पोस्ट्स

२३ सप्टेंबर ला महाराष्ट्रात "राडा" बघायला मिळणार !!

इमेज
 २३ सप्टेंबर ला महाराष्ट्रात "राडा"  बघायला मिळणार !!        नाशिक ( प्रतिनिधी )- साऊथ स्टाईल कमालीची ऍक्शन आणि कॉमेडीसह सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' सिनेमा येत्या २३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.  'राडा' सिनेमाने सोशल मीडियावर चांगलीच हवा करत राडा घातला आहे. चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर, आणि चित्रपटातील दमदार गाणी रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आता रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी 'राडा' सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे. पत्रकार परिषदेत अभिनेते मिलिंद गुणाजी,  आकाश शेट्टी, अभिनेत्री हीना पांचाळ या कलाकारांनी अशी माहिती दिली.     राम शेट्टी निर्मित 'राडा' या सिनेमाचा हिरो समा म्हणजेच अभिनेता आकाश शेट्टी- तुप्तेवार 'राडा' या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे. तर राम शेट्टी निर्मित, रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प - पडगीलवार कॉर्पोरेशन यांच्या या चित्रपटात आकाश शेट्ट

भारतीय कला प्रभावी असल्याचे युनायटेड किंग्डमचे डॉ. जॉफ्री फिशर, ले फिशर दाम्पत्य व ऑस्ट्रेलियाच्या फरझाना युसुफ या तीन परदेशी शिक्षणातज्ञांचे मत !

इमेज
भारतीय कला प्रभावी असल्याचे युनायटेड किंग्डमचे डॉ. जॉफ्री फिशर, ले फिशर दाम्पत्य व ऑस्ट्रेलियाच्या फरझाना युसुफ या तीन परदेशी  शिक्षणातज्ञांचे मत ! वारली कला ही प्रभावी चित्रभाषा !         नाशिक ( प्रतिनिधी )- युनायटेड किंग्डमचे डॉ. जॉफ्री फिशर, ले फिशर हे दाम्पत्य व ऑस्ट्रेलियाच्या फरझाना युसुफ या तीन आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञांनी वारली चित्रशैली अभ्यासक संजय देवधर यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांनी महाराष्ट्राची आदिवासी वारली कला जाणून घेतली. भिंतीवर केलेले चित्र व विविध रेखाटने, तारपा वाद्य बघून ते मोहित झाले. वारली चित्रशैली ही प्रभावी चित्रभाषा असून त्यातील कथाविश्व जगाला कवेत घेणारे आहे असे त्यांनी नमूद केले. नव्या भारतीय शैक्षणिक धोरणात कलानिर्मितीला महत्वाचे स्थान असेल त्याचे स्वागत केले पाहिजे असेही मत त्यांनी मांडले. सुचित्रा देवधर यांनी भारतीय संस्कृतीनुसार कुंकूमतिलक लावून त्यांचे औक्षणाने स्वागत केले. सुप्रिया देवधर हिने विविध चित्रांचा तपशीलवार आढावा घेतला. संजय देवधर यांनी शंकानिरसन करून वारली चित्रसृष्टीची सफर त्यांना घडवून आणली.

'मृतकाचे नांव काय ?'विनोदाचा आस्वाद विनामूल्य घ्या !बाबाज् थिएटर्सच्या वर्धापनदिनानिमित्तपाच दिवसांचा ' रोटरी कल्चरल फेस्ट !

इमेज
'मृतकाचे नांव काय ?' विनोदाचा आस्वाद विनामूल्य घ्या ! बाबाज् थिएटर्सच्या वर्धापनदिनानिमित्त पाच दिवसांचा ' रोटरी कल्चरल फेस्ट !        नाशिक ( प्रतिनिधी ) बाबाज् थिएटर्स या ख्यातनाम सांस्कृतिक संस्थेचा २२ वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने ५ दिवसांच्या ' रोटरी कल्चरल फेस्ट ' चे आयोजन करण्यात आले आहे. दि.१४ ते १८ सप्टेंबर दरम्यान प. सा. नाट्यगृहात दररोज सायंकाळी ५.३० वाजता हा विनामूल्य सोहळा होणार आहे. काल पत्रकार परिषदेत बाबाज् थिएटर्सचे अध्यक्ष प्रशांत जुन्नरे, रोटरी क्लब ऑफ नाशिकरोडच्या अध्यक्षा वर्षा जोशी, सचिव ज्ञानेश वर्मा यांनी अशी माहिती दिली.        दि.१४ रोजी ज्ञानेश वर्मा प्रस्तुत 'रागरंग 'हा हिंदी चित्रपटातील रागदारीवर आधारित कार्यक्रम होईल. दि.१५ रोजी रोहित पगारे लिखित व दिग्दर्शित ' मृतकाचे नाव काय ? ' या सामाजिक व विनोदी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे. दि.१६ रोजी ' एव्हरग्रीन लता - आशा '  ही सुरेल गीतांची मैफल अमोल पाळेकर व सहकारी सादर करतील. दि.१७ रोजी झी मराठी प्रस्तुत ' उत्सव नात्यांचा ' कार

समाजाने बौद्धिक संपदेची गुणात्मकता वाढवून विकास साधावा- सुहास शुक्ल !

इमेज
समाजाने बौद्धिक संपदेची गुणात्मकता वाढवून विकास साधावा- सुहास शुक्ल !         सिन्नर ( प्रतिनिधी) बौद्धिक संपदेबद्दल असलेला आत्मविश्वास, संस्कृती व आधुनिकता यांचा मेळ प्रगतीकडे नेतो. सुसंस्कार, सत्शील वर्तणूक आणि अंगभूत देशभक्ती हे ब्राह्मण समाजाचे विशेष गुण आहेत. त्यांची गुणात्मकता वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. त्यातून व्यक्तिगत, सामाजिक आणि देशाचाही विकास साधता येईल असे प्रतिपादन नाशिक येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व बांधकाम व्यावसायिक सुहास शुक्ल यांनी केले. सिन्नर येथील सीताराम मंदिर न्यासाच्या वतीने आयोजित ब्राह्मण समाजाच्या ३२ व्या गुणगौरव समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक एम.जी. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास पत्रकार व वारली चित्रशैली तज्ज्ञ संजय देवधर, पी. एल. देशपांडे, ज्योतिषी संजय रत्नाकर व्यासपीठावर उपस्थित होते.      या कार्यक्रमात विविध शैक्षणिक स्तर, कला, क्रीडा स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविणारे विद्यार्थी,  पारितोषिकांचे प्रायोजक योगिता व अभिलाष पंडित, तसेच सेवानिवृत्त व वयाचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या ज्ये

शिक्षण विभागातर्फे कविसंमेलन व मुशायऱ्याचे आयोजन !!

इमेज
शिक्षण विभागातर्फे कविसंमेलन व मुशायऱ्याचे आयोजन !!         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : करीरोड येथील शिक्षणाधिकारी कार्यालयातील सभागृहात बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील कवी, लेखक शिक्षकांसाठी कवी संमेलन आयोजित करण्यात आले. 'कल्पनेतून जग निर्माण झाले' या कवितेनं जग बदलले असे विचार मांडणारे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ त्यांच्या स्वरचित कवितेत म्हणतानाच 'माणसातला माणूस असा घडवत जाते कवितेतून खदखदून हसवताना नकळत डोळ्यातून अश्रू येणे भाग पाडतात. कंकाळ यांच्या कवितेनं रसिक श्रोत्यांना अंतर्मुख करत सभागृह जिंकून घेतलं.          शिक्षणाधिकारी राजू तडवी (मध्यवर्ती) यांनी हरीवंशराय बच्चन यांची कविता ऐकवून अभिजात कवितेचा अनुभव रसिकांना दिला. या कार्यक्रमाचे संयोजक मनपा अधीक्षक निसार खान यांनी शिक्षण विभागात कार्यरत कवी, शायर, लेखक ज्यांनी देशभर नाव कमावलं आहे त्यांचा उचित सन्मान व्हावा या उद्देशाने या सत्कार सोहळ्याचे, कविसंमेलनाचे आयोजन केल्याचे सांगितले.            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी किसन पावडे पाटील यांनी करून सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण

अलास्का हॉलमध्ये राजयोग मेडिटेशन शिबिराचे यशस्वी आयोजन !

इमेज
अलास्का हॉलमध्ये राजयोग मेडिटेशन शिबिराचे यशस्वी आयोजन !       नासिक ( सुचेता बच्छाव)::- चांदशी येथील भूमिपुत्र मंडलिक परिवाराकडून त्यांच्या अलास्का हॉल मध्ये ५ दिवसीय राजयोग मेडिटेशन आयोजन गणपती उत्सवानिमित्त करण्यात आले.       प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय संस्था, गंगापूर रोड सेंटरच्या संचालिका आदरणीय मनीषा दिदी यांनी परिसरातील नागरिकांना संबोधित केले. सकारात्मक विचार कसे करायचे, संकल्पशक्तीच्या माध्यमातून आपल्या जीवनाला चांगली दिशा कशी दाखवावी या बद्दल मार्गदर्शन केले.          अध्यात्मिक मार्ग ज्ञानातून आपल्याला सामाजिक मुल्ये, नैतिक मुल्ये जोपासून पुन्हा एक मुल्यानिष्ठ समाज निर्माण करू शकतो. प्रसादाचे महत्व सांगताना त्यांनी शुद्ध आणि सात्विक शाकाहाराचे महत्व पटवून दिले.        ध्यानधारणेच्या फायद्यांबद्दलही त्यांनी विश्लेषण केले. मेडिटेशन शिबिरात सुखद आणि सुखद अनुभव आल्याचे आणि आत्मिक शांती मिळाल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी शांतीलाल भाई, किरण भाई, अशोक भाई , नंदलाल भाई, नानाभाई, सुचेता बच्छाव बहेन, सोनी बहेन यांनी सहयोग दिला. शरद मंड

जिल्ह्यातील ७५ आरोग्य संस्थांमध्ये गरोदर मातांना आरोग्य सेवा देऊन आरोग्य विभाग साजरा करणार आजादीका अमृत महोत्सव !

इमेज
  जिल्ह्यातील ७५ आरोग्य संस्थांमध्ये गरोदर मातांना आरोग्य सेवा देऊन आरोग्य विभाग साजरा करणार आजादीका अमृत महोत्सव !     नासिक (प्रतिनिधी)::- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वस्थ भारत चे स्वप्न साकार करण्यासाठी जि. प. आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय नाशिक, स्त्री रुग्णालय मालेगाव, ३२ ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे १३ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांच्या संकल्पने नुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांच्या प्रमुख मार्गदर्शनानुसार जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचे सनियंत्रणाखाली विशेष गरोदर माता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गरोदर मातांचे आरोग्य चांगले राहावे. गरोदरपणामध्ये विशेष स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी व्हावी तसेच त्यांना औषधोपचार, आहार सल्ला, बालकाची काळजी याविषयी मार्गदर्शन मिळावे तसेच जोखमीच्या मातांचे प्रमाण कमी करणे, माता व बालक मृत्यू कमी करण्यासाठी आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्ग