पोस्ट्स

जिल्हा परिषद कोरोनामुक्त ! सात्त्विक अन्नप्राशन, योग्य व्यायाम व प्रशासनाच्या सूचनांचे पालन केल्यास सहजपणे मात करू शकतो- अध्यक्ष क्षीरसागर !! जनतेनेही सोशल डिस्टन्सिंग पाळणे व महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्यास कोरोनाला हररविणे अवघड नाही- मुख्य कार्यकारी अधिकारी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
     नासिक जिल्हा परिषद कोरोनामुक्त                    नासिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट कोरोना पाॅझिटीव्ह आला होता, तत्काळ त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, ते आज कोरोनावर मात्र करून सुखरूप बाहेर पडले. नासिक जिल्हा परिषदेच्या एका संशयित रूग्णामुळे संपूर्ण जिल्हाभरात खळबळ माजली होती, आज या परिस्थितीतून जिल्हा परिषद कोरोनामुक्त झाली.             जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी जनतेला आवाहन करताना सांगितले की, आपला रोजचा आहार सात्त्विक अर्थात घरगुती आहार व त्यासोबत निवासी व्यायाम केल्यास शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीची क्षमता वाढीस लागते हा कोविड-१९ लागेल हरविण्याचा सर्वात मोठा उपाय आहे यासोबत प्रशासनाकडून आलेल्या सूचनांचे पालन केले तर कोरोना जिल्हाभरातून हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही.                 जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासनाने वेळोवेळी  केलेल्या विविध उपाययोजना व सूचना सर्व अधिकारी, कर्मचारी अंमलात आणतात यामुळे हाॅटस्पाट ठरलेल्या नासिक जिल्ह्याची मातृसंस्था असलेली नासिक

तहसीलदार उपस्थित नव्हते तर प्रांत यांची असहकाराची भूमिका ! अखेर खासदार व पदाधिकाऱ्यांनी निवेदन चिकटविले शासनाच्या वाहनाला !! कुठे घडला असा प्रकार, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी, निफाड यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस, खासदार भारती पवारांच्या आंदोलनाला निफाड प्रशासनाचे असहकार्य                 नासिक::- आज निफाड येथे भारतीय जनता पार्टी निफाड तालुका तर्फे शेतकऱ्यांच्या प्रश्नानंबाबत तहसील कार्यालय येथे दिंडोरी लोकसभा खासदार भारती पवार तसेच नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष केदा आहेर, निफाड तालुका अध्यक्ष भागवतबाबा बोरस्ते, लासलगाव मंडळ अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य डी. के. नाना जगताप, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश दायमा यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यासाठी गेले असताना मे. तहसीलदार उपस्थित नसल्याने भारती पवार यांनी प्रांत अर्चना पठारे यांना विनंती केली, आम्ही ५ लोक सोशल डिस्टन्स पाळून तुम्हाला निवेदन देणार आहोत, तुम्ही या, असे सांगितले, परंतु त्या त्यांच्या केबिन सोडून निवेदन घेण्यास न आल्याने शेवटी शासनाने दिलेल्या त्यांच्या वाहनास निवेदन चिकटवून निषेध करण्यात आला. एका लोकप्रतिनिधी खासदार यांना अशी वागणूक तर सामान्य जनतेचे सामान्य शेतकऱ्याचे काय ?  हा प्रश्न सर्वसामान्य जनतेस विचार करण्यासारखा आहे. यावेळी मीडिया प्रवक्ता तथा लासलगाव कृषी उत्पन्न बा

अनेक दिवसांपासून गोदावरी नदी ला लागलेलं पानवेलींच ग्रहण आम. बनकरांच्या प्रयत्नाने सुटले ! जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांची प्रतिक्रिया !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी, निफाड यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस, अनेक दिवसांपासून गोदावरी नदी ला लागलेलं पानवेलींच ग्रहण सुटले ! आमदार दिलीपराव बनकर यांच्या पाठपुराव्याला यश पानवेली काढण्यास सोमवार पासून झाली सुरवात             नासिक::-निफाड तालुक्यातील गोदाकाठावर असलेल्या गावांसाठी  आमदार दिलीपराव बनकर यांच्या प्रयत्नातून  जलसंपदा विभागाच्या वतीने पानवेली काढण्यास सुरवात करण्यात आली आहे.  नागरिक,शेतकरी व पर्यावरण प्रेमी यांनी समाधान व्यक्त केले आहे. नासिक शहरात तून सांड पाणी व कारखान्यातुन गोदावरी नदी पात्रात सोडले जाणारे रसायनयुक्त पाणी या मुळे गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होते, यामुळे पानवेली तयार होतात. या  पानवेली वाढीचा वेग कमी कालावधीत संपूर्ण गोदावरी चे पात्र व्यापून टाकतात. पानवेली नांदूरमध्यमेश्वर ते शिलापूरच्या जवळपास ३० किलोमीटर पर्यंत गोदेच्या पात्रात दरवर्षी पसरलेल्या असतात, पानवेली  मुळे, जलचर प्राणी मात्राचे अस्तित्व धोक्यात येत असते. तसेच पाणी ही प्रदुषित व  खराब होते. पानवेली लवकर नष्ट होत नाही. पावसाळ्यात पाणवेली अधिक अडसर ठरतात. इगतपुरी-त्रंबके

राजकारण करु इच्छिणाऱ्या राजकारण्यांनो अवकातीत रहा ! ..................आणि आज कुणीही उठतं आणि एकमेकांवर गलिच्छ पणे गरळ ओकतात, उदाहरणच द्यायचे झाले तर राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल या संवैधानिक पदांनाही सोडत नाहीत, बुजगावणे, रबर स्टॅम्प, मौनी, ५६ इंची, चायवाला, कोरोना, टरबुज्या, चंपा, तुझी उंची काय ? चाटुगिरी, झेरॉक्स,  ही काय विशेषणे वापरली म्हणजे जनतेने यांना नेता म्हणायचे ?.................. सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
राजकारण करु इच्छिणाऱ्या राजकारण्यांनो अवकातीत रहा !            "राजकारण करु इच्छिणाऱ्या राजकारण्यांनो अवकातीत रहा" असं म्हणणं सोपं आहे, त्याचे परिणाम किती अंगलट येतील त्यांचे मोजमाप करता येणे शक्य नाही. येथे मुद्दा असा आहे की प्रस्थापित राजकारणी हे प्रगल्भ गटात मोडतात. त्यांना जे राजकीय बाळकडू मिळालेत, धडे मिळालेत, त्यांच्या पाठीमागे "राजकारण" कसे करावे हे सांगणारे, शिकवणारे व नवतरुणांना राजकारणात आणताना ज्या तरुणांची भरती होत असे ते निवडून, पारखून घेतले जात होते, आजचे चित्र खूप विदारक आहे, लोकशाहीचा गळा घोटणारे वाटायला लागले आहे.          तत्कालीन परिस्थितीत तेव्हाचे नेते काय वागलेत, त्यांनी घेतलेले निर्णय देशासाठी चांगले की मारक ठरले हा विषय नाही मात्र राजकारणात प्रवेश देताना त्यांनी जे निर्णय घेतले ते अपवाद वगळता एक सक्षम नेतृत्व देऊ शकतो असे तरुण वाखाणण्याजोगे होते. अनेक पक्ष, पक्षांचे नेते देशपातळीवरील नवीन नेते घडविण्यासाठी काळजी घेत असत आणि आज त्याउलट परिस्थिती निर्माण झाली आहे. लुच्चे, लफंगे, भ्रष्टाचारी, घाण, बारीक, जाड, ढेरीवाले, खपाट ही विशेषणे तेव्ह

आरोग्य अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
              नासिक , दि .२५::- नंदुरबार जिल्हा परिषद, नंदूरबार अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी हरीचंद्र टिकाराम कोकणी, बटेसिंग नगर खांडबारा तालुका, नवापूर, जिल्हा नंदूरबार याने  ७५६५०/- रुपयांची लाचेची मागणी करून ५००००/- रुपये लाच स्वीकारली असता लाचलुचपत विभाग नासिक अंतर्गत नंदुरबार युनिट यांनी रंगेहात अटक केली आहे. या बाबत तक्रारदार यांनी तक्रार केली होती. तक्रारदार यांचे कुटूंबाच्या मालकीचे शासकीय मान्यताप्राप्त सोनोग्राफी सेन्टर नवापूर येथे असून त्याची कायदेशीर नोंद झाली आहे.  शासकीय योजनेअंतर्गत गरोदर मातां-पेशंट कडून तपासणी केल्यानंतर मोबदला न घेता  शासकीय दर प्रति पेशंट ४००/- रुपये या मानधनावर तपासणी करण्याचा करार झाला होता. त्याप्रमाणे नमुद कार्यालयाचे  लोकसेवक आरोपी डॉक्टर हरीचंद्र कोकणी यांनी प्रत्येक पेशंट मागे रुपये ५०/- प्रमाणे एकूण ७५६५०/- रुपयांची ची मागणी करून तडजोडी अंती रुपये ५००००/- ची लाच नवापूर येथे पंच व साक्षीदार यांच्या समक्ष मागणी केली  म्हणून गुन्हा नोंद केला आहे. सदरची कारवाई शिरिष जाधव पोलीस उप अधिक्षक, नंदूरबार युनिट, पोलिस निरीक्षक जयपाल अहिररराव, व  सहक

संपादकीय, नासिक ते दिल्ली एक शोकांतिका !! जनतेच्या कररुपाने जमा झालेल्या निधीवर डल्ला मारणारी जमात म्हणजे राजकारणी हा समज रुढ झालेला मानला जात असताना कुठेतरी निद्रीस्त शरमेला जाग येण्याचे दिवस आहेत, जो "विश्वस्त" यात जागा होईल त्याला जनता आजही "नेता", "हिरो" समजेल, वेळ गेलेली नाही, सोडा कुठेतरी "टक्केवारी, कमीशन, भ्रष्टाचार". जनतेच्या उद्रेकाची...............!!! न्यूज मसालाचा अंक व विविध बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
संपादकीय नासिक ते दिल्ली एक शोकांतिका ! जागतिक महामारी ने जगात थैमान घातले आहे, लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो आहे, अब्जावधी जनतेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत लग्न, वाढदिवस, अंत्ययात्रा तसेच वरीष्ठ-कनिष्ठ सभागृहांच्या सभा रद्द केल्या जात आहेत, भारताला शेजारी देशांशी लढायची वेळ आली आहे आणि......          नासिक महानगरपालिका, नासिक जिल्हा परिषद आॅनलाईन का होईना सभा घेत आहेत जेव्हा केंद्रीय अधिवेशन स्थगित केले जाते, महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन फक्त दोन दिवस घेण्याची तयारी सुरू आहे मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सभा घेण्याचा अट्टहास का ? विषय कोणताही असो पण जिथे टक्केवारी बाबत तोंड उघडले जाते याचा जर सर्वसामान्य जनतेने जाब विचारला तर राज्यकर्ते वा विरोधक किती तोंड लपवत फिरतील याची जाणीव नसावी यासारखे सुदैव की दुर्देव हे नियंत्यालाच माहीत. निवडून आलेल्या सदस्यांना "विश्वस्त" म्हणतात याचाही विसर पडतो काय ? जनतेला मुर्दाड समजण्याची चूक करणाऱ्यांबाबत जनतेनेच सुधारणा केली तर चित्र खूप वेगळं असेल ! जनतेच्या कररुपाने जमा झालेल्या निधीवर डल्ला मारणार

कौतुकास्पद !! शेतकरी पुत्र प्रमोद सावंत यांनी नायब तहसीलदार पदाला घातली गवसणी ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
संतोष गिरी निफाड यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस           नासिक, निफाड::- नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला. त्यात निफाड तालुक्यातील चांदोरी येथील प्रमोद सावंत याने नायब तहसीलदार पदाला गवसणी घातली आहे. चांदोरी गांवचे नाव रोशन  केल्याने चांदोरी गावासह जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे. प्रमोद ने  आपले प्राथमिक शिक्षण चांदोरी रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये पूर्ण केले, त्यानंतर पदवी साठी त्यानी अभियांत्रिकी विभागात मुंबई येथे पदवी व पदव्युत्तर चे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयाच्या अभ्यासा सोबत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास सुरु केला त्यात सलग चार वर्ष त्यांनी पूर्व परीक्षा पार करत मुख्य परीक्षेस पात्र झाले, त्या नंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या अभ्यास सुरु केला, पहिल्याच प्रयत्नात २०१९ मध्ये दिलेल्या परीक्षेत नायब तहसीलदार पदाला पात्र ठरला  आहे. त्यांनी नाशिक व दिल्ली येथे वाचनालयात जाऊन अभ्यास केला आहे. प्रमोद चे वडील निवृत्ती सावंत हे  शेतकरी व आई मंगल गृहिणी आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल चांदोरी ग्राम

ग्रामपंचायतींशी आॅनलाईन पद्धतीने संवाद साधणे सुरू ! राज्यातील पहीलाच उपक्रम कुठे अंमलात आणला गेला !! जाणून घ्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
                नाशिक- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा, तालुका तसेच ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेणे शक्य नसल्याने जिल्हा परिषदेने ऑनलाईन पद्धतीने ग्रामपंचायतींशी संवाद साधणे सुरू केले आहे. जिल्हा परिषद मुख्यालयातुन सरपंच,उप सरपंच पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामसेवक, तालुकास्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला जात असून कोरोनाबाबत तसेच विविध विकासकामांबाबत आढावा घेण्यात येत आहे. अशाप्रकारे थेट ग्रामसेवक व सरपंच यांच्याशी ऑनलाईनद्वारे संवाद साधण्याचा राज्यातील हा पहिलाच उपक्रम असून याद्वारे कोरोनाबाबत उपाययोजना तसेच लॉकडाउनमुळे रखडलेली विविध विकासकामे पूर्ण करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमतीलीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारपासून हा उपक्रम सुरू झाला आहे. दररोज दोन किंवा तीन तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींशी  विडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन संपर्क करण्यात येत असून यामध्ये विविध विषयांचा आढावा तसेच मार्गदर्शन करण्यात येत आहे. यामध्ये ग्रामपंचायत विभाग

टोकाचा निर्णय घेण्याआधी दहा वेळा विचार करा !! निसर्ग सुद्धा कोरोना च्या निमित्ताने हेच तर सांगत नसावा ना ! एन.के.मोरे , राजाजी सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
एन. के. मोरे, राजाजी आत्महत्या करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा,,,,,,                    कोरोना च्या महामारीत सर्व जगावर संकट आले आहे,,आपल्याच भारत देशात नव्हे तर चीन सारख्या देशात भूकबळी ने लोक मरतात आहे,,आत्महत्या करण्यापूर्वी एक वेळ  आपल्या पेक्षा ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे त्यांच्या कडे बघा,,,आज झोडपट्टीत राहणारे रस्त्याच्या कडेला राहणारे लोकांकडे बघा , त्याना चिंता नाही का उद्याची,,,,रोजंदारीवर जाणारे, हॉटेल मध्ये काम करणारे, धुनी भांडी करणारे, ही माणसे नाही का? त्यांना पण भविष्याची चिंता नसेल का, त्यांना कोरोनाची भीती वाटत नसेल का, पण तरीही बघा त्यांच्या कडे किती आनंदात जे काही रोज मिळते त्या वर गुजराण करीत आहेत,,, पण ते विचार नाही करत आत्महत्या करण्याचे, या फोटो मध्ये जे दोघे जण दिसतात, ते गिरणारे जवळील धोंडे गावातील आहेत हिरामण खाडे व त्याचा मेव्हणा आज सकाळी ५ वाजता घर सोडून कामासाठी नाशिक ला आले, माझ्या बंगल्यातील नारळाच्या झाडावरील नारळ उतरवून दिले त्यात दोन तीन तास त्यांचे गेले, मजुरी ६०० रु., मिळाली शेजारील पाटील काकू व डॉ शिवदे यांच्या कडील नारळ काढून दिले दोन्ही म

राजीव खंडेलवाल लिखीत ! ‘‘जांबाज शहीदों को देश का सलाम‘‘ अधिक जानकारी के लिये नीचे दी गयी लिंक को क्लिक करें !!!

इमेज
‘‘जांबाज शहीदों को देश का सलाम‘‘ राजीव खंडेलवाल                                                                                         (लेखक वरिष्ठ कर सलाहकार )                                                                                                                                                                                                                                          प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा राजनीतिक पार्टियों की सर्वदलीय बुलाई गई बैठक में गलवान घाटी में शहीद हुये 20 जाबाजों की घटना के बाबत आवश्यक जानकारी दी गई। प्रधानमंत्री ने स्पष्ट शब्दों में यह कहा कि गलवान घाटी में हमारी सीमा में न तो कोई घुसा है और न ही घुसा हुआ है और न ही हमारी कोई ‘‘पोस्ट’’ किसी दूसरे के कब्जे में है। प्रधानमंत्री के उक्त कथन का राष्ट्रीय हित में न केवल स्वागत किया जाना चाहिए, बल्कि उस पर कोई शक की गुंजाइश किये बिना, उन्हें इस बात के लिये बधाई भी दी जानी चाहिए कि उन्होंने अपने उस कथन को सही सिद्ध कर दिखाया कि भारत की एक इंच भूमि पर भी किसी शत्रु देश का कब्जा नह