पोस्ट्स

शिवरायांना श्रद्धास्थानी मानणाऱ्या मनांची कत्तल ! दिर्घकालानंतर उपस्थित होणारा प्रश्र्न "शिवराय कोण होते ?" याचे उत्तर आजच शोधले तर बरे अन्यथा रयतेचे राज्य या संकल्पनेची हत्या केल्याचं पाप ठरेल ! उद्विग्न भावनांचा कल्लोळ सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
सरकारने घुमजाव केले की जनभावनेचा आदर करून निर्णय मागे घेतला ! काहीही असो पण तुर्तास अभिनंदन !  एका मोठ्या "रयतेचे राज्य संकल्पनेची" हत्या घडण्यापासून बचाव केला तरीही असा अविवेकी विचार आलाच कसा ? यांवर अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटल्या तशीच एक प्रतिक्रीया "शिवराय कोण होते ?" असा प्रश्न भविष्यात उपस्थित करणारी !! गडकिल्ले हेरिटेज हॉटेलसाठी की पर्यटन स्थळासाठी !         चालान वाढविण्याने भडकलेल्या जनतेच्या जखमांची शाई वाळते न वाळते तोच सरकारने गडकिल्ल्यावर हेरिटेज  हॉटेल बांधण्याचा निर्णय घेवून तमाम शिवरायांवर श्रद्धास्थान ठेवणा-या मनाची सरकारने कत्तल केलेली दिसून येत  आहे.गडकिल्ले  हे शिवरायांच्या राज्यकारभाराचे  सत्ताकेंद्र.ज्या  राजाने गडकिल्ल्यावरुन तमाम आदिलशाही,निजामशाही आणि मोगलशाहीला आव्हान दिलं,नव्हे तर त्यांची सत्ता उधळून  लावली.तसेच  याच किल्ल्याच्या आधाराने तमाम आपलं अस्तित्व न समजणा-या लोकांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन  दिली.आज  गडकिल्ले ही वास्तू जरी शोभेची वस्तू वाटत असली तरी त्या ठिकाणी एक एक किल्ला लढवितांना तिथे तमाम मावळ्यांचंच

आज विजयकुमार हळदे यांचा वाढदिवस ! यांना शुभेच्छा कोणत्या द्याव्या ? जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
पाच सप्टेंबर-शिक्षक दिन पाच सप्टेंबर-वाढदिवस ? विजयकुमार हळदे यांचा आज वाढदिवस ! शिक्षक दिनाच्या शिक्षण क्षेत्रातील सर्व ज्ञात-अज्ञात देश, समाज घडविण्यासाठी कटीबद्ध असलेल्या मान्यवर विभूतींना न्यूज मसाला परीवाराकडून हार्दिक शुभेच्छा !! अशाच एका शिक्षक नसलेल्या मात्र शिक्षकांइतकेच प्रभावी कार्य करणारे नासिक जिल्हा परिषदेतील कक्ष अधिकारी, जिल्हा परिषद व सरकारी कर्मचारी बॅंकेचे अध्यक्ष, कर्मचारी संघटना नेते विजयकुमार हळदे यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी हार्दिक शुभेच्छा !! शिक्षकी पेशा अंगीकारलेले शिक्षकांना शुभेच्छा आहेतच मात्र विजयकुमार हळदे यांचेही कार्य जिल्हा परिषद व सरकारी कर्मचारी यांना मार्गदर्शक ठरते, त्यांचे विचार व कार्य करण्याची पद्धत ही इतरांसाठी सदैव एका गुरुस्थानी मानते, संघटन व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची शैली, निवडणूक संपली की पुन्हा सर्वांशी मिळून मिसळून काम करण्याची पद्धत यामुळे ते राज्यस्तरीय नेते म्हणून गणले जातात , अशा व्यक्ती जर समाजात , प्रशासनात, राजकारणात असतील तर त्याही शिक्षकांप्रमाणे असतात किंबहुना द्रोणाचार्य हेच फक्त गुरु नाहीत तर त्यांचा पुतळाही एक

गणपती जरुर बसवा, पण सावधगीरी बाळगा - लेखक अंकुश शिंगाडे नागपूर यांच्या संस्कार मालिकेतील लेख खास न्यूज मसालाच्या वाचकांसाठी !! लेखावर एक नजर फिरवून शेअर करायला विसरू नका !!! सविस्तर माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
अंकुश शिंगाडे, नागपूर, यांच्या संस्कार या लेखमालिकेतील १ सप्टे. २०१९ रोजीचा लेख, गणपती बसविणाऱ्यांनी गणपती बसवावा पण सावधगिरी बाळगण्यातील निष्काळजीपणा व होणारे गणेशोत्सवाचे विडंबन याला कोणी जबाबदार आहे असे नाही मात्र सावधगिरी बाळगावी या प्रबोधनत्मक लेखाचा संयमी सूर सर्वांनाच भावेल अशी आशा -संपादक, न्यूज मसाला, नासिक. गणपती जरुर बसवा.पण सावधगीरी बाळगा           गणपती बाप्पा मोरया म्हणत आजकाल गणपती बापाची लोकांनी फँशनच निर्माण केली आहे.लोकांना वाटते की गणपती बाप्पाला मांडले आणि दहा दिवस पुजा केली की बस झालं.सा-या समस्या चुटकीसरशी सुटल्या.खरंच सुटतात का समस्या?याचे कारण नाही असंच असेल.पण तरीही आम्ही मांडतो आहोत.त्यासाठी लाखो रुपये खर्च करतो आहोत.का?तर आमच्या सुखासाठी.आमच्या चेह-यावर आनंद झळकावा यासाठी.....क्षणभर का होईना आम्हाला आमचे दुःख विसरता यावे यासाठी.....       गणपती या दहा दिवसात मातीची मुर्ती जरी असला तरी तो आम्हाला सजीव वाटतो.त्याच्यासाठी मग सर्वच काही करण्याच्या आमच्या कला आम्ही पणास लावतो.वेगवेगळे प्रसाद बनवुन त्याला भोग देतो.तो खात नाही हे माहीत असुनही सारंच काही त्या

भारतीय आयुर्विमा महामंडळाचा ६३ वा वर्धापन दिनानिमीत्त १ ते ७ सप्टेंबर २०१९ दरम्यान एलआयसी सप्ताहाचे आयोजन ! कर्मचारी व विमाधारकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा - वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक तुलसीदास गडपायले !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल www.newsmasala.in. संपादक नरेंद्र पाटील ,!!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
भारतीय आयुर्विमा महामंडळाचा ६३ वा वर्धापन दिन -१ सप्टेंबर २०१९          नासिक (३१)::-भारतीय आयुर्विमा महामंडळ ६३ वा वर्धापन दिन दिनांक १ सप्टेंबर २०१९ रोजी साजरा करीत आहे. १ ते ७ सप्टे. २०१९ या दरम्यान आयुर्विमा महामंडळाच्या सर्व कार्यालयांमध्ये "एलआयसी सप्ताह' साजरा केला जाणार आहे. या कालावधीमध्ये कर्मचार्यासाठी तसेच पॉलिसी धारकांसाठी विविध उपक्रम हाती घेतले जातील, अनेक सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम, जसे की गरजूंना लागणाऱ्या वस्तूंचे वाटप, वृक्षलागवड, आरोग्य शिबिर इ. या दरम्यान राबविले जातील.           सप्टेंबर १९५६ रोजी त्यावेळेस कार्यरत असलेल्या २४५ खासगी विमा कंपन्यांचे विलीनीकरण करून संसदेच्या एका कायद्यानुसार भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली. गेल्या ६३ वर्षांच्या प्रवासात भारतीय आयुर्विमा महामंडळ प्रत्येक वर्षागणिक अधिकाधिक जोमाने वृद्धिंगत झालेले आहे आणि आज विविध कसोट्यांवर या देशातील क्रमांक एकची वित्तसंस्था ठरलेली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने दावे निकाली काढण्याच्या आपल्या अनुकरणीय विक्रमाने कोट्यावधी भारतीयांचा विश्वास संपादन केला आहे. भारतीय आय

नासिक जिल्हा परिषद अभियंता सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली ! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल www.newsmasala.in - संपादक नरेंद्र पाटील !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
नासिक जिल्हा परिषद अभियंता सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली !       नासिक (१ सप्टे.)::-नासिक जिल्हा परिषद अभियंता सहकारी पतसंस्थेची २१ वी सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष जयराम गोवर्धने यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.           संस्थेला सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात कर्जवाटप व खर्च वजा जाता आठ लाख चार हजार रूपयांचा नफा झाला असून लेखापरिक्षणात 'अ' वर्ग मिळाला आहे.             आजच्या सभेत संस्थेचे अध्यक्ष जयराम गोवर्धने यांनी उपस्थित सभासदांशी वार्तालाप करताना सांगितले की, संस्था आपलीच समजून तिच्या प्रगतीसाठी मासिक वर्गणी, कल्याण निधी, कर्ज हप्ता दरमहा नियमित भरून सहकार्य करावे,  सभासदांनी कर्जाचा विनियोग स्वतासाठी व कुटुंबियांच्या कल्याणासाठी करावा, सभासदांची गरज लक्षात घेऊन कार्यकारी मंडळ तत्काळ कर्ज मंजूर करून देते. संस्थेच्या विकासासाठी जिप पदाधिकारी, सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखा व वित्त अधिकारी, सर्व खातेप्रमुख यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे, विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव, जिल्हा उपनिबंधक श्रीमती ज्यो

साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्काराने जळगाव जिल्ह्यातील  शिक्षकांचा सन्मान..... !! एक मोठं कुटुंब तयार झालं याचा मला अभिमान वाटतो, या कुटुंबातील  सदस्य शिक्षकांना सामना कराव्या लागणाऱ्या स्थानिक तसेच राज्यस्तरीय प्रशासकीय अडचणी सोडविण्यासाठी मी वेळोवेळी आपल्या सोबत राहील - अध्यक्ष संजय देवरे !!! एसकेडी चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम !!!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल www.newsmasala.in -संपादक नरेंद्र पाटील ,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्काराने जळगाव जिल्ह्यातील  शिक्षकांचा सन्मान.....          जळगाव ::- एस. के.डी.चॅरिटेबल ट्रस्ट आणि गिरणा गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख पाहुणे जळगावच्या प्रथम नागरिक सिमाताई भोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, यावेळी तहसीलदार कैलास चावडे, जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य चौधरी , जैन ग्रुपचे किशोर कुलकर्णी, एस.के.डी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संजय देवरे, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे सुरेश पवार आदी मान्यवर  उपस्थित होते.           पुरस्कार वितरणानंतरच्या एसकेडी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजय देवरे यांनी जिल्ह्यातील उपस्थित शिक्षक, त्यांचे आप्तेष्ट, मित्रपरिवार यांच्याशी संवाद साधताना आपल्या मनोगतात ग्रामीण भागातील पाहीलेले वास्तव व त्यातून पुढे समाजातील घटकांसाठी कार्य करणे, ही भावना रूजविण्याचे अपरोक्षपणे,  व अव्याहत कार्य शिक्षकांकडून केले जाते अशा सर्वच शिक्षकांचा हा गौरव सोहळा आहे, याप्रसंगी त्यांनी देवळा तालुक्यातील खेड्यातून मी तेथील शिक्षकांनी मला दिलेले सं

विविध सामाजिक संस्था, कारखाने यांनी त्यांच्या सीएसआर निधीचा ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेसाठी वापर करुन सामाजिक दायित्व निभाविण्याचे व जिल्हयातील ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्तेसाठी योगदान देण्याचे आवाहन-अध्यक्षा शितल सांगळे ! जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे सांगत विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणे गरजेचे-भुवनेश्वरी एस. !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल-संपादक नरेंद्र पाटील !!!!

इमेज
नाशिक – समाजाला समृध्द आणि सशक्त करण्याची क्षमता शिक्षणात आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे काळाची गरज आहे. विविध सामाजिक संस्था, कारखाने यांनी त्यांच्या सीएसआर निधीचा ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेसाठी वापर करुन सामाजिक दायित्व निभाविण्याचे व जिल्हयातील ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्तेसाठी योगदान देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी केले.         जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आज वडाळारोडवरील अशोका कॅम्पसमध्ये नाशिक कलेक्टिव्ह कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना सौ सांगळे बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत विविध सामाजिक संघटना, कारखाने यांचे एकत्रिकरण करण्यात येवून सीएसआर सेलची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत आज सर्व घटकांसाठी नाशिक कलेक्टिव्ह कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले.         पुढे बोलताना शितल सांगळे यांनी शाळाबाहय मुलांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असल्याचे सांगत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांप्रमाणेच क्रिडाविषयक सुविधा व म

वेडं मन तुझ्यासाठी, येईल, पोहचेल, ऐकशील,. न्यूज मसाला परीवाराकडून शब्दरुपी भावपूर्ण श्रद्धांजली !!!

इमेज
"वेडं मन तुझ्यासाठी" चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक विजयकुमार घोटे यांचं दुःखद निधन ! न्यूज मसाला परीवाराचा हितचिंतक आज दि. ३० आॅगस्ट २०१९ रोजी आपणा सर्वांना दुरावला, त्यांस शब्दरुपी भावपूर्ण श्रद्धांजली !!! विजू, तुला आई आणि वडील यांनी "विज्या" हि हाक मारली की नाही मला माहीत नाही, परंतु ते सोडून तुला मिळालेल्या आयुष्यात दुसऱ्या कुणी अशी हाक मारली नसेल, तुझा स्वभावच मुळी सडेतोड, परखड पण आदबशीर होता आणि आज अचानक तु आम्हा सर्वांना सोडून गेलास, अनेकांनी आज हक्काने व तुझ्या निघून जाण्याच्या दुःखाने  "विज्या" तुझं "वेडं मन तुझ्यासाठी" च राखून ठेवलं रे म्हणत बैलपोळ्याचा अमावस्येच्या दिवशी (जे तुला कधी पटत नव्हते) सर्वांचे "मन" खट्टू करुन गेलास !           आदिवासी समाज तुझ्याकडे एक पत्रकार, यशस्वी छायाचित्रकार, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, भावी राजकीय नेता, समाजाचा आधारस्तंभ अशा भावनेने सतत पहात होता, तुझ्या संपर्कात आलेल्या अनेकांना तुझा बौद्धिक व सामाजिक  सहवास हवाहवासा वाटायचा, नव्या धागूर ता. दिंडोरी जि. नासिक येथून मुंबई दिल्ली पर्य

२८ वी वार्षीक क्रिडा स्पर्धा २०१९ चा समारोप सोहळा कमांडट स्कूल ऑफ आर्टिलरी लेफ्ट.जनरल आर.एस.सलारीया यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला ! विजयी खेळाडू पुढील स्पर्धेसाठी पात्र ठरतील व यश संपादन करतील-पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल-संपादक नरेंद्र पाटील !!!!!

इमेज
नाशिक शहर पोलीस आयुक्तालय आयोजित २८ वी वार्षिक किडा स्पर्धा २०१९ चा समारोप सोहळा पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक शहर येथे कमांडट स्कूल ऑफ आर्टिलरी लेफ्ट.जनरल आर.एस.सलारीया यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. आजचा दिवस हा मेजर ध्यानचंद यांचा स्मृती दिन असल्याने संपूर्ण भारतात किडा दिन साजरा केला जातो. सदर किडा स्पर्धा २७ ते २९ ऑगस्ट, २०१९ या कालावधीत पार पडली.  किडा स्पर्धेत पोलास आयुक्तालयातील परिमंडळ १, परिमंडळ२, पोलीस मख्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय व इतर शाखा अशा ०४ संघांनी भाग घेतला होता. सदर स्पर्धेत एकुण १५० पोलीस खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धेमध्ये हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॅन्डबाॅल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो असे पुरुष सांधीक खेळ व महिलांकरीला व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबडडी, खो-खो यांचा समावेश होता. वैयक्तीक खेळांमध्ये पुरुष व महिलांचे १००, २००, ४००, ८००, १५०० मीटर धावणे, उंचउडी, लांबउडी, गोळाफेक, भालाफेक, रिले. क्रासकंट्री, मॅरेथॉन तसेच कुस्ती,  बाॅक्सिंग, वेटलिफ्टीग, जुडो, तायक्वांदो यांचा समावेश होता. स्पर्धा अतिशय उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बेस्ट अॅथ

नासिक पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी सारीका बारी रूजू ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !! बातमी मागच्या बातमीसाठी उत्तर महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल- संपादक नरेंद्र पाटील !!!

इमेज
नासिक पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी सारीका बारी रूजू ! नासिक::- पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांची बागलाण (सटाणा) येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्तपदी नंदुरबार जिल्हा परिषदेतून बढती बदलीने सारीका बारी यांनी आज नासिक पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.         सारीका बारी या मुळच्या धुळे जिल्ह्यातील असून त्यांचे शिक्षण उत्तर महाराष्ट्रातील नावाजलेल्या जय हिंद महाविद्यालय धुळे येथे झाले आहे. त्यांच्याशी आमच्या प्रतिनीधीने संपर्क साधला असता त्यांनी कुपोषण, शिक्षण व आरोग्य याविषयी काम करण्याचे मनोगत व्यक्त केले, त्याचबरोबर पंचायत समितीच्या इतर विभागातील कामकाजावर लक्ष देण्यात येईल, अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आपसातील विश्र्वासात दृढता निर्माण करून तालुक्याच्या विकासासाठी झटणार, प्रलंबित कामांचा निपटारा करतानाच नवीन कामांकडे लक्ष देण्यात येईल अशी माहिती दिली.