पोस्ट्स

मत प्रदर्शन -(४) कोमल फलके, आष्टी, नागपूर, स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ? भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !

इमेज
मत प्रदर्शन -(४) कोमल फलके, आष्टी, नागपूर, स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ?  भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !         १) स्त्रिया उच्चशिक्षित असतील किंवा कोणीही उच्चशिक्षित असला म्हणजे त्याने नोकरी करायलाच पाहिजे असा त्या उच्च शिक्षणाचा अर्थ होत नाही किंबहुना उच्चशिक्षित सोबतच ज्याचे फंडामेंटल आणि कन्सेप्टस परिपूर्णपणे क्लियर असतात ते लोक नोकरीकडे न जाता स्वतः चा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ डॉक्टर, जे डॉक्टर्स स्वतःला परिपूर्ण समजतात ते स्वतःचा दवाखाना थाटून रोग्यांची  सेवा करतात व नंतर तज्ञ डॉक्टर म्हणून उदयास येतात परंतु त्यांच्या इतकी शैक्षणिक योग्यता असलेले लोक हे मेडिकल ऑफिसर वगैरे सारखे पदांवरती कार्यरत असतात            २) घरची परिस्थिती चांगली असेल तर त्या विचाराप्रमाणे नोकरी करायची गरज नाही परंतु फायनान्शियल स्टेटस आणि नोकरी या भिन्न बाबी आहेत, धंदा उद्योग व्यवसाय सर्वांनाच करणे जमत नाही आणि नोकरीमध्ये एक ठराविक वेळ सकाळी जाणे आणि सायंकाळी परत घरी येणे इतका वेळ आपण एंगेज केला तर आपल्याला महिन्याच्या शेवटीला ए

मत प्रदर्शन -(३) पद्माकर वाघरूळकर, छत्रपती संभाजीनगर, स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ? भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !

इमेज
मत प्रदर्शन -(३) पद्माकर वाघरूळकर, छत्रपती संभाजीनगर, स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ? भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !         १) स्त्रिया उच्च शिक्षित आहेत म्हणून त्यांनी नोकरी करणे गरजेचे आहे का ? उत्तर: नाही परंतु मुळात शिक्षणाचा आणि नोकरीचा सुतरामही संबंध नाही नोकरी मिळविण्यासाठी शिक्षणाबरोबरच कौशल्यांचीही आवश्यकता असते हे खरे आहे परंतु प्रत्येक शिक्षितांना नोकरी मिळेलच याची १००% शाश्वती नाही. आणि मी सुशिक्षित स्त्री म्हणून मला नोकरी मिळालीच पाहिजे हा अट्टहास/दुराग्रह धरणेही चूकच आहे.           २) जर घरची परिस्थिती चांगली असेल तर का करावी नोकरी ? उत्तर :  हाही विचार चांगलाच परंतु त्यामुळं स्वतःचा वैचारिक कोंडमारा होता कामा नये.             ३) त्या जागी ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे नोकरीची,  त्याला ती मिळाली ? उत्तर:- माझ्या नोकरी न केल्यामुळे जर इतर बेरोजगारांना संधी मिळत असेल मी मला गरज नसताना नोकरी न केलेली बरी हा विचार खूपच चांगला.             ४)एवढे शिकून घरात बसले तर शिक्षण फुकट जाते का ? उत्तर : अजिबात नाही. उलट शिक्षित माता

मत प्रदर्शन -(२) कु. सुरज गेल्ये, रत्नागिरी स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ? भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !

इमेज
मत प्रदर्शन -(२) कु. सुरज गेल्ये, रत्नागिरी  स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ? भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !         १) स्त्रिया उच्च शिक्षित आहेत म्हणून त्यांनी नोकरी करणे गरजेचे आहे का ?        उतर) नाही, तिने नोकरीच करावी हे गरजेचे नाही. तिला जे पाहिजे ते करू द्यावे.           २) जर घरची परिस्थिती चांगली असेल तर का करावी नोकरी ?        उतर) स्वतःची पण काही स्वप्न असतीलच ना ? ती पूर्ण करण्यासाठी...        ३) त्या जागी ज्या व्यक्तीला खरच अत्यंत गरज आहे नोकरीची  त्याला ती मिळाली तर…..?        उतर) उत्तमच           ४) एवढे शिकून घरात बसलीस तर शिक्षण फुकट जाते का ? भावी पिढी घडवण्यासाठी उपयोग होईल ना…….?        उतर) नाही. भावी पिढी घडण्यासाठी तिच्या शिक्षणाचा उपयोग होणारच.           ५) स्त्रियांनी स्वतः च्या ज्ञानाचा उपयोग समाज सक्षम करण्यासाठी कसा करता येईल असा विचार केला तर कितपत योग्य आहे ?       उतर)  खूप चांगलं होईल, समाज सुधारेल..           ६) ती जर हाऊस वाईफ असेल तर तिला दुय्यम स्थान दिले जाते का ?          उतर) नाही, सर्वच ठि

मत प्रदर्शन -(१):: स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ? भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेले "मत प्रदर्शन" !

इमेज
भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रम विषय: मत प्रदर्शन, स्त्रियांनी नोकरी करावी की नाही ?       १) स्त्रिया उच्चशिक्षित आहेत म्हणून नोकरी करणे गरजेचे आहे का?              उच्च शिक्षित आहे, नोकरी करायलाच पाहिजे असे नाही, घरी बसून छोटे-मोठे उद्योग करू शकता, थोडेफार कमवायला पण शिकले पाहिजे, स्वतःचे अस्तित्व निर्माण करता आले पाहिजे, प्रत्येक वेळी समोरच्याच्या समोर हात पसरणे योग्य वाटत नाही, कधी कधी मन मारून शांतही बसावे लागते.        २)  जर घरची परिस्थिती चांगली असेल तर का करावी नोकरी?              घरची परिस्थिती चांगली असेल तर अजिबात नोकरीच्या मागे लागू नका. एखाद्या गरजूला फायदा होईल. त्याचे कुटुंब तरी सुखी होईल. जे आपल्याला हवे ते मिळत असेल तर नोकरी मागे धावून स्वतःचे स्वास्थ्य हरवू नका, जगण्याचा आनंद घ्या.            ३) त्या जागी ज्या व्यक्तीला खरंच अत्यंत गरज आहे नोकरीची त्याला मिळाली तर...?              खरोखर आनंदाची गोष्ट आहे.ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण देणं लागतो. काहीच करता येत नसेल तर गरजवंताची गरज तरी भागवावी.            ४) एवढे शिकून घरात बसलीस तर शिक्षण फुकट जाते का ?     

डॉ. भारतीताई पवार, डॉ. सुभाष भामरे आणि कार्यसम्राट हेमंत गोडसे ! स्नेहभोजनाच्या पंक्ती रोजच उठविता येतील अन्यथा बाजार उठायची वाट बघणे धोक्याची घंटा ठरू नये !

इमेज
डॉ. भारतीताई पवार, डॉ. सुभाष भामरे आणि कार्यसम्राट हेमंत गोडसे !  स्नेहभोजनाच्या पंक्ती रोजच उठविता येतील अन्यथा बाजार उठायची वाट बघणे धोक्याची घंटा ठरू नये ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक        खासदार भारतीताई पवार यांचा दोन लाखांच्या मताधिक्याने लोकसभेत प्रवेश झाला. लोकसभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना मराठीतून केलेले भाषण आणि खासदार प्रीतम मुंढे व रक्षा खडसे यांना आलेले हसू याचा व्हायरल झालेला  व्हिडिओ काय दर्शवित होता हे प्रत्येकाच्या नजरेतून वेगवेगळे भाव निर्माण करुन गेला. मात्र नासिक जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार होण्याचा मिळालेला मान उल्लेखनीयच म्हणावा लागेल. शिवाय राज्यमंत्री म्हणून शपथ घेणे यासाठी मुंढे आणि खडसे यांचे हसणे, दोन लाखांचे मताधिक्य, पहिल्या महिला खासदार, पाणीदार नेते ए. टी. पवार (दादासाहेब) यांच्या स्नुषा, जिल्हा परिषद सदस्य या कारकिर्दीचा तसेच उच्चशिक्षित यापैकी कशाचा निकष असेल ? काहीही असो, राज्यमंत्री होण्याचा मान प्राप्त होणे अभिनंदनीयच. यामुळे जिल्ह्यातील समस्त हितचिंतकांना आनंद तर होणारच आणि अपेक्षाही वाढणार यांत शंका नाही. या

जब झिरो दिया मेरे भारतने- सौजन्याने

जब झिरो दिया माझा भारताने- सौजन्याने 

चांद्रयान ३ - भारत विश्वगुरू वाटचाल !! कविता -२ Good luck चंद्रयान 3

इमेज
चांद्रयान ३ - भारत विश्वगुरू वाटचाल !! कविता -२ Good luck चंद्रयान 3 पृथ्वीची ओसंडून वेस पाहिलास तू नवा देश ! प्रियकर, मामा इथे ख्याती डोलला अभिमानाचा शेष !! देव म्हणून तुज पूजले  ओव्या, आरतीत भजले ! नव्या युगाचे पाऊल नवे देशाचे कौतुक झाले !! इस्त्रो शास्त्रज्ञ कथा न्यारी छातीठोक अभिमान वारी ! पहिला वाहिला भारत देश  फडकवल्या तिरंगा लहरी !! आनंदाचे दरवळले अत्तर  डोंगर, दरी, कातळ, पत्थर ! दुमदुमली चंद्रयान 3 पांढरी सफल, यशस्वी इस्त्रोचा पत्कर !!   कल्पना मापूसकर, मीरारोड, ठाणे

चांद्रयान ३ - भारत विश्वगुरू वाटचाल !! कविता -१ विजयी विश्व तिरंगा आमुचा !

इमेज
चांद्रयान ३ - भारत विश्वगुरू वाटचाल !! कविता -१ विजयी विश्व तिरंगा आमुचा ! विजयी विश्व तिरंगा आमुचा आज फडकला चंद्रावरती ! चांद्रयानाच्या यशस्वीतेने भारतीयांची फुलली छाती !! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कुणीच पोचू शकले नाही ! चांद्रयानाने ते करून दावले, ही आमच्या सामर्थ्याची ग्वाही !! भारत आमचा विश्र्वगुरू हा  ब्रह्मांडाला  घाली गवसणी ! वाटचाल ही असेल पुढची सूर्यमण्डल हे लक्ष्य ठेवुनी !!           उद्धव भयवाळ, छत्रपती संभाजीनगर,           २४/०८/२०२३

ज्योतिषाच्या पुस्तक लेखनाबद्दलॲड. मिलिंद चिंधडे यांचा सन्मान !

इमेज
ज्योतिषाच्या पुस्तक लेखनाबद्दल ॲड. मिलिंद चिंधडे यांचा सन्मान !         सातारा-नासिक::- ज्येष्ठ रमलतज्ञ आणि ग्रहांकितकार  चंद्रकांत शेवाळे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने पुणे येथे आयोजित ४१ वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन झाले त्यामध्ये पुस्तक लेखनाबद्दल मिलिंद चिंधडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.           सत्काराला उत्तर देताना "ज्योतिष नभातील तारे" हे एक ज्योतिष विषयातील आगळे वेगळे पुस्तक असल्याचे नमूद करून त्यामध्ये ५० ज्योतिषांच्या कामगिरीचा आढावा घेतल्याचे मिलिंद चिंधडे म्हणाले.           भालचंद्र ज्योतिष विद्यालय पुणे आणि प्राचार्य रमणलाल शहा ज्योतिष अकॅडमी सातारा यांच्यातर्फे आयोजित या अधिवेशनात तीसहून अधिक ज्योतीष संस्थांचे प्रतिनिधी आणि देशातील सुमारे १००० हून अधिक ज्योतिर्वीद सहभागी झाले होते.          अधिवेशनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध टॅरो ग्रंथ लेखिका ॲड. सुनिता पागे यांनी आणि स्वागताध्यक्षपद वास्तु ज्योतिषी ॲड. वैशाली अत्रे यांनी भूषविले. याप्रसंगी चंद्रकांत शेवाळे, सौ. पुष्पलता शेवाळे, राजेश वशिष्ठ, दिलीप अवस्थी, उल्हास पाटकर, प्रदीप पंडित, आप्पासाहेब नवले  इत्य

आचार्य अत्रे आणि समकालिन यांच्याविषयी नवी पिढीने वाचन करावे – भाऊ तोरसेकर, आचार्य अत्रे यांना १२५ व्या जयंतीनी वरळीत अभिवादन !

इमेज
आचार्य अत्रे आणि समकालिन यांच्याविषयी नवी पिढीने वाचन करावे – भाऊ तोरसेकर आचार्य अत्रे यांना १२५ व्या जयंतीनी वरळीत अभिवादन ! न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801          मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)::- आचार्य अत्रे स्मारक समिती, मुंबई यांच्या वतीने आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंतीदिनी वरळी येथील आचार्य अत्रे चौकातील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यावेळी भाऊ तोरसेकर, आचार्य अत्रे यांची नात मीना पै, पणतू अक्षय पै, समितीच्या आरती सदावर्ते-पुरंदरे, लेखक-कवी रविंद्र आवटी, विसुभाऊ बापट, अरविंद भोसले, शिबानी जोशी, ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री विजय वैद्य, योगेश त्रिवेदी, संतोष (आबा) माळकर, अशोक शिंदे, ह. मो. मराठे यांच्या कन्या श्रीमती पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.           दरवर्षी काकासाहेब पुरंदरे यांच्या नावाने दिला जाणारा १३ वा आचार्य अत्रे पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना समितीच्या वतीने आरती सदावर्ते-पुरंदरे यांनी जाहीर केला. त्याचे वितरण २८ ऑक्टोबर २०२३ रोजी शानदार समारंभात होणार आहे.          आचार्य अत्रे यांचे ज्यांच्याशी वाद झाले, मैत्री झाली, अशा समकालि