राहुडे अतिसाराचे बळींची संख्या चारवर !! नागरिकांनी पाणी शुद्ध करून पिणे व प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी-शितल सांगळे, खासदार चव्हाण यांनीही केली पाहणी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
नाशिक(१३)::– दुषित पाण्यामुळे अतिसाराचा उद्रेक होवून ४ जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविली गेलेल्या सुरगाणा तालुक्यातील राहुडे ग्रामपंचायतीस आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी भेट देवून याबाबत माहिती घेतली. दरम्यान, खासदार हरीश्चंद्र चव्हाण यांनीदेखील राहुडे गावास भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा केली. ८ जुलै रोजी सुरगाणा तालुक्यातील राहूडे येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत अति पावसामुळे विहिरी शेजारील नाल्यातील पाणी गेल्यामुळे पाणी दुषित होवून अतिरासाराची लागण झाली असे प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते, त्यापाठोपाठ कळवण तालुक्यातील वीरशेत येथे पाणी पिण्यास अयोग्य असलेल्या हातपंपाचे पाणी पिल्यामुळे साथीचा उद्रेक झाला होता. याबाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत, जलव्यवस्थापन सभेत तसेच स्थायी सभेत याविषयी चर्चा झाली होती. घटनेची सर्व चौकशी करून संबधितांवर कार्यवाही करण्याचे आदेश शितल सांगळे यांनी दिले होते. जिल्ह