पोस्ट्स

"रेणू बाग" हाँटेल उद्यापासुन खवैय्यांच्या सेवेत रूजू होत आहे !

इमेज
धुळे शहरांत (महाराष्ट्र) येथे "रेणू बाग" फँमिली हाँटेल खवैय्यांच्या सेवेसाठी उद्यापासुन सुरू होत आहे अशी माहीती संचालक अँड. नरेंद्र मराठे यांनी दिली.      शहरांतील जयहिंद काँलनी या मध्यवर्ती ठिकाणी सुरू होत असलेल्या हाँटेल फक्त जेवणासाठीच अाहे, शाकाहारी व मांसाहारी साठी किचन, सर्विस स्टाफ हा पूर्णपणे स्वतंत्र असुन, हाँटेल मधील बैठक व्यवस्था बाग (गार्डन) संकल्पनेची आहे,        दि. ४ मे १८ रोजी सायं हाँटेलचा शुभारंभ होत असुन सायं ५:३० वा. प्लाट नं १०९, जयहिंद काँलनी, धुळे येथे तीर्थप्रसाद व अल्पोहारासाठी सर्वांना निमंत्रित करण्यात येत असल्याचे आवाहन अँड. उत्तमराव मराठे व फँमिली, अभय पाटील यांनी केले आहे.   *अँड. नरेंद्र मराठे-9922552208*

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डाँ.पेडणेकरांची नियुक्ती

इमेज
डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्त‍ी रसायनशास्त्राचे प्राध्यापक तसेच माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुहास रघुनाथ पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी शुक्रवारी (दिनांक २७) डॉ पेडणेकर यांना राजभवन येथे बोलावून नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले. डॉ पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत (यापैकी जे अगोदर असेल ते) करण्यात आली आहे. गेल्यावर्षी दिनांक २४ ऑक्टोबर रोजी डॉ संजय देशमुख यांना विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरुन कार्यमुक्त केल्याने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूपद रिक्त झाले होते. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ  देवानंद शिंदे हे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली ह

महाराष्ट्रातील काही पोलीस ठाण्यांमधील पाठीमागच्या मार्गाची चर्चा घडणे कितपत योग्य आहे !

इमेज
काही पोलीस ठाण्यांमध्ये मागील दरवाजाने वा आवारातील मागच्या दाराने काय काय बाहेर पडते? म्हसरूळ पोलीस ठाण्यातूनच मागच्या दरवाजाने संशयित मोबाईल खरेदीदार मोबाईल घेऊन पसार,  याविषयाशी संबधित बातमी नासिकमधील आजच्या दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे, कुंपणच शेत खाते आहे का ? अशी प्रतिमा पोलीस ठाण्यांतील या घटनेतून प्रथमदर्शनी दिसत आहे, ओएलएक्स वरील मोबाईल विक्रीच्या  माहीतीच्या आधारे पोलीस ठाण्यात मोबाईल विक्रेत्यास खरेदीदार बोलावून घेतो व थोड्याच वेळात पोलीस ठाण्याच्या पाठीमागील मार्गातून पसार होतो हा प्रकार नक्की काय ? अशी शंका निर्माण होत नाही का ? संबधित ठाण्यातील सीसीटीव्ही शोभेचे आहेत का ? की कुण्या मध्यस्थाचे कारनामे लपविण्यासाठी फुटेज उपलब्ध होत नाही अशी शंका तक्रादाराकडून वक्त होत आहे? याची वरिष्ठांकडून खातरजमा होऊन प्रकरण नक्की काय आहे ?  याचा उलगडा होईल तेव्हा होईल परंतू पाठीमागील मार्गाची उपयुक्तता हा चर्चेचा विषय ठरावा का ? ही पळवाट समजावी की इतिहासात वापरायचे तसा (गरजेची) खुष्कीचा मार्ग समजावा ?

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा लिबर्टी ब्रँड चे नासिकच्या बाजारपेठेत पदार्पण ! 'आराम के लिए फँशन !

इमेज
लिबर्टी" चे नाशिक मध्ये पदार्पण नाशिक (११)::-- पादत्राणे उद्योगातील भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा आघाडीचा  ब्रँड  असलेल्या "लिबर्टी "ने  नाशिकच्या बाजारपेठेत  पदार्पण केले असून, कॉलेजरोड वरील श्रद्धा पेट्रोल पंपाजवळील बी  स्क्वेअर येथे कंपनीने आपले भव्य दालन सुरु केले आहे. ६४ वर्षापासुन लिबर्टी कंपनी या क्षेत्रात असुन आजमितीस अतिशय नवीन ,फॅशनेबल स्वरूपाची पादत्राणे आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत अशी माहीती आर.के.साधू यांनी पत्रकार परिषदेत दिली. "आराम के लिए फॅशन" ही टॅग लाईन तंतोतंत  सांभाळत कंपनी आपल्या ग्राहकांची आवड निवड जपत उत्कृष्ट पद्धतीचे फॅशनेबल आणि तेवढेच आरामदायी पादत्राणे वेळोवेळी बदल करत  ग्राहकांसाठी बाजारात आणते . एस एस १८ ही नव्याने येत असलेली श्रेणी आणि कंपनीची  इतर सुमारे ४५० पेक्षा जास्त उत्पादने नाशिक मधील दालनात  कंपनीने उपलब्ध करून दिली आहेत . पुरुषांकरिता फॉर्मल आणि कॅज्युअलसाठी "कुलर्स" , स्पोर्ट्स मध्ये फोर्स १०, महिला वर्गासाठी खास "सेनोरिटा "  मुलांसाठी  "फुटफन " ही उत्पादने येथील खास आकर्षण आहे

स्थानिक स्वराज्य संस्थांचे वाटोळे होत आहे काय ?,     कायद्यात बदल करायला हवा की नको ?      राष्ट्रगीताचा अपमान होतो असे वाटते काय ?

इमेज
खालील संदेश पटला असेल तर सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी लिंक शेअर करा ! नागरिकांच्या सोयी सविधांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली जाते, विश्वस्त की चोर निवडून दिले जातात हा प्रश्न उपस्थित होतो, याचे अवलोकन सर्वच राजकीय पक्षांनी करायची वेळ आली आहे , अन्यथा वेळ निघून गेल्यास अराजकता निर्माण होईल असे वाटते, नागरिक शांत असतात, मुकाट सहन करतात असे ग्रुहीत धरण्याचे दिवस संपले आहेत असे कुणालाच वाटत नाही का ?       राजदंड पळविणे हे विरोधकांचे काम व तो सांभाळणे हे सत्ताधाऱ्यांचे काम ! विषय मंजूर वा नामंजूर हा सभाग्रुहाला दिलेला अधिकार असतांना तो मान्य करणे बंधनकारक असले तरी कोणत्या शिष्टाचारांत तो पारित झाला वा होतो हेही तितकेच महत्वाचे आहे याचा जणू सत्ताधाऱ्यांना विसर पडत आहे की काय ? आजचे विरोधकही कालच्या किंवा उद्याच्या सत्तेत होते किंवा राहतील त्यांनाही जनसामान्यांनी दिलेली विश्वस्तपदाची बूज राखणे भविष्यातील राजकारणासाठी गरजेचे आहे,       महासभेत नागरिकांच्या विकासाचे खरोखर काम केले जाते का ? उद्या नागरिकांनी जर प्रश्न विचारला की स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत किती विद्यार्थी शि

मुका घ्या मुका ! राज्यातील सहा जागांवरील निकाल ! सत्तासुंदरीने घेतला मनसेचा व दोन्ही काँग्रेसचा मुका ! वर्चस्व नसल्याने मिळालेल्या भाजपाच्या पाठिंब्याने सेनेला एक जागा !

इमेज
काय वाटते ? राज्यभरांतील सर्व सहा जागांवर भाचपाचा धुव्वा, सेनेला मुंबईतील एक जागा जिथे भाजपाचे वर्चस्व नव्हते तेथे भाजपाने दिलेल्या पाठींब्याने ! सोलापूर व अहमदनगर काँग्रेसकडे ! पुणे व उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेच्या पारड्यात ! आणी--------- नासिक::-मनसेच्या गटनेत्या सुरेखा भोसले यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त  झालेल्या प्रभाग १३ च्या पोटनिवडणुकीत अँड.वैशाली भोसले २३२२ मतांच्या आघाडीने विजयी झाल्या.         तशी हि निवडणुक बिनविरोध करण्याचे प्रयत्न होत असतांना शिवसेनेची सत्तासुंदरीचा "मुका" घेण्याचा मनसुबा धुळीस मिळविणे हे दोन्ही काँग्रेसने ठरविल्या प्रमाणे घडले. याचा शिवसेनेच्या नवनिर्वाचित शहरप्रमुखांना मोठा धक्का मानला जात असुन मध्यंतरीच्या काळात मराठा क्रांती मोर्चा व पुन्हा तोच विस्मरणांत गेलेला मुद्दा गांढुळाच्या "मुका" ने एेनवेळी उकरून काढण्याचे कसब शब्दच्छल करून साधण्याचा खटाटोप करून सेना नेत्रुत्वाने का केला हे कोडे आता सोडविणे नासिक सेनेच्या पुढील मोठे आव्हान समजल्यास वावगे ठरू नये असा हा पोटनिवडणुकीचा निकाल आहे.         सत्ता सुंदरीने मनसेचा "म

सहा महिन्यानंतर, अधिक सुविंधांसह, दिव्य कार्निव्हल सिनेमाज आजपासुन सुरू ! प्रथममच डाल्बी 7.1 साउंड सिस्टिमचा वापर !

इमेज
सहा महिन्यानंतर दिव्य कार्निव्हल सिनेमाज आजपासुन नासिककरांच्या सेवेत रूजू ! प्रथममच डाल्बी 7.1 साउंड सिस्टिम चा वापर ! नासिक::- दिव्य कार्निव्हल ने सहा महिन्यांत टप्प्या-टप्प्याने पूर्विची मेकओव्हर पद्धत बदलत आज एका आकर्षक मल्टिप्लेक्स ची श्रुंखला सुरू करून चित्रपट चाहत्यांना एक नवीन आनंददायी सुखकारक अनुभूती देण्याचा दिव्य कार्निव्हल सिनेमाजकडून उपलब्ध करून दिल्याची माहीती डाँ. श्रीकांत भासी यांनी पत्कार परिषदेच्या माध्यमातून दिली.       पहिल्यापेक्षा लांब व रूंद पडदे, 7.1 डाँल्बी साऊंड सिस्टिम च्या आधुनिक टेक्नालाँजीचा वापर करण्यात आलेले स्वयंपूर्ण मल्टिप्लेक्स प्रेक्षकांना आवडेल व सुरक्षित वातावरणाने चित्रपटाचा आनंद द्विगुणीत  करेल, १०५३ बैठकांची क्षमता तसेच सर्व पडदे 2K प्रोजेक्षन प्रणाली युक्त असल्याने उचित प्रकाशात 3D चित्रपट पाहण्यासाठी अनुकुल आहे.        सर्वसाधारण पणे टप्प्या-टप्प्याने मल्टिप्लेक्स अपग्रेड केली जातात मात्र कार्निव्हल सिनेमाजकडून या चित्रपटग्रुहास अपग्रेड (नवीनीकरण) करण्यासाठी सहा महिने पूर्णत: बंद ठेवण्यात आले. वरिष्ठ मंडळींना १८० अंशात मागे टेकुन सिनेमा बघ