साथीचे आजारांवर नियंत्रणासाठी ग्रामपंचायतीमध्ये एक कोरडा दिवस पाळण्यात यावा-इशादिन शेळकंदे ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
नाशिक – पाणी गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सलग दुस-या वर्षी सर्व तालुक्यांमध्ये जलकुंभांची स्वच्छता व शुद्धीकरण तसेच हातपंपांचे शुद्धीकरण करण्यात येत असून १६ ते ३० जुन पर्यत चालणा-या या अभियानात आतापर्यत जिल्हयातील पेठ, निफाड, बागलाण व सिन्नर येथे मोठया प्रमाणात जलकुंभांची स्वच्छता करण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा येथे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या स्वच्छता व हातपंप शुद्धीकरण अभियान प्रभावीपणे राबविणेबाबतचे दिले असून याचा दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे मुलभूत कर्तव्य आहे. यासाठी पाणी व स्वच्छता विभागातील पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ, टाक्या, हातपंप शुद्धीकरण, टी.सी.एल. साठवणूक व टी.सी.ए