पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुस्तक परीक्षण. भौगोलिक पत्रकारितेचा सांगोपांग वेध ! सविस्तर परीक्षण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
पुस्तक परीक्षण भौगोलिक पत्रकारितेचा सांगोपांग वेध      "वृत्तपत्रविद्या हे सतत गतिमान होत जाणारे  निरंतर  परिवर्तनशील शास्त्र आहे. सध्याच्या वेगवान युगात विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण याप्रमाणेच भौगोलिक पत्रकारितेचे शास्त्रीय कौशल्य विकसित होत आहे. त्यात प्रगत वार्तांकन आणि लेखन कौशल्याचा समावेश होतो. मानवाने निसर्गाशी साधलेल्या सुसंवादातून व संघर्षातून निर्माण झालेल्या या क्षेत्राचे सोपे वर्णन 'भू - पत्रकारिता' असे करता येईल. भूगोल व पत्रकारिता हे दोन विषय शिकविणाऱ्या प्रा. डॉ. एम. जी. कुलकर्णी यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात संशोधनपर प्रबंध सादर केला. त्याचेच 'भू- पत्रकारिता' हे पुस्तक ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माझ्या हस्ते प्रकाशित झाले, हा मी माझा बहुमान समजतो. अभ्यासप्रवृत्त करणारे हे पुस्तक तरुण पत्रकारांना नवी दिशा, नेमका दृष्टिकोन देईल.                    प्रा.डॉ. एम.जी. कुलकर्णी हे अतिशय अभ्यासू व संशोधक वृत्ती असणारे व्यक्तिमत्त्व आहे. एच.पी. टी. महाविद्यालयात भूगोल विषयाचे त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले. नंतरच्या

कै. प्रा. सुनील देवधर यांचा काव्यनिर्झर झुळझुळत राहील ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
कै. प्रा. सुनील देवधर यांचा काव्यनिर्झर झुळझुळत राहील ! न्यूज मसाला वृत्तसेवा 7387333801 नाशिक ( प्रतिनिधी )  प्रा. सुनिल देवधर मितभाषी पण मिश्किल व्यक्तिमत्व होते. वृत्तीने ते कुटुंबवत्सल होते. उत्स्फूर्त काव्यातून ते सातत्याने व्यक्त व्हायचे. त्यांचे निर्मळ मन त्यात कायमच प्रतिबिंबित झाले. ते शरीराने आपल्यात नसले तरी निर्झर काव्य संग्रहातून हा काव्यनिर्झर कायम झुळझुळत राहील असे प्रतिपादन प्रा. अनंत येवलेकर यांनी केले.       कै. प्रा. सुनिल देवधर यांच्या प्रथम जयंतीच्या औचित्याने काल ' निर्झर ' या काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकात हा समारंभ मोजक्या ५० निमंत्रितांच्या उपस्थितीत झाला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अनंत येवलेकर, पत्रकार संजय देवधर, प्रा. संजय चपळगावकर, शरद वर्तक व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी दीपप्रज्वलन व गणेश प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक श्रीमती शुभांगी देवधर यांनी केले. सेवानिवृत्त झाल्यावर सुनिल यांचे कविता संग्रह पूर्ण व्हावा हे स्वप्न होते. ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त

कै. प्रा. सुनील देवधर यांचा काव्यनिर्झर झुळझुळत राहील ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

कै. प्रा. सुनील देवधर यांचा काव्यनिर्झर झुळझुळत राहील ! नाशिक ( प्रतिनिधी )  प्रा. सुनिल देवधर मितभाषी पण मिश्किल व्यक्तिमत्व होते. वृत्तीने ते कुटुंबवत्सल होते. उत्स्फूर्त काव्यातून ते सातत्याने व्यक्त व्हायचे. त्यांचे निर्मळ मन त्यात कायमच प्रतिबिंबित झाले. ते शरीराने आपल्यात नसले तरी निर्झर काव्य संग्रहातून हा काव्यनिर्झर कायम झुळझुळत राहील असे प्रतिपादन प्रा. अनंत येवलेकर यांनी केले.       कै. प्रा. सुनिल देवधर यांच्या प्रथम जयंतीच्या औचित्याने काल ' निर्झर ' या काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकात हा समारंभ मोजक्या ५० निमंत्रितांच्या उपस्थितीत झाला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अनंत येवलेकर, पत्रकार संजय देवधर, प्रा. संजय चपळगावकर, शरद वर्तक व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी दीपप्रज्वलन व गणेश प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक श्रीमती शुभांगी देवधर यांनी केले. सेवानिवृत्त झाल्यावर सुनिल यांचे कविता संग्रह पूर्ण व्हावा हे स्वप्न होते. ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व निर्मळ

आदिवासी वारली चित्रांना आधुनिकतेचा स्पर्श ! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
आदिवासी वारली चित्रांना आधुनिकतेचा स्पर्श !    महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यापासून थेट गुजरातच्या सीमारेषेपर्यंत आदिवासी वारली जमात पसरलेली आहे. छोट्या छोट्या दुर्गम पाड्यांवर राहून वारली जमातीतील स्त्री पुरुष झोपडीच्या भिंतीवर चित्रे रेखाटतात. दहाव्या शतकात ही कला अस्तित्वात आली. ११०० वर्षे जीवंत असणारी वारली चित्रशैली मानवी जीवनाला सचित्र रूप देते. चित्तवेधकता हा वारली कलेचा विशेष गुण आहे. साध्यासुध्या घटनांना, प्रसंगांना कलात्मक आकार दिल्याने त्यांचे उत्कट, चैतन्यमय स्वरूप प्रकट होते. रचनेचे, मांडणीचे सौंदर्य वारली कलाकारांचे रेषेवरचे प्रभुत्व अधोरेखित करते. अकराशे वर्षांच्या वाटचालीत महिलांनी निर्माण केलेली व जोपासलेली वारली चित्रकला आता देशोदेशी पोहोचली आहे. पद्मश्री जिव्या सोमा मशे यांनी क्रांती केल्यावर पुरुषांनीही ही कला आत्मसात केली. आताच्या पिढीतील युवक- युवतींनी या कलेला आधुनिकतेचा स्पर्श बहाल करून नवा आयाम दिला आहे.     विकास, प्रगती यामुळे संधी वाढल्या आहेत. त्यामुळे रोजगारासाठी दुर्गम पाड्यावरचा युवक शहरात येतो. शिक्षणाच्या संस्कारांनी नवी पिढी सजग झाली आहे. शहरी बदल व व

कृषी पर्यटन - चला जाऊ गावाकडे ! तुम्ही कल्पक तरुण असाल आणि तुम्हाला चार-चौघांपेक्षा वेगळे आणि गावात काही करण्याची इच्छा असेल तर कृषी पर्यटनाचा व्यवसाय तुम्हाला साद घालतो आहे ! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
कृषी पर्यटन - चला जाऊ गावाकडे  !     माणसाला असलेली मूलभूत उत्सुकता आणि धकाधकीच्या जीवनाची गरज म्हणून लोकांचा पर्यटनाकडे ओढा वाढत आहे. याचमुळे कृषी पर्यटनात लोकांचा रस वाढतो आहे. ज्यात रोजगाराच्या खूप संधी आहेत. एखाद्या जागी फक्त जाऊन येण्यापेक्षा तेथील जीवनशैली, चालीरीती, पद्धती प्रत्यक्षात अनुभवण्याकडे पर्यटकांचा ओढा आहे. माणूस हा खेड्यातून शहराकडे गेला आहे. आज बहुतांश उत्पन्न कमावणारा गट शहरातच जन्मलेला असला तरी आपले पूर्वज कसे जीवन जगायचे हे त्याला अनुभवायला आवडते. ज्यांना गाव नाही त्यांना गावातील जीवन पाहायला आवडते. यातूनच कृषी पर्यटनाची क्रेझ निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील अश्याच काही कृषी पर्यटन केंद्रांचा परिचय पुढच्या आठवड्यापासून दर शनिवारी आपण करून घेणार आहोत. त्यापुढील टप्प्यात राज्यातील केंद्रांचा समावेश केला जाईल.               कृषी पर्यटन व्यावसायिक म्हणून काय देतोय यावर आपल्याकडे पर्यटकांचा ओघ कसा असेल हे अवलंबून असतो. असा हा अतिशय सुंदर आणि आव्हानात्मक व्यवसाय-कृषी पर्यटन !           माणूस हजारो वर्षापासून शेती करतो आहे आणि जमिनीशी त्याची नाळ जन्मजन्मांतरीच

नासिक पोलिस आयुक्त आणि सहा जानेवारी पत्रकार / दर्पण दिन ! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नासिक पोलिस आयुक्त आणि सहा जानेवारी पत्रकार / दर्पण दिन ! नासिक पोलिस आयुक्त दिपक पांडेय यांच्याशी काल आयुक्तालयात संवाद साधला असता त्यांच्यातील सतत काहीतरी शिकत राहिले पाहिजे या आणखी एका पैलूचे दर्शन झाले. निमित्त होते पत्रकार दिनाचे, पांढऱ्या आणि काळ्या तीळाच्या लाडूंनी आमचे तोंड गोड केले की आम्ही काही बोलू नये म्हणून आदरातिथ्य्याचा सोपस्कार घडवून आणला अशी शंका येत नाही तितक्यात दहा पंधरा सेकंदात लाडू विषयाला सुरुवात होऊन संपुष्टातही आणला. आणि याच कालावधीत आम्ही कशासाठी, कोणत्या कामासाठी आलो आहोत, यावर काय उपाय, अपेक्षा व निराकरणाचा निष्कर्ष मनोमन काढून विषयापासून दूर न जाता विषयांतरही करायला हसत मोकळे झाले. आम्हाला अजूनही खात्री नव्हती की आमचे काम मार्गी लागले असेल !      तिसऱ्या मिनिटाला सुरूवात झाली आणि,,,,,,,  पत्रकार, पत्रकारिता काय असते ते जाणण्यासाठी "मी सहा जानेवारी ला सायंदैनिक भ्रमर या वृत्तपत्र कार्यालयात निमंत्रित संपादक म्हणून जात आहे !" या अनपेक्षित वाक्याने मात्र खात्री पटली की आमचे काम झाले आहे ! कारण साहेब एक दिवस,  तेही सहा जानेवारीलाच, पत्रकार प्र क

महाराष्ट्रात कृषी पर्यटनाला मोठा वाव ! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
महाराष्ट्रात कृषी पर्यटनाला मोठा वाव    महाराष्ट्र राज्य शासनाने नव्यानेच कृषी पर्यटन धोरण जाहीर केले आहे. या माध्यमातून शहरी लोकांना ग्रामीण जीवनाची व तेथील संस्कृतीची ओळख होण्याबरोबरच राज्यातील शेतकरी वर्गाला हमखास उत्पन्न आणि साहजिकच आर्थिक स्थैर्यही मिळणार आहे. या कृषी पर्यटन धोरणांतर्गत शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याने यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन नाशिक जिल्हा पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक तथा उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई-राठोड यांनी अलीकडेच केले आहे. यंत्रवत शहरी जीवनातून दोनचार दिवस वेळ काढून ग्रामीण जीवनाचा खराखुरा आनंद नागरिकांनी अवश्य घ्यावा. विशेषतः युवकांना व नव्या पिढीतील मुलांना आवर्जून अशा ठिकाणी घेऊन जावे. लेखाच्या पुढील भागात शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होऊन बळीराजा आत्मनिर्भर कसा होईल ते पाहू. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील तसेच राज्यातील कृषी पर्यटन केंद्रांची माहितीही घेऊ.     कृषी पर्यटन सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या धोरणांतर्गत सहभाग नोंदविण्यासाठी किमान एक एकर शेती क्षेत्र असणारे वैयक्तिक शेत

वारली पाड्यांवरचा साधासुधा गावगाडा ! अमेरिकेत ही वारली चित्रकलेचा डंका ! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

इमेज
वारली पाड्यांवरचा साधासुधा गावगाडा !     वारली...महाराष्ट्रातील आदिवासींची एक प्रसिद्ध, कलाप्रेमी जमात. वारली असा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर येते ती जगभरात प्रसिद्ध असलेली वारली चित्रकला. पालघर, ठाणे, नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असलेल्या आदिवासींनी वारली चित्रकला जगभरात पोहचवली आहे. जागतिक स्तरावर वारली चित्रकलेचा प्रसार होऊन आदिवासींना रोजगार मिळू लागला आहे. आपल्या चित्रांच्या विक्रीसाठी आता हा समाज परदेशात पोहचला असला तरीही; या समाजाची आपल्या गावाशी असलेली नाळ तुटलेली नाही. आजही वारली समाजाचे राहणीमान अतिशय साधे आहे. लहान लहान बांबूंच्या झोपड्यांची वस्ती, घराजवळ केलेली भातशेती आजही महाराष्ट्राच्या आदिवासी ग्रामीण भागात पाहायला मिळते. वारल्यांच्या वस्तीला पाडा म्हणतात. जव्हार, पालघर, डहाणू, तलासरी, सिल्वासा या शहरी भागात मात्र अलीकडे हे चित्र काहीसे बदलत असून, सिमेंट कॉन्क्रीटची जंगले निर्माण होत आहेत. परिणामी वारली संस्कृती, दैनंदिन जीवनशैली व साहजिकच त्यांची निसर्गाभिमुख चित्रशैलीही लोप पावू नये ही नववर्षाच्या प्रारंभी प्रार्थना !    वारली लोकांचे पाडे  विखुरलेल्या

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
जगाच्या पाठीवर आजवर अनेक प्रसिद्ध शास्त्रज्ञ होवून गेले, ज्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक महत्वपूर्ण शोध लावले. त्यांनी केलेल्या संशोधनाच्या बळावरच आज आपण आधुनिक जगात सुखाने वावरत आहोत. महान इंग्रज शास्त्रज्ञ, गणितज्ञ, खगोल प्रेमी, ज्योतिषशास्त्रज्ञ आणि प्रकाशकी अशी बहुआयामी  ख्याती मिळवणारे प्रसिद्ध वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटन यांच्या जयंतीनिमित्ताने (४ जानेवारी) त्यांच्या कार्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा..... अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान  शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन     सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म ४ जानेवारी  १६४३ रोजी म्हणजे ज्या वर्षी महान संशोधक गॅलिलिओ मरण पावला त्याच वर्षी इंग्लंडमधील वूलस्थॉर्प मध्ये झाला. प्राचीन ज्युलियन कॅलेंडर चा उपयोग करता, न्यूटन ची जन्मतिथी २५ डिसेंबर १६४२ म्हणूनही वापरली जाते. त्याचे शिक्षण केंब्रिज विद्यापीठात झाले. तेथेच त्याची १६६९ साली गणितशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. गणितशास्त्र, गुरुत्वाकर्षण, गतिशास्त्र, प्रकाश, दृकशास्त्र इ. क्षेत्रात न्यूटनने संशोधन करून महत्वाचे सिद्धांत मांडले. १. गणितशास्त्र : न्यूटन एक

पत्रकारितेचा बदलता प्रवाह,,,,,,दर्पण दिनानिमित्त. ६ जानेवारी रोजी दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हाच योगायोगाने बाळशास्त्रींचाही जन्मदिवस आहे. तोच स्मृती दिवस पत्रकार दिन म्हणून आज महाराष्ट्रात साजरा केला जातो. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
पत्रकारितेचा बदलता प्रवाह....||        दर्पण दिनानिमित्त वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते आणि याच विचारातून जवळपास १८३ वर्षापूर्वी म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले. मराठीतील पहिले संपादक होण्याचा बहुमान मिळविला. त्यांची आठवण म्हणून आपण ६ जानेवारी रोजी महाराष्ट्रात "दर्पण दिन" साजरा करतो. त्याकाळी  समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती. इंग्रजांच्या हातात आपला देश असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे असे बाळ शास्त्रींना वाटले. त्यामुळे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत ‘दर्पण’ ची सुरूवात मुंबई येथे केली. त्याकाळी सुरु झालेल्या मुद्रणालयाचा  त्यांनी समाज प्रबोधनासाठी उपयोग करुन घेतला. २५ जून १८४० साली दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. दर्पणच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, मनोरंजन, आणि समाजप्रबोध