रिजर्व बँकेने दंडात्मक रकमेबाबत सर्वसामान्यांना परवडेल अशी नियमावली तयार करायला हवी काय ?

अर्थ तज्ञांनो उत्तर द्या !

एक बातमी, तीन बँकांनी आपले व्याजदरांत केली वाढ !

पीएनबी नेही केली वाढ

        पूर्वी कधी किमान शिल्लकवर आजच्या इतकी दंड आकारणी होत नव्हती, आजची परिस्थिती काय ?
          धनादेश खात्यावर पुरेशा शिल्लक अभावी परत गेल्यास किती दंड आज बँका घेतात ?
           देशाचा जीडीपी आटोक्यात कसा ?
         मित्रों, बँकांचे अनेक घोटाळे तसेच कर्ज बुडवून परदेशांत पळून जाणे या बाबींकडे सर्व सामान्यांनी जरूर लक्ष द्यायला हवे !
         कर्ज बुडवून परदेशांत निघून गेलेल्यांचा भुर्दंड सर्वसामान्याकडून यामार्गाने वसुल केला जात आहे असे वाटते का ?
         मित्रों, जीडीपीची व्यवस्था बँक खात्यातील किमान शिल्लक नसल्यास, धनादेशाचा अनादर झाल्यास दोन्ही खातेदारांना भुर्दंड, बँक आणी ग्राहक यांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा व या सर्वांवर जीएसटी, सीजीएसटी च्या माध्यमातून वसुल करून सरकारचा खजिनाही वाढवायचा हि हुशार अर्थतज्ञांची खेळी वाटते काय ?
           मित्रों, तरीही बँकांची भूक भागत नाही मग व्याजदरांत वाढ केली जाते, हे कारण संयुक्तिक वाटते काय ?
            मित्रो, आपल्याला अशा पद्धतीने लुटले जात आहे, शिवाय बँक कर्मचाऱ्यांना दुसरा-चौथा शनिवार सुटी देऊन सर्वसामान्यांची आर्थिक अडवणूक होत आहे असे वाटते काय ?
         मित्रों, यांसाठी एटीएम आहेत, तेथे पांच व्यवहारानंतर चार्जेस आहेतच शिवाय इतर बँकेच्या एटीएम मधून पैसे काढल्यास वेगळे चार्जेस आहेत मग खात्यावरील सर्वसान्यांचा घामाचा , कष्टाचा पैसा असाच वाया जात आहे असे नाही काय ?
           मित्रों, अर्थतज्ञ मखलाशी करतील की विकास दिसत नाही का ? आणी विकासाच्या नांवाने गेली ७० वर्षे भ्रष्टाचार झालाच नाही का ? या प्रश्नाचेही उत्तर देणे हे भारतीय हुशार अर्थतज्ञांकडून अपेक्षित नाही काय ?
         मित्रों, कळू द्या सर्वांना की सर्वसामान्यांनी बँक व्यवहार करावेत का ? शिवाय चालू खात्यावरील किमान वा कमाल रक्कम बँका विना व्याज वर्षानुवर्षे वापर करीत आहेत, अब्जावधी रूपयांची रक्कम अशी अनेकांच्या खात्यात असते,याचेही उत्तर मिळायला हवे असे वाटते का ?
    कालची सुखद बातमी की, स्टेट बँकेने खात्यावरिल किमान शिल्लक नसल्यास होणाऱ्या दंडात कपात केली, आनंद आहे पण खाजगी क्षेत्रातील काही  बँकांचे  चालू खात्यांवर ३५०+gst +sgst  अशी दंडाची  आकारणी होते, बचत खात्यांचीही तशीच परिस्थिती आहे. यावर रिझर्व बँकेने सर्वसमावेशक नियमावली तयार करावयास हवी असे वाटते काय ?
उदाहरणासाठी बँकांचे ताळेबंद तपासल्यास वस्तुस्थिती समोर यायला हरकत नाही,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।