पोस्ट्स

नासिक येथील अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेची करमाळा जि. सोलापूर येथे शाखा...

इमेज
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेची करमाळ्याला शाखा...        नाशिक..दि.२४::-आखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिकच्या करमाळा येथे नविन केंद्राचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला. संस्थेचे कार्याध्यक्ष उदयकुमार मुंगी, सहकार्यवाह गंगाधर कुलकर्णी, कार्यकारीणी सदस्य सर्वश्री सचिन पाडेकर, सुभाष सबनीस, उल्हास पंचाक्षरी रोहीणी कुलकर्णी, सुप्रिया सबनीस आणि केंद्राचे पदाधिकारी संतोष कुलकर्णी, सदस्य सुधीर पुराणिक, नरहरी होशिंग, सारंग पुराणिक, सुनिल कुलकर्णी, सुनिल देशमुख, राजेंद्र सुर्यपुजारी, निलिमा पुंडे, सागर कुलकर्णी उपस्थित होते.                उद्घाटनाच्या निमित्ताने सामुदायिक व्रतबंधाचे आयोजन करण्यात आले होते. अठरा बटुंचा व्रतबंध यावेळी पार पडला. केंद्राच्या केंद्रप्रमुखपदी संतोष कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. आखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिकच्या ध्येय धोरणानुसार आणि संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा केंद्राच्या माध्यमातून समाजाची सेवा करू‌, तसेच विविध उपक्रम राबवून संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करू असे आश्वासन केंद्रप्रमुख संतोष कुलकर्णी यांनी यावेळी दिले. शेखर जोगळ

युवा वर्गातील वाढती व्यसनाधीनता हातात हात घालून हदयास हदय जोडून बंधू सहाय्याला लाहो बलसागर भारत होवो - साने गुरुजी

इमेज
युवा वर्गातील वाढती व्यसनाधीनता             हातात हात घालून             हदयास हदय जोडून             बंधू सहाय्याला लाहो             बलसागर भारत होवो                                   - साने गुरुजी         आज आपण २१ व्या शतकात पदार्पण करत आहोत. आपला भारत देश विश्वगुरू होण्याच्या शर्यतीत एकेक पाऊल पुढे टाकत आहे. या २१ व्या शतकात " युवा वर्गातील वाढती व्यसनाधीनता " यासारखा निबंध लिखानाचा विषय ठरावा. यासारखे दुर्देव कुठेच नसेल.         जगातील सर्वात जास्त युवक असलेला देश म्हणून भारताची ओळख आहे. कारण १८ ते ३५ या वयोगटातील ५५ टक्के युवक भारतात आहे. हा युवकवर्ग निरोगी, विवेकी, सुदृढ, विज्ञाननिष्ठ, व्यसनमुक्त असणे हीच देशाची खरी ताकद आणि यश आहे. परंतू भारतात विचित्र स्थिती पहावयास मिळते. किशोरवयींन लहान मुलांपासून ते युवकापर्यंतचे सर्वच घुटखा, मावा, तंबाखू, सिगारेट, बिडी, चरच, गांजा, ड्रग्स अशा विविध पदार्थांचे सेवन करून रस्त्यावर थुंकतांना दिसतात. अशी व्यसनाच्या जाळ्यात अडकलेली युवा पिढी देशाचे भवितव्य कसे ठरू शकेल हाच गंभीर प्रश्न आज भारतासमोर निर्माण झाला आहे.        शाळा, महाविद्

आपल्याकडे शेती नसेल तरीही प्रत्यक्ष शेतात जाऊन विषमुक्त भाजीपाला लागवडीसह सुदृढ जीवनशैलीचा मूलमंत्र !

इमेज
विषमुक्त भाजीपाला लागवडीसह मिळणार सुदृढ जीवनशैलीचा मूलमंत्र! नाशकातील मृद‍्गंध @ यंदे फार्म कडून अनोखी व्यवस्था सादर !        नाशिक::- शहरी जीवनशैलीचा अंगीकार करणार्‍यांना एकाच वेळी सेंद्रिय भाजीपाला उत्पादनाचा वेगळा अनुभव देताना दुसरीकडे दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करणारी अभिनव व्यवस्था नाशिक शहरात उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती यंदे फार्मच्या संचालिका स्मिता यंदे यांनी दिली. पुण्यामधील मृद‍्गंध स्टार्ट-अपच्या ​संयुक्त विद्यमाने नाशकात त्र्यंबकरोडवर हा प्रकल्प आकारणीस येत असल्याचे यंदे यांनी सांगितले.         यासंदर्भात अधिक माहिती देताना यंदे यांनी सांगितले की, शेतामध्ये भाडेतत्वावर उपलब्ध करून दिलेल्या सुमारे ७५० चौरस फूट जागेत गादीवाफे तयार करून भाज्यांची शेती करण्याची संधी यामध्ये दिली जाणार आहे. हे प्लॉट्स किमान सहा महिन्यांसाठी देताना त्यामधून सेंद्रिय पध्दतीने भाजीपाल्याची लागवड करता येणार आहे. यासाठी आवश्यक ते साहित्य मृद‍्गंध @ यंदे फार्मच्या वतीने पुरवण्यात येणार असून बिया आणि तत्सम वस्तू उत्पादक आणू शकतात. विषमुक्त भाजीपाल्याची लागवड करून सुदृढ जीवनशैलीचा मूलमंत्र

२५ जून भारतीय इतिहासातील सुवर्ण दिनच !

इमेज
२५ जून भारतीय इतिहासातील सुवर्ण दिनच !        २५ जून १९८३ हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली हा संघ विश्वचषकात सहभागी होण्यासाठी इंग्लंडला गेला तेव्हा या संघाकडून कोणालाच अपेक्षा नव्हती ,  पण युवा भारतीय संघाने आपल्या समर्पणाने आणि मेहनतीने जगातील सर्व संघांना गुडघे टेकायला लावून २५ जून १९८३ ला क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्डस वर दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचा अंतिम फेरीत पराभव करून विश्वचषक जिंकला. त्या विजयानंतर क्रिकेट हा खेळ भारतात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. या स्पर्धेतील झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात भारताच्या १७ धावांत पाच विकेट पडल्यानंतर तरूण कर्णधार कपिल देवची नाबाद १७५ धावांची खेळी क्रिकेटच्या इतिहासात एक दंतकथा बनली आहे.   विश्वचषक विजय हा सामूहिक विजय होता. त्या विजयात प्रत्येक खेळाडूने आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कामगिरी केली. हा ऐतिहासिक विजय सर्व खेळाडूंसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. त्या विजयानंतर भारतीय संघाकडे आदराने पाहिले जात होते. क्रिकेटप्रेमी तो दिवस कधीच विसरणार नाहीत. तो

"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातून सुवर्ण भारताच्या दिशेने". व्याख्यान::- स्वर्णिम भारताच्या निर्मितीत महीलांचे योगदान !

इमेज
नाशिक - "स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातून सुवर्ण भारताच्या दिशेने" हे घोष वाक्य घेऊन  अंतरराष्ट्रीय स्थरावरील संस्था प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय तर्फे  जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ दरम्यान संपूर्ण भारतातील तसेच देश विदेशातील  विविध सेवाकेंद्र  तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.         याच शृंखलेत दिनांक १९ जून रोजी म्हसरूळ कलानगर येथील प्रभू प्रसाद या ब्रह्माकुमारी च्या मुख्य सभागृहांमध्ये स्वर्णिम भारत निर्मितीत महिलांचे योगदान या  विषयान्वये महिलांसाठी  एक दिवसीय व्याख्यानाचे आयोजन दिनांक १९ जून रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख प्रमुख वक्ता म्हणून शिर्ड्डी साईबाबा संस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत, प्राचार्या डॉ. जेडी  सोनखासकर महिलांना विशेष मार्गदर्शन करणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दिदीजी स्वर्णिम भारत निर्मितीत  महिलाचे योगदान या विषयी आपले मनउदगार प्रस्तुत करणार आहेत. या कार्यक्रमासाठी अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहित

प्रस्थापित पक्षांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करणार्‍या लोकशाही आघाडीची २० जून रोजी विभागीय बैठक !

इमेज
प्रस्थापित पक्षांच्या विरोधात नवीन पर्याय निर्माण करणार्‍या लोकशाही आघाडीची नागपूरमध्ये २० जून रोजी विभागीय बैठक !        मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार मागासवर्गीयांना न्याय देण्यात कमी पडले आहे. फुले-शाहू-आंबेडकर, आण्णा भाऊ साठे यांच्या नावाने मागासवर्गीयांची, बहुजनांची मते घेऊन ह्या पक्षांनी सत्ता मिळवली आहे. मात्र ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळू नये, असा ह्या प्रस्थापित पक्षांचा डाव आहे. म्हणून एकमेकांवर आरोप करत आहेत, मात्र मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांच्या पदोन्नतीतील आरक्षण दोन्ही पक्षांनी असेच अडकवून ठेवले आहे. ओबीसींना पदोन्नतीतील आरक्षण सुरू करण्यासाठी २००६ ला कॅबिनेटच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही, मागासवर्गीयांच्या शैक्षणिक सवलती, सरकारी नोकरीतील लाखांचा शिल्लक असलेला अनुशेष, खाजगीकरण कंत्राटीकरण, कोतवालांना चतुर्थ श्रेणी नाकारणे, कामगार विरोधी कायदे, गगनाला भिडणारी महागाई, पेट्रोल डिझेलचे भाव शंभरावर कधीच गे

देहू येथील शिळा मंदिराबद्दल माहिती !

इमेज
देहू येथील शिळा मंदिराबद्दल माहिती !     पुणे::-१७ व्या शतकातील संत, जगतगुरू तुकाराम यांच्या सन्मानार्थ पुण्याजवळ देहू येथे उभारण्यात आलेल्या शिळा मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रार्पण केले. पंतप्रधानांनी यावेळी संत तुकाराम यांची भक्ती करणाऱ्या आणि महाराष्ट्रात पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांशी संवाद देखील साधला.             विशिष्ट प्रकारच्या राजस्थानी दगडापासून बांधण्यात आलेले हे मंदिर, संत तुकाराम यांनी ज्या शिळेवर बसून १३ दिवस ध्यानधारणा केली त्या शिळेला समर्पित करण्यात आले आहे. पंढरपूरची वारी सुरु करण्यापूर्वी तुकाराम महाराजांचे भक्त असलेले वारकरी या शिळेचे दर्शन घेऊन प्रार्थना करतात.            या शिळा मंदिराच्या जवळच उभारण्यात आलेल्या संत तुकाराम यांच्या नव्या पुतळ्याचे अनावरण देखील पंतप्रधानांनी केले.          १७ व्या शतकात होऊन गेलेले भक्तिमार्गाचे उपासक कवी आणि संत तुकाराम त्यांच्या ‘अभंग’ या प्रकारच्या भक्तीभावाने भरलेल्या काव्यरचनांसाठी तसेच ‘कीर्तने’ म्हणून प्रसिध्द असलेल्या अध्यात्मिक रचनांसाठी सुप्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील वारकरी समुदायामध्ये त्या