महाराष्ट्रातील काही पोलीस ठाण्यांमधील पाठीमागच्या मार्गाची चर्चा घडणे कितपत योग्य आहे !

काही पोलीस ठाण्यांमध्ये मागील दरवाजाने वा आवारातील मागच्या दाराने काय काय बाहेर पडते?
म्हसरूळ पोलीस ठाण्यातूनच मागच्या दरवाजाने संशयित मोबाईल खरेदीदार मोबाईल घेऊन पसार,  याविषयाशी संबधित बातमी नासिकमधील आजच्या दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे, कुंपणच शेत खाते आहे का ? अशी प्रतिमा पोलीस ठाण्यांतील या घटनेतून प्रथमदर्शनी दिसत आहे, ओएलएक्स वरील मोबाईल विक्रीच्या  माहीतीच्या आधारे पोलीस ठाण्यात मोबाईल विक्रेत्यास खरेदीदार बोलावून घेतो व थोड्याच वेळात पोलीस ठाण्याच्या पाठीमागील मार्गातून पसार होतो हा प्रकार नक्की काय ? अशी शंका निर्माण होत नाही का ? संबधित ठाण्यातील सीसीटीव्ही शोभेचे आहेत का ? की कुण्या मध्यस्थाचे कारनामे लपविण्यासाठी फुटेज उपलब्ध होत नाही अशी शंका तक्रादाराकडून वक्त होत आहे? याची वरिष्ठांकडून खातरजमा होऊन प्रकरण नक्की काय आहे ?  याचा उलगडा होईल तेव्हा होईल परंतू पाठीमागील मार्गाची उपयुक्तता हा चर्चेचा विषय ठरावा का ? ही पळवाट समजावी की इतिहासात वापरायचे तसा (गरजेची) खुष्कीचा मार्ग समजावा ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!