"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातून सुवर्ण भारताच्या दिशेने". व्याख्यान::- स्वर्णिम भारताच्या निर्मितीत महीलांचे योगदान !

नाशिक - "स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातून सुवर्ण भारताच्या दिशेने" हे घोष वाक्य घेऊन  अंतरराष्ट्रीय स्थरावरील संस्था प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय तर्फे  जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ दरम्यान संपूर्ण भारतातील तसेच देश विदेशातील  विविध सेवाकेंद्र  तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

       याच शृंखलेत दिनांक १९ जून रोजी म्हसरूळ कलानगर येथील प्रभू प्रसाद या ब्रह्माकुमारी च्या मुख्य सभागृहांमध्ये स्वर्णिम भारत निर्मितीत महिलांचे योगदान या  विषयान्वये महिलांसाठी  एक दिवसीय व्याख्यानाचे आयोजन दिनांक १९ जून रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख प्रमुख वक्ता म्हणून शिर्ड्डी साईबाबा संस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत, प्राचार्या डॉ. जेडी  सोनखासकर महिलांना विशेष मार्गदर्शन करणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दिदीजी स्वर्णिम भारत निर्मितीत  महिलाचे योगदान या विषयी आपले मनउदगार प्रस्तुत करणार आहेत. या कार्यक्रमासाठी अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी +91 94234 81973 या क्रमांकावर संपर्क साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

खोटी माहिती सादर केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार ! उप अभियंत्यांनी दिलेला अंतराचा दाखला ग्राह्य धरला जाईल !! शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांबाबत डॉ. गितेंचा इशारा !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!