कोण म्हणते, मराठा जातीयवादी आहे !! थोडक्यांत मांडलेल्या विचारांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
कोण म्हणते , मराठा जातीयवादी आहे, विचारून तर बघा एकदा नवनिर्वाचित आमदार दराडे बंधूंना, व शिवसेनेला ! किती मते होती वंजारी समाजाची, याचा अभ्यास करा ? पैसे जे, निवडणुकीत वाटले जायला नकोत या मताचा मी पण आहे, पण कोणी एकानेच वाटलेत की अनेक उमेदवारांनी ? मग फक्त दराडे व विकले गेलेले मराठाच दोषी आहेत का ? बोटावर मोजण्या इतकी वंजारी समाजाची मते असतांना मराठा समाजाने दरांडेंना मतदान केले व दोन्ही बंधू निवडून आलेत यां विजयांतील सर्वात मोठा वाटा मराठा समाजाचा आहे, हे कुणीही नाकारू शकत नसतांना विनाकारण मराठा समाज जातीयवादी आहे अशी बदनामी का होतेय ? हाकाटी पिटविणाऱ्यांनो जर खरोखर मराठा समाज जातीयवादी असता वा तसा वागला असता तर निवडणुकीचा निकाल काय असता ? याचा विचार करा !! सकल मराठा समाज एक आहे पण जातीयवादी राजकारणापासुन कोसो दूर आहे नासिक मतदार संघातील दोन्ही विधानपरिषद निवडणुक निकालावरून स्पष्ट होत असतांना विनाकारण बदनामी का केली जातेय ? या मागील षडयंत्राचा अभ्यास करणे हा यामागील मुळ मुद्दा ठरू शकतो , त्याचा अभ्यास ज्यांना गरज आहे ते करतीलही, तुर्तास जातीयवादाला पसरवू नका, फक्त नासिक जिल्ह