भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
माजी आमदार रामदास चारोस्कर शिवसेनेच्या संपर्कात या एका बातमीचा परीणाम नासिक लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवर होऊ शकतो, दिंडोरीचे खासदार हरीश्चंद्र चव्हाणांचे नांव जाहीर होत नाही व डाँ भारती पवारांची भाजपाशी होत असलेली बोलणी कितपत उमेदवारी मिळविण्यात यश मिळवेल ? शिवसेनेचे धनराज महालेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून उमेदवारीही पदरात पाडून घेतल्याने नासिक व दिंडोरीतील सर्वच समीकरणे बदलू लागली आहेत. भाजपा शिवसेनेचे जागावाटप निश्चित झाले मात्र नासिक व दिंडोरीचे उमेदवार जाहीर होत नाहीत. राज्यात काल झालेल्या घडामोडींनुसार भाजपा व शिवसेना काही जागांची अदलाबदल करू शकते या विधानाला पुष्टी दिल्यास, नासिक लोकसभा मतदार संघातून पालकमंत्र्यांच्या व्युहरचनेचा हा भाग समजून माणिक कोकाटे हे उमेदवार ठरण्याची शक्यता आहे, तसे झाले तर दिंडोरीतील हरीश्चंद्र चव्हाणांऐवजी शिवसेनेकडून रामदास चारोस्कर उमेदवारी करतील व डाँ भारती पवार यांचा भाजपा प्रवेश केला काय अन् नाही केला तरी फारसा फरक पडणार नाही असे गणित मांडले जाऊ शकते, मुळात राष्ट्रवादीने त्यांच्यावर अन्याय केला आहे या सुडाच्या भावनेने त्या पक्