एकदा सर्वांनी कवयित्री फरझाना इकबाल यांची पंढरीच्या "विठ्ठलाच्या भेटीसाठी मन विठाई विठाई" रचना ऐकायला हवी !

ख्यातनाम कवयित्री फरझाना इकबाल यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या कवितेला गायक रमेश गुजर यांनी दिलेली चाल आणि त्यांच्याच सुमधुर आवाजात गायिलेल्या कवितेच्या ओळींनी विठ्ठल प्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे. सध्या पंढरीच्या वारीची लगबग सुरू आहे. वारक-यांचे अनेक विडीओ बघून मन प्रसन्न होते. मात्र या कवितेने विठ्ठल वारी साहित्यात नवीन भर टाकली आहे असे कवयित्री फरझाना इकबाल यांनी सांगितले. गायक रमेश गुजर यांचे आभार मानत विठ्ठल चरणी आपली सेवा रूजू झाली अशा भावना व्यक्त केल्या. 
सर्वांनी सदर रचना एकदा ऐकायला हवी !


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !

आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।