पोस्ट्स

आदर्श  शिक्षक साने गुरुजी पुरस्काराचे आज दि ३० जुलै रोजी वितरण होणार...! शिक्षक कधीच सामान्य नसतो, याविषयावर विजयेंद्र महाजन यांचे व्याख्यान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
आदर्श  शिक्षक साने गुरुजी पुरस्काराचे आज दि.३० जुलै रोजी वितरण होणार...!   प्रतिनिधी::-  विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना शिक्षण व नाविन्यपूर्ण माहिती देणारे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील व सामाजिक भावना जपणाऱ्या नासिक जिल्ह्यातील विविध क्लासच्या संचालकांना यावेळी आदर्श शिक्षक सानेगुरुजी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती एस.के.डी चँरिटेबल ट्रस्टचे चेअरमन संजय देवरे व गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे व दीपस्तंभ फाउंडेशन चे चेअरमन युजवेंद्र महाजन यांच्या शुभहस्ते हा सन्मान सोहळा मंगळवारी ३० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता प. सा. नाट्यगृह, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सुरेश पवार यांच्या "बे दुने चार"  या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिक्षणातून सामाजिक परिवर्तन या विषयावर उत्तम कांबळे यांचं विशेष व्याख्यान तसेच "शिक्षक कधीच  सामान्य नसतो" या विषयावर यजुवेंद्र महाजन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, यावेळी जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान क

शिर्डी येथील सरपंच परिषदेसाठी ४० ते ५० हजार सरपंच उपस्थित राहतील !! नासिक जिल्ह्यातील २८१९ प्रतिनिधी उपस्थित राहणार असून त्यासाठीचे नियोजन पूर्ण-शितल सांगळे !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक – राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग व अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या वतीने बुधवारी (दि.३१) शिर्डी (जि. अहमदनगर) येथे सरपंच, उपसरपंच यांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी राज्यातील ४० ते ५० हजार सरपंच, उपसरपंच उपस्थित राहणार आहेत. नाशिक जिल्हयातील २८१९ प्रतिनिधी उपस्थित राहणार असून यासाठीचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.           सरपंच परिषदेबाबत आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी पत्रकार परिषद घेवून कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दत्ता काकडे, राज्यसंघटक अविनाश आव्हाड,जिल्हाध्यक्ष तानाजी गायकर यांनीही यावेळी सरपंच परिषदेविषयी तसेच शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत माहिती दिली. सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून काम सुरू आहे. सरंपच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मानधन द्यावे, सरपंचांमधून एक आमदार प

प्रतिक्षा संपली........ केंद्रीय राज्यमंत्री यांची छबी झळकणार !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
न्यूज मसाला, प्रतिक्षा संपली......               या वर्षी निकाल जाहीर करण्यास उशीर झाल्याबद्दल न्यूज मसाला वर प्रेम  करणाऱ्या सर्व मान्यवरांप्रती दिलगीरी व्यक्त करतो, तसेच आनंदाची बातमी म्हणजे न्यूज मसालाचा दिवाळी विशेषांक "लोकराजा" च्या मुखपृष्ठावर  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मा. रामदासजी आठवले यांचे छायाचित्र प्रकाशित करण्यात येणार आहे.           दरवर्षी जुलै च्या सुरुवातीला मुखपृष्ठावरील सन्माननीय संसद सदस्य (खासदार) मानकरी जाहीर करण्यात येते मात्र या वर्षी उशिराने पण सामाजिक जाणीव असलेले रामदास आठवले यांचे छायाचित्र मुखपृष्ठावर प्रकाशित  करीत आहोत याचा मनस्वी आनंद होत आहे.            महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील नामवंत व नवलेखक, कवी यांचा मेळ घालून न्यूज मसाला च्या संपादक मंडळाकडून "लोकराजा" नांवाने दर्जेदार दिवाळी विशेषांक प्रकाशित केला जातो, यांत आपले सर्वांचे, मित्रपरिवाराचे, जाहिरातदारांचे प्रेम मिळते व समाजालाही वाचनीय मजकूराचा दिवाळी फराळ मिळतो, सोबत वाचनसंस्कृतीस प्रोत्साहन दिले जाते याचे सारे श्रेय आपले

पाटीलकी, देशमुखी व श्रीमंती या कारणामुळे उचभ्रू समजला जाणारा समाज नापिकी शेती, कर्जबाजारी यामुळे हतबल झाला आहे !! पाणीदार जिल्ह्यातील कष्टकरी शेतकऱ्यांची दाहकता !!! ग्रामीण भारत देश अस्तित्वात राहण्यासाठी शासनाने चांगले धोरण आखुन अंमलबजावणी करणे आवश्यक आहे !!! सविस्तर लेख वाचून शासनापर्यंत पोहचविण्यासाठी खालील लिंक शेअर करा, पुढील पिढ्यांसाठी आजच सर्वांनी प्रयत्न करायला हवेत !!!!

इमेज
पाणीदार नाशिक जिल्ह्यातील कष्टकरी शेतकऱ्यांची दाहकता ! ****************************** महाराष्ट्र राज्यात नाशिक जिल्ह्याची ओळख ही धरणांचा जिल्हा म्हणुन ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांतून मुंबई, जळगांव, औरंगाबाद व अहमदनगर या जिल्ह्यांना शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. मुंबईसाठी पिण्याच्या पाण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. तर औरंगाबाद, अहमदनगर व जळगांव या जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनासाठी नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. आधुनिक शेती व्यवसायामुळे संपूर्ण भारत देशातील बागायती क्षेत्र वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात भूगर्भातील पाणी साठ्याचा उपसा शेतीसाठी केला जात आहे. सोबत मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय उभे राहिल्यामुळे धरणांमध्ये साठविणेत आलेले पाणी औद्यगिक क्षेत्रासाठी वापर केला जात आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खोलवर गेली आहे. त्यातच विद्युत पंपामुळे पाणी उपसा करण्याची सुविधा कमी खर्चात व सहज होऊ लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात भुगर्भातील पाणी साठा

जमीन विकून आलेल्या पैशाचा "माज" काय असतो ? "माज...फिनिश इट" नक्की काय आहे ? सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
जमीन विकून आलेल्या पैशातून जो "माज" येतो व आयुष्य काय वळण घेते, हा "माज" आजच्या तरुणाईला काहीतरी संदेश देणारा ठरेल असे आशिष जैन यांना वाटते. आशिष जैन हे दिग्दर्शक असलेल्या "माज-फिनीश इट" या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाशिक येथे आले असता त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.         गेली काही वर्षे हा विषय समाजात नैराश्य निर्माण करणारा तर काहींना जमीन विकून आलेल्या पैशांनी नवीन व्ययसायात गुंतवणूक करुन यशाची शिखरे पादाक्रांत केलीत मात्र अनेकांचे आयुष्य बर्बाद झाले आहे. हाच मुद्दा पकडून "माज" या चित्रपटाची निर्मिती केली आहे, "माज" सकारात्मक वा नकारात्मक हे गुलदस्त्यातच ठेवले आहे, ते येत्या २ आॅगस्ट रोजी सिनेमागृहात शिरल्यावर कळेल असे चित्रपटाचे निर्माते संदीप टकले यांनी सांगितले.             या चित्रपटातून एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे, "अमित रेखी व अर्चना संकेत," सोबत नाना गोडबोले, प्रकाश धोत्रे, सशांक दर्णे, मिलिंद जाधव, व्रुंदा बाळ, प्रेम नरसाळे, पूनम कापसे, चंचला बोरकर, जगदीश कुंभार, यासारखे कलाकार आहेत, स

शाखा अभियंत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
शाखा अभियंत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल ! नासिक::- आलोसे राजू पुणा  रामोळे, शाखा अभियंता, लघु पाटबंधारे उपविभाग सटाणा यांचे विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारीत सन २०१८) अन्वये सटाणा पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला.         आलोसे राजु रामोळे याने जाखेडा धरणातून गाळ काढण्याचे मोबदल्यात तसेच गाळ काढण्याचे काम सुरू ठेवण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी १३ जून २०१९ रोजी १५०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. यासंबंधी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नासिक कार्यालयात तक्रार दाखल केली होती, त्यानुसार सापळा पूर्व पडताळणी दरम्यान पंचासमक्ष रामोळे याने तक्रारदाराकडून १५०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर रक्कम मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने आज दि. १९ जुलै १९ रोजी सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट राजकारणात !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
एन्काऊंटर स्पेशालिस्ट राजकारणात ! खास बातमी ::- तब्बल ११३ एन्काऊंटर करणारे मुंबई पोलीस दलातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे लवकरच राजकारणात उतरण्यास सज्ज होत आहेत. ४ जुलै रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे मात्र तो आजपावेतो मंजूर करण्यात आलेला नाही.            सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप शर्मा भाजपा व शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे कळते, राजीनामा व दोन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चेनंतर कोणत्या पक्षाकडून विधानसभा निवडणुक लढवायची व मुंबईतील कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार इतकाच सोपस्कार बाकी असल्याचे कळते !