शिवरायांना श्रद्धास्थानी मानणाऱ्या मनांची कत्तल ! दिर्घकालानंतर उपस्थित होणारा प्रश्र्न "शिवराय कोण होते ?" याचे उत्तर आजच शोधले तर बरे अन्यथा रयतेचे राज्य या संकल्पनेची हत्या केल्याचं पाप ठरेल ! उद्विग्न भावनांचा कल्लोळ सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
सरकारने घुमजाव केले की जनभावनेचा आदर करून निर्णय मागे घेतला ! काहीही असो पण तुर्तास अभिनंदन ! एका मोठ्या "रयतेचे राज्य संकल्पनेची" हत्या घडण्यापासून बचाव केला तरीही असा अविवेकी विचार आलाच कसा ? यांवर अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटल्या तशीच एक प्रतिक्रीया "शिवराय कोण होते ?" असा प्रश्न भविष्यात उपस्थित करणारी !! गडकिल्ले हेरिटेज हॉटेलसाठी की पर्यटन स्थळासाठी ! चालान वाढविण्याने भडकलेल्या जनतेच्या जखमांची शाई वाळते न वाळते तोच सरकारने गडकिल्ल्यावर हेरिटेज हॉटेल बांधण्याचा निर्णय घेवून तमाम शिवरायांवर श्रद्धास्थान ठेवणा-या मनाची सरकारने कत्तल केलेली दिसून येत आहे.गडकिल्ले हे शिवरायांच्या राज्यकारभाराचे सत्ताकेंद्र.ज्या राजाने गडकिल्ल्यावरुन तमाम आदिलशाही,निजामशाही आणि मोगलशाहीला आव्हान दिलं,नव्हे तर त्यांची सत्ता उधळून लावली.तसेच याच किल्ल्याच्या आधाराने तमाम आपलं अस्तित्व न समजणा-या लोकांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली.आज गडकिल्ले ही वास्तू जरी शोभेची वस्तू वाटत असली तरी त्या ठिकाणी एक एक किल्ला लढवितांना तिथे तमाम मावळ्यांचंच