पोस्ट्स

एलन करिअर इन्स्टिटयूट आता नाशिक मध्ये ! २८ डिसेंबरपासून सुरु होतील नीट व आयआयटी, जेईई च्या बॅचेस ! आता नाशिकमध्ये मिळेल ३३ वर्षाच्या कोटा कोचिंगचा लाभ ! आयआयटी, जेईई, नीट, एमएचटी -सीईटी ची होणार तयारी ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
एलन करिअर इन्स्टिटयूट आता नाशिक मध्ये !                 २८ डिसेंबरपासून सुरु होतील नीट व आयआयटी, जेईई च्या बॅचेस ! आता नाशिकमध्ये मिळेल ३३ वर्षाच्या कोटा कोचिंगचा लाभ !                 आयआयटी, जेईई, नीट, एमएचटी -सीईटी ची होणार तयारी ! नाशिक - दि . ११: मेडिकल आणि इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या एलन करिअर इन्स्टिट्यूटने आता नाशिकमध्ये आपले केंद्र सुरु केले असून, नाशिकच्या प्रेरणादायी वक्त्या व योग गुरु छोट्या गुरु माँ , एलन करिअर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष जीवनज्योती अग्रवाल व एलन च्या मुंबई शाखेचे मार्गदर्शक  अमित मोहन अग्रवाल यांनी विधिवत पूजन आणि फित कापून अनौपचारिक शुभारंभ केला. नीट आणि आयआयटी, जेईई  च्या विद्यार्थ्यांसाठी दि २८ डिसेंबर पासून कॅनडा कॉर्नर स्थित बिजिनेस स्क्वेअर येथे नवीन बॅचेस सुरु होणार असून, त्याची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. छोटी गुरु माँ यांनी यावेळी बोलताना सांगितले की , शिक्षणाबरोबरच संस्कार सुद्धा फार महत्वाचे आहेत. घरातील मोठी माणसं असतील किंवा शिक्षक यासर्वांनी विद्यार्थ्यांवर योग्य त्या संस्कारासाठ

वसईत एकाच दिवशी २० ठिकाणी होणार महारक्तदान ! वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
वसईत एकाच दिवशी २० ठिकाणी होणार महारक्तदान ! वसई चा राजा गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम !!               वसई (गुरुदत्त वाकदेकर) : रक्तदान म्हणजे जीवनदान. रक्ताचं नातं हेच जिव्हाळ्याचं नातं असतं. कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर वसई विरार रक्तदान महोत्सवाच्या अंतर्गत वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या   वतीने १२ डिसेंबर २०२१ रोजी द्वितीय महारक्तदान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच दिवशी विविध २० ठिकाणी विविध सामाजिक संस्थांतर्फे वसई तालुक्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीदत्त मंदिर, रमेदी, वसई येथे महारक्तदानाची सुरूवात होईल. सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात वसई विरार तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहान वसईचा राजा गणेशोत्सव मंडळाचे निलेश भानुशे यांनी केले आहे. द्वितीय महारक्तदान महोत्सवासाठी योगेश भानुशे (वसईचा राजा), जितेंद्र पोतदार (रमेदी आळी), स्वप्नील परुळेकर (रूद्र तांडव), प्रशांत कदम (भास्कर आळी), मंगेश म्हस्के (स्वराज्य यूथ फ

पवारांच्या वाढदिवशी शिवडी तालुक्यात रक्तदान ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
पवारांच्या वाढदिवशी शिवडी तालुक्यात रक्तदान !    (गुरुदत्त वाकदेकर यांजकडून)            मुंबई :: रक्तदान म्हणजे जीवनदान. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने १२ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अभ्युदय एज्युकेशन सोसायटीज् हायस्कूल, काळाचौकी येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात शिवडी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहान शिवडी तालुका अध्यक्ष उमेश येवले यांनी केले आहे. १८ ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्ती रक्तदान करू शकतात. कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसाने रक्तदान करता येते. कोविड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसाने तर दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसाने रक्तदान करता येते.  कोविड संकटाच्या काळात रक्त तुटवड्यामुळे ज्यांना नियमित रक्ताची गरज भासते असे थॅलेसीमिया, सिकलसेल रुग्णांचीही गैरसोय होत आहे. गर्भवती मातांसह अपघातग्रस्तांना

इंडिया फर्स्ट नीडल फ्री व्हॅक्सिन भारतात पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यामध्ये ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिक जिल्ह्यामध्ये केंद्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार covid-19 लसीकरण अधिक सुलभतेने होणे कामी तसेच शंभर टक्के लसीकरण यशस्वी होणे कामी इंडिया फर्स्ट नीडल फ्री व्हॅक्सिन भारतात पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यामध्ये दिले जाणार आहे यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत त्याची पूर्वतयारी म्हणून मा. जिल्हाधिकारी सुरज मांढरे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांचे मार्गदर्शनानुसार जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यालयामार्फत जिल्हा प्रशिक्षण केंद्रामध्ये ग्रामीण भागातील आरोग्य सेविकांचे इन्स्ट्रुमेंट हाताळणीचे  एक दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते यामध्ये covid-19 प्रतिबंधात्मक झायडस कंपनीची लस आता शासनामार्फत दिली जाणार आहे यासाठी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात covid-19 लसीकरणाचे काम करणाऱ्या आरोग्य सेविका यांचे प्रशिक्षण जिल्हास्तरावर घेण्यात आले यामध्ये झायडस कंपनीचे फार्माजेट हे इन्स्ट्रुमेंट तयार केले असून या इंस्ट्रूमेंट द्वारे लस दिली जाणार आहे हे नीडल फ्री वॅक्सिंग असून आत्तापर्यंत  एकही लस न घेतलेल्या व्यक्तींना ती दिली जाणार आहे त्यासाठी जिल्हास्तरा

विजयालक्ष्मी मणेरीकर यांचा काव्यसंग्रह “हृदयरंग” चे प्रकाशन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
विजयालक्ष्मी मणेरीकर यांचा काव्यसंग्रह “हृदयरंग” चे प्रकाशन नाशिकच्या लेखिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांचा पहिला कवितासंग्रह “हृदयरंग “ चे प्रकाशन ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज प्रकाशित झाला. सुप्रसिद्ध समीक्षक , वक्ते, लेखक  मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. दिलिपराज प्रकाशनचे मॅनेजिंग डायरेक्टर मसापा चे अध्यक्ष राजीव बर्वे, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उपाध्यक्ष प्रा. प्रशांत पाटील , मराठी प्रकाशन मंचाचे प्रमुख वसंत खैरनार, तसेच जी पी खैरनार, अर्जुन वेलजाळी , शशांक मणेरीकर , प्रमोद पुराणिक, प्रकाश कोल्हे , राजेन्द्र नारखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा संग्रह प्रकाशित झाला. यात एकूण ९५ कविता आहेत. हा कविता संग्रह प्रेम कवितांचे संकलन आहे. यातील कविता मुक्तछंदातल्या आहेत. प्रत्येकाच्या हृदयाच्या कुपीत दडलेल्या प्रेमभावनांचे प्रकटीकरण या कवितांतून प्रकट होते. या संग्रहातील काही काव्यपंक्ती… व्रण - तू बोलला नाहीस पण दिसले व्रण कोणी बोचकारून हळवे केलेले तुझे मन चेहरे - कवितेत त्या म्हणतात - चेहरे बरंचं काह

आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांसाठी बहुउद्देशीय शेडचे लोकार्पण ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
आदिवासी भागातील शाळांसाठी बहुउद्देशीय शेडचे लोकार्पण !  नाशिक ( प्रतिनिधी )- विद्यार्थ्यांचे संस्कारवर्ग, सांस्कृतिक व अन्य कार्यक्रम कोरोनाच्या काळात मोकळेपणाने घेता यावेत या उद्देशाने मुंबईतील माटुंग्याच्या अजरामर महिला मंडळातर्फे पेठ तालुक्यातील कुळवंडी व कोहोर येथील जि.प.शाळांना प्रशस्त बहुद्देशीय शेड बांधून देण्यात आले. नुकतेच या शेडच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त दोन्ही शाळेतील ५०० विद्यार्थ्यांना स्वेटर, चॉकलेट, बिस्किट, चिक्की, कॅडबरी, ,फळे व शिरा यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबद्दल विद्यार्थी, शिक्षकांनी व पालक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.           यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमास सेवा ग्रुपचे संचालक चंद्रकांतभाई देढिया , शिक्षक हरिश्चंद्र भोये (पाटे), विजय भोये (घोसाळी), तसेच दोन्ही शाळेतील शिक्षकांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी घंटेवाड, मुरलीधर महाले यांनी केले तर कोहोर व कुळवंडी शाळेचे मुख्याध्यापक बोरसे सर, भोये सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी अजरामर ग्रुपच्या अध्यक्षा पानबाई

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे !  मंत्री सुभाष देसाई यांची मागणी ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे !  मंत्री सुभाष देसाई यांची मागणी !    नाशिक( प्रतिनिधी)  ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सकाळच्या सत्रात काल ( दि.३ ) मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी मंत्री देसाई व भुजबळ यांनी राष्ट्रपतींना ‘पत्र’ लिहिले.केंद्र सरकारने २००४ साली भाषांना ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानुसार मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी लेखी शिफारस केंद्र सरकारने नेमलेल्या भाषातज्ज्ञांच्या समितीने एकमताने केलेली आहे.त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा त्वरित मिळायला हवा असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री ना. सुभाष देसाई यांनी केले.        प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा, महानुभावी धर्मभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे.           या संदर्भातील अनेक पुराव्यांनी सिध्द झाले आहे की, मराठी ही अभिजात भाषा आहे. तरी  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा असे  मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई  यांनी सांगितले.साहित्य संमेलनात अभिजात मराठी भाषा दालन निर्माण करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन काल सकाळी मान्य

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा...     जवळपास सारे जग  वेठीस धरणाऱ्या कोरोनाच्या संकटामुळे, यंदा मार्च महिन्यात नाशिकला होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ९ महिने लांबणीवर पडले. आता ते ३ ते ५ डिसेंबर दरम्यान होणार आहे. भुजबळ नॉलेज सिटीच्या परिसरात होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ संशोधक, शास्त्रज्ञ व विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर आहेत. यापूर्वी नाशिकला १९४२ साली ऑक्टोबर महिन्यात २७ वे व २००५ साली जानेवारी महिन्यात ७८ वे  अशी दोन संमेलने झाली होती. नाशिकला समृद्ध अशी साहित्यिक, सांस्कृतिक परंपरा आहे. नाशिक ही मंत्रभूमी, देवभूमी, धर्मभूमी, कर्मभूमी, स्वातंत्र्य चळवळीतील शौर्यभूमी, साहित्य क्षेत्रातील सारस्वतांची भूमी, मोक्षभूमी तसेच आधुनिक काळातील तंत्रभूमी म्हणून ओळखली जाते. नाशिक हे जनस्थान म्हणजे साधकांसाठी सिद्धस्थान आहे. श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही तपोभूमी आहे. येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो; तशीच सारस्वतांची मांदियाळी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तीन दिवस जमणार आहे.   नाशिकला साहित्य, संस्कृतीची दीर्घ व समृद्ध परंपरा लाभलेली आहे. ये

नव्या पिढ्यांमध्ये कलापरंपरा  रुजवणारे संपत ठाणकर !  लेखाचा उत्तरार्ध वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नव्या पिढ्यांमध्ये कलापरंपरा  रुजवणारे संपत ठाणकर  (उत्तरार्ध)   अभ्यासू आदिवासी वारली चित्रकार संपत ठाणकर सातत्याने कलेच्या  प्रसारासाठी प्रयत्नशील आहेत. स्वतः चित्रे रेखाटण्याबरोबरच जमातीतील इतर प्रज्ञावंत कलावंत, लेखक, कवी यांचा ते शोध घेतात. त्यांना प्रोत्साहन देण्याचेही काम करतात. हाडाचे शिक्षक असल्याने स्वस्थ न बसता नोकरीव्यतिरिक्त त्यांनी असंख्य आदिवासी मुलांना वारली चित्रकला शिकवली आहे. त्यातील अनेकजण पारंगत होऊन कलेच्या माध्यमातून उदरनिर्वाह करीत आहेत. कुडाच्या भिंतीवरची ही कला जगभरात पोहोचली. मात्र वारल्यांच्या नव्या पिढ्यांनी आपली परंपरा, संस्कृती विसरु नये ही संपत यांची तळमळ आहे. त्यासाठी वारली चित्रकलेवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या तिन्ही भागात तपशीलवार, सचित्र मार्गदर्शन केले आहे.    'वारली चित्रकला' या पुस्तकाच्या पहिल्या भागात ही कला ठिपके, रेषा व सोप्या-मूलभूत आकारांवर आधारित आहे हे संपत यांनी सोदाहरण सांगितले आहे. रेखाटनाचा सराव कसा करावा हे देखील ते सांगतात. त्रिकोण, वर्तुळ व चौकोन या प्राथमिक भौगोलिक आकारांचा वापर करून मानवी आकृत्या, त्यांच्या हाल

त्र्यंबकनगरीत २२ नोव्हेंबरपासून रंगणार राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धा ! पिंच्याक सिलॅट खेळाविषयी थोडक्यात जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
त्र्यंबकनगरीत २२ नोव्हेंबरपासून रंगणार राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धा !           नाशिक : महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन आयोजित ११ व्या राज्यस्तरीय पिंक्याच सिलॅट स्पर्धा २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान त्र्यंबकेश्‍वर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत अशी माहिती इंडियन पिंच्याक फेडरेशनचे अध्यक्ष तथा महा. पिंच्याक सिलॅट असोसिएशनचे महासचिव किशोर येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.           त्र्यंबकेश्‍वर येथील ओम जगद्गुरू जनार्दन स्वामी, मौनगिरी महाराज आश्रमात होणाऱ्या पिंच्याक सिलॅट स्पर्धा सर्व वयोगटातील महिला आणि पुरुष खेळाडूंसाठी खुल्या आहेत. स्पर्धेत राज्यभरातील ३४ जिल्ह्यातील सुमारे ७०० खेळाडू यामध्ये सहभागी होणार असून पहिल्या दिवशी (दि.२२) १० ते १४ वयोगटातील २३० खेळाडू खेळणार आहेत. मंगळवार (दि.२३) १४ ते १७  वयोगटातील २४० तर तिसऱ्या दिवशी (दि.२४) १७ ते ४५ वयोगटातील २३० खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती येवले यांनी दिली. स्पर्धेचे उद्घाटन दुपारी दोन वाजता खासदार हेमंत गोडसे, किशोर येवले, तृप्ती बनसोडे व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. बक्षीस वितरण २३ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वा