पोस्ट्स

लाखाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
लाखाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !        नासिक/जळगाव::- आलोसे प्रशांत विकास जगताप, (कंत्राटी वायरमन) जळगांव जि.जळगांव याने १६००००/- लाचेची मागणी केली होती, त्यातील १०००००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.    यातील तक्रारदार यांचे घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून त्यांनी घराला वीज मीटर बसवण्यासाठी यापूर्वीच अर्ज केला होता. परंतु त्यांना मीटर बसवले नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराला MSEB जळगांव च्या पथकाने भेट दिली होती. सदर भेटीनंतर त्यांना आता चार लाख ६० हजार रुपये दंडाची रक्कम भरली तरच वीज मीटर कनेक्शन मिळेल असा निरोप कंत्राटी वायरमन यांनी दिला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली असता एक लाख साठ हजार रुपयांमध्ये प्रकरण मिटवतो असे सांगून लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचा समक्ष पडताळणी केली असता कंत्राटी वायरमन यांनी तडजोडी अंती एक लाख ४० हजार रुपयांची मागणी करून पंचा समक्ष एक लाख रुपये आज रोजी स्वीकारताना रंग

पाणी मागणी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत !

इमेज
शेतकऱ्यांनी १४ जानेवारीपर्यंत पाणी मागणी अर्ज सादर करावेत !        नाशिक (जिमाका वृत्तसेवा)::- मालेगाव पाटबंधारे विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील पाटबंधारे उपविभाग सटाणा अंतर्गत असलेले लघु प्रकल्प पठावे, दसाणे, जोखाड यांचे जलाशय व नदीवरील मंजूर उपसा सिंचन व कालवा प्रवाही तसेच कालव्यावरील मंजुर उपसा सिंचन द्वारे पाणी पुरवठा करणेसाठी  शेतकऱ्यांनी १४ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत पाणी मागणी अर्ज सादर करावेत असे आवाहन  कार्यकारी अभियंता, मालेगाव पाटबंधारे विभाग म.नं डोके यांनी केले आहे.        रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये पिण्यासाठी आरक्षित पाण्या व्यतिरिक्त उपलब्ध पाण्यातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन देण्याचे नियोजन संबंधित कालावा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे. संबंधित लघु प्रकल्पांमधील सिंचनासाठी उपलब्ध होणारा पाणीसाठा विचारात घेवून रब्बी हंगामात पेरणी झालेली पिके व उभ्या पिकांना हंगामी पद्धतीने पाणी देण्याचे नियोजन आहे.         वरील प्रमाणे करण्यात येणारा पाणीपुरवठा हा महाराष्ट्र शासन सिंचन कायदा सन १९७६ व महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे व्यवस्थापन कायदा २००५ यातील तरतुद

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानातंर्गत विविध योजनांचे शिबीर संपन्न !

इमेज
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानातंर्गत विविध योजनांचे शिबीर संपन्न !                                                                                 नाशिक, दिनांक : १० जानेवारी २०२४ (जिमाका वृत्तसेवा)::- नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियांतनर्गत इगतपूरी, पेठ व त्र्यंबकेश्वर येथे विविध योजनांच्या शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या माध्यमातून  लाभार्थ्यांना मोठया प्रमाणात लाभ देण्यात येत असून विविध योजनांचे प्रमाणपत्र व कार्ड वितरीत करण्यात आले आहे, असे नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जितीन रहमान यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.           या शिबीरात जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी विविध योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच  प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियांतनर्गत लाभार्थ्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड, प्रधानमंत्री उज्वला योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री विश्वकर्मा, जनधन योजन

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर ओंकार कापले (निवृत्त) यांचे आवाहन !

इमेज
माजी सैनिकांनी पेंशन, इसीएचएस व सीएसडी कँटीन विषयी अडचणींबाबत १५ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन !                                     नाशिक, दिनांक : १० जानेवारी २०२४ (जिमाका वृत्तसेवा)::- रक्षा लेखा प्रधान नियंत्रण कार्यालय, अलाहाबाद आणि दक्षिणी कमान, पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यातील माजी  सैनिक, माजी सैनिक वीरमाता, वीरपत्नी, विधवा यांच्या पेंशन, इसीएचएस (ECHS) व कँटीन याविषयीच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी फेब्रुवारी २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात पुणे येथे पेंशन अदालत घेण्याचे नियोजित आहे. त्याअनुषंगाने ज्या माजी  सैनिकांच्या अडचणी असतील त्यांनी सर्व कागदपत्रांसह १५ जानेवारीपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक येथे प्रत्यक्ष अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर ओंकार कापले (निवृत्त) यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

अवलिया युवा कलाशिक्षक प्रदीप शिंदे !

इमेज
पळसे येथील नासाका माध्यमिक विद्यालयाचे युवा कलाशिक्षक प्रदीप भाऊसाहेब शिंदे (86056 57132) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पिंपळपानावर रेखाटलेल्या प्रतिमा. 

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!

इमेज
'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!      न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801        कळवण::- कवी अशोक बुरबुरे यांच्या कवितेसह अनेक कविता सादर करत आईच्या आठवणींचा जागर कळवणच्या आप्पाश्री लॉन्समध्ये रंगला. निमित्त होतं सेवानिवृत्त मुख्याध्यापिका लीलाबाई दिनकर गरुड यांच्या प्रथम स्मृतिदिनाचं. महाराष्ट्राभर गाजत असलेल्या अरुणराज प्रस्तुत 'मायबाप' च्या १८९ व्या प्रयोगातून मातेच्या स्मृतींना अनोखे अभिवादन करण्यात आले.       कवी आणि सादरकर्ते राजेंद्र उगले, अरुण इंगळे यांनी रसिकांसमोर मायबापाची एक-एक आठवण हळुवारपणे मोकळी करत रसिकांच्या डोळ्यात पाणी उभे केले.    'नाही घातलीस माळ, नाही लावियेला टिळा   माझ्या मायमाऊलीचा, भक्तिमार्ग साधाभोळा !' असे म्हणत कवी राजेंद्र उगले यांनी संसारात रमलेल्या पण मुलांच्या संगोपनात घरालाच मंदिर मानणाऱ्या आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या तर कवी अरुण इंगळे यांनी संस्कारांची शिदोरी देणाऱ्या आपल्या वडिलांचं मोठेपण मांडताना-   'श्रीमंती मनाच

पितृपक्षातले पुण्यकर्म, अन्नदान खरा धर्म-"स्वामी" संस्थेचा स्तुत्य उपक्रम !

इमेज
पितृपक्षातले पुण्यकर्म, अन्नदान खरा धर्म-"स्वामी" संस्थेचा स्तुत्य उपक्रम !             मुंबई::- भारतीय संस्कृतीचे एक मोठे वैशिष्ट्य हे आहे की, ती जिवंत असताना विविध कर्मकांडातून आणि धर्माचे पालन करून मानवी जीवन सुधारण्याचे मार्ग सांगतेच, पण मृत्यूनंतरही, अंतिम संस्कारांनंतरही ती आपल्याला आत्म्याच्या उद्धारासाठी कोणकोणत्या कर्मकांड केले पाहिजेत याबद्दल सांगते. शास्त्रात आणि पुराणात मरणोत्तर विधी आणि संस्कारांचे वर्णन केले आहे. अश्विनचा कृष्ण पक्ष (गुजरात-महाराष्ट्रानुसार भाद्रपद) हा  हिंदू धर्मात श्राद्ध पक्ष म्हणून साजरा केला जातो. विष्णू, वायू, वराह, मत्स्य इत्यादी पुराणांमध्ये आणि महाभारत, मनुस्मृती इत्यादी धर्मग्रंथांमध्ये श्राद्धाचा महिमा आणि पद्धत विविध ठिकाणी वर्णन केलेली आहे. पूज्यश्रींचे उपदेश प्रस्तुत पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत जेणेकरून सर्वसामान्यांना 'श्राद्धा महिमा' ची ओळख व्हावी आणि त्यांच्या पूर्वजांप्रती असलेले कर्तव्य पार पाडता यावे.             दैवी पूर्वजांच्या पवित्र आशीर्वादाने, दैवी आत्मा कुटुंबात अवतार घेऊ शकतात. ज्यांनी आयुष्यभर एवढं रक