पोस्ट्स

पाटीलकी, देशमुखी व श्रीमंती या कारणामुळे उचभ्रू समजला जाणारा समाज नापिकी शेती, कर्जबाजारी यामुळे हतबल झाला आहे !! पाणीदार जिल्ह्यातील कष्टकरी शेतकऱ्यांची दाहकता !!! ग्रामीण भारत देश अस्तित्वात राहण्यासाठी शासनाने चांगले धोरण आखुन अंमलबजावणी करणे आवश्यक आहे !!! सविस्तर लेख वाचून शासनापर्यंत पोहचविण्यासाठी खालील लिंक शेअर करा, पुढील पिढ्यांसाठी आजच सर्वांनी प्रयत्न करायला हवेत !!!!

इमेज
पाणीदार नाशिक जिल्ह्यातील कष्टकरी शेतकऱ्यांची दाहकता ! ****************************** महाराष्ट्र राज्यात नाशिक जिल्ह्याची ओळख ही धरणांचा जिल्हा म्हणुन ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांतून मुंबई, जळगांव, औरंगाबाद व अहमदनगर या जिल्ह्यांना शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. मुंबईसाठी पिण्याच्या पाण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. तर औरंगाबाद, अहमदनगर व जळगांव या जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनासाठी नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. आधुनिक शेती व्यवसायामुळे संपूर्ण भारत देशातील बागायती क्षेत्र वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात भूगर्भातील पाणी साठ्याचा उपसा शेतीसाठी केला जात आहे. सोबत मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय उभे राहिल्यामुळे धरणांमध्ये साठविणेत आलेले पाणी औद्यगिक क्षेत्रासाठी वापर केला जात आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खोलवर गेली आहे. त्यातच विद्युत पंपामुळे पाणी उपसा करण्याची सुविधा कमी खर्चात व सहज होऊ लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात भुगर्भातील पाणी साठा

जमीन विकून आलेल्या पैशाचा "माज" काय असतो ? "माज...फिनिश इट" नक्की काय आहे ? सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
जमीन विकून आलेल्या पैशातून जो "माज" येतो व आयुष्य काय वळण घेते, हा "माज" आजच्या तरुणाईला काहीतरी संदेश देणारा ठरेल असे आशिष जैन यांना वाटते. आशिष जैन हे दिग्दर्शक असलेल्या "माज-फिनीश इट" या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाशिक येथे आले असता त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.         गेली काही वर्षे हा विषय समाजात नैराश्य निर्माण करणारा तर काहींना जमीन विकून आलेल्या पैशांनी नवीन व्ययसायात गुंतवणूक करुन यशाची शिखरे पादाक्रांत केलीत मात्र अनेकांचे आयुष्य बर्बाद झाले आहे. हाच मुद्दा पकडून "माज" या चित्रपटाची निर्मिती केली आहे, "माज" सकारात्मक वा नकारात्मक हे गुलदस्त्यातच ठेवले आहे, ते येत्या २ आॅगस्ट रोजी सिनेमागृहात शिरल्यावर कळेल असे चित्रपटाचे निर्माते संदीप टकले यांनी सांगितले.             या चित्रपटातून एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे, "अमित रेखी व अर्चना संकेत," सोबत नाना गोडबोले, प्रकाश धोत्रे, सशांक दर्णे, मिलिंद जाधव, व्रुंदा बाळ, प्रेम नरसाळे, पूनम कापसे, चंचला बोरकर, जगदीश कुंभार, यासारखे कलाकार आहेत, स

शाखा अभियंत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
शाखा अभियंत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल ! नासिक::- आलोसे राजू पुणा  रामोळे, शाखा अभियंता, लघु पाटबंधारे उपविभाग सटाणा यांचे विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारीत सन २०१८) अन्वये सटाणा पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला.         आलोसे राजु रामोळे याने जाखेडा धरणातून गाळ काढण्याचे मोबदल्यात तसेच गाळ काढण्याचे काम सुरू ठेवण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी १३ जून २०१९ रोजी १५०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. यासंबंधी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नासिक कार्यालयात तक्रार दाखल केली होती, त्यानुसार सापळा पूर्व पडताळणी दरम्यान पंचासमक्ष रामोळे याने तक्रारदाराकडून १५०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर रक्कम मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने आज दि. १९ जुलै १९ रोजी सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट राजकारणात !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
एन्काऊंटर स्पेशालिस्ट राजकारणात ! खास बातमी ::- तब्बल ११३ एन्काऊंटर करणारे मुंबई पोलीस दलातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे लवकरच राजकारणात उतरण्यास सज्ज होत आहेत. ४ जुलै रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे मात्र तो आजपावेतो मंजूर करण्यात आलेला नाही.            सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप शर्मा भाजपा व शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे कळते, राजीनामा व दोन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चेनंतर कोणत्या पक्षाकडून विधानसभा निवडणुक लढवायची व मुंबईतील कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार इतकाच सोपस्कार बाकी असल्याचे कळते !

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात ! नासिक::- शासनाकडून जमीनीच्या भरपाई पोटी रुपये ५१ लाख मंजूर करण्यात आले होते त्या रकमेचा धनादेश अदा करणेसाठी ३००००/- रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.       सदर रक्कम आज प्रकल्प अधिकारी कार्यालय, सिंचन भवन येथे तक्रारदाराकडून पुणेगाव कालवा प्रकल्प अधिकारी, पाटबंधारे विभागाचे उप अभियंता राजेंद्र माधवराव शिरवाडकर यांस ३००००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

जेष्ठ विचारवंत, लेखक, राजकारणी तथा दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले काळाच्या पडद्याआड ! केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शोक व्यक्त केला !! न्यूज मसाला परीवार नासिक कडून भावपूर्ण श्रद्धांजली !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
महान लढवय्ये विचारवंत राजा ढाले यांचे निर्वाण ! दलित पँथर चे संस्थापक,  आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार,  ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचे आज दि. १६ जुलै रोजी सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवारी दुपारी 12 वाजता विक्रोळी (पू) येथील त्यांच्या निवसस्थानाहून निघणार,  दादर चैत्यभूमी येथिल इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, आता त्यांचे पार्थिव गोदरेज रुग्णालय येथे नेण्यात येत असल्याची माहिती त्यांची कन्या गाथा ढाले यांनी दिली आहे. राजा ढाले यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळताच आंबेडकरी जनतेत तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्या निधनाची वार्ता कळताच तीव्र शोक व्यक्त केला आहे. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार ; मार्गदर्शक, दलित पँथर चा महानायक हरपला आहे अशी शोकभवना व्यक्त करून ना रामदास आठवले यांनी दिवंगत राजा ढाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्

न्यूज मसालाची बातमी व नियोजन समिती सदस्य यांनी केलेल्या आरोपांची जिल्हा परिषदेकडून दखल !! निव्वळ फार्स की ठोस कार्यवाही ची चर्चा !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
न्यूज मसालाची बातमी व नियोजन समिती सदस्य यांनी केलेल्या आरोपांची जिल्हा परिषदेकडून दखल !! नासिक::-   ४ फेब्रु. व ६ फेब्रु. १९ ला न्यूज मसालाने प्रकाशित केलेल्या बातमीची अखेर प्रशासनाकडून दखल घेण्यात आली. यासाठी प्रशासनाला तब्बल साडेपाच महिन्यांचा कालावधी लागतो याबाबत जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागात कुतुहलाचा विषय ठरला असून सदर रस्ता व त्याची प्रशासनाकडून करण्यात आलेली पाहणी हा निव्वळ फार्स ठरेल की संबंधितांवर कारवाई करण्यात येईल अशी चर्चा सुरू आहे.           त्र्यंबक तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा रस्ता जिल्हा परिषदेच्या ठेकेदाराकडून बनविण्यात आला व तोच रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराकडून ही बनविला आहे असा आरोप नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर यांनी ग्रामस्थांच्या व जिल्हा परिषद प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य रुपांजली माळेकर यांनी सदर कामाची व फसवणुकीच्या चौकशीची वारंवार मागणी केली असता अखेर शुक्रवारी (दि.१२) चौकशी समितीने पाहणी केली.  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी चौकशी समिती स्थापन करुन अहवाल सादर कर

योगाला वयोमर्यादा नसल्याने समाजातील प्रत्येक नागरिकाने योग अभ्यास करावा - विश्वासराव मंडलिक !! योग आयुष्यात असणे म्हणजे रोग मुक्त आयुष्य- पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
आरोग्यम धनसंपदा कार्यशाळेतून मधुमेह ,  स्थुलता निरावरणाचे धडे योगाला वयोमर्यादा नसल्याने समाजातील प्रत्येक  नागरिकाने योग अभ्यास करावा - विश्वासराव मंडलिक नाशिक , दि.७ जुलै :-  योगाला वयोमर्यादा नसल्याने समाजातील प्रत्येक नागरिकाने योग अभ्यास करावा त्यात पदवी मिळवावी व आपल्यासोबत इतरांनीही त्याचे मार्गदर्शन करावे असे।आवाहन पंतप्रधान योग पुरस्कार विजेते विश्वास मंडलिक गुरुजी यांनी केले. आज  परशुराम सायखेडकर नाट्यगृह शालिमार येथे योग विद्या धामच्या माध्यमातून आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन केले.          या कार्यशाळेस पमुख पाहुणे नाशिकचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख मनोहर कानडे,ओंकार नगर (नवीन नाशिक) अध्यक्ष राजेंद्र फड,योगशिक्षिका कांचंनताई खाडे,योगविद्या धामचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम पुरी, अमरजीतसिंग गरेवाल, डॉ. विद्याताई देशपांडे,आशाताई वेळूकर,निलेश वाघ, योग शिक्षक व साधक उपस्थित होते.याप्रसंगी किशोर वयीन मुलांसाठी योग व मसाज तंत्र व मंत्र या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

जिल्हा परिषद बांधकाम सभेला अभियंत्यांची अनुपस्थिती...! शेडेकर चिखलफेकीचा परिणाम;सामूहिक रजा अर्ज करून केला निषेध !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
      बांधकाम सभेला अभियंत्यांची अनुपस्थिती...      शेडेकर चिखलफेकीचा परिणाम;सामूहिक रजा अर्ज करून केला निषेध        सिंधुदुर्गनगरी:- महामार्ग प्राधिकरण उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गुरुवारी कणकवली येथे चिखलाच्या पाण्याने घालण्यात आलेले आंघोळ प्रकरण जिल्ह्यातील शाखा अभियंता यांनी गंभीर घेतले आहे. शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषद बांधकाम समिती सभेला विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंता यांनी अनुपस्थित राहत निषेध व्यक्त केला. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी सचिव म्हणून सभेला उपस्थिती लावली. दरम्यान, सर्व अभियंत्यांनी रजेचा अर्ज टाकत घटनेचा निषेध केला आहे.            सभापती जेरॉन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली नाथ पै सभागृहात शुक्रवारी संपन्न झालेल्या या सभेला सदस्य प्रदीप नारकर, राजेश कविटकर, श्रिया सावंत, राजन मुळीक यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. गुरुवारी आ नितेश राणे व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता शेडेकर यांना कणकवली बाजार पेठेतील रस्ता पाहण

पुरेसा पाऊस न झाल्याने टँकर लागण्याची शक्यता असल्यास टँकर वाढविण्यासाठी तालुक्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
नाशिक : - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी आज जिल्हयातील पाणी टंचाईबाबत तालुक्यांचा आढावा घेवून विविध सुचना केल्या. जिल्हयात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे काही तालुक्यांमध्ये टँकर लागण्याची परिस्थिती असून गटविकास अधिका-यांच्या आढाव्यामध्ये जिल्हयात १४ टँकर लागण्याची शक्यता असल्याने टँकर वाढविण्याची  गरज असल्यास तालुक्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शितल सांगळे यांनी यावेळी दिले.            जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक तालुक्याचा आढावा घेताना पाणी टंचाईबाबत राबविण्यात येत असलेल्या उपयायोजनांची माहिती घेवून प्रत्येक गावाला पाणी पुरवठा होईल यासाठी जबाबदारीने काम करण्याचे तसेच कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना पाणी टंचाईबाबत दिलासा देण्यासाठी विशेष उपायोजना करण्याचे निर्देश शितल सांगळे यांनी यावेळी दिले.                 यावेळी पर्जन्यमानाबाबत माहिती घेवून विंधन विहिरींचाही आढावा घेण्यात आला. पाणी टंचाईचा सामना करण्या