पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत !कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत समितीच्या अहवालावर उचीत निर्णय घेणार ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही !

इमेज
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत ! कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत  समितीच्या अहवालावर उचीत निर्णय घेणार ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801, मुंबई, दि. २०: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे जाहीर केले.          यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना व सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने दिनांक १४ मार्च, २०२३ पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तसेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या वतीने देखील दिनांक २८ मार्च, २०२३ पासून संपावर जाण्याबाबत राज्य शासनाला नोटीस दिलेली आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्य सच

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली

इमेज
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801       मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यांची सरकारसोबतची चर्चा यशस्वी झाली आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी मागील सात दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत आज चर्चा केली. या चर्चेमध्ये तोडगा निघाला असून उद्यापासून संप मागे घेण्याचा निर्णय संपकऱ्यांनी घेतला आहे. तीन महिन्यांमध्ये सरकार मागण्या पूर्ण करेल, त्यामुळे उद्यापासून संप मागे घेत आहोत असं संपकऱ्यांच्या वतीने समन्वयक विश्वास काटकर यांनी माध्यमांना सांगितलं. उद्यापासून कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचं आवाहन काटकर यांनी केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या शिष्टमंडळामध्ये १६ सदस्य होते. मागील काही वेळापासून संपकरी आणि सरकारसोबत चर्चा सुरु होती. ही चर्चा यशस्वी झाली आहे. सरकार संपकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं काटकर यांनी सांगितलं. जुनी पेन्शन योजन

राज्य उत्पादन शुल्क विभागातीलवर्ग ३ आणि ४ ची ६६७ पदे लवकरच भरणार !

इमेज
राज्य उत्पादन शुल्क   विभागातील वर्ग ३ आणि ४ ची ६६७ पदे लवकरच भरणार !                   - मंत्री शंभूराज देसाई   न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801             मुंबई ,  दि. २० : राज्य उत्पादन शुल्क विभागात येत्या 5 महिन्यांत वर्ग ३ आणि ४ च्या पदांची भरती केली जाणार असून एकूण ६६७ पदे भरण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.             विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार ,  भास्कर जाधव ,  छगन भुजबळ ,  जयकुमार रावल यांनी याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.             देसाई म्हणाले की ,  राज्य उत्पादन शुल्क विभागात प्रथमच इतकी मोठी पदभरती केली जात आहे. टीसीएस या कंपनीमार्फत ही पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याशिवाय या विभागासाठी २९० पदांच्या भरतीची मागणी करण्यात आली असून यापैकी ११४ पदांची मागणी मंजूर करण्यात आली आहे. तर उर्वरित १७६ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुन्हे नोंदविण्याच्या संख्येत ७.६ टक्क्यांवर वाढ झाली आहे. याशिवाय आरोपी पकडण

चवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही ! - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इमेज
चवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही ! - मुख्यमंत्री   एकनाथ शिंदे न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801             मुंबई ,  दि. २० : चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देऊन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  “ चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असून त्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही ,”  अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.             यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ,  आमदार भरत गोगावले ,  समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे ,  जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे ,  बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये ,  पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व इतर मान्यवर उपस्थित होते.             मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर चवदार तळ्यासाठी देखील जल शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे यावेळी सांगितले.

आयटी, साॅफ्टवेअर क्षेत्रात करिअर करण्यासाठी पायथाॅन भाषा आत्मसात करावी !संख्याशास्त्राचे ज्ञान हे विविध क्षेत्रात सहाय्यकारी व आवश्यक- ऋषिकेश जगताप !

इमेज
आयटी, साॅफ्टवेअर क्षेत्रात करिअर करण्यासाठी पायथाॅन भाषा आत्मसात करावी ! संख्याशास्त्राचे ज्ञान हे विविध क्षेत्रात सहाय्यकारी व आवश्यक- ऋषिकेश जगताप ! पी.व्ही.पी. महाविद्यालयात संख्याशास्त्राचे अतिथी व्याख्यान न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801 कवठेमहांकाळ :  दि. २०  ( प्रतिनिधी) येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयातील बी.एस्सी. संख्याशास्त्र  विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिथी व्याख्याते म्हणून   ऋषिकेश जगताप उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना  जगताप यांनी 'संख्याशास्त्रीय संकल्पना' तसेच  'सांख्यिकीय पद्धती आणि तंत्रांचा' वापर विविध प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये होत असल्याने आय टी इंडस्ट्री मध्ये संख्याशास्त्राची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले.तसेच सध्या सर्वच ठिकाणी पायथाॅन (Python) या प्रोग्रामिंग लँग्वेज चा उपयोग अनिवार्य ठरत असल्याने संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी पायथाॅन भाषा आत्मसात केल्यास त्यांना विविध क्षेत्रात विशेषत: आयटी, साॅफ्टवेअर क्षेत्रात करिअ

गोविंद बोरसे व प्रविण अलई यांची महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड… !

इमेज
गोविंद बोरसे व प्रविण अलई यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड…   न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801 नाशिक(प्रतिनिधी)::- भाजपा विभागीय प्रसिध्दी प्रमुख गोविंद बोरसे व भाजपा प्रदेश सोशल मिडीया, माजी संयोजक प्रविण अलई यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड झाल्याची माहिती भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावळकुळे यांनी प्रदेश कार्यालयातून  प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. त्यांच्या निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले. या निवडीबद्दल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण  राज्यमंत्री डॉ. भारती पवार, नामदार गिरीष महाजन, खा.उन्मेश पाटील, खा.सुभाष भामरे, खा. हिना गावित, प्रदेश उपाध्यक्ष जयकुमार रावल, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ.राम शिंदे, आ.श्रीकांत भारतीय, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्य विभाग व प्रसिध्दी प्रमुख नवनाथ बन, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष केदा आहेर, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, सुनिल केदार, तसेच शहर, मंडल, उत्तर महारष्ट्रातील भाजपा आमदार, खासदार, पदाधिकारी विविध आघाड्या, प्रक

गणितशास्र, गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत, गतिशास्र, प्रकाशकी, दृकशास्र शोध शास्त्रज्ञ ! अद्वितीय शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन यांचा (२० मार्च) स्मृतिदिन !

इमेज
गणितशास्र, गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत, गतिशास्र, प्रकाशकी, दृकशास्र शोध शास्त्रज्ञ ! अद्वितीय शास्त्रज्ञ :  सर आयझॅक न्यूटन  यांचा स्मृतिदिन !  सर  आयझॅक  न्यूटन यांचा जन्म ४ जानेवारी  १६४३ रोजी म्हणजे ज्या वर्षी महान संशोधक  गॅ लिलिओ मरण पावला त्याच वर्षी इंग्लंडमधील  वूलस्थॉर्प   मध्ये झाला .   प्राचीन ज्युलियन कॅलेंडर चा उपयोग करता, न्यूटन ची जन्मतिथी  २५ डिसेंबर १६४२  म्हणूनही वापरली जाते.   त्याचे शिक्षण केंब्रिज विद्यापीठात झाले .  तेथेच त्याची १६६९ साली गणितशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली .  गणितशास्त्र ,  गुरुत्वाकर्षण ,  गतिशास्त्र ,  प्रकाश ,  दृकशास्त्र इ .  क्षेत्रात न्यूटनने संशोधन करून महत्वाचे सिद्धांत मांडले . १ .  गणितशास्त्र  :  न्यूटन एक श्रेष्ठ गणिती होता .  गणितशास्त्रामधील शून्यलब्धी चा शोध त्याने लावला . ( कॅलक्य़ुलसचा शोध भास्कराचार्यांनी लावला .  या शास्त्राला ते शून्यलब्धि म्हणत असत .  म्हणजे शून्याच्या जवळ पोचणार्‍या संख्याफलांचे गणित ) .  सर्वंकष स्वरूपातला बायनॉमियल थिरम ज्याच्या आधारे  ' क्ष '  अधिक  ' य '  अशा दोन संख्यांच्या बेरजे

पूर्व प्राथमिक वयात मूल्यआधारित शिक्षण महत्वाचे - विनय जोशी

इमेज
पूर्व प्राथमिक वयात मूल्यआधारित शिक्षण महत्वाचे - विनय जोशी  न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801 नाशिक( प्रतिनिधी )-  मेंदूचा विकास हा वयाच्या पाच वर्षापर्यंत सुमारे ९०  टक्के होतो. ही विकासाची वर्ष मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी खूप महत्त्वाची असतात. लहान मुलांचा मेंदू हा स्पंजसारखा असतो. या वयात ते जे काही बघतात ऐकतात किंवा अनुभवतात ते सगळे त्यांच्या मेंदूत समाविष्ट होते म्हणूनच या वयात मुलांनी चांगल्या गोष्टी शिकणं, ऐकणं आणि बघणं खूप महत्त्वाचं ठरतं.          यासाठीच आम्ही मूल्य शिक्षणावर भर दिला आहे. पूर्व प्राथमिक वयात जर मूल्यांवर आधारित शिक्षण दिलं गेलं तर मुलं त्या दृष्टीने तयार होतील आणि आपली संस्कृती जपण्यात याचा नक्कीच फायदा होईल असे प्रतिपादन इनोवेरा  स्कूलचे  सहसंस्थापक विनय जोशी यांनी केले.     याप्रसंगी संचालक विकास  जकुने व  शैक्षणिक समन्वयक प्राजक्ता पवार या उपस्थित होत्या. माय स्कूलची पहिली शाखा (इनोवेरा प्रि-स्कूल) लवकरच नाशिक शहरात सुरू होत असून त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की  या वयात मुलांना अनुभवातून शिकवलं तर ते खूप चांगल

कुलगुरूंच्या उपस्थितीत नॅब चे २५ मार्चला राज्यस्तरीय विशेष गौरव पुरस्कार वितरण !

इमेज
कुलगुरूंच्या उपस्थितीत नॅब चे २५ मार्चला राज्यस्तरीय विशेष गौरव पुरस्कार वितरण ! न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801           नाशिक ( प्रतिनिधी ) : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्राच्या ( नॅब ) वतीने शैक्षणिक क्षेत्रातील राज्यस्तरीय विद्यार्थी, आदर्श प्राध्यापक, संस्था आणि शिक्षक व विशेष गौरव पुरस्कार सोहळा पुरस्कार वितरण सोहळा दि. २५ मार्च रोजी होणार आहे. अशी माहिती पुरस्कार समितीचे चेअरमन मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, नॅब महाराष्ट्राचे संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, मानद महासचिव गोपी मयूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.        या संदर्भात  माहिती देताना  मुनशेट्टीवार यांनी पुढे सांगितले की, नाशिक नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र नाशिक यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे राज्यातील इयत्ता दहावी व बारावी बोर्डातील प्रथम श्रेणीतील विद्यार्थी, विद्यापीठाद्वारे अंतिम पदवी प्राप्त विद्यार्थी, दृष्टीबाधित शाळेत किंवा दृष्टीबाधितांना शिकविणारे दृष्टिबाधित किंवा डोळस विशेष शिक्षक, महाविद्यालयातील दृष्टी बाधित प्राध्यापक, दृष्टीबाधितांसाठी कार्य करणारी संस्था, विशेष कार्य करण

पंचायत समितीचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
पंचायत समितीचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! चांदवड (नासिक १७)::- आरोपी नारायण विश्वनाथ शिंदे. वय ४२ वर्षे, कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (APO), पंचायत समिती चांदवड, जि.नाशिक याने ५०००/- रुपये (पाच हजार) मागणी केली, तडजोडी अंती ४०००/- रूपयांची लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.       यातील तक्रारदार यांचे वडिलांचे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचे गोठ्यासाठी शासकीय अनुदान प्रकरण मंजूर करून  देण्याच्या कामाच्या मोबदल्यात  एकूण पाच हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ४०००/- रुपये लाचेची रक्कम  आज दिनांक १७ मार्च २०२३ रोजी कार्यालयात स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. सापळा अधिकारी श्रीमती वैशाली पाटील, पोलीस उप अधीक्षक, सह सापळा अधिकारी - पो. नि. अनिल बागुल व सापळा पथक पो.ना. राजेश गीते, शरद हेंबाडे, अजय गरुड यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस अधीक्षक, नारायण न्याहळदे, अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार, पोलीस उपअधीक्षक, वाचक, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.

श्री सच्चियाय भवानी मातेच्या ज्योतीचे गुढीपाडव्याच्या दिवशी नाशकात आगमन !

इमेज
श्री सच्चियाय भवानी मातेच्या ज्योतीचे गुढीपाडव्याच्या दिवशी नाशकात आगमन ! नाशिक (न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801)::- राजस्थानातील जोधपुर जवळील ओशिया गावातील ओशियाँ माता उर्फ श्री सच्चियाय भवानी माता जैन, माहेश्वरी समाजाची कुलदेवी आहे. प्रसिद्ध व्यापारी संजय राठी जोधपूरहून मातेची अखंड ज्योत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुधवारी (दि.२२) नाशिकमधील रविवार कारंजा येथे घेऊन येणार आहेत. त्यानिमित्ताने भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे.              मिरवणुकीमध्ये महिला दिवे, देविचे रुप व ध्वज घेवुन सहभागी होतील. रविवार कारंजापासून मेनरोड - धुमाळ पॉईंट- मुंदडा मार्केट, टिळक पथ, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ - रविवार - पेठे मार्गे  मिरवणूक राठी वाड्यापर्यंत पोहचेल. या ठिकाणी महाप्रसाद वितरण व भजनाचा कार्यक्रम होईल. श्री सच्चियाय भवानी माता जैन समाजातील ओसवाल माहेश्वरीतील राठी, सारडा, लोया, लोढा व लढ्ढा आदींची कुलस्वामिनी आहे. रविवार पेठेतील राठी वाड्यात श्री सच्चियाय मातेचे स्वयंभू असे जागृत स्थान आहे. गुढीपाडव्यापासुन देवीचे चैत्र नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. त्यानिमित्त अयोध्याबाई, ठमाबाई,

राज्यातील १ हजार ८२ पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत !

इमेज
राज्यातील १ हजार ८२ पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ! - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक 7387333801             मुंबई  :    राज्यातील १०८९ पोलीस ठाण्यांपैकी १ हजार ८२ पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी नियमितपणे कॅमेरे सुरु असणे आणि रेकॉर्डिंग जतन केले जाणे याबाबींचे ऑडिट केले जाईल ,  अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.             विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान यासंदर्भात सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.             उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की ,  राज्यातील उर्वरित सात पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम नूतनीकरण आणि स्थलांतरामुळे प्रलंबित आहे. तसेच सध्या बसविलेल्या कॅमेऱ्यांमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंगची सुविधा नाही. अर्थात याठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याच्या कामांत विलंब झाल्यामुळे संबंधित सेवा पुरवठादारावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.           यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ,  शशिकांत शिंदे ,  अनिकेत त

भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या अधिपत्याखाली करणार !

इमेज
भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतःच्या अधिपत्याखाली करणार ! नासिक(न्यूज मसाला वृत्तसेवा::- बागलाण तालुक्यातील अंतापूर ग्रामपंचायतीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल या स्वतःच्या अधिपत्याखाली करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.         अंतापूर येथील शेकड्याच्या वर ग्रामस्थांनी आपल्या सहीनिशी आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिष्टमंडळाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. निवेदनात अठरा बाबतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.   सदर तक्रार अर्जात ग्रामपंचायत नूतन इमारत बांधकामातील अनियमितता, ग्रामपंचायत च्या शिल्लक रकमेत तफावत, गावातील अंतर्गत रस्त्यांचे काॅंक्रिटीकरण, प्लॅन इस्टिमेटनुसार भूमिगत गटार योजनेचे काम झालेले नाही, स्मशानभूमीतील पेव्हर ब्लॉक बसविणे, सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमत करून आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा दावा, पाण्याच्या टाकी परिसरातील काॅंक्रिटीकरण, व्यायाम शाळा निकृष्ट बांधकाम, प्राथमिक शाळेतील कंपाऊंड, वाॅल कंपाऊंडचे अर्धवट झालेले काम, त्याचप्रमाणे अंगणवाडीतील खर्च, दलित

नायब तहसीलदार लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
नायब तहसीलदार लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !     जळगाव (न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक)::- आलोसे जयवंत पुंडलीक भट , वय-५१ वर्ष, नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय, धरणगाव ता.धरणगाव, जि.जळगाव. (वर्ग-२) रा.काळकर गल्ली,एरंडोल ता.एरंडोल जि.जळगाव,  राहुल नवल शिरोळे, वय-३०, कोतवाल, पाळधी तलाठी कार्यालय , ता.धरणगाव, जि.जळगाव. रा.पाळधी, ता.धरणगाव जि.जळगाव. (वर्ग-४) यांनी तक्रारदार पुरूष, वय २७ रायसोनी नगर, जळगाव यांचेकडे प्रथम ३०,०००/-रू लाचेची मागणी केली, तडजोडीअंती २५,०००/-रु . लाच स्विकारली असता लाचेची रक्कम पंचासमक्ष हस्तगत करण्यात आली.          यातील तक्रारदार यांचे भावाचे नावे दोन ढंपर वाहन असुन सदर ढंपर वाहनाने ते वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतात. दोन ढंपर वाहनांपैकी एक ढंपर वाहन हे एरंडोल तहसिल कार्यालय येथे जमा आहे. तसेच यापूर्वी देखील ढंपर अडवून जागेवरच सोडून देण्यासाठी तक्रारदार यांचेकडून दि.०१/०३/२०२३ रोजी ३०,०००/- रुपये व दि.११/०३/२०२३ रोजी २३,०००/- रुपये असे आलोसे क्रं.१ यांनी जागेवरच घेतलेले आहेत. त्यानंतर आलोसे क्रं.१ यांचे सांगितल्याप्रमाणे तक्रारदार यांनी आलोसे क

मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अधिवेशनानंतर दिल्लीत टास्क फोर्सची बैठक ! लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही !

इमेज
मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनानंतर दिल्लीत टास्क फोर्सची बैठक ! लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही ! न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक, 7387333801           मुंबई, दि. १६ : - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी पुरेपूर आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील. पुर्णपणे ताकदीने हा न्यायालयीन लढा लढला जाईल. त्यासाठी आवश्यक तिथे केंद्र सरकारची मदत घेतली जाईल. विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर दिल्ली येथे जाऊन वकिलांची टास्क फोर्स आणि संबंधित सर्वांना एकत्र घेऊन बैठक घेतली जाईल. त्या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहीन, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत दिली. मराठा समाज आरक्षणाशी संदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.             मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाज आरक्षणातील २०१८ पासून ते ५ मे २०२१ पर्यंतचे टप्पे विस्ताराने मांडले. आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाची समीक्षा करण्यासाठी न्या. दिलीप भोसले यांची समिती निय

जलजीवन मिशन अंतर्गत ३८ हजार गावांमध्ये दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठ्याच्या योजना मंजूर !

इमेज
जलजीवन मिशन अंतर्गत ३८ हजार गावांमध्ये दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठ्याच्या योजना मंजूर !              मुंबई ,  दि. १६ :- जलजीवन मिशनमध्ये पूर्वीचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. या मिशनअंतर्गत ३८ हजार गावांमध्ये प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई ५५ लिटर पाणी पुरवठ्याच्या योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. यापैकी २२ हजार गावांमध्ये कामे सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत दिली.             सदस्य अभिजित वंजारी यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. याविषयावर  मंत्री पाटील म्हणाले की ,  या योजना ३० वर्षांसाठीच्या कालावधीसाठी असून जेथे शक्य आहे तेथे या योजना सौर ऊर्जेवर सुरू करण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार योजनेच्या पायाभूत सुविधांच्या भांडवली किंमतीच्या १०  टक्के एवढी लोकवर्गणी गोळा करण्यात येते व ती ग्रामपंचायतीच्या खात्यात राहते. तर डोंगराळ / वन भागामध्ये व अनुसूचित जाती/ जमातीची लोकसंख्या असलेल्या क्षेत्रासाठी किमान पाच टक्के लोकवर्गणी गोळा करण्यात येते. या लोकव

नासिकच्या मध्यवर्ती भागातउदयाला येतोय "बिझनेस पॉईंट" !

इमेज
नासिकच्या मध्यवर्ती भागात उदयाला येतोय "बिझनेस पॉईंट" ! न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक, 7387333801       नाशिक ( प्रतिनिधी ) - नाशिक हे महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणातील महत्वाचा कोन असलेले शहर आहे. सर्वाधिक विकास होणाऱ्या या शहरात स्पर्धात्मक युगात उद्योजकांच्या प्रगतीला गती मिळणे तितकेच महत्त्वाचे ठरते. त्यासाठी अत्यंत मोक्याच्या जागी उद्योग - व्यवसाय असणे गरजेचे आहे. रुंग्टा बिल्डकॉनचा ' बिझनेस पॉईंट ' हा औद्योगिक प्रकल्प शहराच्या अत्यंत मध्यवर्ती भागात उदयाला येत आहे. येथे आपल्या उद्योगाचा प्रारंभ करण्याकरिता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विशेष आकर्षक सवलती देत आहोत. चेअरमन सेंडूराम रुंग्टा यांनी पत्रकार परिषदेत अशी घोषणा केली.    रुंग्टा बिल्डकॉन गेली २५ वर्षे नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात असून दर्जेदार बांधणी, पारदर्शक व्यवहार, वेळेवर ताबा ही वैशिष्ट्ये आहेत. आता उंटवाडी रस्त्यावर त्रिमूर्ती चौकात ' बिझनेस पॉईंट ' ही संपूर्ण व्यावसायिक इमारत उभी राहिली आहे. सिटीसेंटर मॉलजवळ असलेल्या या बिझनेस पॉईंटमध्ये व्यवसाय म्हणजे यशाची हमी ठरेल. सातपूर व अंबड या दोन्ही औद्

'मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी २०२२' चे प्रकाशन !

इमेज
'मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी २०२२' चे प्रकाशन ! नवी दिल्‍ली::- केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री परषोत्तम रुपाला यांनी काल (१५ मार्च २०२३) विभागाच्या 'मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी या वार्षिक पुस्तिकेच्या २०२२ च्या आवृत्तीचे अनावरण केले. यावेळी  पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱी उपस्थित होते. प्रकाशन केल्याबद्दल रूपाला यांनी पशुसंवर्धन सांख्यिकी विभागाचे अभिनंदन केले. हे पुस्तक म्हणजे पशुधन क्षेत्रातील परंपरा आणि माहितीचा महत्त्वाचा स्रोत बनल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. पशुधन लोकसंख्या, पशुधन उत्पादन आणि पशु रोग, पायाभूत सुविधा अशा महत्त्वाच्या पशुधन आकडेवारी या पुस्तकात असून हे पुस्तक पशुसंवर्धन क्षेत्राचा थोडक्यात आढावा घेते. दूध, अंडी, मांस आणि लोकर या चार प्रमुख पशुधन उत्पादनांच्या २०२१-२२ वर्षासाठीच्या अंदाजावरील माहितीचा आणि एकात्मिक नमुना सर्वेक्षण (आयएसएस) च्या इतर तांत्रिक बाबींसाठी हे पुस्तक म्हणजे प्राथमिक स्रोत आहे. परषोत्तम रुपाला, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बल्यान, मत्स्यव्यवसाय आणि पशुस

संपादकीय ! आज राज्याचे आरोग्यमंत्री मोठी घोषणा करणार ! संकटाच्या मालिकेला जागरूकतेची जोड देऊया !

इमेज
संपादकीय ! आज राज्याचे आरोग्यमंत्री मोठी घोषणा करणार ! संकटाच्या मालिकेला  जागरूकतेची जोड देऊया !  नव्या विषाणूने बधितांची संख्या वाढतेय ! न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक     एच३ एन २ एनफ्लुएंझाला हाँगकाँग विषाणूही म्हटले जाते. यामुळे संसर्ग झालेल्यांना रुग्णालयात भरती करण्याचा दर केवळ ७ टक्के आहे. परंतु याबाबत हयगय करू नये. एच३एन२ विषाणूची लक्षणे काय आहेत ? हे समजून घेतले पाहिजेत. हा एनफ्लुएंझा विषाणू असून तो श्वासात संसर्ग निर्माण करतो. देशासह विविध राज्यात या विषाणूने बधितांची संख्या वाढत आहे. नाशिक शहर व जिल्ह्यातही रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत.घाबरून न जाता वैद्यकीय उपचार घेणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, योग्य आहार घेणे आवश्यक आहे.      डब्ल्यूएचओनुसार एच३ एन२ एनफ्लुएंझा  हा उपप्रकार आहे. तसेही एनफ्लुएंझा विषाणू वर्षभर हवेत पसरलेला असतो. परंतु सध्याच्या वातावरणातील चढ-उतारामुळे त्याच्या तीव्रतेत वाढ होत आहे. एच३एन२ संसर्गात श्वास घेण्यात अडचण येणे हे त्याचे सर्वात पहिले लक्षण आहे. सर्दी-खोकला, तीव्र ताप, हगवण, उलटी आणि अंग दुखणे ही लक्षणेही आहेत. काहींच्या बाबतीत सगळी किं

संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार-सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे

इमेज
संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार-सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे   मुंबई(न्यूज मसाला वृत्तसेवा)::- दि. १४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे राज्य शासनाचे सचिव सुमंत भांगे (साविस) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.  राज्य शासकीय कर्मचारी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे. या संपात राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र, राज्य सरकारी- निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना सहभागी आहेत. या संपामध्ये राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ६ च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी यांच्या संघटनेने पुक

विनामूल्य "पाॅझिटिव्ह पॅरेटिंग आणि चाईल्ड हेल्पलाईन" उपलब्ध !

इमेज
विनामूल्य "पाॅझिटिव्ह पॅरेटिंग आणि चाईल्ड हेल्पलाईन" उपलब्ध !  तुमच्या सर्व मानसिक आरोग्य आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी आता मोफत #MentalHealthHelpline उपलब्ध आहे! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक  मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंतराव चव्हाण केंद्र परिसर आशा यांच्या संयुक्त विद्यमाने एक गोपनीय आणि विनामूल्य 'पॉझिटिव्ह पॅरेंटिंग आणि चाइल्ड हेल्पलाइन' सुरू करत आहे - 📞18005322244 / 9594466461 वर सर्व दिवस सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत उपलब्ध आहे.         ही हेल्पलाइन एक विनामूल्य, गोपनीय आणि ऑनलाइन आणि दूरध्वनी सेवा आहे जी लहान मुले, तरुण आणि प्रौढ ज्यांना त्यांच्या वयाची पर्वा न करता मैत्रीपूर्ण समर्थन किंवा समुपदेशन आवश्यक आहे त्यांना लाभ घेता येईल.         संस्थेचे तज्ञ समुपदेशक सर्व प्रश्न ऐकतील आणि त्यांचे निराकरण करतील यासाठी खालील इमेल द्वारा ही संपर्क साधू शकता. info@parisarasha.org/pahelpline@gmail.com

असंसर्गजन्य आजारांवर संशोधन परिषदेचे आयोजन !

इमेज
असंसर्गजन्य आजारांवर संशोधन परिषदेचे आयोजन ! नाशिक(न्यूज मसाला वृत्तसेवा)::- नाशिक जिल्ह्यातील एसएमबीटी इन्स्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अॅण्ड  रिसर्च सेंटर येथे दिनांक १८ आणि १९ मार्च २०२३ या दोन दिवशी असंसर्गजन्य व्याधींसंबंधी एका महत्वपूर्ण संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी २५० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.        भारतात आणि महाराष्ट्रात एकूणच असंसर्गजन्य व्याधींचे प्रमाण वाढत असून मधुमेह, अतिरक्तदाब, हृदयविकार, कर्करोग, गुडघेदुखी, मानसिक आजार, अपघात, लठ्ठपणा हे आजार बळावले आहेत. या परिषदेत सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून असंसर्गजन्य व्याधींच्या समस्या, प्रतिबंधित आणि व्यापक उपाययोजना याबद्दल विचारविनिमय होणार आहे.           ही परिषद सार्वजनिक-आरोग्य आणि जन-वैद्यक शास्त्र यासंबंधी असून महाराष्ट्र राज्य पातळीवरील जन औषधवैद्यकशास्त्र या विषयातील शिक्षक, संशोधक व विविध विद्यार्थ्यांची असोसिएशन अर्थात इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन (IAPSM) आणि सार्वजनिक आरोग्य सेवेतील अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या संस्थां

आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताचा सर्वात मोठा विजय ! लेडी गागा-रिहाना यांच्या गाण्यांवर मात करत 'नाटू-नाटू''ने जिंकला ऑस्कर !

इमेज
आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताचा सर्वात मोठा विजय ! लेडी गागा-रिहाना यांच्या गाण्यांवर मात करत 'नाटू-नाटू''ने जिंकला ऑस्कर ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक  मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ऑस्कर २०२३ च्या विजेत्यांचा सन्मान आज भारतीय वेळेनुसार पहाटे करण्यात आला.  हॉलिवूडच्या सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्यामध्ये भारताने आपले नाव झळकावले आहे.  दक्षिणेच्या आरआरआर चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याने इतिहास रचताना हा मान पटकावला आहे.  हा पुरस्कार स्वीकारताना एमएम कीरावानी यांनी आपल्या मनोगताने सर्वांची मने जिंकली आहेत.  इतकेच नाही तर नातू-नातूने या विजयासह प्रसिद्ध गायिका रिहाना आणि लेडी गागा यांच्या गाण्यांनाही मागे टाकले आहे.  नाटू-नाटूने कोणती गाणी मागे टाकून हे यश मिळवले आहे, जाणून घेऊया:-            ऑस्कर २०२३ मध्ये नाटू-नाटूने 'सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचे' शीर्षक पटकावले आहे. टेल इट लाइक अ वुमन अ‍ॅप्लॉज, टॉप गन: मॅव्हरिक्स होल्ड माय हँड, ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर लिफ्ट माय अप, आणि एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स दिस इज अ लाइफ या गाण्यांवरही विजय मिळवला. अशाप्रकारे हा भार

महानगरपालिकेच्या उद्यानात २० व्या मोफत खुले वाचनालयाची सुरूवात !

इमेज
महानगरपालिकेच्या उद्यानात २० व्या मोफत खुले वाचनालयाची सुरूवात !  दहिसरमध्ये पुस्तकांचा खजिना ! आनंद वन उद्यानात मोफत वाचनालय ! विशेष प्रतिनिधी गुरुदत्त वाकदेकर यांजकडून     मुंबई (न्यूज मसाला वृत्तसेवा)::- दहिसर पूर्व विभागातील नागरिकांना विशेष करून तरुण पिढीला वाचनासाठी मोफत पुस्तके उपलब्ध व्हावी, यासाठी आनंदवन उद्यानात मोफत खुले वाचनालय सुरू करण्यात आले आहे. मोफत वाचनालय वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, दहिसर येथे सुरू केलेले हे २०वे मोफत वाचनालय असल्याची माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.             इंटरनेट, मोबाईल मध्ये हरवून गेलेल्या तरुण पिढी मध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून मोफत वाचनालय उपक्रम राबवण्यात येत आहे. ह्यापूर्वी विविध उद्यानात १९ मोफत वाचनालये सुरू करण्यात आली असून, उद्यानातील 'खुले वाचनालय' या उपक्रमाअंतर्गत आर उत्तर विभागातील आनंदवन उद्यान, आनंदनगर, दहिसर पूर्व येथे मिशन ग्रीन मुंबई यांच्या सहकार्याने हे २०वे खुले वाचनालय सुरू करण्यात आले.           मुंबई महानगरपा

साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी हिंदी साहित्यिक माधव कौशिक ! रंगनाथ पठारे पराभूत; उपाध्यक्षपदी प्रथमच महिला !

इमेज
साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी हिंदी साहित्यिक माधव कौशिक ! रंगनाथ पठारे पराभूत; उपाध्यक्षपदी प्रथमच महिला ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक       नवी दिल्ली (गुरुदत्त वाकदेकर) : देशाच्या साहित्य क्षेत्रात अतिशय महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ हिंदी साहित्यिक माधव कौशिक विजयी झाले. या निवडणुकीत ज्येष्ठ मराठी साहित्यिक रंगनाथ पठारे पराभूत झाले. त्यांना केवळ तीन मते मिळाली.           साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षपदी दिल्ली विद्यापीठाच्या प्रोफेसर कुमुद शर्मा यांची निवड झाली आहे. साहित्य अकादमीच्या इतिहासात पहिल्यांदा या पदावर एका महिलेची निवड झाली आहे. त्यांनी राधा कृष्णन यांचा केवळ एका मताने पराभव केला. साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत झाली. त्यात रंगनाथ पठारे यांच्यासह माधव कौशिक आणि कन्नड साहित्यिक मल्लपुरम व्यंकटेश रिंगणात होते. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव म्हणाले की, निवडणूक निकाल जाहीर करताना निवडणुकी दरम्यान सर्व ९९ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.   त्यात कौशिक यांना ६०, मल्लपुरम व्यंकटेश यांना ३५, तर पठ

आईनस्टाईन ने साऱ्या जगाला एकट्याने जिंकले, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. मानवाच्या सृष्टीविषयक तत्कालीन कल्पनेत उलथापालथ घडवून आणून गुरुत्वाकर्षण, अवकाश , काळ आदीमध्ये क्रांतिकारक स्वरूपाचे नवे विचार जगापुढे मांडण्याचे कार्य गणितज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन ने केले आहे. १४ मार्च हा त्यांचा जन्मदिन.त्या निमित्ताने.....

इमेज
आईनस्टाईन ने साऱ्या जगाला एकट्याने जिंकले, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. मानवाच्या सृष्टीविषयक तत्कालीन कल्पनेत उलथापालथ घडवून आणून गुरुत्वाकर्षण, अवकाश , काळ आदीमध्ये क्रांतिकारक स्वरूपाचे नवे विचार जगापुढे मांडण्याचे कार्य गणितज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन ने केले आहे. १४ मार्च   हा त्यांचा जन्मदिन.त्या निमित्ताने.....    विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ  : अ ल्बर्ट आईनस्टाईन    !                   अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म १४ मार्च १८७९ रोजी जर्मनीतील उल्म या गावी एका ज्यू कुटुंबात झाला. लहानपणी मंद बुद्धीचा आणि एकलकोंडा समजल्या गेलेल्या अल्बर्ट यांना गणित, विज्ञान आणि संगीताची आवड होती. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी बीजगणितातील भौतिकी समीकरणे आत्मसात केली होती. झ्युरिच (स्वित्झर्लंड) येथील फेडरल इंस्टीटयूट ऑफ टेक्नोलोजी मधून गणित व विज्ञान या विषयातून पदवी घेऊन ते एका पेटंट ऑफिस मध्ये कारकुनाची नोकरी करू लागले. आईन्स्टाईन नोकरी करीत असताना न्यूटनच्या गतीविषयक व गुरुत्वाकर्षण विषयक सिद्धांतावर विचार करावयाचे. त्यांना विश्वाचा शोध घेण्याची तळमळ लागली होती.  न्यूटनचा सिद्धांत आकाशातील