पोस्ट्स

वेदात नाही असा कोणताही विषय जगात नाही : तेजोमयानंद

इमेज
वेदात नाही असा कोणताही विषय जगात नाही : तेजोमयानंद !        नाशिक ( प्रतिनिधी) "वेदात नाही असा कोणताही विषय जगात नाही. वेदांचे सामर्थ्य अतर्क्य व मानवी बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडचे आहे." असे प्रतिपादन चिन्मय मिशनचे विश्वप्रमुख स्वामी तेजोमयानंद यांनी केले. ते दत्तजयंती निमित्त शंकराचार्य सभागृहात आयोजित प्रवचनप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चिन्मय मिशनचे नाशिक आश्रमाचे प्रमुख स्वामी अद्वैतानंद, पपू मोहन महाराज गाणगापूरकर उपस्थित होते. यावेळी प्रभा आठवले यांनी लिहिलेल्या श्री गुरुचरित्र सारायण या सात खंडातील ग्रंथाचे गुरूंना अर्पण करण्यात आले.        स्वामीजी पुढे म्हणाले, "वेद म्हणजे ज्ञान भांडार. आपण एखादा विषय शिकतो ते प्रत्येक शास्त्र खूप मोठे. त्या सर्वांचा साठा म्हणजे वेद होय. असा कोणताच विषय नाही जो वेदात नाही. वेद हे श्वासाप्रमाणे भगवानांकडून प्रकट झाले. वेद अभ्यास कठीण असल्याने रामायण, महाभारत निर्माण झाले, गीता निर्माण झाले. गुरुचरित्र वाचा. मनुष्यदेहाचा उपयोग कसा करावा यासाठीचे बुकलेट म्हणजे वेद. ज्या विषयाचे ज्ञान प्रत्यक्ष किंवा प्रमाण याद्वारे होऊ शकत

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचाकॅपजेमिनी सॉफ्टवेअरशी करार !

इमेज
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचा कॅपजेमिनी सॉफ्टवेअरशी करार !      मुंबई (प्रतिनिधी)::- वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी कॅपजेमिनी सॉफ्टवेअरने करार केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे.          विद्यार्थ्यांची निवड तसेच त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना कॅपजेमिनीच्या तंत्रज्ञानाचा आणि अभियांत्रिकी कार्यबलाचा भाग बनण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि त्यांना उद्योगासाठी तयार करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे जी काळाची गरज आहे, असे विचार प्रतिष्ठानचे सरचिटणीस आप्पासाहेब देसाई यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे अध्यक्ष सुरेश उपाध्ये काळाच्या पडद्याआड !

इमेज
अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे अध्यक्ष सुरेश उपाध्ये काळाच्या पडद्याआड !           मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ८२ वर्षीय जुनी सुप्रसिद्ध अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर -मुंबई या नामांकीत संस्थेचे अध्यक्षपद गेली अनेक वर्षे समर्थपणे सांभाळणारे सुरेश उपाध्ये यांचे शुश्रुषा रुग्णालयात गुरुवारी सकाळी निधन झालं.      शिक्षकी नोकरीतून निवृत्त झाल्यावर आपल्या जीवनाचा उर्वरीत काळ त्यांनी कीर्तन संस्थेला दिला.कीर्तनसंस्थेचा आर्थिक तसेच सर्व प्रकारचा कारभार त्यांनी निस्पृहपणे चोखपणे सांभाळला. उत्तम वक्तृत्व , शिस्तप्रिय आणि  मोत्यासारखे सुंदर अक्षर , सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच लयीत , एका ओळीत सुबक पणे सर लिहीत. आजपर्यंत अनेक कीर्तनकार घडवण्यात तसेच कीर्तन संस्थेचे वर्षभर विविध उपक्रम त्यांनी राबवले. आजारपणात सुद्धा कीर्तन संस्थेचाच विचार त्यांच्या मनात होता. संस्थेच्या आणि त्यांच्याशी निगडित संस्थाच्या वतीने २० डिसेंबर रोजी संस्थेच्या सभागृहात द ल वैद्य मार्ग दादर येथे शोकसभेचे आयोजन केले असल्याचं प्रमुख विश्वस्त रवींद्र आवटी यांनी सांगितले

स्वामी तेजोमयानंद यांचे दर्शन आणि सत्संगाचे शनिवारी आयोजन !

इमेज
स्वामी तेजोमयानंद यांचे दर्शन आणि सत्संगाचे शनिवारी आयोजन !          नाशिक (प्रतिनिधी) देशात आणि जगभरात कार्यरत असलेल्या चिन्मय मिशनचे परमपूज्य स्वामी तेजोमयानंद यांचे दर्शन आणि सत्संग कार्यक्रम शनिवार दि. १० डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता पंचवटी चिंचबन येथील आश्रमात करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित राहून त्यांच्या सत्संगाचा लाभ घ्यावा असे आवाहन अश्रामातर्फे करण्यात आले आहे. स्वामी तेजोमयानंद हे १९९४ ते २०१४ दरम्यान चिन्मय मिशनचे प्रमुख होते. नंतर २०१७ पासून स्वामी स्वरूपानंद हे चिन्मय मिशनचे प्रमुख आहेत. त्यांना २०१६ मध्ये देशातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण देवून भारत सरकारने गौरविले आहे. ते कोईमतूर येथील चिन्मय सेंटर ऑफ वर्ल्ड अंडरस्टान्डींग, दिल्ली, चिन्मय इंटरनशनल स्कूलचे देखील प्रमुख आहेत. याबरोबरच त्यांनी वेदांत तत्वज्ञानावर शंभरावर पुस्तके लिहिली आहेत. बऱ्याच काळानंतर तेजोमयानंद यांचे नाशिकमध्ये आगमन होत असून या सत्संगास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन चिन्मय मिशनच्या वतीने करण्यात आले आहे.  

जिल्हा परिषद शाळेत होणार "विनोबा" ऍपचा वापर !जिल्हा परिषद व ओपन लिंक्स फाउंडेशन मध्ये सामंजस्य करार !

इमेज
जिल्हा परिषद शाळेत होणार "विनोबा" ऍपचा वापर ! जिल्हा परिषद व ओपन लिंक्स फाउंडेशन मध्ये सामंजस्य करार !      नाशिक : जिल्हा परिषद व ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या माध्यमातून पुढील काळात जिल्हा परिषदेतील शिक्षकांसाठी "विनोबा ऍपचा" वापर करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी ओपन लिंक्स फाउंडेशनकडून जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांशी निगडित सर्व प्रकारच्या माहितीचे संकलन हे विनोबा नावाच्या ऍप मध्ये करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, ओपन लिंक्स फाऊंडेशन चे संजय दालमिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.     आचार्य विनोबा भावे शिक्षक सहायक ऍप           शिक्षणाच्या अनुभव बाबतीत शाळेतील ९०% विद्यार्थ्यांवर त्यांच्या शिक्षकांचा प्रभाव असतो. "विनोबा" हा एक माहिती तंत्रज्ञानावर आधारीत ऍप आहे. भारतामध्ये उच्च गुणवत्तेवर आधारीत K -१०  शिक्षण पध्द्ती आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.  शिक्षकांचा दैंनदिन कामात

गुजरात विधानसभेतील विजयाचा नाशिक भाजपाकडून जल्लोष...!

इमेज
गुजरात विधानसभेतील विजयाचा नाशिक भाजपाकडून जल्लोष...!           नाशिक- गुजरात विधानसभा निवडणूकीत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पुन्हा एकदा १८२ जागांपैकी १५६ पेक्षा अधिक जागांवर भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय  मिळविल्याबद्दल भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने भाजपा कार्यालय वसंतस्मृती येथे कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत तसेच एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला.             या जल्लोषाप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश सचिव रेहान मेमण, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगुरकर, जगन पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे, रोहिणी नायडू, काशिनाथ शिलेदार, अरुण शेंदुर्णीकर, सागर धर्माधिकारी, सुरेश पाटील, चंद्रकांत थोरात, फिरोज शेख, माधवी पढार, विजय बनछोडे, शाहिन मिर्झा , शिवाजी गांगुर्डे,  प्रा.कुणाल वाघ, रुची कुंभारकर, हेमंत शुक्ल, चारुदत्त आहेर, सुनिल देसाई, विश्वास पारनेरकर, राकेश पाटील, सोनल दगडे, धनंजय पळसेकर, उदय जोशी, वसंत उशीर, विनायक कस्तुरे, सोनाली कुलकर्णी, सुशमा गोराणे, सुरेश पिंगळे

बहुविकलांग बालकांचा प्रश्न ऐरणीवर !शासनाने सहकार्य करावे ही माफक अपेक्षा !!

इमेज
बहुविकलांग बालकांचा प्रश्न ऐरणीवर ! शासनाने सहकार्य करावे ही माफक अपेक्षा !!       नाशिक ( प्रतिनिधी ) सध्या निराधार, बेवारस बालकांवरील अत्याचाराच्या घटनांनी शहर परिसर हादरुन गेला आहे. नुकताच बाल लैंगिक शोषण प्रतिबंध दिन झाला. आज (दि.३) जागतिक दिव्यांग दिन आहे. घारपुरे घाटाजवळच्या आधाराश्रम संस्थेत वयोमर्यादा पूर्ण केलेली १० बहुविकलांग बालके असून त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांना नियमानुसार योग्य संस्थेत दाखल करण्याची गरज आहे. यानिमित्ताने हे मंथन.    नाशिकमध्ये आधाराश्रम ही संस्था गेली ६८ वर्षे निराधार बालकांना आधार देऊन त्यांच्या संगोपनाचे, पुनर्वसन करण्याचे काम करते. मातापित्यांनी टाकून दिलेली, अनौरस, एकल पालकांची तसेच बेवारस आढळलेली बालके जिल्हा रुग्णालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष व जिल्हा बालकल्याण समिती या संस्थांच्या मार्फत कायदेशीर प्रक्रिया करून आधाराश्रमात दाखल होतात. एक दिवस ते ६ वर्षे वयाचे ३० मुलगे तर एक दिवस ते १२ वर्षे वयाच्या ९० मुली सध्या येथे आहेत. या आकड्यांवरून अजूनही समाजात मुलींना स्वीकारण्याचा दृष्टिकोन किती संकुचित, नकारात्मक व अपरिपक्व आहे हे लक्षात येते. आ

श्री बाबा रामदेवजींचा जम्मा जागरण ५ डिसेंबरला ! नाशिकच्या रामदेवजी भक्त परिवाराने केले आयोजन !

इमेज
श्री बाबा रामदेवजींचा जम्मा जागरण ५ डिसेंबरला !  नाशिकच्या रामदेवजी भक्त परिवाराने केले आयोजन !     नाशिक::- येथील रामदेवजी भक्त परिवारातर्फे ‘ श्री बाबा रामदेवजी यांचा विशाल जम्मा जागरण’ कार्यक्रम सोमवार ५ डिसेंबर २२ रोजी दुपारी १ वाजेपासून ते रात्रीपर्यंत धनदाई लॉन्स येथे आयोजित केला आहे. हैदराबाद येथील संगीतकार व कथाकार सुशिल गोपल बजाज हे हा कार्यक्रम सादर करणार आहे.        या कार्यक्रमात दुपार पासून होम हवन, अखंडज्योत, भजन, जन्म वृत्तांत, कथा ब्यावला, महाप्रसादी व महाआरती होणार आहे.  तर या कार्यक्रमाचे आयोजन समिती तर्फे स्वप्नील जैन, रुपाली गौड, तृप्ती जैन, संजय लोढा, प्रा. सीए. लोकेश पारख, नंदकिशोर हरकुट, सचिन कोठारी हे विशेष परिश्रम घेत आहे.         या जम्मा जागरण सोहळ्यात सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन रामदेवजी भक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे.

सदाचारी बनो जीवन में आगे बढो !

इमेज
सदाचारी बनो जीवन में आगे बढो !    नासिक::- बॉईज टाऊन पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम व्यक्तिमत्व व बदलत असलेली शिक्षण पद्धती यांचे महत्व सांगण्यासाठी  दि. २५ नोव्हेंबर रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ यांचे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.        आजच्या समाजात शिक्षणाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शिक्षणाचे बरेच उपयोग आहेत परंतु त्यास एक नवीन दिशा देणे आवश्यक आहे. शिक्षण आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आवश्यक साधन आहे. आपल्या जीवनात शिक्षणाची ही साधने वापरुन आपण काहीही चांगले साध्य करू शकतो. उच्च स्तरीय शिक्षण लोकांना सामाजिक आणि कौटुंबिक आदर ठेवण्यास आणि एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करते. शिक्षणाचा काळ हा सर्वांसाठी, सामाजिक आणि वैयक्तिकरित्या खूप महत्वाचा काळ आहे, यामुळेच आपल्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व  आहे.आजच्या आधुनिक  आजच्या काळात शिक्षणाची पातळी वाढवण्यासाठी अनेक पद्धती अवलंबल्या जातात हे सांगताना त्यांनी गुरुकुल पद्धतीचे शिक्षण व त्याचे फायदे देखील विविध उदाहरणांतून विद्यार्थ्यांसमोर मांडले; तसेच करोना महामारी

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक

इमेज
महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतावर मागील अनेक शतकांत विविध परकीय शक्तींनी आक्रमण केले तरीही आपण कायमच देश म्हणून अखंड राहिलो. संस्कृती, आहार, विचारात विविधता असूनही एवढा मोठा खंडप्राय देश म्हणून कसा टिकला, याचे आश्चर्य वाटते, पण अनेक आक्रमणानंतरही भारताला काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत महाभारत आणि रामायण या दोन महाकाव्यांनी एकत्र जोडून ठेवले, ही साहित्याची ताकद असून ते अमोघ आहे, जोपर्यंत हे दोन ग्रंथ आहेत तोपर्यंत देशाच्या धर्माला धोका नाही. भारताचा एकच धर्म तो म्हणजे साने गुरुजींनी आम्हाला शिकवलेला मानवता धर्म. जगाला प्रेम अर्पावे, हाच आमचा धर्म, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले.          यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा यशवंतराव चव्हाण पुरस्कार त्यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर,