आदिवासी वारली चित्रांना आधुनिकतेचा स्पर्श ! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
आदिवासी वारली चित्रांना आधुनिकतेचा स्पर्श ! महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यापासून थेट गुजरातच्या सीमारेषेपर्यंत आदिवासी वारली जमात पसरलेली आहे. छोट्या छोट्या दुर्गम पाड्यांवर राहून वारली जमातीतील स्त्री पुरुष झोपडीच्या भिंतीवर चित्रे रेखाटतात. दहाव्या शतकात ही कला अस्तित्वात आली. ११०० वर्षे जीवंत असणारी वारली चित्रशैली मानवी जीवनाला सचित्र रूप देते. चित्तवेधकता हा वारली कलेचा विशेष गुण आहे. साध्यासुध्या घटनांना, प्रसंगांना कलात्मक आकार दिल्याने त्यांचे उत्कट, चैतन्यमय स्वरूप प्रकट होते. रचनेचे, मांडणीचे सौंदर्य वारली कलाकारांचे रेषेवरचे प्रभुत्व अधोरेखित करते. अकराशे वर्षांच्या वाटचालीत महिलांनी निर्माण केलेली व जोपासलेली वारली चित्रकला आता देशोदेशी पोहोचली आहे. पद्मश्री जिव्या सोमा मशे यांनी क्रांती केल्यावर पुरुषांनीही ही कला आत्मसात केली. आताच्या पिढीतील युवक- युवतींनी या कलेला आधुनिकतेचा स्पर्श बहाल करून नवा आयाम दिला आहे. विकास, प्रगती यामुळे संधी वाढल्या आहेत. त्यामुळे रोजगारासाठी दुर्गम पाड्यावरचा युवक शहरात येतो. शिक्षणाच्या संस्कारांनी नवी पिढी सजग झाली आहे. शहरी बदल व व