पोस्ट्स

वरिष्ठ तंत्रज्ञ व खाजगी इसम यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले !

इमेज
  वरिष्ठ तंत्रज्ञ व खाजगी इसम यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले !     नासिक::- फत्तेपूर जि. जळगाव येथील म.रा.वि.वि.कंपनी चा वरिष्ठ तंत्रज्ञ (सिनियर टेक्निशियन) विनोद उत्तम पवार, वय-३२ वर्ष, (वर्ग३) व खाजगी इसम कलिम सलीम तडवी, वय-२७ वर्ष, रा.देऊळगाव, ता.जामनेर यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.           यातील तक्रारदार जळगाव येथे वास्तव्यास आहेत. हे तोरनाळे ता.जामनेर येथील मुळ रहीवासी असून ते सध्या जळगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या मुळगावी तोरनाळे ता. जामनेर ग्रामपंचायतीच्या त्यांच्या वडीलांच्या नावे असलेल्या बखळ जागी त्यांनी तयार केलेल्या पत्र्यांच्या शेडमध्ये विज मीटरचे नविन कनेक्शन घ्यायचे होते. म्हणून तक्रारदार  म.रा.वि.वि.कंपनी लि.फत्तेपूर कार्यालयात जावून विज मीटरचे नविन कनेक्शन मिळणेसाठी विचारपुस केली असता सदर कार्यालयातील कर्मचारी सिनीयर टेक्नीशियन विनोद पवार व खाजगी इसम कलीम तडवी यांनी तक्रारदार यांना विज मीटरचे नविन कनेक्शन मिळणेसाठी ज्यांच्या नावे कनेक्शन घ्यायचे आहे, त्यांचे आधारकार

नासिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार !

इमेज
नासिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801,       नाशिक::-  भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पक्षप्रवेश समारंभ संपन्न झाला.     यावेळी सटाणा येथील राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यासह, नगरसेवक, सरपंच व मनमाड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य  पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.           याप्रसंगी प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश महामंत्री विक्रांत दादा पाटील, मालेगाव जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, संघटन सरचिटणीस देवा पाटील, खासदार डॉ सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे, आमदार सीमा ताई हिरे यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

नासिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार !

इमेज
नासिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801,       नाशिक::- भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पक्षप्रवेश समारंभ संपन्न झाला.     यावेळी सटाणा येथील राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यासह, नगरसेवक, सरपंच व मनमाड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य  पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.           याप्रसंगी प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश महामंत्री विक्रांत दादा पाटील, मालेगाव जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, संघटन सरचिटणीस देवा पाटील, खासदार डॉ सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे, आमदार सीमा ताई हिरे यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

वास्तविक ज्या काही बातम्या दाखवल्या जात आहेत किंवा येत आहेत त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही - अजित पवार

इमेज
वास्तविक ज्या काही बातम्या दाखवल्या जात आहेत किंवा येत आहेत त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही - अजित पवार  आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत आणि राष्ट्रवादीतच राहणार आहोत... काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत; बाबांनो, काही काळजी करू नका; पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन... बोलणार्‍यांची बातमी देण्याऐवजी अजित पवार का बोलले नाही, 'अरे एवढे प्रेम का ऊतू जातेय माझ्यावर'... 'अरे बाबांनो... 'ध' चा 'मा' करु नका ना... जर काही झाले तर मीच सांगेन ना तुम्हाला... दुसर्‍या कुणाच्या ज्योतिषाची गरज नाही ...           मुंबई  - कारण नसताना माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकारी आमदारांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी होताना दिसत आहे. वास्तविक ज्या काही बातम्या दाखवल्या जात आहेत किंवा येत आहेत त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडली. गेले काही दिवस माध्यमातून येत असलेल्या उलटसुलट बातम्यांवर आज विरोधी पक्षनेते

१२००० रुपयांची लाच स्वीकारताना दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
१२००० रुपयांची लाच स्वीकारताना दोघे  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !     नासिक::- भुसावळ येथील आलोसे रविंद्र लक्ष्मण धांडे , वय-५४ वर्ष, कोतवाल, सजा तलाठी भुसावळ हल्ली नेमणूक तहसिल कार्यालय, भुसावळ (वर्ग-४) व खाजगी इसम हरिष देविदास ससाणे, वय-४४ वर्ष, रा. भुसावळ यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.         यातील तक्रारदार यांनी सन २०२२ मध्ये  ता . भुसावळ  जि . जळगांव  मधील कुऱ्हे पानाचे या गावात स्वतःच्या नावे  सु .२ एकर. शेतजमीन विकत घेतली आहे. सदर शेत जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर तक्रादार यांचे  स्वतःचे नावं लावण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालय कुऱ्हे पानाचे येथे प्रकरण सादर केले होते. सदर प्रकरणात भुसावळ मंडळ अधिकारी योगिता पाटील यांनी त्रुटी काढून तक्रारदार  यांना भुसावळ तहसील कार्यालयाचे कोतवाल रवींद्र धांडे यांना भेटण्यास सांगितले होते. त्या प्रमाणे तक्रारदार हे कोतवाल रवींद्र धांडे यांना  भेटले असता त्यांनी तक्रारदार यांना मी तुमचे  ७/१२ च्या उताऱ्यावर नावं मंडळ अधिकारी  योगिता पाटील यांच्या कडून करून आणतो असे सांगून १५००० रुपयांची मागण

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीअभ्यास, कला - क्रीडा यांचा समन्वय डॉ. शेफाली भुजबळ यांचे प्रतिपादन

इमेज
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास, कला - क्रीडा यांचा समन्वय  डॉ. शेफाली भुजबळ यांचे प्रतिपादन न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801,         नाशिक  (प्रतिनिधी)- उत्तम समाज निर्मितीसाठी चांगले नागरिक असणे आवश्यक असते. चांगला माणूस घडविण्याचे काम विद्यार्थी दशेपासूनच करावे लागते. आदर्श विद्यार्थी देशाचे उद्याचे भवितव्य असतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक असून अभ्यासाबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञान व पारंपरीक कला, क्रीडा नैपुण्य यांचा समन्वय साधणे ही काळाची गरज आहे. ती गरज मीना भुजबळ स्कुल ऑफ एक्सलन्स निश्चितच पूर्ण करेल असे प्रतिपादन एमईटीच्या मार्गदर्शक डॉ. शेफाली भुजबळ यांनी केले.         एमईटी - भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात काल नव्याने सुरु असलेल्या मीना भुजबळ स्कुल ऑफ एक्सलन्सच्या ओरिएंटेशन - परिचयाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका शुभ्रा वर्मा यांनी पालकांशी संवाद साधला. जून महिन्यात सिबीएसई बोर्डाचे बालवाडी पासून इ. पाचवीपर्यंतचे वर्ग सुरु होतील. नंतर टप्प्याटप्प्याने बारावीपर्यंतचे वर्ग स

उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी माफी मागावी-केशव उपाध्ये !

इमेज
उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी माफी मागावी-केशव उपाध्ये !         मुंबई (१५) ::-   स्वतःच्या हट्टापाई मेट्रो कारशेड कांजूर मार्गला हलवत मुंबईकरांवर २० हजार कोटी अतिरिक्त खर्च तसेच प्रकल्पाला विलंब केला याबद्दल उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा  माफी मागावी व पत्रकार परिषदेत खोटी माहिती देणे आदित्य ठाकरेंनी थांबवावे अशी मागणी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.         कांजूरमार्ग येथील १५ एकर जागा मेट्रो क्र ६ कारशेड देण्यात येत असलेल्या वृत्तावरुन आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेला आरे ऐवजी कांजूरमार्ग येथे कारशेड नेण्याचा निर्णय कसा योग्य होता हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण आजची पत्रकार परिषद ही दिशाभूल करणारी होती.           मुळात महाविकास आघाडी सरकार असताना नेमण्यात आलेल्या शौनिक कमिटीने आरे कारशेड हिच जागा मेट्रो ३ साठी योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता याचा विसर आदित्य ठाकरेंना पडलेला असावा. ज्या मेट्रो ६ चे कारशेड कांजूरमार्ग येथे होत असल्याच्या वृत्तावरुन त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ती मेट्रो लोखंडवाला त

उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी माफी मागावी-केशव उपाध्ये !

इमेज
उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी माफी मागावी-केशव उपाध्ये !         मुंबई (१५) ::-   स्वतःच्या हट्टापाई मेट्रो कारशेड कांजूर मार्गला हलवत मुंबईकरांवर २० हजार कोटी अतिरिक्त खर्च तसेच प्रकल्पाला विलंब करणा-या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा त्याबद्दल माफी मागावी व पत्रकार परिषदेत खोटी माहिती देणे आदित्य ठाकरेंनी थांबवावे अशी मागणी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.         कांजूरमार्ग येथील १५ एकर जागा मेट्रो क्र.६ कारशेड देण्यात येत असलेल्या वृत्तावरुन आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेला आरे ऐवजी कांजूरमार्ग येथे कारशेड नेण्याचा निर्णय कसा योग्य होता हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण आजची पत्रकार परिषद ही दिशाभूल करणारी होती.           मुळात महाविकास आघाडी सरकार असताना नेमण्यात आलेल्या शौनिक कमिटीने आरे कारशेड हिच जागा मेट्रो ३ साठी योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता याचा विसर आदित्य ठाकरेंना पडलेला असावा. ज्या मेट्रो ६ चे कारशेड कांजूरमार्ग येथे होत असल्याच्या वृत्तावरुन त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ती मेट्रो लोखंडवा

भारतीय जनता आपली बुद्धिमत्ता आणि उद्यमशीलतेचं दर्शन घडवत आहे : पंतप्रधान

इमेज
भारतीय जनता आपली बुद्धिमत्ता आणि उद्यमशीलतेचं दर्शन घडवत आहे : पंतप्रधान           मुंबई::- भारतीय जनता आपली बुद्धिमत्ता आणि उद्यमशीलतेचं दर्शन घडवत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या ट्विटवर पंतप्रधान प्रतिक्रिया देत होते. एका ट्विटच्या माध्यमातून गोयल यांनी माहिती दिली की भारताने वर्ष २०२२-२३ मध्ये  निर्यातीत ७७० अब्ज डॉलर्सची नवी विक्रमी उंची गाठली आहे.       यावर पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की “भारतीय जनता आपली बुद्धिमत्ता आणि उद्यमशीलतेचं दर्शन घडवत आहे. संपूर्ण जग भारताकडे आशावाद आणि उत्साहाने पहात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत प्रमुख स्थळांचे दर्शन घडवणारी भारत गौरव पर्यटक रेल्वे काल नवी दिल्ली येथून रवाना !

इमेज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत प्रमुख स्थळांचे दर्शन घडवणारी भारत गौरव पर्यटक रेल्वे काल नवी दिल्ली येथून  रवाना ! देशांतर्गत पर्यटन आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत' या भावनेला चालना देणे हे या रेल्वेचे उद्दिष्ट : जी.के. रेड्डी तळागाळातील माणसाला सक्षम बनवण्यासाठी आणि जाती आधारित भेदभाव दूर करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या बाबासाहेबांचा जीवनप्रवास अतिशय  प्रेरणादायी आहे. : डॉ वीरेंद्र कुमार       दिल्ली (१४) ::- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत प्रमुख स्थळांचे दर्शन घडवणाऱ्या भारत गौरव पर्यटक रेल्वे यात्रेला आज हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून पर्यटन, सांस्कृतिक आणि ईशान्येकडील राज्ये विकास विभागाचे मंत्री जी. किशन रेड्डी आणि सामाजिक न्याय तसेच अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.         भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाची झलक सर्व प्रवाशांना दाखवणे हा भारत गौरव टुरिस्ट ट्रेनचा उद्देश आहे, असे जी.के.रेड्डी यावेळी बोलताना म्हणाले. देशांतर्गत पर्यटन आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत' या भावनेला चालना देणे हा देखील