पोस्ट्स

युवा रेडक्रॉस हे व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम : डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी

इमेज
युवा रेडक्रॉस हे व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम : डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी      नाशिक : " छत्रपती शिवरायांसारखं अलौकिक व्यक्तिमत्व घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि इतिहासातील ध्रुवतारा स्वामी विवेकानंद यांचा आज जन्मदिन. या दुर्मिळ योगावर आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस सारख्या मानवतावादी संघटनेच्या युथ रेडक्रॉस या उपयुक्त उपक्रमाला नाशिकचे युवक आपलेसे करत आहेत ही नाशिक रेडक्रॉस साठी अतिशय आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. या युथ रेडक्रॉस च्या वाटचालीत आम्ही खंबीरपणे उभे राहू असे प्रतिपादन नाशिक रेडक्रॉस चे चेअरमन डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले. मविप्र चे आर्किटेक्चर कॉलेज आणि नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या युथ रेडक्रॉस शाखांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर पी. एम. भगत होते तर सुप्रसिद्ध वास्तुरचना तज्ज्ञ प्रसन्न भोरे, फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉ.विजय वाघ, आर्किटेक्ट महाविद्यालयाचे प्रा.आशीष खेमनार , प्रा. मेघा बुटे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.  कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद

प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी "बांबू" लागतातच ! "बांबू" लागू नयेत यासाठी काय गरजेचे आहे ते बघूया २६ जानेवारीपासून !!

इमेज
प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी "बांबू" लागतातच !  "बांबू" लागू नयेत यासाठी काय गरजेचे आहे ते बघूया २६ जानेवारीपासून !!          नाशिक ( प्रतिनिधी ) - प्रेमाचा इतिहास हेच सांगतो की, खांद्यासाठी बांबू लागतो आणि बांबू लागला की, कोणाचा तरी खांदा हा लागतोच. खरंतर प्रेमात पडलेल्या सॅारी…. प्रेमात लागलेल्या अनेक बांबूचा अनुभव आयुष्यात प्रत्येकानेच घेतला असेल. हे बांबूच लागू नयेत यासाठी प्रेमाचे सायन्स पाळणे खूप गरजेचे आहे. प्रेमात बांबू कसे लागतात, याची गोष्ट सांगणारा  ‘बांबू’ चित्रपट लवकरच दि.२६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.     क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत, तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्मित, विशाल देवरूखकर दिग्दर्शित, अंबर विनोद हडप लिखित या चित्रपटात अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, पार्थ भालेराव, वैष्णवी कल्याणकर, समीर चौघुले, स्नेहल शिदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. चित्रपटातील ‘मी तुला त्या नजरेनं’ हे धमाल गाणेही नुकतेच प्रदर्शित झाले असून तरूणाईला भुरळ घालणारे हे गाणे रोहित राऊत आणि ज्ञानदा पवारने गायले आहे. य

महीला पोलिसांवरील संशोधन प्रकल्प ! कु. सोनाली शिराळकर यांची प्रथम पारितोषीकाची हॅटट्रिक व सुवर्ण पदक" ! मुंबई विद्यापीठाच्या १७ वी आविष्कार आंतरमहाविद्यालयीन संशोधन स्पर्धा !

इमेज
महीला पोलिसांवरील संशोधन प्रकल्प ! कु. सोनाली शिराळकर यांची प्रथम पारितोषीकाची हॅटट्रिक व सुवर्ण पदक" ! मुंबई विद्यापीठाच्या १७ वी आविष्कार आंतरमहाविद्यालयीन संशोधन स्पर्धा !         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई विद्यापिठ, विद्यार्थी कल्याण मंडळ आयोजित १७व्या आंतरमहाविद्यालयीन संशोधन प्रकल्प स्पर्धेत, सिद्धार्थ महाविद्यालय संशोधन केंद्राच्या पीएच. डी. विद्यार्थिनी, कु. सोनाली प्रकाश शिराळकर यांच्या महिला पोलीसांवरील संशोधन प्रकल्पास अंतिम फेरीत प्रथम पारितोषिक मिळाले. मागील दोन वर्षासह सलग तीनही वर्षी त्यांनी प्रथम पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली व त्या सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या. मुंबई विद्यापिठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी मान्यवर परीक्षकांच्या उपस्थितीत सुवर्णपदक व प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित केले. त्यांच्या संशोधन प्रकल्पाचा विषय होता "मुंबईतील महिला पोलीसांमधील सामर्थे, संधी, दुर्बलता व आवाहनांचे विश्लेषण" (A Study on SOWC Analysis of Women Police in Mumbai Region).       यानंतर कु. सोनाली  राज्यस्तरीय आविष्कार आंतर-विद्यापीठ स्पर्धेत मुंबई वि

पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेच्यावतीने स्वेटर वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

इमेज
पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेच्यावतीने स्वेटर वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !           सांजेगांव(ता.इगतपुरी):- पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्था नासिक आणि जिल्हा परिषद नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा सांजेगांव येथील २४० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले.      दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे आणि सरस्वती पूजन तसेच दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष सुभाष सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले.         याप्रसंगी निवृत्ती जाधव यांनी बोलताना पत्रकार फक्त बातमीच घेण्यासाठी येतात असे नाही तर ते समाजाचा आरसा बनून येतात, राजकारणी व प्रशासनाकडून प्रश्नांची सोडवणूक करून घेतात, यापलीकडे जाऊन या संस्थेने आज विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करून जांभेकरांच्या स्मृतींना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले, विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले यातून पत्रकारांची समाजाप्रती असलेली

'गोष्टीपलीकडचे महाभारत' सारख्या ग्रंथांनी मराठी भाषा समृद्ध होईल - दीपक केसरकरमहाभारतातील सूडाचा प्रवास नव्हे तर अतिशय सकारात्मक इतिहासाचा हा मागोवा आहे - प्रा. डॉ.खांडगे

इमेज
'गोष्टीपलीकडचे महाभारत' सारख्या ग्रंथांनी मराठी भाषा समृद्ध होईल - दीपक केसरकर महाभारतातील सूडाचा प्रवास नव्हे तर अतिशय सकारात्मक इतिहासाचा हा मागोवा आहे - प्रा. डॉ.खांडगे       मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : 'गोष्टीपलीकडचे महाभारत' हा स्वाती काळे लिखित ग्रंथ म्हणजे महाभारतातील विविध प्रसंग पात्रे यांची मौलिक मांडणी आहे. हे पुस्तक मराठी भाषेच्या समृद्धीत निश्चितच भर टाकेल. वस्तू व सेवा कर या विभागांमध्ये सहआयुक्त पदाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असताना स्वाती काळे यांनी आपल्या चित्रमय शैलीतून महाभारतातील विविध घटनांचे आणि पात्रांचे जे चिंतन मांडले आहे, ते पथदर्शी ठरेल. 'गोष्टीपलीकडचे महाभारत' च्या पुढच्या भागाची तयारी स्वाती काळे यांनी करावी, असे मत मुंबईचे पालकमंत्री तसेच शालेय शिक्षण व मराठी भाषा विकास मंत्री माननीय नामदार दीपक केसरकर यांनी रवींद्र नाट्य मंदिर मधील मिनी थिएटर मध्ये  व्यक्त केली. स्वाती काळे यांच्या 'गोष्टीपलीकडचे महाभारत' या ग्रंथाचे प्रकाशन मंत्री महोदयांच्या हस्ते झाले.        प्रकाशनाच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुस्तकाला

“हरवलेले राज्य-हरवलेल्या वारशाच्या क्षेत्रात जा” या थीमसह वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये `युन्योया’ महोत्सवाला शानदार सुरुवात !

इमेज
“हरवलेले राज्य-हरवलेल्या वारशाच्या क्षेत्रात जा” या थीमसह वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये `युन्योया’ महोत्सवाला शानदार सुरुवात !       मुंबई::- आंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आकर्षण असलेल्या `युन्योया’ महोत्सवाला शानदार सुरूवात झाली आहे. वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या मनोहर फाळके कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजन करण्यात आले असून यात सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक या विभागात विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. “हरवलेले राज्य-हरवलेल्या वारशाच्या क्षेत्रात जा” या थीमसाठी संपूर्ण कचऱ्यापासून बनलेल्या साम्राज्यासारखी भव्य कृती ही या महोत्सवाचे विशेष आकर्षण होती. वृत्तपत्रे, फ्रीज बॉक्स आदींपासून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. उद्घाटनपर कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक नृत्य सादर केले.  या महोत्सवाबाबत बोलताना संस्थेचे सरचिटणीस अॅड. आप्पासाहेब देसाई यांनी सांगितले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रात संधी मिळविण्यासाठी तसेच करिअर करण्याच्या दृष्टीने पर्वणी ठरणार आहे. हा महोत्सव त्यानिमित्ताने संकल्पित करण्यात आला असून त्याचा उपयोग निश्चितपणे सकारात्म

बोधिसत्व फाऊंडेशन आणि सलोखा समूह आयोजित सामाजिक सलोखा चित्र प्रदर्शन ही काळाची गरज- प्रमोद मुजुमदार

इमेज
  बोधिसत्व फाऊंडेशन आणि सलोखा समूह आयोजित सामाजिक सलोखा चित्र प्रदर्शन ही काळाची गरज- प्रमोद मुजुमदार           यवतमाळ::- बोधिसत्व फाउंडेशन आणि सलोखा समूह गटाच्या वतीने यवतमाळ येथील सावित्री ज्योतिराव समाजशास्त्र महाविद्यालयात,  सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने चित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. चौदा शाळेतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. सामाजिक सलोखा या विषयावरील चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रमोद मुजुमदार आणि निशा साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.       मुजुमदार यांनी, अखंडप्राय आपला भारत देश जागतिक महासत्तेच्या दिशेने सरसावतो आहे तेव्हा सामाजिक सलोखा बाळगणे ही काळाची गरज आहे, आपली एकसंधता हीच खरी शक्ती आहे असे मत उद्घाटनप्रसंगी मनोगतात व्यक्त केले.         याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी बोधिसत्व फाउंडेशनच्या अमृता खंडेराव आणि सौ. प्रज्ञा तांबेकर यांनी मेहनत घेतली. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये समाजातील सर्व घटकांबद्दल जिव्हाळ