पोस्ट्स

साप्ताहिक न्यूज मसाला दि. १५ जुलै चा अंक. सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
सा प्ताहिक न्यूज मसाला दि. १५ जुलै चा अंक न्यूज  मसाला दि. १५ जुलै चा अंक

मर्मज्ञ चित्रकार ; उपक्रमशील पत्रकार संजयजी देवधर ! मुक्त पत्रकार पराग वाड यांनी संजयजी यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या लेखनीतून शब्दबद्ध केलेल्या शुभेच्छा !! न्यूज मसाला परीवाराकडून संजयजी यांना ६३ व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
न्यूज मसाला सर्विसेस , नासिक    7387333801 मर्मज्ञ चित्रकार ; उपक्रमशील पत्रकार    अतिशय साक्षेपी दृष्टी लाभलेले प्रतिभावंत चित्रकार, कलासमीक्षक, वारली चित्रशैलीचे अभ्यासक, दैनिकात दीर्घकाळ वार्ताहर तसंच उपसंपादक आणि सेवानिवृत्तीनंतर आता मुक्त पत्रकारिता; एवढे सगळे पैलू एकाच व्यक्तीत एकवटलेले असणं तसं विरळाच ! कार्यालयीन सहकारी आणि मित्र या नात्यानं आमचा घनिष्ठ ऋणानुबंध जुळला. असे माझे हे ज्येष्ठ स्नेही संजय देवधर आज दि.१३ जुलै रोजी ६३व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.या औचित्यानं मला भावलेल्या त्यांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचं हे शब्दचित्र...     एका मध्यमवर्गीय, मात्र विद्याव्रती अशा परिवाराचा वारसा संजय देवधर यांना लाभला. त्यांचे पणजोबा प्राणाचार्य कृष्णशास्त्री देवधर हे  प्रख्यात वैद्य होते. त्यांची कीर्ती सर्वदूर पसरलेली होती. नाशिकच्या रविवार पेठेतील त्यांचा वाडा असलेल्या गल्लीला तत्कालीन नगरपालिकेने देवधर गल्ली असे नाव सन्मानपूर्वक दिले होते, आजही ही गल्ली याच नावाने ओळखली जाते. अशा प्रसिद्ध  घराण्यात जन्मलेल्या संजय यांना चित्रकलेची उपजत आवड होती. नामांकित पेठे विद्याल

कवी अमोल बागुल यांचा "मुक्काम आयसीयू कोविड वॉर्ड" काव्यसंग्रह ऐतिहासिक दस्तऐवज आणि सृजनात्मक कलाकृती- कविवर्य आम. लहू कानडे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
न्यूज मसाला सर्विसेस , नासिक   7387333801 मुक्काम आयसीयू (कोविड वॉर्ड) काव्यसंग्रह ऐतिहासिक दस्तऐवज आणि सृजनात्मक कलाकृती  : कविवर्य आ.लहू कानडे अहमदनगर : “आजही न संपलेल्या वेदनेला मुहतोड जबाब देणारी अमोल बागुल यांची कविता ही फक्त कविता नसुन कोरोना काळातील एक ऐतिहासिक दस्तऐवज आणि सृजनात्मक कलाकृती आहे,” असे मत कविवर्य आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केले.*          वाचकपीठच्या अकराव्या दृकचित्र साहित्य चर्चा (वेबिनार) मध्ये अध्यक्षपदावरून ते बोलत होते.नाशिक मनपा चे सहा.आयुक्त तथा कवी अमोल बागुल यांच्या “मुक्काम आयसीयू (कोविड वॉर्ड)” या काव्यसंग्रहावर चर्चा करण्यात आली.याचर्चेमध्ये प्रा.डॉ. गंगाधर अहिरे,नाशिक,प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे,सिन्नर, प्राचार्य चंद्रकांत भोसले इ मान्यवर सहभागी झाले होते.        पुढे बोलतांना आ.लहू कानडे म्हणाले कि, “जगण्याचा आत्मविश्वास गमावणारी माणसे कोरोनाने गेली,आशा परिस्थितीमध्ये अमोल बागुल संवेदनशीलपणे लिहित राहिले,कवितेने त्यांना जगण्याचे बळ तर दिलेच पण कविता चौकाचौकात,मोह्ल्या मोहल्यात वाचली तर माणसांच्या जगण्याला हातभार लागेल अशी प्रबोधनात्मक आहे.”  प

न्यूज मसाला दि. ८ जुलै च्या अंकात- संपादकीय- डोंगर हादरले अन् झाडे झाली भयभीत ! जनजाती समाजाला वनांवर अधिकार देण्यासाठी केंद्र सरकारचा पुढाकार ! इन्कलाब पुस्तक प्रकाशन-कायद्याचे राज्य बळकट करून विवेकी विचारांची गरज- सरकारी वकील शिशिर हिरे यांचे प्रतिपादन !! गांव समृद्ध तर मी समृद्ध या संकल्पनेतून रोहयो च्या लेबर बजेटची आखणी करा- अपर मुख्य सचिव !!! जिल्हा बँका डबघाईला का आल्या - दिलीप देशपांडे !! मॅग्मो प्रकाश नावाचे वादळ काळाच्या पडद्याआड- जी.पी.खैरनार !! सचित्र पर्जन्यसूक्त- संजय देवधर !! पोलिस एफआयआर दाखल करून घेत नाहीत-मनपा उपायुक्त !! शहर बससेवेचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते उद्घाटन !! ग्रामीण भागातील रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक गावाची- पालकमंत्री छगन भुजबळ !! श्रीराम महाराज बेलेकर अनंतात विलीन !! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
Editorial डोंगर हादरले अन् झाडे झाली भयभीत !    नाशिक शहरासह परिसर व जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली सध्या निसर्ग धोक्यात आला आहे. त्यामुळे सह्याद्री पर्वतरांगेतील डोंगर हादरले असून पुरातन वृक्षसंपदा भयभीत झाली आहे. गौण खनिजांसाठी डोंगराच्या पायथ्याशी स्फोट घडवून डोंगर उध्वस्त केले जातात. सर्वोच्च व उच्च न्यायालयाने स्पष्टपणे निर्देश दिलेले असतांना बिनदिक्कतपणे दिवसाढवळ्या अवैध वृक्षतोड केली जाते. संबंधित यंत्रणा मात्र निष्क्रिय दिसतात. त्याबद्दल संतापाची लाट उसळली आहे. हॅशटॅग चिपको चळवळ, उत्तुंग झेप फाउंडेशन, जिल्हाधिकारी कार्यालयाने नियुक्त केलेला टास्क फोर्स व विविध निसर्गप्रेमी, पर्यावरण तज्ज्ञ यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.      त्र्यंबकेश्वरजवळ ब्रम्हगिरी पर्वतातून गोदावरी नदीचा उगम होतो. तेथेच अवैधरीत्या उत्खनन सुरू झाल्याने संतापाचा उद्रेक झाला. ते थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कृती समिती नेमली. त्यावरूनही वाद झाले. या समितीत उत्खननात सामील असणाऱ्यांनाच सहभागी करून घेतल्याची तक्रार पर्यावरण तज्ज्ञ असणाऱ्यांनी केली. नंतर त्यांनाही सामावून घेण्यात आले. त्याचदरम्यान दुस

पावसाळी अधिवेशनात जनहिताचे निर्णय घेतल्याचे समाधान-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नऊ विधेयके दोन्ही सभागृहात संमत !! एका दृष्टिक्षेपात दोन दिवसीय अधिवेशन सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सौजन्य:- NEWS DAILY  मुख्यमंत्री सचिवालय पावसाळी अधिवेशनात जनहिताचे निर्णय घेतल्याचे समाधान-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नऊ विधेयके दोन्ही सभागृहात संमत मुंबई दि. ६:  पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचाच असला तरीही या अधिवेशनात जनतेच्या हिताचे कामकाज करता आले याचे समाधान आहे असे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. या अधिवेशनात ९ विधेयके दोन्ही सभागृहांनी मंजूर केली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्य मंत्री अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते. या दोन दिवसाच्या अधिवेशनात खालीलप्रमाणे कामकाज झाले त्याविषयी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी माहिती दिली . १.     मराठा आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा शिथील करण्याची केंद्र शासनाला शिफारस करणारा ठराव २.     ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळविण्याचा ठराव ३.     2014 च्या ईएसबीसी उमेदवारांना मोठा दिलासा. तात्पुरत्या नियुक्त्या, वयोमर्यादेत वाढ ४.     लवकरच महाराष्ट्र आयोगामार्फत १५ हजार ५१५ वर्ग

निसर्गाशी मानवाचे असलेले अतूट नाते हेच त्यांच्या चित्रांचे अधिष्ठान व भावविश्व ! सचित्र पर्जन्यसूक्त !! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सचित्र पर्जन्यसूक्त     पावसाळ्याच्या प्रारंभी जून, जुलै महिन्यात आदिवासी वारली चित्रकार पावसाची, शेतीची, पावसात नाचणाऱ्या मोरांची चित्रे काढतात. झोपडीच्या भिंतीवर अशी चित्रे काढण्यामागे चांगले पीक तयार होऊन अन्नधान्याने समृद्धी यावी, हा प्रामाणिक उद्देश असतो. निसर्गावर त्यांची अपार श्रद्धा आहे. वारली जमात पावसारंभी जणू एका तालासुरात सचित्र पर्जन्यसूक्त गात असते. ढगातून जमिनीवर येणाऱ्या पावसाच्या  धारा अन् सरी, आनंदाने थुईथुई नृत्य करणारे मोर, आकाशात पसरलेले इंद्रधनुष्य, शेतातील पेरणी, शेतकऱ्यांची लगबग, गुरेढोरे, शेतीची अवजारे व निसर्गाची विविध रूपे यांचा चित्रांमध्ये समावेश असतो. केवळ पांढऱ्या रंगात रंगविलेल्या इंद्रधनुष्यात सप्तरंगांची उणीव भासत नाही हे विशेष !     आदिवासी वारली जमात शेतीसंस्कृती जपते. त्यांच्या जगभर लोकप्रिय झालेल्या चित्रसंस्कृतीलाही ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. त्यामुळेच वारली चित्रशैलीत शेतात काम करणारे स्त्रीपुरुष, झाडेझुडपे, विहिरी, पशुपक्षी, सरपटणारे प्राणी, उंदीर, बेडूक अशा शेतीला उपयुक्त घटकांना महत्त्वाचे स्थान दिले जाते. निसर्गाशी मानवा

पोलिस एफआयआर दाखल करून घेत नाहीत-मनपा उपायुक्त ! नाशिकरोडच्या वृक्षतोड प्रकरणी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंद !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिकरोडच्या वृक्षतोड प्रकरणी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंद ! नाशिक (प्रतिनिधी ) दि.१ जुलै रोजी नाशिकरोडच्या जव्हेरी कॉलनीत २५० वर्षांपेक्षा पुरातन पिंपळाचे झाड अवैधरीत्या तोडण्यात आले. मनपा उद्यान विभागाने सायंकाळी उशिरा पंचनामा केला. या बाबतीत दखलपात्र गुन्हा दाखल होण्याची गरज असताना संबंधित केवळ दोन व्यक्तींवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबद्दल हॅशटॅग चिपको चळवळीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून उद्यान विभाग व पोलीस यंत्रणा अशीच चालढकल करून गुन्हेगारांना पाठिशी घालणार असेल तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.       सर्वोच्च व उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश देऊनही नाशिकमध्ये अवैध वृक्षतोडीच्या घटना वारंवार घडत आहेत. संबंधित यंत्रणा मात्र थातुरमातुर कारवाई केल्याचे दाखवतात.  उडवाउडवीची उत्तरे देतात. नाशिकरोडमधील प्रख्यात वास्तुविशारद व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवसाढवळ्या उंच पत्रे उभारुन २५० वर्षांपेक्षा पुरातन पिंपळाचे झाड समूळ तोडले. याबाबतीत कडक कारवाईची मागणी हॅशटॅग चिपको चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केली. पण संबंधित व्यक्तींवर दखलपात्र गुन्हा