पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी समूह वारली चित्रप्रदर्शनाचे उद्धाटन!

इमेज
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी होणार समूह वारली चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन !       नाशिक ( प्रतिनिधी ) - येथील वारली आर्ट फाउंडेशनतर्फे दि. १ ते ८ मे दरम्यान समूह वारली चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन रविवारी दि. १ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक व रंगकर्मी सतीश मोहोळे उपस्थित राहणार आहेत. पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे नाशिकरोड येथे पासपोर्ट ऑफिसशेजारी शोरूम आहे. त्याठिकाणी वातानुकूलित कलादालन तयार करण्यात आले आहे.तेथेच हे चित्रप्रदर्शन भरविण्यात येत आहे. नाशिककर रसिकांना उत्तम वारली चित्रे बघण्याची व खरेदी करण्याची यानिमित्ताने संधी मिळेल.    यासंदर्भात प्रदर्शनाचे संयोजक वरिष्ठ पत्रकार व वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर यांनी माहिती दिली. समूह वारली चित्रप्रदर्शनात अपूर्वा भंडारे, स्नेहल बंकापुरे, शुभश्री चित्राव, विलास देवळे, सुप्रिया देवधर, गौरवी घोडके, हर्षदा माळी, आबा मोरे, सोमेश्वर मुळाणे, पद्मजा ओतूरकर, रविंद्र वैष्णव

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी होणार समूह वारली चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801 समूह वारली चित्रप्रदर्शनाचे रविवारी दि.१ मे रोजी उद्घाटन !    नाशिक ( प्रतिनिधी ) - येथील वारली आर्ट फाउंडेशनतर्फे दि. १ ते ८ मे दरम्यान समूह वारली चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन रविवारी दि. १ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक व रंगकर्मी सतीश मोहोळे उपस्थित राहणार आहेत. पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे नाशिकरोड येथे पासपोर्ट ऑफिसशेजारी शोरूम आहे. त्याठिकाणी वातानुकूलित कलादालन तयार करण्यात आले आहे.तेथेच हे चित्रप्रदर्शन भरविण्यात येत आहे. नाशिककर रसिकांना उत्तम वारली चित्रे बघण्याची व खरेदी करण्याची यानिमित्ताने संधी मिळेल.         यासंदर्भात प्रदर्शनाचे संयोजक वरिष्ठ पत्रकार व वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर यांनी माहिती दिली. समूह वारली चित्रप्रदर्शनात अपूर्वा भंडारे, स्नेहल बंकापुरे, शुभश्री चित्राव, विलास देवळे, सुप्रिया देवधर, गौरवी घोडके, हर्षदा माळी, आबा मोरे, सोमेश्वर मुळाणे, पद्मजा ओतूरकर, रविंद्र वैष्णव, मंगला वाघमार

मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक होण्यासाठी आवाहन !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801         मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक होण्यासाठी आवाहन !           मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जोगेश्वरी पूर्व मेघवाडी येथे "मराठा सामाजिक संस्थेच्या" वतीने मराठा पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 'विषय गंभीर तिथे मराठा खंबीर' या उक्तीप्रमाणे मराठा समाजानेही जुन्या चालीरीती संस्कृती परंपरेत न अडकता गुजराती मारवाडी सिंधी लोकांप्रमाणे उद्योगात यशस्वी झाले पाहिजे. त्यासाठी "रिस्क" ही घेतलीच पाहिजे. शिवरायांनी बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले होते तसेच आता त्यांचीच विचारधारा पुढे चालवत उद्योगक्षेत्रात जिद्दीनं उभे राहणे गरजेचे आहे असे आवाहन बैठकीत करण्यात आले. बैठकीत मराठा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव सुर्वे, उपाध्यक्ष सुहास तावडे, कार्यवाहक संदीप भोसले, अश्विनीताई भोसले, कैलास येरुणकर, साक्षीताई घोसाळकर, उद्योग आणि सहकार विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल कदम यांनी नवउद्योग करणाऱ्य

"मुंबईकर" महाराष्ट्रदिनी आपल्या भेटीला ! मी मुंबईकर... मै मुंबईकर... दुनिया में कोई नहीं मुझसे बेहतर… हालात हों जैसे भी मै सिकंदर... !!

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक    ‘मुंबईकर’ महाराष्ट्रदिनी मुंबईकरांच्या भेटीला !         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : 'मुंबईकर’ ही मुंबईत राहणार्‍या माणसाला अभिमानास्पद अशी पदवीच वाटते. सार्‍या भारतातच नव्हे तर जगात अनेक ठिकाणी ही ओळख ठळकपणे आपलं अस्तित्व दाखवते. मुंबईचं श्रीमंतीचं, ग्लॅमरचं वलय आपसुक मिळत असलं तरी, मुंबईकर हा माणूस म्हणून स्वतःची वेगळी ओळख असलेला आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंचं वर्णन करणाऱ्या ‘मुंबईकर’ या हिंदी गाण्याचा म्युझिक व्हिडिओ १ मे या महाराष्ट्रदिनी रसिकांसमोर मिथिलेश पाटणकर या यूट्यूब चॅनेलवर आणि ऑडिओ इतर सर्व प्रमुख ऑडिओ प्लॅटफॅार्मस् वर प्रसिद्ध होत आहे.           या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार डॉ. प्रमोद बेजकर आहेत. मिथिलेश विश्वास पाटणकर यांनी या गाण्याचं संगीत संयोजन आणि गायन केलं आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे, यात एक रॅप गाण्याचा भाग आहे, जो मिथिलेश यांनीच लिहिला असून, एका वेगळ्याच शैलीदार आवाजात गायला आहे. या गाण्याच्या व्हिडिओत, मुंबईची ओळख म्हणून प्रसिद्ध असलेली अनेक स्थळं पहायला मिळतील. तसंच मुंबईत विविध व्यवसाय करणारे देखिल आपण

ब्रम्हाकुमारीज् संस्थेच्या वतीने व्यक्तिमत्व विकास शिबिराचे यशस्वी आयोजन !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक   ब्रम्हाकुमारीज् संस्थेच्या वतीने व्यक्तिमत्व विकास शिबिराचे यशस्वी आयोजन !             नासिक::-ब्रम्हाकुमारीज् संस्थेच्या मुल्य शिक्षण ह्या विभागाद्वारे गंगापूर रोड नासिक येथील कॉमर्स मैनेजमेंट कम्प्युटर सायन्स कॉलेज येथे विद्यार्थांसाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर पाच दिवसीय कोर्स चे आयोजन करण्यात आले होते.          ब्रम्हाकुमारीज् संस्थेचे विकास साळुंके व प्राध्यापक सतिश भदाणे यांनी ब्रम्हाकुमारी वासंती दिदीजींच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे, प्राध्यापिका डॉ. वावीकर यांनी सहकार्य केले.           ब्रम्हाकुमारीज् गंगापूर रोड सेवा केंद्र संचालिका मनिषा दिदी यांनी विद्यार्थ्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर मार्गदर्शन करताना, सकारात्मक विचार, इमोशनल स्टॅबिलिटी, निर्णय शक्ती व एकाग्रता वाढवण्यासाठी टिप्स देताना विद्यार्थ्यांना गाईडेड मेडिटेशन चा अनुभव करवला. सोनी तर्वे यांनी गीतगायन केले. सुरेश साळुंके, तृप्ती देवरे, सतिश भदाणे, विकास साळुंके यांनीही विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास याविषयी सकारात्मक मार

मुंबई दूरदर्शन च्या वतीने प्रेक्षकांना 'शब्दसूरांचा जादूगार संगीतकार,,,,,,," या लघुपटाची दि. ६ व ७ मे रोजी अनोखी भेट !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक  मुंबई दूरदर्शन च्या वतीने प्रेक्षकांना 'शब्दसूरांचा जादूगार संगीतकार,,,,,,," या लघुपटाची दि. ६ व ७ मे रोजी अनोखी भेट ! `संगीतकार अशोक पत्की' लघुपटाचे दूरदर्शनवर ६ व ७ मे रोजी प्रसारण मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई दूरदर्शनच्या वतीने `शब्दसूरांचा जादूगार संगीतकार अशोक पत्की' या लघुपटाची निर्मिती केली आहे. त्याचे प्रसारण शुक्रवार दिनांक ६ मे रोजी सायंकाळी साडे सात वाजता आणि शनिवार दिनांक ७ मे रोजी दुपारी १.३० व रात्री १०.३० वाजता होईल. दूरदर्शनच्या माजी सहाय्यक संचालक निर्मात्या डॉ. किरण चित्रे यांनी त्याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. यासाठी दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक नीरज आगरवाल यांचे सहकार्य मिळाले आहे.          अशोक पत्की हे संगीत विश्वातलं मोठं नाव, शास्त्रशुद्ध पद्धतीने संगीताचे शिक्षण न घेताही स्वकर्तृत्वाच्या बळावर त्यांनी संगीत क्षेत्रात अफाट आणि वैविध्यपूर्ण काम केले आहे. त्यांच्या सांगितिक जीवनाची यशोगाथा रसिकांसमोर यावी, यासाठी या लघुपटाचे संकलन प्रफुल्ल मोहिते यांनी केले आहे तर संकलन प्रमुख शुभांगी सावंत यांनी समन्वयकाची जबाबदारी

पर्यटनाची मार्गदर्शक 'कार' कीर्द ! माझा कार प्रवास !!

इमेज
पर्यटनाची मार्गदर्शक 'कार' कीर्द !                 (पुस्तक परीक्षण)    पर्यटनाचे महत्त्व समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात देखील सांगितले आहे. सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी पर्यटनाचा चांगला उपयोग होतो. देशाच्या विविध भागातील संस्कृती, इतिहास, निसर्ग सौंदर्य, तेथील जीवनशैली, खाद्यविशेष यांची पर्यटनामुळेच ओळख होते. पर्यटन केवळ मौजमजा, विरंगुळा, मनोरंजन इतक्यापुरतेच मर्यादित नाही. आपल्या भारतात विविधतेतली एकता बघायला मिळते. गड-कोट, मंदिरे, लेणी, समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणे अशा अनेक ठिकाणी पर्यटकांची कायम गर्दी असते. साहसी पर्यटन देखील केले जाते. आपल्या आनंदासाठी कारने प्रवास करणाऱ्या पर्यटकांना ' माझा कार प्रवास ' हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.     अमरावतीचे विजय पाटणे पर्यटनप्रेमी आहेत. त्यांनी कारमधून प्रवास करून महाराष्ट्रासह बव्हंशी सारा देश पिंजून काढला. शेजारच्या नेपाळलाही ते कारने प्रवास करूनच भेट देऊन आले. 'माझा कार प्रवास' या पुस्तकामधले या सर्व भटकंतीचे वर्णन वाचताना वाचकांना नक्कीच प्रवासाची अनुभूती मिळेल. 'बीएसएनएल'मध्ये उपविभागीय अभियंता पदावरू

राष्ट्रीय पंचायती राज दिवसानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण ! या दोन ग्रामपंचायतींचा होणार गौरव !

इमेज
राष्ट्रीय पंचायती राज दिवसानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण !     पंचायती राज दिनी ग्रामसभांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वेबिनारद्वारे करणार मार्गदर्शन !           नाशिक जिल्ह्यातील पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती मोडाळे ता.इगतपुरी व  दरी ता. नाशिक यांचा होणार गौरव बक्षिसाची रक्कम PFMS द्वारे थेट ग्रामपंचायतींना होणार वितरित.          नाशिक - २४ एप्रिल हा दिवस देशपातळीवर पंचायती राज दिवस म्हणून साजरा केला जातो, त्या अनुषंगाने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा आयोजन करण्यात येणार असून राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या निमित्ताने प्रधानमंत्री देशातील सर्व नागरिकांना वेबिनारद्वारे संबोधित करणार आहेत. या दिवशी उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्था व ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.       देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या पंचायती राज दिवस कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीस ऑनलाईन पद्धतीने नोंदणी आवश्यक असल्याने खालील वेब लिंक नोंदणी करावी आणि २४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२:०० वा. नियोजित राष्ट्र

कामकाजात अनियमितता व दोषारोप सिद्ध झाल्याने दोन ग्रामसेवकांचे निलंबन !

इमेज
कामकाजात अनियमितता : दोन ग्रामसेवक निलंबित ! दोषारोप सिद्ध झाल्याने केले निलंबन ! नाशिक - जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्रीमती लीना बनसोड यांनी ग्रामपंचायत कोटंबी (ह), ता. त्र्यंबकेश्वर येथील ग्रामसेवक पांडुरंग जाणु खरपडे यांना १० दोषारोपावरुन व ग्रामपंचायत कोमलवाडी, ता. सिन्नर येथील ग्रामसेवक राजेंद्र भाऊराव निकम यांना ०३ दोषारोपावरुन निलंबित केले आहे.           पांडुरंग जाणु खरपडे हे ग्रामपंचायत कोटंबी (ह), ता. त्र्यंबकेश्वर येथे कार्यरत असुन त्यांच्याविरुध्द कार्यालयीन कामकाजाबाबत ग्रामस्थांनी लेखी तक्रार अर्ज सादर केलेले होते. त्यानुसार आर. आर. बोडके प्रशासक यांनी दिनांक ३ नोव्हेंबर २१ व १२ जानेवारी २२ रोजी भेट दिली असता खरपडे हे गैरहजर असल्याचे आढळून आले. तसेच खरपडे वारंवार अनधिकृत गैरहजर असल्यामुळे ग्रामस्थांना शासकीय दाखले वेळेत न मिळणे, ग्रामस्थांना पाणी न मिळणे, कोटंबी हे गांव आदिवासी क्षेत्रात येत असुन पेसा व इतर आदिवासी योजनांपासुन गावास वंचित ठेवणे, ग्रामसभा न घेणे, पाणी शुध्दीकरणासाठी टीसीएल पावडर संपल्यानंतर नवीन साठा उपलब्ध करुन न देणे, गावांत ३

शाश्वत विकासाचा संकल्प,. गरिबीचे उच्चाटन, पृथ्वीच्या रक्षणाची शपथ !

इमेज
ग्रामपंचायतींकडून शाश्वत विकासाचा संकल्प पंचायत राज दिनी ग्रामसभेत होणार ठराव : गरिबीचे उच्चाटन, पृथ्वीच्या रक्षणाची शपथ नाशिक : गरिबीचे उच्चाटन करणे, पृथ्वीच्या रक्षण करणे आणि २०३० पर्यंत सर्व नागरिकांना शांतता व समृध्दी प्राप्त करून देणे, यासाठी पंचायत राज संस्था कटिबध्द असून येत्या  २४ एप्रिल २०२२ रोजी प्रत्येक ग्रामपंचायत शाश्वत विकासाचा संकल्प सोडणार आहे, तसेच केंद्र सरकारच्या व्हायब्रंट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्ड वर याबाबतची माहिती प्रसिध्द केली जाणार आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत केंद्र शासनाने नव्याने सुधारणा केली आहे त्यानुसार सन २०२२-२३ पासून शाश्वत विकासाच्या ध्येयाची पंचायत राज यंत्रणेमार्फत प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. शाश्वत विकासाच्या दृष्टीने जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र संघाने जी ध्येये निश्चित केली आहेत, ती साध्य करण्यासाठी पंचायत राज संस्थांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे. जागतिक स्तरावर निश्चित करण्यात आलेल्या १७ पैकी ९ संकल्पना / विषय (Themes) केंद्र शासनाने निश्चित केल्या आहेत. *******************************         या संकल्पना खालील प्रमाणे : 

अनिल आव्हाड यांची आय. एम. ए. च्या अध्यक्षपदी निवड !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा,.                                     डॉ. अनिल आव्हाड यांची आय. एम. ए. मुंबईच्या अध्यक्षपदी निवड ! मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : काळाचौकी विभागातील सुप्रसिद्ध डॉ. अनिल आव्हाड यांची इंडियन मेडिकल असोसिएशन, मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा पदग्रहण समारंभ मुंबई हाजीअली येथील "आय एम ए हाऊस" येथे संपन्न झाला. आय एम ए दिल्लीचे सेक्रेटरी जनरल डॉ. जयेश लेले हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आय एम ए महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.  अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल आव्हाड यांनी त्यांच्या पुढील वर्षातील योजनांबद्दल माहिती दिली. वैद्यकीय व्यावसायिकांची जनमानसातील प्रतिमा उंचावणे, डॉक्टरांचे वैयक्तिक आरोग्य व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य यांचे महत्त्व ओळखून ते उत्तम राखण्यासाठी नवीन योजना आखणे, डॉक्टरांच्या मनावरील मानसिक ताण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना करणे; ज्यामध्ये वेगवेगळे खेळ, संगीत आणि पर्यटन याचा समावेश असेल असे विविध कार्यक्रम राबविण्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

माॅ का दूध तो सभीं ने सुना होगा लेकीन "बाप का दूध" प्रस्तूत करणारे, "शव यात्रा पर हास्य कविताएं" ऐकवणारे जेव्हा दुकानदाराला विचारतात "अंडे कैसे दिये ?" (१२ एप्रिल)वजनदार हास्यकवी अर्थातकविसंमेलनाचे फड गाजवणारे कवि प्रदीप चौबे यांचा स्मृतिदिन !

इमेज
माॅ का दूध तो सभीं ने सुना होगा लेकीन "बाप का दूध" प्रस्तूत करणारे, "शव यात्रा पर हास्य कविताएं" ऐकवणारे जेव्हा दुकानदाराला विचारतात "अंडे कैसे दिये ?"    (१२ एप्रिल) वजनदार हास्यकवी अर्थात कविसंमेलनाचे फड गाजवणारे कवि प्रदीप चौबे यांचा स्मृतिदिन !                                                     १२ एप्रिल, आपल्या विनोदी काव्यरचनांनी रसिकांना रिझविणारे हिंदी हास्यकवी प्रदीप चौबे यांचा तिसरा स्मृतिदिन. तीन वर्षापूर्वी १२ एप्रिलला चौबे यांचे दिर्घ आजाराने वयाच्या ७१ व्या वर्षी ग्वालियर येथे निधन झाले होते. २६ ऑगस्ट १९४९ ला महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे जन्मलेल्या आणि नंतर ग्वालियर येथे वास्तव्यास असलेले प्रदीप चौबे अखिल भारतीय हिंदी कविसंमेलनाचे बेताज बादशहा होते. व्यंगकार, कवि आणि गीतकार प्रदीप चौबे  आपल्या हास्य कवितांना नेहमीच टीकात्मकतेची जोड देऊन तत्कालीन परिस्थितीवर व्यंगात्मक भाष्य करायचे. हिंदी हास्य कविसंमेलनांचा फड गाजवणारे कवी प्रदीप चौबेंना चाहत्यांचे अलोट प्रेम लाभले होते. ते काव्य मैफिलीत नेहमीच हास्याची कारंजी उडवत असत. त्यांच्याशिवाय कोणतेह

जलजीवन अभियान-हर घर जल अंतर्गत महाराष्ट्रात ७० टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहचले-प्रल्हादसिंग पटेल

इमेज
जलजीवन अभियान-हर घर जल अंतर्गत महाराष्ट्रात ७० टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहचले-प्रल्हादसिंग पटेल.          नवी दिल्ली::- जलजीवन अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण घरांमध्ये  ७०% नळाद्वारे पाणी पोहचविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील एकूण १४६.०९ लाख घरांपैकी १०३.५४ लाख म्हणजे ७०.८८% घरांमध्ये  ०४ एप्रिल २०२२ रोजीपर्यंत नळाच्या पाण्याची जोडणी  पोहोचली आहे. जल जीवन अभियान  २०१९ घोषित झाले तेव्हा महाराष्ट्रातील केवळ ४८.४४ लाख म्हणजे ३३ टक्के ग्रामीण घरात नळाच्या पाण्याच्या जोडण्या होत्या. त्यानंतर पाण्यासाठीच्या नळजोडणीत  ५५.१० लाख म्हणजे ३७.७२ टक्के घरांची भर पडली. अशी माहिती जलशक्ती मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. ******************************* जलजीवन अभियान- महाराष्ट्रासह देशाच्या प्रत्येक राज्यातील ग्रामीण भागात २०२४ पर्यंत नळाचे पाणी पोचवण्यासाठी केंद्र सरकार ऑगस्ट २०१९ पासून ‘जलजीवन अभियान- हर घर जल’ राज्यांसोबतच्या भागीदारीतून राबवत  आहे. ********************************* नासिक जिल्ह्यात "जलजीवन अभियान-हर घर जल&

ध्रुव शाखा हा सर्वांना जोडणारा अतूट धागा - डॉ. गोविलकर

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा,  ध्रुव शाखा हा सर्वांना  जोडणारा अतूट धागा आनंदमेळाव्यात डॉ. गोविलकर यांचे प्रतिपादन                         नाशिक ( प्रतिनिधी ):- शताब्दीकडे झेपावणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शहर संघचालकपदाचे दायित्व निभावणे ही मोठी जबाबदारी आहे. डॉ.विजय मालपाठक यांची निवड ते सार्थ ठरवतील व कौशल्याने नेतृत्व करतील. कारण ध्रुव शाखेचे पाठबळ त्यांना असून तो सर्वांना जोडणारा अतूट धागा आहे असे प्रतिपादन श्रीगुरुजी  रुग्णालयाचे अध्यक्ष व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी केले. ते ध्रुव शाखेच्या आनंदमेळाव्यात बोलत होते.      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ध्रुव शाखेने दोन वर्षांपूर्वी ५० वर्षे पूर्ण केली. मात्र कोरोनाच्या  लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष शाखा व गाठीभेटी झाल्या नाहीत. रामनवमीच्या निमित्ताने रविवारी नानाराव ढोबळे सभागृहात आनंदमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी नूतन शहरसंचालक डॉ. विजय मालपाठक यांचा सत्कार प्रांत संघचालक नाना जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. विनायक गोविलकर उपस्थित होते. ते म्हणाले, डॉ. मालपाठक यांच्यारूपाने योग्य व्यक्ती

एका दिवसात जगप्रसिद्ध व लोकप्रिय वारली चित्रकला शिकण्याची संधी !

इमेज
फक्त एका दिवसात वारली चित्रकला शिका !         नाशिक ( प्रतिनिधी )  जगप्रसिद्ध व लोकप्रिय वारली चित्रकला शिकण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. दि. १४ ते १७ एप्रिल दरम्यान एकदिवसीय वारली चित्रकार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ५ ते ७५ या वयोगटातील कलाप्रेमींना त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवशी कार्यशाळेत सशुल्क सहभागी होता येईल. सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत होणाऱ्या या कार्यशाळेत वारली चित्रशैली तज्ज्ञ संजय देवधर मार्गदर्शन करणार आहेत. सोनिया अपार्टमेंट, इंद्रकुंड, पंचवटी, नाशिक येथे कार्यशाळा होईल. सहभागी होणाऱ्या सर्वांना आवश्यक सर्व साहित्य व सर्टिफिकेट दिले जाईल. नावनोंदणीसाठी आजच ९४२२२७२७५५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

अकरा विद्यार्थ्यांना हजारो रुपयांचे कोर्सेस मोफत देण्यात आले ! उद्याही करियर मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, 7387333801, करियर मार्गदर्शन कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद  !       नासिक (प्रतिनिधी)::-केटीएचएम महाविद्यालय माजी विद्यार्थी संघातर्फे आयोजित दोन दिवसीय करियर गायडन्स सेमिनारचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त प्रतिसादात संपन्न झाला, ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. याप्रसंगी केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही. बी. गायकवाड  यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांविषयी माहिती दिली.           कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रा. सीए लोकेश पारख यांनी कॉमर्स व स्पर्धा परीक्षा क्षेत्रांमध्ये झालेले बदल व विद्यार्थ्यांसाठी असलेल्या नवीन संधींविषयी माहिती दिली. प्रा. माधवी पगारिया यांनी ॲनिमेशन व कंप्यूटर संबंधित विविध कोर्सेसची तर प्रा. समीना शेख यांनी सायन्स मधील करिअरच्या संधी याविषयी माहिती दिली      उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू सोबतच ॲनिमेशन, बेसिक ऑफ कॉमर्स व बेसिक ऑफ सायन्स संदर्भात कोर्सेस मोफत देण्यात आले.                 लकी ड्रॉ द्वारे उपस्थित विद्यार्थ्यांपैकी अकरा विद्यार्थ्यांना हजारो रुपयांचे कोर्सेस

सुनील गोसावी यांना वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे ग्रंथ पुरस्कार घोषित !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, 7387333801, सुनील गोसावी यांना वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे ग्रंथ पुरस्कार घोषित !   अहमदनगर :  (वार्ताहर )येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त  सुनील गोसावी यांना वाचन संस्कृती प्रबोधन उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.    अहमदनगर येथील शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक, सचिव सुनील राम गोसावी यांच्या 'आठवणींचा डोह 'ह्या आत्मपर ग्रंथास हा पुरस्कार घोषित करण्यात आला, राष्ट्र सह्याद्री मध्ये माझ्या मनातलं या लेखमाले द्वारे सुनील गोसावी यांनी आपला जीवनप्रवास उलगडून दाखवला होता, साडेतीन महिने चाललेल्या या लेखमालेचे "आठवणींचा डोह" हे पुस्तकं नुकतेच पद्मश्री  पोपटराव पवार, आमदार लहू कानडे, कॉ भालचंद्र कांगो, प्रा डॉ प्रल्हाद लुलेकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले आहे,    प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक माजी प्राचार्य टी. ई. शेळके, संस्थापक,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये, उपाध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे, कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये, ग्रंथ परीक्षक डॉ. शिवाजी काळे, डॉ. रामकृष्ण जगताप, उपाध्यक्ष संगीता फासाटे, प्रा. शि

सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचार्‍यांच्या संघटनेची पुनर्रचना !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, ७३८७३३३८०१ सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचार्‍यांच्या संघटनेची पुनर्रचना ! अध्यक्षपदी विश्वास रणदिवे, सचिवपदी शशिकांत सपकाळ           मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचारी संघटनेशी संलग्न सार्वजनिक बांधकाम विभाग व आमदार निवास येथील चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या संघटनेची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यावेळी राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि मूंबई जिल्हा संघटनेचे सरचिटणीस प्रकाश बने यांच्या मार्गदर्शनाबरोबरच नवनियुक्त सदस्यांचा सत्कार समारंभदेखील फोर्ट येथील बांधकाम भवन येथे आयोजित करण्यात आला. संघटनेच्या अध्यक्षपदी विश्वास रणदिवे आणि सचिवपदी शशिकांत सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे.          यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता, उप-अभियंता, शाखा अभियंता व इतर वरीष्ठ पदाधिकारी तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने, कार्यालय सचिव बाबाराम कदम, कार्यालय प्रमुख मनोहर दिवेकर, कार्यालय सहाय्यक कृष्णा भरडे त्याचप्रम

जल जीवन अभियान आणि स्वच्छ भारत अभियान ची प्रगती आणि पुढील आराखडा यांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने उद्या प्रादेशिक परिषदेचे आयोजन !

इमेज
केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या ८ एप्रिल २०२२ रोजी जयपूर येथे देशातील ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची प्रादेशिक परिषद आयोजित ! जल जीवन अभियान आणि स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) या अभियानांची प्रगती आणि पुढील आराखडा यांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने या प्रादेशिक परिषदेचे आयोजन ! नवी दिल्ली::- जल जीवन अभियान आणि स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) या अभियानांची प्रगती आणि पुढील आराखडा यांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने उद्या ८ एप्रिल २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षपद केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत भूषविणार आहेत. या प्रादेशिक परिषदेत सहभागी होणाऱ्या ८ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, लडाख, दमन आणि दीव तसेच दादरा आणि नगर हवेली यांचा समावेश आहे. या परिषदेला ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० राज्यातील  जल मंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. अत्यंत महत्त्वाच्या अशा या दोन्ही सरकारी अभियानांनी प्रत्येक र

तांत्रिक अडचणीमुळे ५३.१२ कोटींचा निधी शासनास परत !

इमेज
न्यूज मसाला, नासिक ७३८७३३३८०१ केवळ तांत्रिक अडचणीमुळे ५३.१२ कोटींचा निधी शासनास परत !--जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी नाशिक दिनांक ७ (जिमाका)::- जिल्हा नियोजन अधिकारी किंवा जिल्हा नियोजन समिती कार्यालयामार्फत जिल्हा नियोजनाचा निधी शासनास परत जाण्याबाबत कोणतेही अधिकृत वृत्त प्रसिद्धीसाठी देण्यात आलेले नाही. तसेच केवळ तांत्रिक अडचणींमुळे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचा ५३.१२ कोटी रुपयांचा निधी शासनास परत गेला असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी कि. बा. जोशी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.         याबाबत जिल्हा नियोजन अधिकारी जोशी यांनी दिलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्याप्रमाणे, जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबत जिल्हा नियोजन अधिकारी किंवा जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती अथवा बातमी देण्यात आलेली नाही. परंतु काही वृत्तपत्र व प्रसार माध्यमांमध्ये जिल्हा नियोजन अधिकारी व जिल्हा नियोजन कार्यालय यांचा स्त्रोत म्हणून संदर्भ देवून अनधिकृत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बीडीएस स्लिप न निघणे किंवा बीडीएस प्रणालीवर निधी वितरीत करता न येणे

नव्या आर्थिक वर्षाची जोषात सुरुवात !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, 7387333801. नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात जोषात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : चलनवाढीचा दबाव रोखण्यासाठी जागतिक स्तरावर केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढवण्याचे काम सुरू केले आहे. तथापि, भारताने आतापर्यंत अधिक अनुकूल धोरण ठेवले आहे. आर्थिक धोरण कडक केल्याने मागणी कमी होण्यास मदत होईल परंतु पुरवठा वाढविण्यात मदत होणार नाही. अमेरिकेने देशाच्या धोरणात्मक तेल साठ्यात मोठ्या प्रमाणात सोडण्याची घोषणा केल्यामुळे आणि रशियाने भारताला मोठ्या सवलतीत कच्च्या तेलाची ऑफर दिल्याने चलनवाढीच्या संदर्भात नवीन आशावाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी यांच्या विलीनीकरणाच्या घोषणेने देशांतर्गत बाजाराने उसळी घेतली. बाजाराचे आगामी लक्ष कमाईचे अहवाल आणि या आठवड्यात आरबीआयच्या बैठकीवर असेल.  सेन्सेक्स १,३३५.०५ अंकांनी किंवा २.२५% वर ६०,६११.७४ वर होता आणि निफ्टी ३८२.९५ अंकांनी किंवा २.१७% वर १८,०५३.४० वर होता. सुमारे २५३४ शेअर्स वाढले आहेत, ७९६ शेअर्समध्ये घट झाली आहे आणि ११८ शेअर्स अपरिवर्तित आहेत.  एचडीएफसी बँक, एचडीएफसी, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी लाइफ आणि कोटक महिंद्रा बँक हे

अत्यावश्यक बाब,,,,,,,,,,,,,,,,, मानीव अभिहस्तांरणासाठी विशेष मोहिम ! सहकारी गृहनिर्माण संस्थांना ३० एप्रिल पर्यंत करता येणार नोंदणी- डॉ. सतिश खरे

इमेज
मानीव अभिहस्तांरणासाठी विशेष मोहिम; सहकारी गृहनिर्माण संस्थांना ३० एप्रिल पर्यंत करता येणार नोंदणी- डॉ. सतिश खरे   नाशिक, दिनांक: ४ (जिमाका वृत्तसेवा)::-राज्यात सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणासाठी १ ते ३० एप्रिल २०२२ दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी बाकी आहे अथवा विकासकाकडून नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीखालील जमिनीचे संस्थेच्या नावे हस्तांतरण करण्यात आलेले नाही. अशा संस्थांनी ३० एप्रिल २०२२ पर्यंत नोंदणी करावी असे, सहकारी संस्थचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतिश खरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.          जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांना अपार्टमेंट अॅक्ट १९७० अंतर्गत अपार्टमेंट मधील फ्लॅट व युनिट धारकांना देखील सदर योजनेचा लाभ घेता येणार आहे. या मोहिमेंतर्गत नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट ओनशिप अॅक्ट अन्वये नोंदविण्यात आलेल्या अपार्टमेंट मधील सदनिका तसेच युनिट धारकांनी स्थावर मिळकतीचे हस्तांतरण संस्थेच्या नावे करुन घ्यावे, असे आवाहनही जिल्हा

आजपासून राष्ट्रीय महिला आयोगाकडून मानव तस्करीविरोधी विभाग सुरू !

इमेज
आजपासून राष्ट्रीय महिला आयोगाकडून मानव तस्करीविरोधी विभाग सुरू !            मानवी तस्करीची प्रकरणे हाताळताना परिणामकारकता सुधारणे, महिला आणि मुलींमध्ये जागरूकता वाढवणे, तस्करीविरोधी कक्षांची क्षमता बांधणी करणे आणि प्रशिक्षण देण्यासह कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांचा प्रतिसाद वाढवण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महिला आयोगाने आज मानव तस्करीविरोधी विभाग सुरू केला.            कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांमध्ये जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या  क्षमता बांधणीसाठी  सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या विभागाची स्थापना करण्यात आली आहे. मानवी तस्करी रोखण्यासाठी हा विभाग  प्रादेशिक, राज्य आणि जिल्हा स्तरावर पोलिस अधिकारी आणि अभियोक्त्यांसाठी लैंगिक संवेदना प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करेल. आयोगाला प्राप्त होणाऱ्या मानवी तस्करीशी संबंधित तक्रारींचे या विभागामार्फत निराकरण केले जाईल.              मानवी तस्करीविरोधात लढताना भेडसावणाऱ्या काही प्रमुख समस्यांमध्ये पीडितांच्या पुनर्वसनाचा अभाव आणि तस्करीची झळ पोहोचल्यानंतर त्यातून सुटका करण्यात आलेल्यांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबिय

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, 7387333801 अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल !    अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी दिलीप खैरे ,  बाळासाहेब कर्डक ,  अंबादास गारूडकर , अॅड.  सुभाष राऊत ,  तुकाराम बिडकर यांच्यासह प्रा.दिवाकर गमे यांची वर्णी !           नाशिक,  दि. २ एप्रिल :-  राज्याचे अन्न ,  नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आलेले आहे. त्यानुसार प्रदेश उपाध्यक्षपदी दिलीप खैरे ,  बाळासाहेब कर्डक ,  अंबादास गारूडकर ,  अॅड.सुभाष राऊत ,  तुकाराम बिडकर यांच्यासह प्रा.दिवाकर गमे यांची वर्णी लावण्यात आली आहे.             अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची नुकतीच राज्यस्तरीय आढावा बैठक मुंबई येथे पार पडली. सदर बैठकीत कार्यकारिणी बाबत चर्चा होऊन कार्यकारिणीत फेरबदल करण्याच्या सूचना राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या. त्यानुसार माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये सुधारणा !अक्रियाशील सदस्याची तरतुद रद्द !!

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये  सुधारणा ! अक्रियाशील सदस्याची तरतुद रद्द !!           मुंबई, दि.१:-  राज्यातील अंदाजीत दोन लाख सहकारी संस्थांशी जवळ जवळ पाच कोटी लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संबंधित असणा-या सभासदांच्या  हितार्थ आणि सहकार चळवळीच्या सुरळीत कामकाजासाठी सहकारी संस्थांचे नियंत्रण  व संनियंत्रण करणा-या  महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये सुधारणा करून यामध्ये अक्रियाशील सदस्याची तरतुद रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे असंख्य सहकारी संस्थांच्या सभासदांना दिलासा मिळाला आहे.             या सर्व सहकारी संस्थांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये नियंत्रण  व संनियंत्रण ठेवण्यात येते. सन २०१३ मध्ये केंद्र सरकारने ९७ वी घटनादुरुस्ती करतांना सहकार अधिनियमात मोठ्या प्रमाणात बदल करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे राज्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील विविध कलमात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. मात्र ९७ वी घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने केलेले काही बदल राज्याच्या दृष्टीने सहकार क्षेत्रासाठी बाधक ठरत होते. घटने

पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ. वर्षा फडोळ मंगळवारी रुजू होणार !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, 7387333801 नाशिक –जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या रिक्तपदावर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांची नियुक्ती शासनाने केली असून मंगळवारी त्या पदभार घेणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.          पाणी व स्वच्छता विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इशादिन शेळकंदे यांची बदली झाल्याने आठ महीन्यांपासून रिक्त असलेल्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती झाली आहे.            महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून २००७ मध्ये बीएएमएसचे शिक्षण पूर्ण करताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण होत  डॉ. वर्षा फडोळ यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली.  जळगाव जिल्हा परिषदेत परिविक्षाधीन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मुंबई येथे मंत्रालयातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात ह्युमन रिसोर्स विभागाच्या (एचआरडी) सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त पदावर कार्यरत होत्या. तेथील बदलीने नंदुरबार जिल्हा परिषदेत उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) या पदावर

सर्वव्यापी संख्याशास्त्राचा अभ्यास करा - डॉ. व्हि.एन शिंदे

इमेज
कवठेमहांकाळ ३१ ( प्रतिनिधी) :: शिवाजी  विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील ,  महाविद्यालयातील संख्याशास्त्र विभागाला भेट दिली. याप्रसंगी  विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी पदार्थ विज्ञान आणि जैवशास्त्रामध्येही सांख्यिकीय पद्धतींचा अवलंब मोठ्या प्रमाणात होत असल्याचे स्पष्ट केले. शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय उपक्रमाअंतर्गत आर.आर.पाटील महाविद्यालय सावळज आणि पी.व्ही.पी. महाविद्यालयाने प्रशासकीय कर्मचाऱ्यासाठी आयोजित केलेल्या एक दिवशीय कार्यशाळेसाठी प्रमुख साधन व्यक्ती म्हणून डॉ. व्ही. एन. शिंदे महाविद्यालयात आले होते. यावेळी त्यांनी सर्व विभागांना भेटी दिल्या.  नव्यानेच सुरु झालेल्या संख्याशास्त्र विभागाची संगणकयुक्त प्रयोगशाळा, विद्यार्थी संख्या तसेच पुरेसा शिक्षक वर्ग पाहून समाधान व्यक्त केले.   याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. (डॉ.) एम.के. पाटील, संख्याशास्त्र विभागातील प्रा. विजय कोष्टी, प्रा. अभिलाष  पाटील, प्रा. गणेश सातपुते, प्रा. शुभांगी भोसले उपस्थित होते.