !

इमेज
जलजीवन मिशन अंतर्गत केंद्रस्तरीय पथकाकडून जिल्हयातील गावांना भेटी ! ‍नाशिक- जल जीवन मिशन अंतर्गत अंमलबजावणी व गुणवत्तेबद्दल केंद्रस्तरीय पथकाकडून नाशिक जिल्हयातील ७ गावांची पाहणी करण्यात आली. या भेटीत गावातील कुटुंबस्तरावरील नळजोडणी, पाणीपुरवठा योजना, पाणी गुणवत्ता या बाबत पडताळणी करण्यात आली. दरम्यान, चांदवड तालुक्यातील सुतारखेडे गावातील कामांबाबत पथकाने समाधान व्यक्त करत कौतूक केले. देशातील प्रत्येक कुटुंबाला घरगुती स्तरावर नळाव्दारे नियमित, शुध्द व ५५ लिटर प्रतिमाणसी पाणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने जल जीवन मिशनची सुरुवात केलेली आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक महसुली गावातील १०० टक्के कुटुंबांना नळ जोडणी देऊन ५५ लिटर प्रतिमाणसी शुध्द व शाश्वत पाणी पुरवठा करावयाचा आहे. तसेच गावातील सर्व शाळा, अंगणवाडी, संस्था, सार्वजनिक ठिकाण यांना नळाव्दारे पाणी पुरवठा करावयाचा आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांचे काम सुरु आहे.  जलजीवन मिशन योजनेची अंमलबजावाणी कशाप्रकारे करण्यात येत आहे. याब

अभिनव कल्पनांमुळे उद्योजकांना प्रेरणा- केंद्रिय लघु व मध्यम उद्योग मंत्री ना. भानुप्रतापसिंह वर्मा यांचे प्रतिपादन.आर.डी. इन्फ्राचे राहुल देशमुख यांना इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड्स सन्मान !

इमेज
अभिनव कल्पनांमुळे उद्योजकांना प्रेरणा- केंद्रिय लघु व मध्यम उद्योग मंत्री ना. भानुप्रतापसिंह वर्मा यांचे प्रतिपादन. आर.डी. इन्फ्राचे राहुल देशमुख यांना इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड्स सन्मान !        नवी दिल्ली::- कनझूमर अँड इंडस्ट्रीज तर्फे इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड्स या पारितोषिकाने सुप्रसिध्द उद्योजक आरडी इन्फ्रा इक्विपमेंटचे व्यवस्थापकीय संचालक राहुल देशमुख यांना  केंद्रिय लघु व मध्यम उद्योग मंत्री ना. भानूप्रतापसिंह वर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.          या प्रसंगी व्यासपीठावर जमैकाचे राजदूत जासान हॉल, गयाणाचे राजदूत प्रसाद आदी मान्यवर उपस्थित होते.         दिल्ली येथील ताज पॅलेस येथे आशिया आफ्रिका बिझनेस अँड सोशल फोरम तर्फे झालेल्या कार्यक्रमात ना. वर्मा म्हणाले की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम आहे. यामुळे व्यापार उद्योगांना चालना मिळते आणि नव उद्योजकांना प्रेरणा देणारे ठरते असे सांगीतले. याप्रसंगी राहुल देशमुख यांनी सांगितले की सातत्याने अभिनव संकल्पनांचा पाठपुरावा केला तर उद्योगात यशस्वी होता येते. निर्यातक्षम उद्योगांच्या वि

राज्यातील पहिली टॅबलेट शाळा, जगातली तिसरी आणि भारतातील पहिली 'झिरो एनर्जी स्कूल' यासह विविध वैशिष्ट्यामुळे नावारुपाला आलेल्या ‘जिल्हा परिषद शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक दीपक खैरे यांना नेशन बिल्डर अवार्ड जाहीर !

इमेज
जिल्हा परिषद शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक दीपक खैरे यांना नेशन बिल्डर अवार्ड  जाहीर !  वाबळेवाडी शाळेच्या  शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ता.०३ (पुणे प्रतिनिधी)::- वाबळेवाडी शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक दीपक बबनराव खैरे यांना रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरचा नेशन बिल्डर अवार्ड  नुकताच जाहीर झाला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती रोटरी क्लब शिक्रापूरचे अध्यक्ष विरधवल करंजे, सचिव डॉ. मिलिंद भोसुरे आणि पब्लिक इमेज डायरेक्टर मनोहर परदेशी यांनी नुकतीच दिली.        रोटरी क्लब ऑफ शिक्रापूर एक सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. समाजात उत्कृष्ट सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा देण्याचे काम ही संस्था करत असते. दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिनाचे औचित्य साधून ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना जिल्हा परिषद शिक्षणाधिकऱ्यांच्या हस्ते नेशन बिल्डर अवार्ड  देऊन सन्मानित करते. यावर्षीही संस्थेच्या वतीने पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.              राज्यातील पहिली टॅबलेट शाळा, जगातली तिसरी आणि भारतातील पहिली

अपरिहार्य कारणास्तव दोन वेळा रद्द झालेले अधिवेशन आता १९, २० नोव्हेंबरला पिंपरी चिंचवड येथे होणारच- देशमुख

इमेज
 अपरिहार्य कारणास्तव दोन वेळा रद्द झालेले अधिवेशन आता १९, २० नोव्हेंबरला पिंपरी चिंचवड येथे होणारच- देशमुख     मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे अधिवेशन आता १९,२० नोव्हेंबर रोजी पिंपरी - चिंचवड येथे होणार-एस.एम देशमुख        पुणे दि. २ : मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन १९ आणि २० नोव्हेंबर २०२२ रोजी पिंपरी - चिंचवड येथे होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी आज येथे केली.       मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुणे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने कृषी महाविद्यालयात आज एस.एम देशमुख यांच्या हस्ते शरद पाबळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी एस.एम देशमुख बोलत होते. कार्यक्रमास राज्यभरातून तसेच जिल्ह्यातून पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.       सलग दोन वेळा काही अपरिहार्य कारणास्तव अधिवेशन रद्द करावे लागले होते त्यामुळे राज्यातील पत्रकारांची जी गैरसोय झाली त्याबद्दल एस.एम.देशमुख यांनी दिलगीरी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवडचे अधिवेशन ठरलेल्या तारखेला होईल आणि त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत बदल होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. २०१५ मध

बाल विकास सेवा योजना प्रकल्पांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव !

इमेज
राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२२ शुभारंभ बाल विकास सेवा योजना प्रकल्पांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव नाशिक - सन २०१८ मध्ये मा. पंतप्रधान कार्यालयाचा महत्वपूर्ण कार्यक्रम म्हणून महिला व बाल विकास विभागांतर्गत पोषण अभियान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांचे आरोग्य व पोषण या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सदर कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता शासनाच्या इतर विभागांमध्ये समन्वय व अभिसरण राखण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येते.         महिला व बालकांच्या आरोग्य व पोषण विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याकरिता जनजागृती हा घटक महत्वपूर्ण ठरतो. समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्याकरिता पोषण अभियानांतर्गत दरवर्षी पोषण महिना व पोषण पंधरवडा साजरा करण्यात येतो व या उपक्रमांद्वारे जन आंदोलनातून समाजामध्ये जागृती घडवून आणण्याकरिता प्रयत्न केला जातात. या वर्षी सप्टेंबर २०२२ हा महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देशित केलेले असून सदर कार्यक्रमात लोकांचा सक्