संपादकीय- काॅग्रेस संपवायला कोण निघाले आहे ? ** सावरगाव खुर्द ते देवरगाव रस्त्याचे वाजले बारा ! ** महावितरणच्या गलथान कारभारामुळे व्यावसायिक अंधारात ! ** इतर बातम्यासह सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
काॅग्रेस संपवायला कोण निघाले आहे ! काॅंग्रेसमुक्त भारत करण्याची भाषा भाजपकडून २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केली गेली, १२५ वर्षांपेक्षा अधिक परंपरा असलेल्या काॅंग्रेसला संपविणे भाजपाला ही अवघड वाटत असेल म्हणून दुधाची तहान ताकावर भागवावी या उक्तीप्रमाणे भाजपाने प्रचार केला, भारताला काॅंग्रेसमुक्त करण्याची जबाबदारी मतदारांवर सोपविण्यात आली पण संपविण्याची भाषा ना मतदारांना करू दिली ना स्वत: भाजपाने उचलली, यांतच खरी गोम आहे ती समजणाऱ्यांनी समजून घ्यावी व समजू न शकणाऱ्यांनी "डोक्याची दही" करू नये हा मानसिकतेच्या खेळाचे फासे फेकून भाजपा नामानिराळा झाला, याचा भाजपाला अपेक्षित असलेला फायदा तर झाला, मग संपविण्याची भाषा कोणी करावी ? राष्ट्रीय काँग्रेस संपत चालली असून पूर्णपणे संपलेली नाही, केंद्रात विरोधी पक्ष नेतेपदी बसण्याइतके संख्याबळ मिळवू न शकणे हा "संपली" असा गृहीत धरणे चुकीचे वाटते. सक्षम नेतृत्व मिळाले तर पुन्हा उभारी घेणे काॅग्रेसला शक्य आहे पण गांधी घराणे एकाधिकारशाही व रिमोट कंट्रोल ठेवण्याचे काम जोपर्यंत थांबवत नाही तोपर्यंत काठावर पास नव्हे त