पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आज रंगणार रफी गीतांची सुरेल मैफल !

आज रंगणार रफीगीतांची विनामूल्य सुरेल मैफल, रविवारी प.सा.नाट्यगृहात रंगणार रफीगीतांची सुरेल मैफल.         नाशिक ( प्रतिनिधी) - सदाबहार श्रेष्ठ गायक मोहम्मद रफी हा दैवी चमत्कार होता. त्यांच्या गाण्यांचे आजही अनेक चाहते आहेत. या लोकप्रिय पार्श्वगायकाने १९४९ ते १९८० पर्यंतची तीन दशके आपल्या सुरेल गाण्यांनी श्रोत्यांना मोहित केले. रविवारी ३१ जुलै रोजी त्यांचा ४२ वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने  'मुझे तुमसे मोहब्बत है' या बहारदार मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ०५:३० वाजता प.सा. नाट्यगृहात ही विनामूल्य मैफल होईल.            लोकप्रिय गायक घनश्याम पटेल या मैफलीचे संयोजक आहेत. गेली १० वर्षे ते सातत्याने हा उपक्रम राबवतात. कोरोनाच्या काळातही दोन वर्षे ऑनलाईन कार्यक्रम सादर करण्यात आला. स्वर्गीय सुरांचे सुरेल गायक मोहम्मद रफी यांनी आपल्या ३१ वर्षांच्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली. हिंदीसह मराठी, ऊर्दू, पंजाबी, तेलुगु व अन्य अनेक भाषांमध्येही त्यांनी पार्श्वगायन केले. ६ फिल्मफेअर अवॉर्डसह राष्ट्रीय पुरस्कार तसेच पद्मश्री किताबाने रफी साहेबांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांची ल

आवाज की दुनिया का बेताज बादशहा ! तुम मुझे यु भुला न पाओगे.

इमेज
आवाज की दुनिया का बेताज बादशहा  !   तुम मुझे यु भुला न पाओगे.        स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेले पार्श्वगायक   मोहम्मद (महम्मद) रफी यांचा  ३१ जुलै हा स्मृतिदिन. रफींना जाऊन आज ४० हून अधिक वर्षे लोटली असली तरी त्यांचा आवाज भारतीय संगीत रसिकांच्या कानावर पडला नाही ,  असा एकही दिवस गेला नसेल.  गेल्या कित्येक वर्षांत अनेकांनी  ' प्रति रफी '  बनण्याचा प्रयत्न केला. मात्र ,  कोणालाही रफींच्या जवळपासही फिरकता आले नाही, यातच रफींच्या गायकीचे वेगळेपण अधोरेखित होते. रफींनी अजरामर केलेल्या गीतांची यादी अफाट असून त्यांच्या    क्या हुआ तेरा वादा...( हम किसीसे कम नही ), बहारों फूल बरसाओ...(सूरज),   बाबूल की दुवाएँ लेती जा...(नीलकमल), ए रेश्मी जुल्फें...(दो रास्ते), उड़े जब जब जुल्फें तेरी ...(नया दौर),   ओ दुनिया के रखवाले... (बैजू बावरा) आदी गीतांचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यांनी उर्दू, पंजाबी, मराठी आणि तेलगू भाषेतही गाणी गायली. त्यांचे  ‘हा रुसवा सोड सखे...’ हे गाणे ऐकताना एक अमराठी माणूस गातोय असे कुठेच जाणवत नाही.  रफी यांनी अनेक पार्श्वगायिकांसोबत गाणी गायली. विशेषत: लता मंगेशकर

आज रंगणार रफीगीतांची विनामूल्य सुरेल मैफल.रविवारी प.सा.नाट्यगृहात रंगणाररफीगीतांची सुरेल मैफल.

आज रंगणार रफीगीतांची विनामूल्य सुरेल मैफल. रविवारी प.सा.नाट्यगृहात रंगणार रफीगीतांची सुरेल मैफल.                नाशिक ( प्रतिनिधी) - सदाबहार श्रेष्ठ गायक मोहम्मद रफी हा दैवी चमत्कार होता. त्यांच्या गाण्यांचे आजही अनेक चाहते आहेत. या लोकप्रिय पार्श्वगायकाने १९४९ ते १९८० पर्यंतची तीन दशके आपल्या सुरेल गाण्यांनी श्रोत्यांना मोहित केले. रविवारी ३१ जुलै रोजी त्यांचा ४२ वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने  'मुझे तुमसे मोहब्बत है' या बहारदार मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता प.सा. नाट्यगृहात ही विनामूल्य मैफल होईल.            लोकप्रिय गायक घनश्याम पटेल या मैफलीचे संयोजक आहेत. गेली १० वर्षे ते सातत्याने हा उपक्रम राबवतात. अगदी कोरोनाच्या काळातही दोन वर्षे ऑनलाईन कार्यक्रम सादर करण्यात आला. स्वर्गीय सुरांचे सुरेल गायक मोहम्मद रफी यांनी आपल्या ३१ वर्षांच्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली. हिंदीसह मराठी, ऊर्दू, पंजाबी, तेलुगु व अन्य अनेक भाषांमध्येही त्यांनी पार्श्वगायन केले. ६ फिल्मफेअर अवॉर्डसह राष्ट्रीय पुरस्कार तसेच पद्मश्री किताबाने रफी साहेबांना सन्मानित करण्यात आले होते.

आज रंगणार रफीगीतांची विनामूल्य सुरेल मैफल !

इमेज
आज रंगणार रफीगीतांची विनामूल्य सुरेल मैफल ! रविवारी प.सा.नाट्यगृहात रंगणार रफीगीतांची सुरेल मैफल !!                नाशिक( प्रतिनिधी) - सदाबहार श्रेष्ठ गायक मोहम्मद रफी हा दैवी चमत्कार होता. त्यांच्या गाण्यांचे आजही अनेक चाहते आहेत. या लोकप्रिय पार्श्वगायकाने १९४९ ते १९८० पर्यंतची तीन दशके आपल्या सुरेल गाण्यांनी श्रोत्यांना मोहित केले. रविवारी ३१ जुलै रोजी त्यांचा ४२ वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने  'मुझे तुमसे मोहब्बत है' या बहारदार मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता प.सा. नाट्यगृहात ही विनामूल्य मैफल होईल.                            लोकप्रिय गायक घनश्याम पटेल या मैफलीचे संयोजक आहेत. गेली १० वर्षे ते सातत्याने हा उपक्रम राबवतात. अगदी कोरोनाच्या काळातही दोन वर्षे ऑनलाईन कार्यक्रम सादर करण्यात आला. स्वर्गीय सुरांचे सुरेल गायक मोहम्मद रफी यांनी आपल्या ३१ वर्षांच्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली. हिंदीसह मराठी, ऊर्दू, पंजाबी, तेलुगु व अन्य अनेक भाषांमध्येही त्यांनी पार्श्वगायन केले. ६ फिल्मफेअर अवॉर्डसह राष्ट्रीय पुरस्कार तसेच पद्मश्री किताबाने रफी साहेबांना सन्मानित

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यसैनिक काॅ. श्रीपाद अमृत डांगे कुटुंबियांचा सन्मान व जिल्हा प्रशासनाच्या वतीने मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन !

इमेज
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यसैनिक काॅ. श्रीपाद अमृत डांगे कुटुंबियांचा सन्मान व जिल्हा प्रशासनाच्या वतीने मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन !         नाशिक - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या वारसांचा नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे योगदान अनन्यसाधारण होते. ब्रिटिश काळात महाविद्यालयीन जीवनात विल्सन कॉलेजमध्ये असताना कॉम्रेड डांगे यांनी मराठी भाषा मंडळासाठी व पदवी अभ्यासक्रमात इंग्रजी व फ्रेंच भाषेसारखाच मराठी भाषेचा समावेश व्हावा यासाठी विद्यार्थ्यांचा संप घडवून आणला होता. भारताच्या कामगार चळवळीच

अमास सेवा ग्रूपच्या सेवाभावी उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ !

इमेज
अमास सेवा ग्रूपच्या सेवाभावी   उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ !          नाशिक ( प्रतिनिधी ) आदिवासी भागातील पत्र्याचापाडा येथील विद्यार्थ्यांना मुंबईच्या अमास सेवा ग्रूप या सेवाभावी संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अनेक दानशूर व्यक्तींच्या वाढदिवसाच्या औचित्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. सन २०१६ पासून आदिवासी भागातील मुलांच्या, समाजाच्या समस्या ओळखून विविध मदत मिळवून  देण्यासाठी  'अमास सेवा ग्रुप ' सतत प्रयत्नशील असतो. सामाजिक बांधिलकीचे हे नाते आता घट्ट झाले आहे.     शैक्षणिक वर्ष २०२२ - २३ मध्ये अमास सेवा ग्रुपचे अध्यक्ष चंद्रकांतभाई देढीया, विजय भगत यांच्या नेतृत्वाखाली विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून पेठ, सुरगाणा, भंडारदरा, वैतरणा, दिंडोरी परिसरातील ९० जिल्हा परिषद शाळांमधील जवळपास ५ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ( स्कूल बॅग, वही, पेन्सिल बाॅक्स, रेनकोट, पाटी, वाॅटर बॅग, चित्रकला वही, पेन, स्केल व गिफ्ट सेट) वाटप करून समाजामध्ये एक नवीन आदर्श निर्माण करीत आहे. वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातील एक सुखद क्षण असत

अमास सेवा ग्रूपच्या सेवाभावी उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ !

इमेज
अमास सेवा ग्रूपच्या सेवाभावी   उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ !          नाशिक ( प्रतिनिधी ) आदिवासी भागातील पत्र्याचापाडा येथील विद्यार्थ्यांना मुंबईच्या अमास सेवा ग्रूप या सेवाभावी संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अनेक दानशूर व्यक्तींच्या वाढदिवसाच्या औचित्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. सन २०१६ पासून आदिवासी भागातील मुलांच्या, समाजाच्या समस्या ओळखून विविध मदत मिळवून  देण्यासाठी  'अमास सेवा ग्रुप ' सतत प्रयत्नशील असतो. सामाजिक बांधिलकीचे हे नाते आता घट्ट झाले आहे.     शैक्षणिक वर्ष २०२२ - २३ मध्ये अमास सेवा ग्रुपचे अध्यक्ष चंद्रकांतभाई देढीया, विजय भगत यांच्या नेतृत्वाखाली विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून पेठ, सुरगाणा, भंडारदरा, वैतरणा, दिंडोरी परिसरातील ९० जिल्हा परिषद शाळांमधील जवळपास ५ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ( स्कूल बॅग, वही, पेन्सिल बाॅक्स, रेनकोट, पाटी, वाॅटर बॅग, चित्रकला वही, पेन, स्केल व गिफ्ट सेट) वाटप करून समाजामध्ये एक नवीन आदर्श निर्माण करीत आहे. वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनातील एक सुखद क्षण असत

संजय चव्हाण उपाध्यक्ष पदी तर जाॅ. सेक्रेटरी पदी गोरखनाथ बलकवडे बिनविरोध !

इमेज
संजय चव्हाण उपाध्यक्ष पदी तर जाॅ. सेक्रेटरी पदी गोरखनाथ बलकवडे बिनविरोध !      नासिक (प्रतिनिधी)::-गत महिन्यात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करून नविन पदाधिकारी व कार्यकारिणी निवडणूक प्रक्रिया जाहिर झाली त्यात अध्यक्षपदी वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांची तर उपाध्यक्ष पदी नाशिक शहर तालीम संघाचे अध्यक्ष संजय चव्हाण यांची व त्यांच्यासह ५ उपाध्यक्षांची व जॉ.सेक्रेटरी पदी नाशिक जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष गोरखनाथ बलकवडे यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित कार्यकारिणी ३१ जुलै २०२२ रोजी जाहीर करण्यात येणार आहे . नाशिक शहराला प्रथमच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्षपद मिळाले असून या निवडीमुळे नाशिक शहर व जिल्ह्यात सर्व कुस्ती प्रेमी व पहिलवानांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नविन कार्यकारणी व पदाधिकारी यांचे नाशिक शहर तालीम संघ प्रांतिक प्रतिनिधी हिरामण वाघ यांचे कडून व शहर तालीम संघातर्फे व सर्व पहिलवान व कुस्तीप्रेमी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे...

घरगुती उत्पादनांना शास्त्रोक्त विपणनाची जोड हवी : प्रा. दिलीप फडके

इमेज
घरगुती उत्पादनांना शास्त्रोक्त विपणनाची जोड हवी : प्रा. दिलीप फडके स्वयंसिध्दा आयोजित प्रदर्शनाचा थाटात शुभारंभ      नाशिक::- महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणामध्ये आर्थिक अंग अत्यंत महत्वाचे असून कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी ते निर्णायक आहे. यासाठी चांगल्या घरगुती उत्पादनांना शास्त्रोक्त विपणनाची जोड देऊन व्यवसायवृध्दीचे समीकरण यशस्वी करणे गरजेचे आहे असे मत ज्येष्ठ विचारवंत तथा सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी व्यक्त केले.           स्वयंसिध्दा समूहाच्या वतीने गंगापूर रोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. फडके बोलत होते. माजी उपमहापौर अजय बोरस्ते, अर्चना बोरस्ते, योग विदुषी प्रज्ञा पाटील, माजी नगरसेविका प्रा. डॉ. वर्षा भालेराव या अतिथींसह आयोजक रूक्मिणी जोशी व मानसी सजगुरे यावेळी उपस्थित होत्या. कोरोना काळातील अनपेक्षित आर्थिक अस्थैर्याचा उल्लेख करत प्रा. फडके यांनी महिलांनी लहान व्यवसायातून स्वयंसिध्दता साधायचे आवाहन केले. अजय बोरस्ते यांनी, महिलांमधील उद्योजिका विकसित होणे काळाची गरज असल्याचे सांगताना नाशिकमध्ये खास महिलांसाठी प्रदर्शन स्थळे विक

६३ मित्रांच्या उपस्थितीत अनोखा ६३ वा वाढदिवस साजरा !

इमेज
६३ मित्रांच्या उपस्थितीत अनोखा ६३ वा वाढदिवस साजरा !           नाशिक ( प्रतिनिधी )::- आपला वाढदिवस अनेकांच्या साक्षीने साजरा व्हावा अशी सर्वांचीच इच्छा असते. कुटुंबीय, नातेवाईक यांच्या उपस्थितीत उत्साहात वाढदिवस साजरे केले जातात. काल ( दि.२०) आपल्या मित्राचा ६३ वा वाढदिवस तब्बल ६३ शालेय मित्रांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा सुंदर योग जुळून आला.         पेठे विद्यालयातून १९७५ साली एसएससी झालेल्या बॅचची दरमहा मिसळपार्टी होत असते. काल संजय देवधर, उदय वाईकर, राजगोपाल धूत, प्रफुल्ल साखला, हेमंत जोशी, श्रीहरी कर्पे, विवेक आंबेकर, गिरीश परांडकर, श्याम कुलकर्णी, विश्वनाथ भुतडा यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ६३ मित्र उपस्थित राहिले. बहुतेकांचे जन्म १९५९ सालचे असल्याने त्यांनी वयाची ६३ वर्षे या महिन्यात पूर्ण केली. त्यामुळे हा विलक्षण योगायोग जुळून आला याचा सर्वांनाच आनंद झाला. गंगापूर नाक्यावरील हॉटेल विहारमध्ये हा झकास वाढदिवस साजरा झाला.            वर्गमित्र अभय बोरा याने २०१९ मध्ये परिश्रमपूर्वक आपल्या शालेय मित्रांचा  व्हॉट्सअप ग्रूप तयार करून सर्वांना एकत्र आणले. त्यामुळे अनेक वर्षे सर्वत्र

भूलशास्त्र संघटनेतर्फे नासिकमध्ये राज्यस्तरीय युवा महाकॉन परिषद !

इमेज
भूलशास्त्र संघटनेतर्फे नासिकमध्ये राज्यस्तरीय युवा महाकॉन परिषद !             नाशिक ( प्रतिनिधी )भारतीय भुलशास्त्र संघटना (आयएसए) नाशिक या संघटनेच्यावतीने युवा महाकॉन २०२२ या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.२३ आणि रविवार दि.२४ जुलै या कालावधीत हॉटेल एक्सप्रेस इन येथे ही राज्यस्तरीय परिषद होणार असल्याची माहिती डॉ. अनिता नेहेते व सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.             आयएसए नाशिक ही संघटना भूलतज्ज्ञांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असते. सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध घटकांसाठी देखील संघटनेद्वारे उपक्रम राबविले जातात. यंदा पंचेचाळीस वयाच्या आतील भूलतज्ज्ञांसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारची राज्यस्तरीय युवा महाकॉन परिषद आयोजीत करण्यात आली आहे. आरोग्य सुविधांमध्ये आधुनिकता येत असतानाच भूलशास्त्रही प्रगत होते आहे. आरोग्य सेवेत भुलशास्त्र आणि भूल तज्ज्ञांचे महत्व अनन्य साधारण आहे. या शास्त्रात अंतर्भाव होणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची, उपचार प्रणालीची सर्वांना माहिती व्हावी, विशेषतः वयाच्या पंचेचाळीशीच्या आतील भूल तज्ज्ञांच्या ज्ञानाचा अन्य सहकाऱ्यांना ही लाभ मिळावा, त्

६३ मित्रांच्या उपस्थितीत अनोखा ६३ वा वाढदिवस साजरा !

इमेज
६३ मित्रांच्या उपस्थितीत अनोखा ६३ वा वाढदिवस साजरा !           नाशिक ( प्रतिनिधी )::- आपला वाढदिवस अनेकांच्या साक्षीने साजरा व्हावा अशी सर्वांचीच इच्छा असते. कुटुंबीय, नातेवाईक यांच्या उपस्थितीत उत्साहात वाढदिवस साजरे केले जातात. काल ( दि.२०) आपल्या मित्राचा ६३ वा वाढदिवस तब्बल ६३ शालेय मित्रांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा सुंदर योग जुळून आला.         पेठे विद्यालयातून १९७५ साली एसएससी झालेल्या बॅचची दरमहा मिसळपार्टी होत असते. काल संजय देवधर, उदय वाईकर, राजगोपाल धूत, प्रफुल्ल साखला, हेमंत जोशी, श्रीहरी कर्पे, विवेक आंबेकर, गिरीश परांडकर, श्याम कुलकर्णी, विश्वनाथ भुतडा यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ६३ मित्र उपस्थित राहिले. बहुतेकांचे जन्म १९५९ सालचे असल्याने त्यांनी वयाची ६३ वर्षे या महिन्यात पूर्ण केली. त्यामुळे हा विलक्षण योगायोग जुळून आला याचा सर्वांनाच आनंद झाला. गंगापूर नाक्यावरील हॉटेल विहारमध्ये हा झकास वाढदिवस साजरा झाला.            वर्गमित्र अभय बोरा याने २०१९ मध्ये परिश्रमपूर्वक आपल्या शालेय मित्रांचा  व्हॉट्सअप ग्रूप तयार करून सर्वांना एकत्र आणले. त्यामुळे अनेक वर्षे सर्वत्र

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ अध्यक्षपदी विलास पोतदार तर कार्यवाह म्हणून सुभाष सबनीस यांची निवड...!

इमेज
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ नाशिक विभागाचे अध्यक्षपदी विलास पोतदार तर कार्यवाह म्हणून सुभाष सबनीस यांची निवड...!      नासिक::-अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या नाशिक विभागाचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी निवडीची घोषणा प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी नुकतीच केली आहे. अध्य‌क्षपदी वैशाली प्रकाशनाचे विलास पोतदार तर कार्यवाहपदी सुभाषित प्रकाशनचे सुभाष सबनीस यांची तर उपाध्यक्षपदी ज्योती स्टोअर्सचे वसंतराव खैरनार यांची निवड झाली आहे. खजिनदारपदी जी.पी. खैरनार यांना संधी देण्यात आली असुन कार्यकारिणी सदस्य म्हणून विनोद गोरवाडकर, सावळीराम तिदमे, किरण सोनार, संदीप देशपांडे, दिलिप बोरसे, विनायक रानडे, संतोष लहामगे, सौ.सुमती पवार, सौ.सुरेखा बो-हाडे यांची निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, कार्यवाह पराग लोणकर यांनी अभिनंदन केले आणि पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. नाशिक विभागात प्रकाशक लेखक यांच्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील आणि साहित्यिक सांस्कृतिक आणि वैचारिक परीस्थितीत प्रगल्भता आणण्यासाठी प्रयत्न करू अशी भुमिका यावेळी नुतन अध्यक्ष विलास पोतदार

भूलशास्त्र संघटनेतर्फे नासिकमध्ये राज्यस्तरीय युवा महाकॉन परिषद !

इमेज
भूलशास्त्र संघटनेतर्फे नासिकमध्ये राज्यस्तरीय युवा महाकॉन परिषद !             नाशिक ( प्रतिनिधी )भारतीय भुलशास्त्र संघटना (आयएसए) नाशिक या संघटनेच्यावतीने युवा महाकॉन २०२२ या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.२३ आणि रविवार दि.२४ जुलै या कालावधीत हॉटेल एक्सप्रेस इन येथे ही राज्यस्तरीय परिषद होणार असल्याची माहिती डॉ. अनिता नेहेते व सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.             आयएसए नाशिक ही संघटना भूलतज्ज्ञांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असते. सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध घटकांसाठी देखील संघटनेद्वारे उपक्रम राबविले जातात. यंदा पंचेचाळीस वयाच्या आतील भूलतज्ज्ञांसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारची राज्यस्तरीय युवा महाकॉन परिषद आयोजीत करण्यात आली आहे. आरोग्य सुविधांमध्ये आधुनिकता येत असतानाच भूलशास्त्रही प्रगत होते आहे. आरोग्य सेवेत भुलशास्त्र आणि भूल तज्ज्ञांचे महत्व अनन्य साधारण आहे. या शास्त्रात अंतर्भाव होणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची, उपचार प्रणालीची सर्वांना माहिती व्हावी, विशेषतः वयाच्या पंचेचाळीशीच्या आतील भूल तज्ज्ञांच्या ज्ञानाचा अन्य सहकाऱ्यांना ही लाभ मिळावा, त्

मातीचा वसा आणि वारसा जपत महाविद्यालय सुसज्ज झाल्याचा आनंद - मा. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भास्कर विचारपीठावर माजी पोलीस सहआयुक्त बाबासाहेब बुधवंत

इमेज
👆👆👆👆👆👆👆 मातीचा वसा आणि वारसा जपत महाविद्यालय सुसज्ज झाल्याचा आनंद - मा. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भास्कर विचारपीठावर माजी पोलीस सहआयुक्त बाबासाहेब बुधवंत शेवगाव – “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी संस्थेने काळाची पावले ओळखून शेवगाव येथे महाविद्यालयाची उभारणी केली, त्यामुळे तळागाळातील विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग झाला, त्यांच्या स्वप्नांना बळ आणि ऊर्जा मिळाली, मातीचा वसा आणि वारसा घेऊन सुरु झालेले हे महाविद्यालय आज सुसज्ज झाल्याचे पाहून आनंद वाटला.” असे प्रतिपादन माजी विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी केले.                            शेवगाव येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या वर्धापन दिना निमित्ताने माजी विद्यार्थी मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती निर्मला काटे होत्या, विचारपीठावर माजी पोलीस सहाय्यक आयुक्त बाबासाहेब बुधवंत, अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, माजी प्राचार्य शिवाजीराव देवढे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संजय फडके, बापूसाहेब भोसले, प

कोरोनापूर्वीच केली होती घोषणा, " एकदा काय झालं ! "

इमेज
‘ एकदा काय झालं' मराठी  चित्रपट येणार ५ ऑगस्टला !     नाशिक ( प्रतिनिधी )::- पुणे टॉकीज प्रा. लि. आणि हेमंत गुजराथी यांची प्रस्तुती असलेला 'एकदा काय झालं' हा मराठी चित्रपट येत्या ५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सलील कुलकर्णी व कवी संदीप खरे यांनी सांगितले. यावेळी संदीप यांनी काही कविता सादर केल्या. त्यातून चित्रपटाचे कथानक उलगडले.     ‘एकदा काय झालं ’ हे वाक्य आपल्या सगळ्यांना अगदी लहानपणापासूनच परिचित असतं. या वाक्यापासून सुरूवात होणाऱ्या असंख्य गोष्टी आपण लहानपणापासून नेहमीच ऐकतो, अशाच वेगवेगळ्या भावनिक गोष्टींमधून साकारलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार हे नक्की. नात्यांचे बंध, भावनांचे अर्थ, एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम, जिव्हाळा आणि या सर्वांच्या जोडीला गोष्टी ! या सगळ्या कंगोऱ्यांची सांगड घालत साकार झालेला ‘एकदा काय झालं ’ हा चित्रपट ५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. सोशल मीडियात एक मोशन पोस्टर रिलीज करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली.आशयघन कथानक आणि उत्तम कलाकारांची मांदियाळी घेऊन चित्रपट दिग्दर्शित करण

कोरोनापूर्वीच केली होती घोषणा, 'एकदा काय झालं !'

इमेज
‘ एकदा काय झालं' मराठी  चित्रपट येणार ५ ऑगस्टला !     नाशिक ( प्रतिनिधी )::- पुणे टॉकीज प्रा. लि. आणि हेमंत गुजराथी यांची प्रस्तुती असलेला 'एकदा काय झालं' हा मराठी चित्रपट येत्या ५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सलील कुलकर्णी व कवी संदीप खरे यांनी सांगितले. यावेळी संदीप यांनी काही कविता सादर केल्या. त्यातून चित्रपटाचे कथानक उलगडले.     ‘एकदा काय झालं ’ हे वाक्य आपल्या सगळ्यांना अगदी लहानपणापासूनच परिचित असतं. या वाक्यापासून सुरूवात होणाऱ्या असंख्य गोष्टी आपण लहानपणापासून नेहमीच ऐकतो, अशाच वेगवेगळ्या भावनिक गोष्टींमधून साकारलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार हे नक्की. नात्यांचे बंध, भावनांचे अर्थ, एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम, जिव्हाळा आणि या सर्वांच्या जोडीला गोष्टी ! या सगळ्या कंगोऱ्यांची सांगड घालत साकार झालेला ‘एकदा काय झालं ’ हा चित्रपट ५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. सोशल मीडियात एक मोशन पोस्टर रिलीज करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली.आशयघन कथानक आणि उत्तम कलाकारांची मांदियाळी घेऊन चित्रपट दिग्दर्शित करण

मी अत्रे बोलतोय... सदानंद जोशींच्या जन्मशताब्दीला प्रारंभ !

इमेज
मी अत्रे बोलतोय... सदानंद जोशींच्या जन्मशताब्दीला प्रारंभ !    यश हे अपघाताने किंवा योगायोगाने मिळत नसते. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते असे सदैव आपल्या सोबतच्या सर्वांना सांगणाऱ्या सदानंद जोशी यांनी पुढील काळात यशाची कमान उभी केली. यशस्वीपणे एकपात्री सादरीकरण करून महाराष्ट्रातच नव्हे तर  भारतात इतिहास घडविला. आचार्य अत्र्यांच्या आवाजात आणि वेशात प्रत्यक्ष अत्र्यांचे  व्यक्तीदर्शन घडवून तीन हजार पेक्षा जास्त कार्यक्रम भारतात आणि अनेक देशांत सादर केले. एक उच्चांक स्थापन केला. अशा सुप्रसिद्ध सदानंद जोशींचा जन्म दि.१६ जुलै १९२२ रोजी नाशिक येथे एका उच्चशिक्षित घरण्यात झाला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने !   सदानंद जोशी यांचे वडील त्या काळी म्हणजेच शंभर वर्षापूर्वी एम.ए. झालेले होते. आजोबा शिक्षण अधिकारी होते, तर मामा वकिल होते. बालपणापासून उत्तम निरीक्षण करून कोणत्याही व्यक्तीच्या चालण्याबोलण्याची हुबेहूब नक्कल करण्यांत त्यांनी नेहमीच उत्तम यश मिळविले. साने गुरुजींसारख्या कोमल मनाच्या माणसापासून ते हिटलर सारख्या हुकुमशहा पर्यंत विविध लोकांच्या

मी अत्रे बोलतोय... सदानंद जोशींच्या जन्मशताब्दीला प्रारंभ !

इमेज
मी अत्रे बोलतोय... सदानंद जोशींच्या जन्मशताब्दीला प्रारंभ !    यश हे अपघाताने किंवा योगायोगाने मिळत नसते. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते असे सदैव आपल्या सोबतच्या सर्वांना सांगणाऱ्या सदानंद जोशी यांनी पुढील काळात यशाची कमान उभी केली. यशस्वीपणे एकपात्री सादरीकरण करून महाराष्ट्रातच नव्हे तर  भारतात इतिहास घडविला. आचार्य अत्र्यांच्या आवाजात आणि वेशात प्रत्यक्ष अत्र्यांचे  व्यक्तीदर्शन घडवून तीन हजार पेक्षा जास्त कार्यक्रम भारतात आणि अनेक देशांत सादर केले. एक उच्चांक स्थापन केला. अशा सुप्रसिद्ध सदानंद जोशींचा जन्म दि.१६ जुलै १९२२ रोजी नाशिक येथे एका उच्चशिक्षित घरण्यात झाला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने !   सदानंद जोशी यांचे वडील त्या काळी म्हणजेच शंभर वर्षापूर्वी एम.ए. झालेले होते. आजोबा शिक्षण अधिकारी होते, तर मामा वकिल होते. बालपणापासून उत्तम निरीक्षण करून कोणत्याही व्यक्तीच्या चालण्याबोलण्याची हुबेहूब नक्कल करण्यांत त्यांनी नेहमीच उत्तम यश मिळविले. साने गुरुजींसारख्या कोमल मनाच्या माणसापासून ते हिटलर सारख्या हुकुमशहा पर्यंत विविध लोकांच्या

नासिकच्या प्रा. सुमती पवार व कोल्हापूर च्या डॉ. राजश्री पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अॅकेडमीचे पुरस्कार !

इमेज
नासिकच्या प्रा. सुमती पवार व कोल्हापूर च्या डॉ. राजश्री पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अॅकेडमीचे पुरस्कार ! लातूर (प्रतिनिधी)::- डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य अॅकेडमीचे चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले असून ३१ जुलै रोजी वितरण करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे.       कथासंग्रह, कविता, कादंबरी, बालसाहित्य, आत्मचरित्र व आंबेडकरी साहित्य अशा सहा प्रकारातील प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहेत.       प्रथम १५००/- द्वितीय १०००/- व तृतीय ७५०/- रुपये, शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे. एकुण १८ पुरस्कारांमध्ये बालसाहित्य गटांत नासिकच्या प्रा. सौ. सुमती पवार व कविता गटातून कोल्हापूर च्या डॉ. राजश्री पाटील यांना द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.         लातूर येथील बस स्थानकाशेजारील डॉ. भालचंद्र ब्लड बँक सभागृहात ३१ जुलै रोजी सकाळी ११:३० वा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे संस्थेचे अध्यक्ष अॅड. एस. एन. बोडके, कार्याध्यक्ष प्रा. अॅड. श

मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन लोणी काळभोर येथे संपन्न होणार- एस.एम देशमुख

इमेज
२०,२१ ऑगस्ट रोजी मराठी पत्रकार परिषदेचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन लोणी काळभोर येथे संपन्न होणार- एस.एम देशमुख           पुणे दि. ४ जुलै :मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्दैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन येत्या २० आणि २१ ऑगस्ट २०२२ रोजी पुण्यानजिक लोणी काळभोर येथील एमआयटीच्या भव्य प्रांगणात होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी आज केली. परिषदेचे हे अधिवेशन कोरोनामुळे यापुर्वी दोन वेळा रद्द करावे लागले होते..          पुणे जिल्हा पत्रकार संघ, महाराष्ट्र सोशल मिडिया परिषद आणि हवेली तालुका पत्रकार संघाची संयुक्त बैठक नुकतीच पुण्यात पार पडली. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आणि परिषदेचे नियोजित अध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांनी बैठकीस मार्गदर्शन केले. यावेळी हवेली तालुका पत्रकार संघ, पुणे जिल्हा पत्रकार संघ आणि सोशल मिडिया परिषदेने अधिवेशन घेण्याची तयारी दर्शविली. त्याला मराठी पत्रकार परिषदेने मान्यता दिली आहे. त्यामुळे २० आणि २१ ऑगस्ट रोजी हे अधिवेशन परिषदेच्या परंपरेला साजेशे भव्य दिव्य स्वरूपात साजरे होत आहे. खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते, अमोल को

महाराष्ट्र आय टी सेनेच्या अध्यक्षपदी संकेत निमसे यांची नियुक्ती !

इमेज
महाराष्ट्र आय टी सेनेच्या अध्यक्षपदी संकेत निमसे यांची नियुक्ती !         नाशिक दि.०४ (प्रतिनिधी):- महाराष्ट्र आय टी सेना  ( Information Technology ) कर्मचारी संघाची पुणे येथे झालेल्या बैठकीत नाशिकचे अध्यक्षपदी संकेत निमसे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे घोषणा संघाचे  प्रदेशाध्यक्ष सचिन सरवदे यांनी केली आहे. पुणे येथे झालेल्या बैठकीत सदर निवड करण्यात आली. निमसे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.              माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोत्तरीपरी प्रयत्न करू असे निमसे यांनी आपल्या निवडीनंतर बोलतांना सांगितले, यावेळी महाराष्ट्र आय टी सेना  (Information Technology) कर्मचारी संघाचे अध्यक्ष सचिन भारत सरवदे ,  उपाध्यक्ष रविकिरण  घटकर , सचिव संदीप चौबे, संघटक विक्रम सिंह राजेंद्र सिंह राजे भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दिव्यांग व्यक्तींसाठी वृद्धाश्रम निर्माण करण्यासाठी कटिबद्ध ! - गणेश गिते ८० दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

इमेज
दिव्यांग व्यक्तींसाठी वृद्धाश्रम निर्माण करण्यासाठी कटिबद्ध ! - गणेश गिते ८० दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !             नासिक::- ॐ साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाईंड अॅंण्ड डिसेबल संस्थेच्या वतीने नासिक येथील श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट मध्ये  दिव्यांगासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या जागतिक पातळीवरील हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त अंध व्यक्तिंच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नासिक मनपाचे माजी सभापती गणेश गिते तसेच माणुसकी ग्रुप विंचूर चे किशोर दरेकर, प्रकाश ठोंबरे, हर्षल काळे, राहुल शिळमकर, शेखर लोळगे, एम एस एल ड्राय लाईम सिस्टिमचे व्यवस्थापक हेमंत राख, युनियन अध्यक्ष उत्तम खांडबहाले, हडपे, बोरसे, फड, जयस्वाल आदींसह सुभाषित प्रकाशनचे सुभाष सबनीस, न्यूज मसालाचे संपादक नरेंद्र पाटील उपस्थित होते.          गिते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुंबई नाका येथील एक भूखंड आपल्या कारकीर्दीत दिव्यांगासाठी उपलब्ध करून दिला आहे, पुढील काळात नासिक मनपात सत्तेत असो वा नसो मात्र आणखी एक भूखंड उपलब्ध करून दिव्यांग व्यक्तींसाठी वृद्धाश

पापडीवाल दाम्पत्याच्या अतूट श्रद्धेचा भक्तिमय प्रत्यय ! जयजयकारात महामस्तकाभिषेक संपन्न !

इमेज
पापडीवाल दाम्पत्याच्या अतूट श्रद्धेचा भक्तिमय प्रत्यय ! जयजयकारात महामस्तकाभिषेक संपन्न ! ऋषभदेवपुरम- मांगीतुंगी(प्रतिनिधी)  शुक्रवार ( दि.१) सौ. अंजली पापडीवाल यांनी आपल्या अतूट श्रद्धेचा, निस्सीम भक्तीचा प्रत्यय कृतीद्वारे दिला. मुलगा जीनेश व सून सुरभी यांचा एकाच दिवशी वाढदिवस असल्याने त्यानिमित्ताने संपूर्ण पंचामृत अभिषेक केला. सलग १७ दिवस सुरू असलेल्या महामस्तकाभिषेक महोत्सवात काल शुक्रवारी ( दि.१) आनंदमय वातावरणात भाविकांनी ऋषभदेव व सर्व तीर्थंकरांच्या नावांनी जयघोष केला. उपस्थित सर्व श्रावक- श्राविकांनी अतिशय श्रद्धापूर्वक अभिषेक, पूजनाचा व रत्नवृष्टीचा सात्विक आनंदही मिळवला. भगवान ऋषभदेव मूर्ती निर्माण कमिटीचे महामंत्री संजय पापडीवाल यांच्या सौ. अंजली धर्मपत्नी आहेत. या दाम्पत्याने आपल्या वडिलांचा वारसा जपला आहे.        शुक्रवार ( दि.१) पहाटेपासून भाविकांची सहकुटुंब, सहपरिवार ऋषभदेवपुरम येथून ऋषभगीरीवर जाण्यासाठी रीघ लागली होती. सकाळपासून  पवित्र वातावरणात व उत्साहात भगवान ऋषभदेवांच्या १०८ फुटी उंच अखंड पाषाण मूर्तीवर पंचामृत महामस्तकाभिषेक करून धन्य झाल्याची भावना अंजली पापडीवा

कृषि विभागाच्या सर्व योजना शेतक-यांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीने व्यापक कार्यक्रम हाती घ्यावा- जिल्हाधिकारी गंगाथरन, शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत लाभ घ्यावा- श्रीमती लीना बनसोड

इमेज
कृषि विभागाच्या सर्व योजना शेतक-यांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीने व्यापक कार्यक्रम हाती घ्यावा- जिल्हाधिकारी गंगाथरन, शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत लाभ घ्यावा- श्रीमती लीना बनसोड कृषि दिन कार्यक्रम, कृषि विभाग, जिल्हा परिषद नाशिक       नासिक::- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या जयंती निमित्त १ जुलै हा दिवस दरवर्षी प्रमाणे कृषिदिन म्हणुन साजरा करण्यात येतो. त्यानुसार दिनांक १ जुलै २०२२ रोजी दुपारी ११.०० वाजता महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग, कृषि विभाग आत्मा, कृषि विभाग जिल्हा परिषद नाशिक तसेच पंचायत समिती नाशिक यांचा संयुक्त कार्यक्रम कै. रावसाहेब थोरात सभागृह मुख्य इमारत जिल्हा परिषद नाशिक येथे साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या  अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी  अधिकारी अर्जुन गुंठे, विभागीय कृषी सहसंचालक विवेक सोनवणे, विभागीय कृषी अधिक्षक सुनिल वानखेडे, प्रकल्प संचालक (आत्मा) राजे