ब्रह्माकुमारी संस्थेच्या कार्याची समाजाला गरज आहे -पोलीस निरिक्षक सीताराम कोल्हे. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
ब्रह्माकुमारी संस्थेच्या कार्याची समाजाला गरज आहे -पोलीस निरिक्षक सीताराम कोल्हे पंचवटी (दि.२० सप्टेंबर) - या आध्यात्मिक वातावरणात येऊन मला खूप छान वाटले. बाहेर समाजात फिरताना ताण-तणावाला सामोरे जावे लागते. मात्र येथे दहा मिनिटातच मला सुख शांतीची अनुभूती झाली. ब्रह्माकुमारी संस्थेचे कार्य महान आहे. या कार्याची समाजाला गरज आहे. समाजात फोफावत चाललेली गुंड प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी अध्यात्मिक ज्ञान गरजेचे आहे, हे ब्रह्मकुमारी संस्थेने अधोरेखित केले आहे. समाजसुधारणेचे हे महान कार्य ब्रह्माकुमारी संस्था करीत आहे असे प्रतिपादन पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी केले. दिनांक १९ सप्टेंबर रोजी ब्रह्माकुमारी संस्थेच्या पंचवटी सेवाकेंद्रात राजयोग शिबीराच्या समापन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली याप्रसंगी व्यासपीठावर नाशिक रोड सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी प्रा. सुरेश साळुंखे, ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी, सप्तशृंगी मित्रमंडळाचे सतनाम राज