वेदात नाही असा कोणताही विषय जगात नाही : तेजोमयानंद
वेदात नाही असा कोणताही विषय जगात नाही : तेजोमयानंद ! नाशिक ( प्रतिनिधी) "वेदात नाही असा कोणताही विषय जगात नाही. वेदांचे सामर्थ्य अतर्क्य व मानवी बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडचे आहे." असे प्रतिपादन चिन्मय मिशनचे विश्वप्रमुख स्वामी तेजोमयानंद यांनी केले. ते दत्तजयंती निमित्त शंकराचार्य सभागृहात आयोजित प्रवचनप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चिन्मय मिशनचे नाशिक आश्रमाचे प्रमुख स्वामी अद्वैतानंद, पपू मोहन महाराज गाणगापूरकर उपस्थित होते. यावेळी प्रभा आठवले यांनी लिहिलेल्या श्री गुरुचरित्र सारायण या सात खंडातील ग्रंथाचे गुरूंना अर्पण करण्यात आले. स्वामीजी पुढे म्हणाले, "वेद म्हणजे ज्ञान भांडार. आपण एखादा विषय शिकतो ते प्रत्येक शास्त्र खूप मोठे. त्या सर्वांचा साठा म्हणजे वेद होय. असा कोणताच विषय नाही जो वेदात नाही. वेद हे श्वासाप्रमाणे भगवानांकडून प्रकट झाले. वेद अभ्यास कठीण असल्याने रामायण, महाभारत निर्माण झाले, गीता निर्माण झाले. गुरुचरित्र वाचा. मनुष्यदेहाचा उपयोग कसा करावा यासाठीचे बुकलेट म्हणजे वेद. ज्या विषयाचे ज्ञान प्रत्यक्ष किंवा प्रमाण याद्वारे होऊ शकत