पोस्ट्स

2026 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्रीय मतदार दिन, राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य

इमेज
राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी, कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्यातर्फे रविवार २५ जानेवारी २०२६ रोजी राज्यस्तरीय कार्यक्रम होत आहे. यानिमित्ताने हा लेख… २५ जानेवारी हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी, २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. स्वतंत्र भारताने लोकशाहीची वाट स्वीकारल्यानंतर, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपवण्यात आली. त्यामुळे भारतीय लोकशाहीत २५ जानेवारी या दिवसाला अतिशय महत्व आहे. तथापि, नागरिकांना आपल्या मताची किंमत उपयोगिता, महत्व आणि कर्तव्य कळावे यासाठी २५ जानेवारी २०११ पासून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा होतो. २०२६ हे वर्ष राष्ट्रीय मतदार दिनाचे १६ वे वर्ष आहे. निवडणूक आयोगाने यावर्षी राष्ट्रीय मतदार दिनाचे ब्रीद वाक्य 'माझा भारत माझे मत ' हे ठेवले आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश ...

थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार २०२५–२६ जाहीर !

इमेज
थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार २०२५–२६ जाहीर ! नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी ३ जानेवारी रोजी महिला शिक्षिकांना दिला जाणारा थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार सन २०२५–२६ साठी जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शिक्षिकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. सन २०२५–२६ करिता जिल्ह्यातील सर्व गटांतून प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावांची गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत गट बदल करून सखोल पडताळणी व गुणांकन प्रक्रिया राबविण्यात आली. शिक्षिकांचे वर्गस्तरीय अध्यापन कार्य, विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न, सहशालेय उपक्रम, सामाजिक व शैक्षणिक योगदान या विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले. पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्तावांमधून शासनाने ठरवून दिलेल्या किमान अटी व शर्ती तसेच सर्व निकष पूर्ण करणाऱ्या शिक्षिकांमधून एकूण १५ गुणवंत शिक्षिकांची निवड करण्यात आली. ही निवड अध्यक्ष, जिल्हा गुणवंत शिक्षिका पुरस्कार निवड समिती तथा प...

पिंपरखेड च्या साबळे कुटुंबियांच्या घरी राज्यपालांनी घेतला भोजनाचा आस्वाद

इमेज
पिंपरखेड च्या साबळे कुटुंबियांच्या घरी राज्यपालांनी घेतला भोजनाचा आस्वाद नाशिक : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सायंकाळी  दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड या गावातील साबळे कुटुंबाच्या घरी नागलीची भाकरी, उडीदाचे वरण आणि हरभऱ्याच्या भाजीचा आस्वाद घेतला. राज्याच्या प्रथम नागरिकाने आपल्या घरी भोजनाचा आस्वाद घेतल्याने साबळे कुटुंबीय भारावले होते.            हिरामण शंकर साबळे यांचे गावात साधे घर आहे. त्यांच्या घरी राज्यपाल महोदय जेवणाला येणार, अशी माहिती मिळताच त्यांनी तयारी सुरू केली. घराला रंग रंगोटी केली. प्रवेशद्वाराच्या भिंती वारली चित्रकलेने साकारली होती. साबळे कुटुंबातील गोजरताईने राज्यपालासांसाठी लाल, पांढरी नागली आणि बाजरीच्या भाकरी, अळू आणि वर्कण कंदाची भाजी, हरभराची भाजी, उडीदाचे वरण तयार केले होते. राज्यपाल श्री. देवव्रत यांच्यासमवेत विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे यांच्यासह साबळे कुटुंबातील सदस्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी राज्यपाल श्री. देवव्रत यांनी स्थानिक पिके, जीवनमान या विषयी माहिती घेतली....

नैसर्गिक शेती काळाची गरज-राज्यपाल आचार्य देवव्रत, खते, कीटकनाशकांचे अंश अन्नधान्यात आढळून येत आहेत. या अन्नधान्यामुळे मानवी प्रतिकार क्षमता कमी होऊन दुर्धर आजाराचे रुग्ण वाढत आहेत. ही बाब चिंताजनक आहे. जमिनीची जलसंधारणाची क्षमताही कमी झाली आहे.

इमेज
नैसर्गिक शेती काळाची गरज-राज्यपाल आचार्य देवव्रत सह्याद्री फार्म येथे शेतकरी, कृषी सखींसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी साधला संवाद           नाशिक : रासायनिक खते, कीटकनाशकांच्या अती वापराने देशातील सुपीक जमीन नापीक केली आहे. नापीक जमीन सुपीक बनवून  आत्मनिर्भर भारत करण्यासाठी नैसर्गिक शेती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.            दिंडोरी तालुक्यात मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे आयोजित नैसर्गिक शेती संवादात ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,  पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार,  विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, सह्याद्री फार्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे उपस्थित होते.            राज्यपाल म्हणून नव्हे, तर श...